Halloween Costume ideas 2015

पैगंबरांवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय अब्दुल्लाह यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि त्याने पैगंबरांना म्हटले, ‘‘मी तुम्हांवर प्रेम करतो.’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘जे तुम्ही   म्हणत आहात त्यावर दृढ विचार करा.’’ त्याने तीन वेळा म्हटले, ‘‘अल्लाह शपथ! मी तुम्हांवर प्रेम करतो.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘जर तुम्ही आपल्या वक्तव्यावर खरे असाल तर गरिबी  आणि उपासमारीचा सामना करण्यासाठी शस्त्रांची जुळवाजुळव करा. जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याकडे गरिबी आणि उपासमार महापुरापेक्षा तीव्र गतीने येतात.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
कोणावर प्रेम करणे आणि त्याला प्रिय बनविण्याचा काय अर्थ होतो? हाच की त्याच्या पसंतीला आपली पसंत आणि त्याच्या नापसंतीला आपली नापसंती बनविणे, प्रिय व्यक्ती ज्या मार्गाने जात आहे त्याच मार्गाला आपल्या जीवनाचा मार्ग बनविला जावा, तिचा निकटवर्ती बनणे, तिची संगती आणि तिच्या खुशीकरिता प्रत्येक वस्तूचे बलिदान द्यावे आणि बलिदान  देण्यासाठी तत्पर असावे. पैगंबर मुहम्मद (स.) यांना प्रिय बनविण्याचा अर्थ असा होतो की त्यांच्या प्रत्येक पावलांवर पाऊल टाकणे आणि मार्गातील प्रत्येक निशाणी माहीत करून घेणे   आणि त्यानुसार अनुकरण करणे. पैगंबरांनी ज्या मार्गावर संकटांचा सामना केला आहे त्या मार्गावर संकटे सहन करण्याची शक्ती निर्माण केली जावी. ‘हिरा’ नामक गुहादेखील पैगंबरांचा   मार्ग आहे आणि बद्र आणि हुनैनदेखील पैगंबरांचा मार्ग आहे. ‘दीन’ (जीवनधर्मा) च्या मार्गाचा अवलंब करण्याच्या परिणामस्वरूप गरिबी आणि उपासमारीचे संकट निर्माण होते आणि  उपजीविकेचे संकट सर्वांत मोठे संकट आहे. त्याचा सामना फक्त विश्वास आणि अल्लाहवरील प्रेमाच्या शस्त्रानेच केला जाऊ शकतो. ‘मोमिन’ (ईमानधारक) अशा स्थिती विचार करतो   की अल्लाह माझा वकील आहे, मी निराश्रित आहे आणि मी गुलाम आहे, गुलामाचे काम फक्त आपल्या मालकाची इच्छा पूर्ण करणे असते आणि मी ज्याचे काम करीत आहे तो   कृपावंत आणि न्याय करणारा आहे. माझी मेहनत वाया जाऊ शकत नाही. त्याचे अशाप्रकारे विचार करणे प्रत्येक संकटावर मात करू शकते, शैतानाचे प्रत्येक शस्त्र निरुपयोगी करू  शकते.

कर्माचे फळ नियतीवर

प्रेषित सुलैमान (अ.) यांना पशु-पक्ष्यांची भाषा अवगत होती. एकदा एका मादी-पक्ष्याने त्यांच्याजवळ तक्रार दाखल केली. एका संत भासणाऱ्या व्यक्तीने, त्याच्या नर-पक्ष्याची धोका   देऊन शिकार केली.
प्रेषित सुलैमान (अ.) यांनी सांगितले, ‘‘पक्षी हे माणसासाठी खाद्य आहेत. शिकार केली त्यात काय चुकले?’’ त्या मादी-पक्ष्याने सांगितले, ‘‘एका पर्वतावर तो माणूस हातामध्ये जपमाळ  घेऊन, ईश्वराचे चिंतन करीत होता. माझा नरपक्षी त्याचे सोज्ज्वळ रूप पाहून बिनधास्तपणे त्याच्या खांद्यावर खेळू लागला. त्या वेळी त्या महात्म्याने माझ्या नराची शिकार केली. ती  व्यक्ती शिकारीच्या उद्देशाने बसली असती तर आम्ही आमचा बचाव केला असता. पण त्या व्यक्तीने ईशचिंतनात मग्न अवस्थेत शिकार केली. ही धोकाधडी आहे.’’
यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की माणसाने रूप पालटून कोणाचीही धोकाधडी करू नये. समाजसेवेच्या नावाने राजकीय नेते, प्रशासनिक अधिकारी अडाणी असलेल्या सर्वसामान्य   जनतेला धोका देतात. सर्वांत चिंतनीय बाब म्हणजे धार्मिक रूप धारण करून क्षुल्लक स्वार्थासाठी विश्वासघात करताना मानवता, नीतिमत्ता पार रसातळाला जाते.
इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे, ‘‘माणसाच्या प्रत्येक कर्माचे फलीत त्याच्या नियतीवर अवलंबून असते.’’ (हदीस : बुखारी)
आपण सर्वांनीच अशा धोकाधडीपासून स्वत:ला वाचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget