Halloween Costume ideas 2015

चीनचा देव आन् भारताचा देव्हारा

- अ‍ॅड. मो. यूसुफ थोरात, ९९७५८९५१७८
आधुनिक युगात माणूस एकमेकांच्या जवळ येत आहे. कॉम्प्युटरने आणि इंटरनेटने त्यातभर टाकली. पृथ्वीच्या त्या टोकाचा माणूस या टोकाच्या माणसाशी बोलू लागला, त्याला पाहू लागला. विचारांची देवाणघेवाण होऊ लागली आणि पुढे पुढे एकमेकांना व्यापारिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सैनिकी इत्यादी मदत होऊ लागली. देशादेशामध्ये मैत्री होऊ लागली आणि एकमेकांसाठी मदतीचा हात पुढे येऊ लागला. शेजारी देश एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होऊ लागले आणि सर्वत्र आनंद दरवळू लागला. भारत देश याला अपवाद नाही. पण सीमावादाने, आतंकवादाने साऱ्याआनं दावर विरजन टाकले. शेजारी शेजारी देशांमध्ये संशय, द्वेष, रागयाचे वातावरण पूर्वीच्या आनंदावर मात करू लागले आहे.
चीन देश भारताच्या पूर्वेस आहे. त्याची सीमा भारताच्या पूर्वोत्त सीमेला लागू आहे. भारत त्याच्याकडून मैत्रीची अपेक्षा ठेवून असताना तो नसल्या खोडकर बालकासारखा खोडसाळपणा करीत राहतो. तरीही भारत त्याच्यासोबत व्यापारिक संबंध ठेवून चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न करीत राहतो. मोठा भाऊ लहान भावाची समजूत काढीत असताना दिसतो. हे भारताचे मोठेपण आहे. कोणताही देश केवळ दारूगोळ्यांनी मोठा होत नसतो. देश मोठा होण्यासाठी त्या त्या देशातील लोकांची मनं देशासाठी मोठी पाहिजेत. भारतीयांची मनं देशासाठी मोठी आहेत म्हणून भारतात चिनी मालावर बहिष्कार टाकला जात असल्याचे दिसते. ज्या भारताच्या निर्यातीमधून मिळालेल्या पैशातून चीन दोन वेळचे जेवण जेवतो त्या चिन्यांच्या समोरील ताट ओढण्याची हिंमत भारतातील सर्वसामान्यांच्या मनात आणि मनगटात आहे, याचा विश्वास चिनीमालावरील बहिष्काराने स्पष्ट केला.
ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्याचा घाट, काश्मिरच्या उत्तरेकडील सीमावर्तीभागातून पक्क्या सडक निर्माण योजना आखून त्याला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणे, सिक्कीम माझा म्हणणे, नकाशांमध्ये अरुणाचलला स्वत: म्हणून ठरविणे, ...आणि आता डोकलामवर डोकं लढवत बसणे इत्यादी त्याच्या कोडकर सवर्इंना भारतीय लोक चिनीमालावरील बहिष्काराने सडेतोड उत्तर देणार आहेत... देत आहेत. ही बाब खरोखरच स्वागतार्ह आहे. एखाद्या शत्रूदेशाला केवळ बंदुकीच्याच गोळीने उत्तर देता येत नाही तर, खरेदी-विक्रीच्या माध्यमातून म्हणजे व्यापारिक संबंधातून सुद्धा उत्तर देता येते. याचे प्रॅक्टिकल भारतीयांनी करायला सुरूवात केली आहे.
भारतामध्ये चिनीमाल ज्या दारातून येतो ती दारे कायमचीच बंद व्हायला पाहिजे, पण सरकार तसे तर करीत नसेल तर, आम्ही भारतीय जनता त्या मालाला विकतच घेणार नाही. या पर्यायाचा उपयोग करणार आहोत. या बहिष्काराच्या बाणांचा वर्षाव आम जनता तर काय साधूसंत सुद्धा करू लागले आहेत. काही ठिकाणी वकीलमंडळींनी सुद्धा या बहिष्काराच्या बोहल्यावरपाय ठेवला आणि जनमत बनविणे सुरू केले आहे. बहिष्काराचे शस्त्र, राजकीय चर्चा यातून डोकलामचा प्रश्न सुटणारच असं बुद्धिवंतांना वाटू लागले आहे. पण त्यांचं मन परत परत त्या देव्हाऱ्याकडे वळते आणि चिंताग्रस्त होते आहे. ज्यामध्ये चिनी देव जाऊन बसलेला आहे. भारतातील बहुसंख्य मूर्तिपूजकांनी आपापल्या देव्हाऱ्यात त्या चिनी देवाला जागा दिली आहे. घर असो की दुकान सर्वत्र हा चिनी देव पूजनीय म्हणून भारतातील कोट्यवधी देवांना मागे टाकून हा पुढे झाला आहे.
हा चिनीदेव म्हणजे गलेलठ्ठ माणसाची बसलेली मूर्ती आहे. या मूर्तीचे पोट बाहेर निघालेले असून डोक्यावर केस नाहीत. ही अर्धनग्न मूर्ती भारतीय पेहरावातील धोतर नेसलेली आहे. कानात मोठमोठी कुंडलं आणि देवीदेवतेप्रमाणे अलंकार घातलेली दिसते. ही चीनमधून चिनीदेव म्हणून आलेली मूर्ती भारतातील मूर्तीपूजकांनी आपापल्या घरात, दुकाना, ऑफीसमध्ये पूजास्थानावर बसवून ठेवली आहे. या मूर्तीवर व तिच्या पूजनावर बहिष्कार घालून तिला भारताच्या सीमेबाहेर घालवणे हा खऱ्या अर्थाने चीनवर बहिष्कार होईल. अन्यथा आपली मानसिकता चीनची गुलामी पत्करण्याच्या योगतेचीझाली आहे असे समजा! चीन सीमावादात जरूर हारेल, पण तुमच्या मूर्तिपूजन मानसिकतेवर त्याने विजय मिळविला आहे.
इस्लाम मूतिपूजनाला विरोध करणारा धर्म आहे. मूर्तिपूजा करणे ही मानवीय विकृती असल्याचेही अनेक विद्वानांनी सांगितले, पण मूर्तिपूजक आपला मूर्तीपूजनाचा नाद सोडत नाहीत उलट देशातील धर्माच्या देवांमध्ये अजून भर म्हणून त्यांनी चिनी देव आपल्या देव्हाऱ्यात इतरदेवांसमवेत बसविला आणि मोठ्या श्रद्धेने त्याची पूजाकरणे सुरू केले आहे. आज चिनी मालावर बहिष्कार टाकणाऱ्यांनी या गोष्टीवर विचार करणे गरजेचे आहे.
कोणताही देश तोपर्यंत स्वतंत्र होत नाही जोपर्यंत त्याची मानसिकता बदलत नाही. भारत एक स्वतंत्र देश आहे, पण मानसिकता इंग्रजांच्या गुलामीची आहे. देशाला ‘आपला देश’ म्हणण्याची बोलीभाषा आहे जरूर, पण वागणूक मात्र साताऱ्याला लुटण्याचीच. बोफोर्सपासून बैतुलमालापर्यंत सारा भ्रष्टाचार. आता देशी माल वापरावा याकरिता स्वदेशी चळवळ चालविल्या गेल्याचे आपण पाहिले आहे, पण पाहतापाहता स्वदेशी चळवळ भ्रष्टाचाऱ्यांच्या वाळवीने खाऊन टाकली. आजकाल काय झालं, माणसं विकली जातात. मीच मोर्चा काढतो, मागणी करतो. तुम्हाला जगवतो आणि ज्याला विरोध करतो त्यालाच मोर्चेकरी विकतो. पाकीट घेतो आणि आंदोलन बंद पाडतो. शेतकऱ्यांचे मोर्चे, मराठा आरक्षणाचे मोर्चे याचे उदाहरण होऊ शकतात. अशी चर्चा ऐकिवास आल्यानंतर दु:ख वाटते. असेच चिनी मालाचेही होईल की काय याची भीती वाटते. ‘चिनी देव आणि भारताचा देव्हारा’ हे समीकरण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण चीनवर विजय मिळवू शकत नाही, मग या चीनीमालाच्या बहिष्कार आंदोलनात साधूसंत उतरो की वकील... रिझल्ट मात्र निल!
चिनीदेव भारतात आला तरी कसा या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी आपण मूर्तिपूजेची उत्पत्ती कशी झाली यावर विचार करू या. मूर्तिपूजा करणारे मुळात सत्य नाकारणारी मानसिकता जोपासणारे लोक असतात. सत्याला नाकारणे म्हणजे असत्याला सत्य म्हणून स्वीकारणे होय. असत्याला सत्य समजूुन स्वीकारणारी मानसिकता मूर्तिपूजेचे उगमस्थान आहे. त्याशिवाय भयातूनही मूर्तिपूजेचा उगम असल्याचे दिसते.म्हणजेच असत्याला सत्य समजून स्वीकारणारी भ्याड मानसिकता मूर्तिपूजेचे उगमस्थान आहेहे स्पष्टहोते. भारतीयांची हीच मानसिकता ओळखून चीनचा देव नेपाळमार्गे भारतात घुसला आणि मूर्तिपूजकांच्या देव्हाऱ्यात जाऊन बसला. नव्हे! घुसविला गेला. मग याला भारतात घुसविण्याचे काय कारण असेल बरे,... तर याचेकारण असे की कोणत्याही देशाला आपल्या अधीन कसे करता येईल याचा विचार शत्रूदेश करीत असतो. भारतीयांची मानसिकता दैववादी आहे आणि मूर्तिपूजा हा त्याचाच एक महत्वपूर्ण भाग आहे. चीनचा देव पुजता पुजता भारतीयांची मानसिकता चीनची गुलामी पत्करण्यास अनुवूâल होऊन भविष्यात भारतावर मानसिक गुलामी लादण्यास सोपे जाईल हा प्रयत्न चीनचा आहे.
धर्माची पकड त्या त्या धर्मातील लोकांवर राहावी यासाठी मूर्तिपूजक धर्मांमध्ये देवांच्या पुजण्याचे प्रथा रूढ आहे. बुद्धानंतर बुद्धाची मूर्ती बनवून त्याची पूजा करणे, जैनाचेही तसेच आणि येशूचेही तसेच. वास्तविक मी देव आहे अथवा माझे मृत्यूनंतर माझी पूजा करावी असे कोणीही म्हटले नाही. बुद्ध तरक भौतिकवादी होते, पूजेला तेथे स्थान नाही. पण तरीही धर्माची पकड आपल्यामार्पâत त्या त्या धर्माच्या लोकांवर राहावी याकरिता धर्ममार्तंडांनी मूर्तिपूजेला प्रोत्साहन दिले. यातूनही मूर्तिपूजेचा उगम झाला असे दिसते. इस्लाम याला अपवाद आहे. मुसलमानांच्या घरात देव्हारा नाही. मस्जिदमध्ये मूर्ती नाही.
इंग्रजांनी भारतावर अडीचशे वर्षे राज्य केले. जमीन जिंकण्यासाठी बंदुका वापरल्या, युद्धे केलीत आणि मानसिक गुलामी लादण्याकरिता धर्मप्रचारक आणलेत. आज इंग्रज गेलेत, भारत स्वतंत्र झाला पण भारतातील ‘ती’ मानसिक गुलामी कायम आहे. इस्लामबाबत तसे नाही. भारतातील केरळचा हिंदू राजा चेरामन पेरुमल अरबस्थानात गेला. त्याला इस्लाम पटला म्हणून त्याने इस्लाम कबूल केला. त्याच्या अनुयायांना सुद्धा इस्लाम पटला म्हणून त्यांनी स्वत: इस्लाम भारतात आणला. कोण्या अरब माणसाने इस्लाम भारतात आणला नाही अथवा भारतीयांवर लादला नाही. भारतातील पहिली मस्जिद केरळमध्ये आहे. तिचे नाव चेरामन पेरुमल मस्जिद असे आहे.
आजसुद्धा ज्यांना इस्लाम पटतो तो इस्लाम कबूल करतो. मुस्लिम बनतो. धर्मांतरामध्ये इतर धर्मांतून इस्लाममध्ये दाखल होण्याचे प्रमाण फार जास्त आहे. येथे मानसिक गुलामी नाही. व्यक्तिस्वातंत्र्य आहे. एकता आहे. समता आहे. भारताला गिळण्याचे स्वप्न नाही, उलट भारताला चुकीच्या मानसिकतेतून काढण्याचा - वाचविण्याचा प्रयत्न आहे. इस्लाम शुद्ध लोकशाहीचा स्वीकार करणारा धर्म आहे. भारतीयांचा धर्म आहे, कारण भारतातील अनेक आध्यात्मिक ग्रंथ ऋग्वेद, कल्किपुराण, अध्यात्मपुराण, बौद्धस्कंद इत्यादी धर्मग्रंथांनी पैगंबर मुहम्मद (स.) विषयी त्यांचे जन्माचे दोन हजार वर्षापूर्वी माहिती दिली आहे.
चीनचे मात्र तसे नाही त्याने भारताला आपल्या कचाट्यात करकच्च पकडून ठेवण्यासाठी, नव्हे! गिळंकृत करण्यासाठीच भारताच्य देव्हाऱ्यात चीनचा देव घुसविला आहे. चीनची आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इत्यादी सर्व गुलामी भारतीयांवर लादून त्यांच्यावर राज्या करायचे आहे. येथे साम्यवाद उभारावयाचा आहे. लोकशाही नष्ट करायची आहे. भांडवलवादाचा शत्रू म्हणून भारतीयांना पुढे करायेच आहे. त्याला धर्मप्रचार तर मुळीच करायचा नाही तर चीनव्रती मानसिक गुलाम तयार करावयाचे आहेत. डोकलाम हा मुद्दा भारतीयांचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेले कृत्य आहे. भारतीयांचे लक्ष भारतातील चीनच्या इतर हालचालींपासून विचलीत करून सीमेवर आणून ठेवण्यासाठी रचलेला डाव आहे. भारतात माक्र्सवादी, लेनिनवादी, नक्षलवादी चळवळींकडून भारतीयांचे लक्ष विचलीत करणे सामान्य जनतेची मूर्तिपूजक मानसिकता पाहून मूर्तिपूजेत गुंतवून ठेवणे आणि अजगराने हळूहळू आपली शिकार गिळंकृत करावी तसे भारताला गिळंकृत करावे असा मनसुबा आहे.
इस्लाम अशा कृत्यांचा निश्चित धिक्कार करतो. आणि शुद्ध लोकशाहीला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करतो. जगात बावन्न मुस्लिम देश आहेत. तेथे पंचावन्न टक्क्यांच्या वर केवळ मुस्लिम आहेत. तेथील प्रत्येक मुस्लिमाला आपापल्या देशाप्रती प्रेम आहे. भारतातील मुस्लिमसुद्धा भारतावर प्रेम करतात अन्यथा ते केव्हाचेच पाकिस्तानमध्ये स्थानांतरित झाले असते, कारण तशी वेळ आली होती. सिंध व पंजाबमधील मुस्लिमेतरांना देशप्रेम नव्हते म्हणून ते भारतात आले या जनविचारांना येथे बळकटी मिळते आणि त्यांच्या भारतप्रेमावर प्रश्नचिन्ह जनता उभी करते, ही शोकांतिका आहे. असेच चीनचा देव भारताच्या देव्हाऱ्यात बसलेला पाहून इतरांना ते चीनप्रेमी असल्याचे वाटेल ना?
श्रद्धा मोठी की पूजन मोठे याच तुलना आगामी काळात होईल अशी आशा आहे. सत्य असत्य ओळखण्याची दृष्टी सर्वांना आपापल्या परीने लाभेल. असत्याला सोडून सत्याला स्वीकारण्याची शक्ती अल्लाह सर्वांना देईल. देवही नको अन् देव्हारेही नको असे लोक म्हणतील आणि चीनदेवाला पळता भुई थोडी होईल, तेव्हाच आपण जिंकू!
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget