Halloween Costume ideas 2015

मेरा भारत महान

- इद्रिस खान
या गोष्टी कोणी नाकारू शकत नाही की आपला भारत देश सध्याच्या काळात एका वेगळ्या परिस्थितीत वाटचाल करीत  आहे लोकांमध्ये बेचैनी, स्थीरता, नैराश्य आहे, राग आहे. लोकांमध्ये सरकारच्या निर्णयाशी नाराजगी आहे. सरकारच्या धोरणाशी लोकांमध्ये घृणा आहे. देशात सुरू असलेली एकमेकांविषयी नफरत पसरविणाऱ्या भेदभावाच्या वातावरणास रोखण्यास सरकार असफल आहे. कुठे लोक महागाई व बेरोजगाराच्या समस्यांपासून परेशान आहात तर कुठे शेतकरी आपल्या समस्याला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. महिलांवरील अत्याचार, रेप प्रकरणे थांबायला तयार नाहीत दलितांवर, अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. अशा प्रकारचे वातावरण ना थांबत आहे, ना सरकार याला थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे. 
उलट आवाहन केले जात आहे की, देश पुढे जात आहे. देशाची प्रगती होत आहे. दुःखाची गोष्ट अशी की या घटनांवर शासन मूग गिळूनच नाही तर गुंडांची पाठराखण करीत आहे. लोकांमध्ये जागृत होणारी ही बेचैनी, नैराश्याचा वातावरण, त्यांच्या मनात गोठवलेला राग हा कोणत्या स्तरावर पोहचेल? याचे परिणाम काय होतील? सांगणे कठीण झाले आहे. संदेश हा दिला जात आहे की, जे लोक सरकारची व त्यांच्या धोरणाची तरफदारी करीत नाही ते देशद्रोही आहेत सध्याच्या परिस्थितीत देशात जे वातावरण आहे ते पाहुन असे वाटते की देशात कायदा नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही.
शासनकर्त्यानीं देशाला गुंडाच्या हवाली करून दिले आहे. त्यांनी कोणावरही  अतिरेक करावा, वाटेल त्याला रस्त्यावर भरचौकात मारझोड करावी, मग तो दादरीचा अखलाक असो की राजस्थानच्या अल्वर  गावांतील पहलू खान असो, अगर झारखंडच्या लातीहारमधील मोहम्मद मजलुम व इनामतुल्ला; या दोघांना तर कत्तल करून  झाडावर लटकवण्यात आले होते. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर थाना येथील गुलाम मोहम्मद नावाच्या व्यक्तीला जिवे मारण्यात आले.  दिल्ली विद्यापीठाच्या नजीबला गायब करून आजपर्यंत त्याचा पत्ता लागू दिला नाही. आतापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये खोटेनाटे  आरोप लावून बिनधास्त कत्तल करण्यात आली परंतु मागील महिन्यात देशाची राजधानी दिल्ली ते मथुरा जाणाऱ्या रेल्वेमध्ये  वल्लभगढच्या दरम्यान 16 वर्ष वयाच्या जुनैद नावाच्या निष्पाप मुलाला जे रमजानच्या ईदीसाठी कपडे व सामान खरेदी करून  
आपल्या घरी जात होता, त्याला उपवास (रोजा) होता, अशा परिस्थितीत प्रवासातील गुंडानी त्याची दाढी धरून ओढली, त्याची टोपी  हवेत भिरकवली. ‘तुम्ही बीफ खानारे आहात, तुम्ही पाकिस्तानाचे एजंट आहात,’ असे सांगून शिवीगाळ करून थांबले नाहीत तर त्या कोवळ्या मुलावर चाकूचे 8 घाव केले, त्याच्या दोन भावांना व सोबत्यालाही जबरदस्त मारहाण करून जुनैदच्या पोटात चाकू भोसकून  जिवे मारून फरार झालेत. दलितांवरील अत्याचार काही कमी नाहीत. लिहतो म्हटल्यावर वर्तमानपत्राची पाने पुरणार नाहीत.  थोडक्यात सांगायचे तर दलित समाजाच्या व्यक्तीला सर्वोच्च पदावर विराजमान केल्याने प्रश्न सुटनार नाहीत. एकीकडे अशा  प्रकारचा देखावा करायचा आणि दुसरीकडे दलित खासदाराला राज्यसभेत त्याला आपल्या समाजाच्या व्यथा मांडते वेळी गदारोळ  माजवून त्याच्यावर राजीनामा देण्याची पाळी आणायची, हा कुठला व कसा न्याय आहे? समजू शकत नाहीं. इतके सर्व काही घडून  आजही देशात गंगा-यमुनाची सभ्यता कायम आहे. आजही देशवासीयांत प्रेम, सद्भावना, एकमेंकाच्या सुखदुःखात सामील होणे,  लग्नकार्यात हजर राहणे, मुस्लिम बांधव आपल्या देशबांधवांना दसरा दिवाळी सणाच्या शुभेच्छा देतात, तर हिंदू बांधव मुस्लिमांना  ईदच्या शुभेच्छा देतातमुस्लिमांकडून साजरे करण्यात आलेल्या ईद मिलनच्या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहतात. असेच प्रेम  भावी तरून पिढीत कायम ठेवण्यासाठी देशाची एकता व अखंडता कायम राखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक सुज्ञ व विद्वान  व्यक्तींना समोर येण्याची गरज आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान ट्वीट करून इदीच्या शुभेच्छा देऊन आपल्या भाषणामध्ये  गौरक्षकांच्या माध्यमातूंन होणाऱ्या हत्याकांड व अत्याचाराच्या विरोधात विधाने करतात, परंतु याबाबतीत राज्य सरकारांना कडक  निर्देश दिले जात नाहींत. या निमित्याने एक म्हण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, ‘चोराला म्हणे चोरी कर आणि  सावकाराला सांगे खबरदार!’ 
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget