Halloween Costume ideas 2015

इस्लामी राज्यघटनेची मूलभूत तत्वे

उपरोक्त विषय दर्शवितो की इस्लामी राज्यसत्तेत आत्मिक, स्वाभाविक व ध्येयात्मक दृष्टीकोणाचा बदल झाला आहे. अशाच प्रकारचा बदल किंवा परिवर्तन शासकाकडून इस्लामी राज्य घटनेच्या मूलतत्वामध्ये सुद्धा प्रकट होवू लागला या इस्लामी राज्यघटनेचे सात महत्व पूर्ण तत्व होते. त्यापैकी प्रत्येकात बदल घडून आणला गेला.


1) स्वतंत्र निवडणूक :
इस्लामिक राज्यघटनेची मुलभूत आधारशिला स्वतंत्र निवडणूक आहे. आम जनता स्वतंत्रपणे आपले प्रतिनिधी निवडते. कोणीही प्रयत्न पूर्वक सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न करत नाही. जनता आपला सल्ला मसलतीने उत्कृष्ट उमेदवाराची निवड करून सत्ता त्याच्या सुपूर्द करते. सत्ता-स्विकृती करताना त्यात उमेदवाराच्या प्रयत्नाचा अथवा कटाचा दखल नसतो. जनता सत्ता स्वीकृत करण्यास अथवा अस्विकृत करण्यास पूर्ण स्वतंत्र आहे. जोपर्यंत उमेदवारास सर्वांकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत तो अधिकारावर येवू शकत नाही. तसेच जेव्हा जनतेचा विश्वास त्याच्यावरून उठेल त्यावेळी त्याने सत्तेत चिटकून राहू नये. सर्व मान्यवर खलीफा (ह.अबुबक्र (रजि.), ह. उमर रजि., उस्मान (र), ह.अली (रजि.) गण याच तत्वानुसार सत्तेवर आले होते.
    पण अमीर माविया जेव्हा खलीफा म्हणून सत्तेवर आले तेंव्हा परिस्थिती संभ्रामक झाली. म्हणूनच अमीर माविया सहाबी असून सुद्धा त्यांची गणना खलीफांच्या मालीकेत केली गेली नाही. हा त्यांचा एक प्रकारचा निषेधच होता. जेव्हा अमीर मावियाने मृत्यू पश्चात आपला पुत्र यजीदची खलीफा म्हणून घोषणा केली तेव्हा भयंकर परिवर्तन घडून आले. ज्यामुळे इस्लामी कायद्याला अगदी धाब्यावरच बसविले गेले. येथूनच वंश परंपरागत बादशाहीची सुरूवात झाली. त्या वेळेपासून आजतागायत मुस्लिम राष्ट्रांत निर्वाचित शासन पद्धतीकडे वळण्याची संधी प्राप्त झाली नाही. आता शासनकर्ते मुस्लिमांच्या स्वतंत्र सल्ल्याने नव्हेतर आपल्या शक्ती सामर्थ्याच्या बळावर अधिकार प्राप्त करू लागले. सत्ता स्वीकृती अथवा अस्विकृतीच्या मामल्यात लोक आता स्वतंत्र राहीले नाहीत. जनतेची स्वीकृती सत्तेवर येण्यास अनिवार्य राहीली नाही. आता कोणीच धजावत नाही आलेल्या व्यक्तीस विरोध करण्यास जर जनतेची सत्ता स्वीकृती प्राप्त झाली नाही तरीही सत्तेवर आलेली व्यक्ती सत्ता त्याग करण्यास तयार नसते. अशा प्रकारे बलपूर्वक सत्ता स्वीकृतीचा निषेध वा विरोध मन्सुर अब्बासीच्या शासन काळात इमाम मालीक (रह.)कडून करण्यात आला तेव्हा त्यांच्या पाठीवर आसूडांचे फटके मारले गेले व त्यांचे दोन्ही बाजू खांद्यापासून उपटून काढण्यात आले.

2) सल्लागार व्यवस्था
    दूसरा महत्व पूर्ण नियम या राज्य घटनेचा असा की राज्याचे शासन जनतेच्या सल्ला मसलतीने केले जावे. सल्ला अशा व्यक्तिकडून घेतला जावा ज्याच्या उच्च ज्ञान, संयम, विवेक व योग्य सल्ला देण्याच्या क्षमतेबद्दल आम जनतेस विश्वास असावा. खलीफांच्या शासन काळात जे लोग या संसदेचे सदस्य बनविण्यात आले त्यांचे निवड सर्वसामान्य जनतेकडून झालेली नव्हती तर असे सदस्य खलीफाद्वारे नियुक्त केले जात असे. परंतु, खलीफांनी त्यांचे सल्लागार मनोनित करताना हे कधीच पाहिले नव्हते की हे नियुक्त संसद सदस्य त्यांच्या प्रत्येक व्यवहाराचे समर्थक व स्वार्थ पूर्तीसाठी सर्वोत्तम लोक असतील. उलट त्यांनी निस्वार्थपणे सन्मान पूर्वक समाजातील मौल्यवान रत्नांचीच निवड केली होती. ज्यांच्याकडून सत्य, निस्वार्थता, निर्भिडतेचीच अपेक्षा होती. त्यांच्या ज्ञान, सद्‌सद्‌ विवेक बुद्धीने योग्य मार्गदर्शन व परामर्षः यावर प्रत्येकास विश्वास होता की हे लोक राज्यसत्तेस कधीही चुकीच्या मार्गावर जावू देणार नाहीत. आधुनिक काळानुसार जरी त्या काळी निवडणुका झाल्या असल्या तरी जनेतनं उपरोक्त स्वभावाच्या व्यक्तींनाच निवडून दिले असते व त्यांनाच विश्वास पात्र समजले असते.
    बादशाहीचा प्रारंभ होताच संसदेच्या कार्य पद्धतीत बदल झाला. आता बादशाह मर्जीनुसार स्वच्छंदपणे राज्य करू लागले. आता राजपुत्र व प्रशंसक (खुशामदी) दरबार सदस्य प्रांताचे गव्हर्नर व सरसेनापती त्यांच्या परिषदेचे सदस्य असत. त्यांचे सल्लागार असे असत की जर प्रामाणिकपणे आम जनतेचे मत त्यांच्या विषयी घेतले गेले असते तर त्यांच्या पदरात विश्वासाच्या एका मताऐवजी धिक्काराचे हजार मत पडले असते. याच्या विपरीत ईश्वरभय बाळगणारे सत्य प्रिय, सत्य वचनी, ज्ञानी, विवेकी, संयमी लोक ज्यांच्याबद्दल सर्व सामान्य लोकांना आदर व विश्वास होता असे लोक बादशाहाच्या दृष्टित अविश्वास पात्र, दोषी व संदिग्ध स्वभावाचे ठरू लागले.

3) अभिव्यक्ती स्वातंत्र्य :
    इस्लामी राज्यघटनेचे तिसरे मुलभूत तत्व आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. सदाचारांचे आदेश व दुराचारांस प्रतिरोध. याला इस्लामने प्रत्येक मुस्लिमांचा अधिकारच नव्हे तर कर्तव्य म्हणून मान्यता दिली आहे व इस्लामचा हा आदेश आहे. इस्लामी समाज व इस्लामी शासन हे योग्य मार्गावर आहे किंवा नाही हे लोकांचा आत्मा व लोकांची वाणी स्वतंत्र असण्यावर अवलंबून आहे. कोणत्याही अनुचित कार्याबद्दल श्रेष्ठातल्या श्रेष्ठ व्यक्तिस त्याची चूक दाखविण्याची मुभा आहे. सत्य निर्भिडपणे सांगता यावे. खलीफांच्या शासन काळात केवळ हेच नव्हे की जनतेचे अधिकार व हक्क सुरक्षित व अवरोध होते तर खलीफा याला आपला कर्तव्य समजत व ते कर्तव्य बजावण्यास जनतेला प्रोत्साहित करीत असत. त्यांच्या संसद सदस्यानांच नव्हे तर समाजाच्या प्रत्येक व्यक्तीस बोलण्याचा व जाब विचारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. हे अधिकार वापर करणाऱ्या व्यक्तिस कसल्याही प्रकारची दमदाटी व भीती न दाखविता त्याच्या या धाडसीपणाची प्रशंसाच केली जात होती. जाब विचारण्याच्या हक्काचे स्वातंत्र्य इस्लामने प्रदान केलेले एक इश्वरीय हक्क आहे. व या इश्वरीय हक्काचा सन्मान करणे खलीफा आपले परम कर्तव्य समजत असत. व या अधिकाराचा जनकल्याणासाठी प्रयोग करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे पावन कर्तव्य आहे. जे अल्लाह व त्याचे प्रेषित मुहम्मद (स.) मार्फत समाजास प्राप्त झाले आहे, या हक्कांच्या वापरासाठी समाज व शासन दोघांचे ही वातावरण पोषक राहील याची कटाक्षाने काळजी घेतली जात असे. अशी दक्षता घेणे खलीफा हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजत.
    पण राजेशाही अमल सुरू झाल्याबरोबर जणू सद्‌सद्‌विवेक बुद्धीचे द्वार बंदच झाले. मुस्कटदाबी सुरू झाली. परिस्थिती व कायदा असा झाला की तोंड उघडावयाचेच असेल तर फक्त स्तुती व प्रशंसेसाठी नाहीतर तोंड बंद ठेवा. जर तुमचा अंतरात्मा इतका बलवान आहे की सत्य सांगितल्या शिवाय शांत बसूच शकत नाही तर बंदीवास किंवा मृत्यूदंडासाठी सज्ज रहा. हे धोरण मुस्लिमांना हळू-हळू निराश, भित्रे व अत्याचार सहन करणारे बनवीत गेले. जीवनाचा धोका पत्करून सत्य बोलणारे त्यांच्यात हळूहळू कमी होवू लागले. खुशामदी व चापलूसीची किंमत या जगाच्या बाजारात खूप वाढली. सत्यवचनी सत्य मार्गाची किंमत घटत गेली. उच्च लायकीवाले प्रामाणिक ; स्वतंत्र विचार श्रेणी लोक राजकारणापासून दूर गेले. सामान्य जनतेत खूप निराशा पसरली. कोणत्या राजपरिवाराचे राज्यस्थायी स्वरूपाने टिकून रहावे याचे प्रयत्न करण्याची भावना त्यांच्यात राहिली नाही. एक राजास पदच्यूत करून त्याचे राज्य बळकावणाऱ्याचे विरोधात त्यांनी निष्क्रियता दाखविली. अनेक घराणे राज्य सत्तेवर आले नी गेले. पण लोकांनी केवळ मूक बघ्याची भूमिका घेतली. या आवा गमनाच्या खेळात कसलीच रूची दाखवली नाही.

4) अल्लाह व जनतेसमक्ष उत्तरदायी :
    चौथे मुलभूत तत्व जे तिसऱ्या तत्वाशी निगडीत आहे ते म्हणजे खलीफा व त्याचे शासन अल्लाह व जनता दोघांच्या समक्ष उत्तरदायी आहेत. अल्लाह समक्ष उत्तरदायित्वाच्या जाणीवेने खलीफांना रात्रीची झोप व दिवसाची विश्रांती कठीण होती आपण रयतेला उत्तरदायी आहोत या भावनेने खलीफा स्वतःला सर्व ठिकाणी जबाबदार समजत असत. त्यांच्या शासनात हा नियम नव्हता की केवळ संसदभवनातच पूर्व सूचना देवूनच प्रश्न विचारता येतो. त्याचसाठी प्रत्येक दिवशी पाच वेळेस सार्वजनिक पद्धतीने नमाज अदा करण्याचा हेतू मस्जिदमध्ये उपस्थित राहून जनतेसमक्ष खलीफा जात असे. त्याचप्रमाणे प्रत्यक शुक्रवारी जुमाच्या नमाजमध्ये सामील राहून सर्वांचे म्हणणे ऐकत व ऐकवीत असत. दिवस आणि रात्र आपल्या अंगरक्षकाशिवाय बाजार पेठेत मुक्तपणे फिरत असत. इतर बादशाहा प्रमाणे बाजू व्हा रस्तासोडा अशा प्रकारच्या घोषणा होत नसत. सामान्य माणसाप्रमाणे सामान्य जनतेत ते वावरत असत. त्यांचे शासकीय निवासस्थाना (कच्चे घर)चे द्वार सदैव व सर्वांसाठी खुले होते. प्रत्येक इसम त्यांची भेट घेवू शकत होता. या सर्व प्रसंगी प्रत्येक व्यक्ती त्यांना प्रश्न विचारू शकत होता व उत्तर अपेक्षित करू शकत होता. हे उत्तरदायित्व सिमित नव्हते तर याचे स्वरूप विशाल सर्व काळी सर्वांसाठी होते. हे प्रश्न विचारणे आजच्या सारखे निवडून दिलेल्या प्रतिनिधी मार्फतचे नव्हते तर समस्त जनते समक्ष प्रत्यक्ष पणे होत असे. ते जनतेच्या इच्छेने अधिकारावर आले होते व जनतेची इच्छा त्यांना अधिकारावरून दूर सारू शकत होती. त्यांच्या जागी दूसरा खलीफा निवडला गेला असता. हेच कारण होते की त्यांना जनतेसमोर जाण्यास कसलीच भीती नव्हती व अधिकार पदापासून पदच्युत होण्याची धास्ती नव्हती.
      परंतु, बादशाही अमल सुरू होताच उत्तरदायी शासनाची कल्पना लोप पावली. अल्लाह समक्ष उत्तरदायी असण्याचा विश्वास केवळ बोलण्यापर्यंतच मर्यादित राहिला. प्रत्य आचरणात आणण्याचे चिन्ह फारच कमी दिसू लागले. प्रत्यक्ष जनतेसमक्ष उत्तरदायी असण्याचा तर कोण असा माईंचा लाल होता की जो बादशहास विचारण्याचे धाडस करील. ते बलपूर्वक सत्तेवर आले होते व त्यांचे आव्हान होते. ’’ज्यात सामर्थ्य असेल त्यांनी आमच्याकडून सत्ता हिसकावून घ्यावी’’ असे लोक जनतेचा सामना कसे करू शकत होते, कोणाची हिम्मत होती त्यांच्या जवळपास फिरकण्याची? ते नमाज सुद्धा अदा करीत होते तर सामान्य लोकांसमवेत नसून त्यांच्या महालातील अति सुरक्षित मस्जिदमध्ये. त्याचप्रमाणे त्यांच्या अतिविश्वसनीय अंग रक्षकाच्या गोतावळयात त्यांच्या स्वाऱ्या बाहेत निघत असत. पुढे व पाठीमागे सशस्त्र अंगरक्षक असत. रस्ते निर्मनुष्य केले जात. जनता व त्यांची समारोसमोर भेट कोठेच होत नसे
(क्रमशः) पुढील अंकात शेवटचा भाग.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget