Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(२२४) अल्लाहच्या नावाचा उपयोग अशा शपथग्रहण करण्यासाठी उपयोग करू नका की त्यामुळे सदाचार, धर्मपरायणता आणि लोककल्याणाच्या कार्यापासून तुम्ही परावृत्त व्हाल.२४३ अल्लाह तुमच्या सर्व गोष्टी ऐकणारा आणि जाणणारा आहे. (२२५) अल्लाह तुम्हाला तुमच्या निरर्थक शपथांबद्दल पकडणार नाही२४४ परंतु ज्या शपथा तुम्ही प्रामाणिकपणे घेता त्याविषयी तुम्हाला अवश्य विचारले जाईल. अल्लाह अत्यंत क्षमावंत आणि सहनशील आहे.
(२२६) जे लोक आपल्या पत्नींशी संबंध न ठेवण्याची शपथ घेतात त्यांच्यासाठी चार महिन्यांचा अवधी आहे.२४५ जर त्यांनी पुन्हा संबंध प्रस्थापित केले तर अल्लाह क्षमावंत व कृपावंत आहे.२४६ (२२७) आणि जर त्यांनी तलाकचाच विचार केला असेल२४७ तर लक्षात ठेवा अल्लाह सर्व काही ऐकणारा व जाणणारा आहे.२४८ 
(२२८) ज्या ाqस्त्रयांना तलाक दिली गेली असेल त्यांनी तीन ऋतुस्रावांपर्यंतच्या काळापर्यंत प्रतिक्षा करावी. आणि त्यांच्यासाठी हे वैध नाही की अल्लाहने त्यांच्या गर्भाशयांत जे काही घडविले आहे ते त्यांनी लपवावे. त्यांनी मुळीच तसे करू नये, जर त्या अल्लाह आणि अंतिम दिनावर विश्वास ठेवीत असतील. त्यांचे पती त्यांच्याशी संबंध सुधारण्यास तयार असतील तर ते या इद्दतच्या काळात त्यांना आपल्या पत्नी म्हणून परत स्वीकार करण्याचे हक्कदार आहेत.२४९ 

243) हदीस कथनाने माहीत होते की ज्‌या व्‌यक्तीने एखादी शपथ खाल्ली आणि नंतर त्याला कळले की या शपथेला तोडणेच योग्य आहे तर त्याला शपथ तोडून दिली पाहिजे आणि प्रायश्चित (कफ्‌फारा) दिले पाहिजे. शपथ तोडण्यासाठी प्रायश्चित मूल्‌य दहा दीनदुबùयांना पोटभर जेवू घालणे किंवा त्यांना पोषाख देणे किंवा एक गुलाम स्वतंत्र करणे किंवा तीन दिवसाचे रोजे ठेवणे आहे. (पाहा कुरआन,  5:89) 
244) अर्थात ज्‌या शपथा विनाहेतू अनवधानाने मुखातून निघतात अशा शपथांवर कफ्‌फारा (प्रायश्चित) नाही की त्यांच्‌यावर पकडसुद्धा होणार नाही.
245) शरियतच्‌या परिभाषेत यास "ईला' म्हणतात. पती-पत्नीच्‌या दरम्यान संबंध नेहमीच चांगले राहु शकत नाहीत. गैरसमजुतीची कारणे तर निर्माण होतच असतात. परंतु अशा गैरसमजुतीला आणि बिघाडाला अल्लाहची शरियत पसंत करीत नाही की, दोन्ही एक दुसऱ्यासोबत कायद्याच्‌या दृïीने पती-पत्नी राहावेत, परंतु व्‌यवहारात एक दुसऱ्यापासून असे विलग व्‌हावे जणू पती-पत्नीच नाही. अशा बिघाडसाठी अल्लाहने चार महिन्याची समयसीमा निश्चित केली आहे. या काळात एकतर त्यांनी आपले संबंध सुरळीत करावे किंवा पती पत्नी संबंध तोडून टाकावेत जेणेकरून एक दुसऱ्यापासून स्वतंत्र होऊन ज्‌याच्‌याशी निभाव होईल त्याच्‌याशी निकाह करावा. आयतमध्ये ""शपथ घेण्याचे'' शब्‌द वापरले आहे. यासाठी हनफी आणि शाफई धर्मशास्त्रींनी या आयतचा हेतू असा समजला की ज्‌यावेळी पती-पत्नीने आपले संबंध तोडण्याची शपथ घेतली तेव्‌हाच आदेश लागू होतो. परंतु मालिकी विद्वानानुसारी अशी शपथ जरी घेतली गेली असेल किंवा नाही, दोन्ही स्थितीत संबंधविच्‌छेदसाठी समयसीमा चार महिन्याचीच आहे. इमाम अहमद यांचे कथन याच समर्थनात आले आहे. (बिदायतुल मुज्‌तहीद, भाग 2 पृष्ठ 88)
246) काही धर्मशास्त्रींनी याचा अर्थ असा घेतला आहे की त्यांनी या समय सीमेत आपली शपथ तोडून टाकली आणि पुन्हा पती-पत्नीचे संबंध स्थापित केले तर त्यांच्‌यावर शपथ तोडण्याचा कफ्‌फारा (प्रायश्चित) नाही. अल्लाह क्षमा करणारा आहे. परंतु अधिकांश फिकाह विद्वानांचे मत आहे की शपथ तोडण्याचा कफ्‌फारा द्यावाच लागेल. "क्षमावान आणि दयावान'चा अर्थ हा होत नाही की कफ्‌फारा तुम्हाला माफ करण्यात आला. याचा अर्थ असा आहे, की अल्लाह तुमचा कफ्‌फारा स्वीकार करील आणि संबंधविच्‌छेद प्रक्रियेत जो अतिरेक एकदुसऱ्याने केला त्यास अल्लाह माफ करील.
247) माननीय उस्मान, इब्‌ने मसऊद, जैद बिन साबित (रजि.) यांच्‌या मते समेटाची (रूजू) समय सीमा चार महिने आहे. ही मुदत संपून गेल्‌यावर हे स्पï होते की पतीने तलाक देण्याचा निश्चिय केलेला आहे. म्हणून मुदत संपल्‌यावर आपोआप तलाक होईल. आणि ही एक ""तलाक बाईन'' असेल म्हणजे इद्दतच्‌या काळात पती समेट घडवू शकत नाही. परंतु ते दोन्ही पती पत्नी इच्छित असतील तर पुन्हा निकाह करू शकतात. हनफी विद्वानांनी याच मताचा स्वीकार केला आहे. सईद बिन मुसय्यिब, मकहुल, जोहरी इ.च्‌या मते चार महिन्याची मुदत संपल्‌यावर आपोआप तलाक होईल. परंतु ही ""तलाक रजई'' असेल बाईन नसेल (म्हणजे इद्दतकाळात समेट घडू शकतो, पुन्हा निकाह करण्याची गरज नाही) या विपरीत माननीय आएशा (रजि.), अबू दरदा (रजि.) आणि मदीनातील अनेक धार्मिक विद्वान यांच्‌या मते चार महिन्याची मुद्दत संपल्‌यानंतर न्यायालयात दावा दाखल होईल. न्यायालय पतीला आदेश देईल की पत्नीशी समेट (रुजू) करावे अथवा तलाक द्यावा. इमाम मलिक व शाफईंनी याच मताचा स्वीकार केला आहे. 
248) म्हणजे जर तुम्ही पत्नीला अनुचित प्रकारे सोडून दिले तर तुम्ही अल्लाहविषयी निडर बनू नका. तो तुमच्‌या अतिरेकास जाणून आहे.
249) हा आदेश त्या स्थितीसाठी आहे ज्‌यात पतीने-पत्नीला एक किंवा दोन तलाक दिले असतील.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget