Halloween Costume ideas 2015

बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा जगाच्या पाठीवरील महान योध्दा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला पाहिजे.स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील असा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महु इथे झाला व संपूर्ण भारतवर्षे सुर्यासारखे लखलखायला लागले. जणू काय बाबासाहेबांच्या रूपात या पृथ्वीतलावर दैवी शक्तीच प्रकट होऊन ज्ञानज्योत प्रगटली की काय असे सर्वांनाच वाटत होते. बाबासाहेबांनी समाजाच्या हितासाठी आणि देशहितासाठी आपले प्राणपणाला लावले. त्यामुळेच त्यांच्या अथक प्रयत्नाने संविधानाच्या चौकटीत संपूर्ण भारताला बांधून ठेवले. आज प्रत्येकाला संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळत असतो. आजही अनेक देशांमध्ये हुकूमशाही दिसून येते.परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच भारतीय लोकशाही टिकून आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना न्याय मिळावा यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. तेव्हाच भारतात न्यायव्यवस्था प्रस्थापीत झाली.कारण बाबासाहेबांना कल्पणा होती की काही मुठभर समाज देशातील सर्वसामान्यांना कलंकीत करण्याचे काम करीत आहे.परंतु बाबासाहेबांचे या संपूर्ण हालचालींवर लक्ष होते. याकरिता समाजात जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद यात कटुता निर्माण होऊ नये याकरिता सर्वांना एकत्र आणन्याचे काम त्यांनी केले. जगामध्ये अनेक देशात बाबासाहेबांच्या विचारांची जोपासना केली जाते. कारण बाबासाहेबांच्या विचारांमध्ये ज्ञाणाचा व बुद्धिमत्तेचा अथांग सागर  आहे. त्याची तुलना समुद्रापेक्षाही अफाट आहे. कारण त्यांच्या बुद्धिमत्तेचा व कौशल्याचा संपूर्ण जगात आजही गुणगान होतांना आपण पाहतो. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानयोगी असल्यामुळे त्यांची कला जगात कोणीही अवगत करू शकले नाही. भारतात संपूर्ण समाज आनंदाने राहतो व बागडतो ते फक्त बाबासाहेबांच्या विचारांमुळे व संविधानामुळेच.बाबासाहेबाचा जन्म गरीब घराण्यात झाला असला तरी ते मनाने व विचाराने खूप श्रीमंत होते. आज प्रत्येकाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांने प्रेरित होऊन देश घडवीण्याकरीता पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण बाबासाहेबांच्या विचाराने भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला मोठी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे आज जगातील प्रत्येक देशात बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर केल्या जातो. परंतु आजचा राजकीय पुढारी बाबासाहेबांचे विचार विसरुन समाजाच्या प्रगतीकडे लक्ष न देता स्वतःची प्रगती करतांना दिसत आहे. याचे दु:ख बाबासाहेबांना अवश्य होत असावे. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले इत्यादी अनेक थोर महापुरुषांनी देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी अथक प्रयत्न केले व 1947 ला भारत स्वतंत्र झाला. परंतु गेल्या काही वर्षांत मुठभर राजकीय पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार करून वाममार्गाने मोठ्या प्रमाणात करोडोंची चल-अचल संपत्ती कमवुन देशाच्या 135 कोटी जनतेच्या खांद्यावर महागाई, बेरोजगारी, महागडे शिक्षणाचे ओझे लादले आहे.याचे दु:ख बाबासाहेबांना अवश्य होत असेल. स्वत:ला लोकप्रतिनिधी,जनप्रतिनिधी व स्वयंघोषित समाजसेवक समजणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनो आपण वाममार्गाने कमवीलेली करोडोंची चल-अचल संपत्ती सरकारच्या तिजोरीत जमा करावी किंवा जनकल्याणासाठी उपयोगात आणावी. असे जर कार्य राजकीय पुढारी करीत असेल बाबासाहेबांना राजकीय पुढाऱ्यांची खरी आदरांजली होईल. कारण बाबासाहेबांनी समाज हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लागले याला कुठेही तडा जाणार नाही याची जाण आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी ठेवायला पाहिजे.  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

- रमेश कृष्णराव लांजेवार

नागपूर, मो. नं.9921690779


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget