Halloween Costume ideas 2015

सद्यःस्थितीचा आढावा कुरआनच्या दृष्टिकोनातून


पैगंबरी मिशनचा एक उद्देश नैतिकरित्या सर्वश्रेष्ठ समाजाची निर्मिती आहे व ती करतांना अनेक समस्या समोर येतात हे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या चरित्राचे वाचन केल्याने लक्षात येते. हे काम सोपे नाही पण अशक्यही नाही. मात्र या कामाच्या करण्या आणि न करण्यावरच भारतीय मुस्लिमांचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही अवलंबून आहे. याची जाणीव देशाच्या सध्या असलेल्या परिस्थितीच्या निमित्ताने आपण सर्वांनी ठेवावी.


तुफां बडे गुरूर से ललकारता रहा

कश्ती बडी नियाज से जिद पर अडी रही

अजानबद्दल राज ठाकरेंनी नव्याने आंदोलनाची घोषणा केल्याने महाराष्ट्रासह देशातील वातावरण ढवळून निघालेले आहे. महाराष्ट्र सरकार त्यांच्या ‘लाऊड स्पीकर काढा नाही तर..!’ च्या धमकीला काडीचे महत्त्व देणार नाही, हे एव्हाना स्पष्ट झालेले असले तरी उत्तर भारतात मात्र त्यांच्या आव्हानाने पुरता ढवळून निघालेला आहे. राम नवमी ते हनुमान जयंती दरम्यान उत्तर भारतात ठिकठिकाणी दंगली झाल्या. त्यामुळे सांप्रदायिक उष्णतेचा पारा अधीच चढलेला असताना त्यात राज ठाकरेंनी सुचविलेल्या हनुमान चालिसामुळे अधिकच भर पडलेली आहे. 

दर आठ दिवसाला नवीन मुद्दा घेऊन काही दक्षीणपंथी विचारसरणीचे लोक देशात वातावरण तापत ठेवतात. कधी लव्ह जिहादच्या नावावर, कधी घरवापसीच्या नावावर, कधी गोमांसच्या नावावर, कधी दाढीच्या नावावर, कधी टोपीच्या नावावर, कधी हिजाबच्या नावावर, कधी हलाल मीटच्या नावावर, कधी कपड्यांवरून तर कधी शाळेच्या गणवेशावरून आणि आता अजानचा प्रश्न उचलून हे लोक देशातील जातीय उष्णतेचा पारा सतत चढत राहील याची काळजी घेत आहेत. वास्तविक पाहता ही सर्व कारणे निमित्तमात्र आहेत. खरे कारण इस्लामोफोबिया आहे.   

खरे पाहता प्रश्न अजानचा नाहीच. मुस्लिमांविषयी असलेल्या घृणेचा आहे आणि ही घृणा इस्लामोफोबियामधून जन्मलेली आहे. या स्थितीला अजानला विरोध करणारे जेवढे जबाबदार आहेत तेवढेच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त जबाबदार देशातील मुसलमानसुद्धा आहेत. इस्लामविषयी असलेल्या अज्ञानामुळे दक्षिणपंथियांना इस्लामची भीती वाटते. ही भीती नष्ट करण्याची किंबहुना ती निर्माणच होऊ नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची जबाबदारी भारतीय मुस्लिम समाजाची होती. जी की त्यांनी प्रामाणिकपणे बजावलेली नाही. म्हणून परिस्थिती इतकी भीषण झालेली आहे. पुण्याचे प्रख्यात वकील असीम सरोदे यांनी राज ठाकरेंना आव्हान देत असे म्हटलेले आहे की, ’’माननीय उच्च न्यायालयाने अजानसाठी वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पिकरचा आवाज नियंत्रणात ठेवावा मात्र कोर्टाने कधीच मस्जिदीवरचे भोंगे काढा असा आदेश दिलेला नाही. तसा आदेश राज ठाकरेंकडें असेल तर त्यांनी त्याचे जाहीर वाचन पुण्यात करावे.’’ ही झाली पार्श्वभूमी. खरी अडचण अशी आहे की, इस्लामोफोबिया निर्माण होऊ नये यासाठी मुस्लिमांच्या फार छोट्या गटाने प्रयत्न केले आहेत. बहुतेक मुस्लिमांचा असा समाज आहे की, इस्लामचा परिचय देशबांधवांना करून देण्याची जबाबदारी फक्त उलेमांची आहे. मात्र त्यांचा हा समाज सपशेल खोटा आहे. कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, ’’आम्ही सर्व लोकांच्या मार्गदर्शनासाठी आपल्या ग्रंथात ज्याचे वर्णन केले आहे अशा आमच्या अवतरलेल्या स्पष्ट मार्गदर्शनाला जे लपवितात त्यांचा अल्लाहसुद्धा धिक्कार करतो आणि धिक्कार करणारेही त्यांचा धिक्कार करतात.’’  (संदर्भ : सुरे अलबकरा क्र.2 आयत नं.159)

भारतीय मुस्लिमांनी स्वतःजवळ कुरआनचे मार्गदर्शन 1400 वर्षांपासून जतन करून ठेवले. मात्र देशबांधवांपर्यंत ते पोहोचविले नाही. एका अर्थाने ते लपविलेलेच आहे. या आयातीचा अर्थ स्पष्ट करतांना जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी रहे. म्हणतात की,’’ उलमा-ए-यहूद का सबसे बडा कसूर ये था के, उन्होंने किताबुल्लाह के ईल्म की ईशाअत करने के बजाए उसको रब्बियों और मजहबी पेशेवरों के एक महेदूद तबके में मुकीद (कैद) कर रख्खा था. और आम्मा-ए-खलाएक (आम जनता) तो दरकिार खुद यहूदी अवाम तक को उसकी हवा न लगने देते थे. फिर जब आम जिहालत की वजह से उनके अंदर गुमराहियां फैली तो उलेमाओंने न सिर्फ ये के इस्लाह की कोई कोशिश न की बल्के वो अवाम में अपनी मकबुलियत बरकरार रखने के लिए हर उस जलालत (अज्ञानता) और बिदआत (धर्म में नई बात को डालना) को जिसका रिवाज आम हो जाता, अपने कौल और अमल या अपने सुकूत (खामोशी) से उल्टी सनदे जवाज (सच ठहेराना) अता करने लगे. इसीसे बचने की ताकीद इस आयत में मुसलमानों को की जा रही है. दुनिया की हिदायत का काम जिस उम्मत के सुपूर्द किया जाए उसका फर्ज ये है के, उस हिदायत को ज्यादा से ज्यादा फैलाये ना ये के बखील के माल की तरह उसे छुप्पा रख्खे.’’ 

मौलानांनी ज्या चुकीकडे अंगुलीदर्शन केलेले आहे ती चूक भारतीय मुस्लिम समाजाने गेल्या 1400 वर्षांपासून केलेली आहे. परिणामी ते आज या स्थितीला येऊन ठेपलेले आहेत की,  काही ना काही निमित्त काढून त्यांना खिजविले जाते, त्यांचीं मानहानी केली जाते, त्यांच्या वस्त्यांमधून नंग्या तलवारी घेऊन मिरवणुका काढल्या जातात, मस्जिदीसमोर डिजे वाजविला जातो, त्यांना अपमानित करणारे गीत वाजविले जातात, एवढे करूनही त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही तर मिरवणुकीतीलच काही लोक दगडफेक करतात व त्यानंतर दंगलीला सुरूवात होते. पोलीसही त्यांचीच साथ देतात. मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनाच अटक केली जाते. आतातर त्यांच्या घरावर बुलडोजरही फिरविले जात आहे. या सर्व स्थितीला मुठभर दक्षिणपंथी जरी जबाबदार असतील तरी त्यांच्यापेक्षा जास्त जबाबदारी मुस्लिमांची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा मोह मला आवरता येत नाहीये. 

दंगलींच्या बाबतीत सुद्धा मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त आहे. ते म्हणतात, ’’फसादों को लेकर एक तो इजहार-ए-नफरत, दो उसपे बात नहीं करना, तीन उससे हुए नुकसानात पर इजहारे अफसोस करना, चार- इजहारे बेबसी करना, पांच- नाला (विलाप) करना. इसके सिवा मुसलमानों ने कुछ नहीं किया. मेजॉरिटी की जुबाने सिखना, उसमें लिट्रेचर तरतीब देना, उनसे रवाबित बढाना, खिदमते खल्क के इदारे चलाना, दावती नज्म को मजबूत करना, फलाही इदारे, दवाखाने, स्कूल, कॉलेज खोलके मेजॉरिटी के हक में खुद को फआल (उपयोगी) साबित करना, फालतू नारेबाजी, चर्ब बयानी से बचना, इश्तेआल अंगेज तकरीरों (प्रक्षोभक भाषण) से बचना, फसाद में लुटे लोगों को दुगनी ताकत से खडा करना ये वो काम हैं जो मुसलमान चाहें तो कर सकते हैं. जिनसे होनेवाले फसादों के नुकसानात को कम किया जा सकता है. बल्के फसाद खुद कम हो सकते हैं. इतना करने के बाद भी फसाद फूट पडें तो उसे कैसा निपटा जाए. इसके लिए भी मुसलमानों को प्रशिक्षित करने का काम हमने नहीं किया.’’

मौलानांनी जे वरील मुद्दे उपस्थित केले आहेत त्याबद्दल शंका घेण्यासाठी जागा नाही. आता तर दारूल उलूम देवबंद कडूनही मुस्लिमांना दंगलीमध्ये आत्मरक्षा करण्यासाठीचे आवाहन करण्यात आलेले आहे. दारूल उलूमचे व्यवस्थापक मुफ्ती अब्दुल कासीम नौमानी यांनी म्हटलेले आहे की,’’ मुसलमान हिम्मत और समझदारी से हालात का मुकाबला करें. खौफ और दहेशत को दिल से निकालें. हम अमन-ओ-अमान के मुहाफिज हैं. लेकिन अगर हालात ऐसे आ जाएं के हमारी जान, माल, इज्जत व आबरू पर कोई हमला करे तो डटकर मुकाबला करें’’ हा संदेश त्यांनी 15 एप्रिल रोजी बनारसच्या एका मस्जिदीमध्ये शुक्रवारचा खुत्बा (विशेष संबोधन) देतांना दिला. ते त्या मस्जिदीमध्ये एतेकाफ (धार्मिक उद्देशासाठी मस्जिदमध्ये केला जाणारा मुक्काम) मध्ये बसलेले आहेत. 

शेकडो वर्ष गफलतीत राहिल्याचा एकत्रित परिणाम आता आपल्याला याची देही याची डोळा पहावयास मिळत आहे. मुस्लिमांवर अतिशय कठीण वेळ आलेली आहे. त्यात पुन्हा ईश्वराच्या मदतीसाठी आपण पात्र नाहीत. ही पात्रता आपण आपल्या गैरइस्लामी आचरणामुळे स्वतःहून गमावलेली आहे. आता काही मुस्लिम राजे-महाराजेही नाहीत की, ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करता येईल. आता केवळ स्वबळावर संघटितरित्या कुरआनने सांगितलेल्या उपायांची अंमलबजावणी केल्याशिवाय गत्यांतर नाही. या परिस्थिती पर्यंत येऊन ठेपल्यावरही वर नमूद उपाय करण्यास आपण कमी पडलो तर असेच धिक्कारले जाणार. असेच प्रश्न विचारले जाणार. उत्तर देत-देत आपण थकून जाऊ पण प्रश्नांची मालिका काही थांबणार नाही. जमाअते इस्लामीचे सध्याचे अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांनी म्हटलेले आहे की, ’’सख्त हालात ने कौमों के तीन रद्दे अमल हो सकते हैं. 1. खौफ, शिकस्त खुर्दगी (पराजित मानसिकता). ,पसमर्दगी (पराजय स्विकारणे), खुद सुपूर्दगी (परिस्थितीला शरण जाणे) 2. अंधी जज्बातीयत (अंधभावना), इंतहा पसंदी (आक्रमकता), तशद्दुद (हिंसा). 3. अपने अंदर इत्तरतजाईयत (जरासी लचक) पैदा करके सख्त हालात का तजजिया (विश्लेषण), अपना एहतेसाब (आत्मपरीक्षण) करके होशमंदी के साथ हालात का सामना करना.’’ 

सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांच्या मते मुस्लिमांना आता तिसऱ्या प्रकारे आचरण करावे लागेल तरच त्यांना या देशात चांगले भविष्य दिसेल. इतर समाजासारखे आपण नाहीत. आपण विशेष आहोत, प्रेषित सल्ल. यांचे वारस आहोत, आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, याचे भान ठेऊन मुस्लिमांना वागावे लागेल. या ठिकाणी मी फक्त मुस्लिमांसमोरील प्रश्नच उपस्थित केलेले नसून सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याच्यावर काय उपाय आहेत, हे सुद्धा सुचविलेले आहेत. आपण हे काम केले तर कुरआननी अशा लोकांसाठी जी शुभवार्ता दिलेली आहे ती खालीलप्रमाणे - ’’तथापि जे लोक या प्रवृत्तीपासून परावृत्त होतील व सुधारणा करतील आणि स्पष्टपणे विवेचन करतील त्यांना मी क्षमा करतो आणि मी क्षमावंत आणि दयावंत आहे.’’  (सुरे अलबकरा क्र.2: आयत नं. 160) 

थोडक्यात कुरआनच्या शिकवणी स्थानिक भाषांमध्ये बहुसंख्य बांधवांपर्यंत पोहोचविण्याचे कर्तव्य करण्याची ही कातरवेळ आहे. आज ही जर आपण गफलतीत राहिलो तर मग 

खुदा ने आजतक उस कौम की हालत नहीं बदली

न हो जिसको खयाल खुद अपने हालत के बदलने का

याबाबतीत कुरआनने म्हटलेले आहे की,’’ वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह  कोणत्याही जनसमूहाच्या स्थितीत परिवर्तन करीत नाही जोपर्यंत तो स्वतः आपल्या गुणांना बदलत नाही आणि जेव्हा अल्लाहने एखाद्या जनसमूहावर अरिष्ट आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते कोणाच्याही टाळल्याने टळू शकत नाही, आणि अल्लाहच्या विरोधात अशा जनसमूहाचा कोणी संरक्षक व मदतगारही असू शकत नाही.’’ 

(सुरे अर्रअद नं.13 आयत नं. 11)

कुरआनचा परिचय देतांना त्याच्या मार्गदर्शनावर चालण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. आपण जर कुरआनचे मार्गदर्शन इतरांना सांगू आणि स्वतः त्यावर आचरण करणार नाही तर मग त्या प्रबोधनाचा काडीचाही उपयोग होणार नाही. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी. हे न करता आल्यामुळेच आपण धिक्कारले जात आहोत. चोहीकडून संकटांची मालिका सुरू आहे हे ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल तो सू दिन. आपण कुरआनवर आचरण सुरू केल्यावरच दूसऱ्यांपर्यंत त्याबद्दल प्रबोधन करण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो. अन्यथा कुरआन स्वतःच म्हणतो की, ’’हे लोकहो ! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, तुम्ही का ती गोष्ट सांगता जी तुम्ही करीत नाही?’’  (सुरे अस्सफ नं.6 आयत क्र.2)

अजानच्या वादाच्या पार्श्वभूमीवर जमाअते इस्लामी हिंदचे वरीष्ठ आलीमे दीन मुहियोद्दीन गाजी यांनी एक चांगला प्रस्ताव देशाच्या मुसलमानांसमोर मांडलेला आहे. त्यावर या ठिकाणी चर्चा करणे अनाठायी होणार नाही. त्यांच्यामते अजान अरबी भाषेमध्ये दिली जात असल्यामुळे देशबांधवांनाच काय बहुसंख्य मुस्लिमांना सुद्धा त्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे अजानविषयी गैरसमज वाढण्यामध्ये हा एक फॅ्नटर कारणीभूत आहे. म्हणून अरबीची अजान देण्यापूर्वी किंवा दिल्यानंतर स्थानिक भाषेतून त्याचा अर्थ सांगणारी तशीच अजान दिली गेली तर सर्वांच्याच लक्षात येईल की अजानचा नेमका अर्थ काय आहे? व त्यामुळे लोकांचा गैरसमज सुद्धा दूर होईल. उदाहरणादाखल मराठीतील अजान खालीलप्रमाणे दिली जाऊ शकेल. 

1. ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे. 

2. मी साक्ष देतो की, ईश्वराशिवाय कोणीही उपास्य नाही. 

3. मी साक्ष देतो की, मुहम्मद (सल्ल.) ईश्वराचे दूत आहेत.

4. या ईश्वराची उपासना करू. 

5. या सफलता प्राप्त करू 

6. ईश्वराचे स्मरण झोपेपेक्षा चांगले आहे. 

7. ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे 

8. ईश्वराशिवाय कोणी उपासणा करण्यास योग्य नाही. 

भारतात इस्लामने ज्या परिस्थितीत आपले पाय रोवले होते त्या परिस्थितीचे वर्णन करतांना प्रसिद्ध कम्युनिस्ट लेखक एम.एन. रॉय यांनी आपले पुस्तक ’इस्लामचे ऐतिहासिक योगदान’ च्या पान क्र. 79 वर लिहिलेले आहे की, ’’ जेव्हा मुसलमान भारतात आले तेव्हा भारतातील बौद्ध क्रांती पराभूत झालेली नव्हती. त्या क्रांती अंतर्गत असलेल्या उणीवांचा फायदा उठवून ब्राह्मणी व्यवस्थेच्या पुरस्कर्तयांनी तिचा गर्भपात घडवून आणला होता. बुद्धाच्या क्रांतीला यशस्वी करण्याइतपत त्या काळातील शक्ती परिपक्व झालेल्या नव्हत्या. त्यामुळे बुद्धिझमचा ऱ्हास झाला. त्यानंतर ; आपला देश आर्थिक विनाश, राजकीय दमन, बौद्धिक अराजकता आणि आध्यात्मिक गोंधळाच्या भयंकर गर्तेत सापडला. प्रत्यक्षात संपूर्ण समाजच विघटन व पतनाच्या क्लेशदायक प्रक्रियेने त्रस्त झालेला होता. त्यामुळे, राजकीय स्वातंत्र्याचा विचार बाजूला सारून, त्रस्त व पीडित झालेले लोक, सामाजिक समता देऊ इच्छिणाऱ्या इस्लामच्या झेंड्याखाली त्वरेने गोळा झाले, इतकेच नव्हे; तर अगदी उच्च जाती-वर्गातील लोकांनीही स्वार्थासाठी परकीय आक्रमकाप्रती आपल्या सेवा रूजू केल्या. त्यातून; त्याकाळातील सर्वसामान्य लोक निराशाग्रस्त व उच्च वर्गातील लोक पूर्णत: नीतिभ्रष्ट झाले होते, हे स्पष्ट आहे. - एम. एन. रॉय

(संदर्भ: इस्लामचे ऐतिहासिक योगदान, पान क्रमांक 79)

पैगंबरी मिशनचा एक उद्देश नैतिकरित्या सर्वश्रेष्ठ समाजाची निर्मिती आहे व ती करतांना अनेक समस्या समोर येतात हे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या चरित्राचे वाचन केल्याने लक्षात येते. हे काम सोपे नाही पण अशक्यही नाही. मात्र या कामाच्या करण्या आणि न करण्यावरच भारतीय मुस्लिमांचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही अवलंबून आहे. याची जाणीव देशाच्या सध्या असलेल्या परिस्थितीच्या निमित्ताने आपण सर्वांनी ठेवावी. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’हे अल्लाह ! आम्हा सर्वांना आपल्या देशासाठी व देशबांधवांसाठी उपयोगी बनण्यासाठी कार्य करण्याची शक्ती व समज दे.’’ (आमीन)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget