Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(२२८) ...आणि याबाबतीत स्त्रियांना त्याचप्रमाणे हक्क आहे परिचित पद्धतीनुसार जसे पुरुषांचे हक्क त्यांच्यावर आहेत. मात्र पुरुषांसाठी स्त्रियांपेक्षा एक दर्जा अधिक आहे आणि अल्लाह सर्वांवर प्रभुत्वशाली, विवेकी आणि ज्ञाता आहे.
(२२९) तलाक दोन वेळा आहे नंतर स्त्रीला  एकतर सर्वसंमत पद्धतीने आपल्याजवळ ठेवून घ्या किंवा सन्मानपूर्वक तिला  निरोप द्या.२५० आणि तुमच्यासाठी हे वैध नाही की जे काही तुम्ही त्यांना दिले आहे त्यातून काहीही परत घ्यावे. २५१ अपवाद फक्त जर त्या दोघांना भय वाटत असेल की अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांचे ते पालन करू शकत नाहीत. नंतर जर तुम्हाला भय वाटत असेल की ते दोघे अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांवर कायम राहू शकत नसतील तर त्यांच्यामध्ये असा समेट घडविण्यामध्ये कोणताही अपराध नाही की पत्नीने आपल्या पतीला प्रतिदान देऊन स्वत:ला मुक्त करून घ्यावे.२५२ या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत त्यांचे उल्लंघन करू नका आणि जे अल्लाहच्या मर्यादाचे उल्लंघन करतील तेच अत्याचारी आहेत.

250) अरब अज्ञानता काळात पती आपल्‌या पत्नीला अनेक तलाक देत असे. ज्‌या स्त्रीशी तिचा पती नाराज झाला तर तिला तो पुन्हा पुन्हा तलाक देऊन समेट (रुजू) घडवून आणत असे, जेणेकरून ती बिचारी पतीबरोबरसुद्धा राहु शकत नसे की पूर्ण मुक्त होऊन दुसऱ्याशी निकाहसुद्धा करू शकत नसे. कुरआनची ही आयत याच अत्याचाराचे दार बंद करते. या आयतच्‌या प्रकाशात एक पती आपल्‌या पत्नीला जास्तीतजास्त दोनदाच रजई तलाक देऊ शकतो. अशी तलाक की ज्‌यानंतर समेट होऊ शकतो म्हणजे पुन्हा पत्नी म्हणून राहु शकते चा अधिकार वापरु शकतो. जो मनुष्‌य आपल्‌या पत्नीला दोनदा तलाक देऊन तिच्‌याशी समेट करतो, तो आपल्‌या आयुष्‌यात जेव्‌हा कधी तिला तिसरा तलाक देतो तेव्‌हा पत्नी त्याच्‌यासाठी कायमचीच वेगळी होते.
तलाक देण्याची योग्य पद्धत जी कुरआन आणि हदीसनुसार आहे ती म्हणजे पत्नीला मासिकपाळी व्‌यतिरिक्तच्‌या काळात एक तलाक दिला जावा. एक तलाक दिल्‌यानंतर जर त्याची इच्‌छा असेल तर दुसऱ्या पाळीनंतर दुसऱ्यांदा एक तलाक द्यावा. अन्यथा योग्य हेच आहे की पहिल्‌याच तलाकवर थांबावे. या स्थितीत पतीला हा अधिकार राहातो की इद्दत (तलाकनंतरचा कालावधी) संपण्यापूर्व जेव्‌हा वाटेल समेट (रुजू) करावा आणि ईद्दतकाळ संपला तरी दोघांच्‌यासाठी संधी उपलब्‌ध असते की पुन्हा परस्पर सहमतीने पुन्हा निकाह करावा. परंतु तिसऱ्या वेळी तिसऱ्या पाक (स्वच्‌छ) स्थितीत तिसऱ्यांदा तलाक दिल्‌यानंतर मात्र पतीला समेटाचा अधिकार राहात नाही आणि दोघांचा पुन्हा निकाह करण्याची संधी बाकी राहात नाही. एकाच वेळी तीन तलाक देण्याची आजकालच्‌या अडाणी लोकांची प्रथा शरियतनुसार मोठा भंयकर गुन्हा आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी याविरुद्ध कडक शब्दांत निंदा केली आहे. आणि माननीय उमर (रजि.) तर एकाच वेळी तीन तलाक देणाऱ्याला कोडे मारण्याची शिक्षा देत असत.
251) म्हणजे महर आणि दागदागिणे, कपडे इ. पती आपल्‌या पत्नीला दिले तर त्यातील कोणतीही वस्तू परत घेण्याचा अधिकार त्याला नाही. ही गोष्ट इस्लामच्‌या नैतिकतेच्‌या विरुद्ध आहे की एखादी वस्तू जी त्याने दुसऱ्याला देणगी (हिबा, हदीया) रुपात भेट दिली असेल तिला पुन्हा परत मागावे. या हीन कार्याला हदीसमध्ये त्या कुÍयाची उपमा दिली आहे जो स्वत: केलेल्‌या उलटीला चाटतो. खासकरून एक पतीसाठी तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की त्याने तलाक दिल्‌यावर तलाक पश्चात पत्नीला निरोप देतांना त्या वस्तू परत मागाव्‌यात ज्‌या त्याने तिला दिल्‌या होत्या. याउलट इस्लामने ही शिकवण दिली आहे की तलाकपश्चात पत्नीला निरोप देतांना आणखी काही द्यावे. जसे पुढे आयत नं. 241 मध्ये स्पष्ट केले आहे.
252) शरियतमध्ये यास "खुलअ' म्हणतात. म्हणजे पत्नीने आपल्‌या पतीला काही देवून तलाक देणे होय. याविषयी पत्नी आणि पतीदरम्यान घरातल्‌या घरात मामला निश्चित झाला असेल तर त्यानुसार कार्यवाही होईल. परंतु जर न्यायालयात मामला गेला तर न्यायालय या गोष्टीचा शोध घेईल की खरोखरच या स्त्रीला आपल्‌या पतीची इतकी घृणा आहे की यापुढे दोघांचा निभाव लागणे अशःय आहे. याची पडताळणी झाल्‌या वर न्यायालय परिस्थितीनुरुप जो काही फिदीया (रक्कम) तजवीज करील ती फिदया रःकम देवून पत्नी आपल्‌या पतीपासून विभक्त होते. फिकाहशास्त्रींना बहुतेक मान्य नाही की जो माल पतीने त्या पत्नीला दिला होता त्यास परत घेताना जास्त काही देण्यात यावे.
"खुलअ'च्‌या स्थितीत जो तलाक दिला जातो तो रजई नव्‌हे तर बाईना आहे. म्हणजे पती समेट (रुजू) करु शकत नाही परंतु दोन्हींच्‌या सहमतिने निकाह होऊ शकतो.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget