Halloween Costume ideas 2015

पूर ओसरला; संसार उघड्यावर

कोल्हापूर
सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापुराने मानवी जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. येथे आलेल्या आजपर्यंतचा सर्वात मोठा पुराचा सामना येथील नागरिक करीत आहेत. शहरात मुख्य रोडवर तर गावात नदी काठच्या घरांना पूराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरांची अतोनात पडझड  झाली असून, घरे उभारण्यासाठी बराच काळ लागणार आहे. त्यासाठी शासनाने जलदगतीने सर्व्हेक्षण करून घरे बांधण्याची मोहिम हाती घेऊन पूरग्रस्तांना धीर द्यावा अशी मागणी  राज्यभरातील नागरिक करीत आहेत. तसेच शेतीही वाहून गेली असल्याने पिके पूर्णपणे बाधित झाली आहेत.
महापूर आणि प्रशासनाची तयारी हा एक चर्चेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनावर अवलंबून न राहता अनेक स्वयंसेवी संघटना या समाजहितासाठी पुढे आल्या  आहेत. या प्रसंगी राज्यभरातील विविध सामाजिक संस्था, संघटना येथे मदत करत आहेत. जमाअत-ए-इस्लामी हिंदचा समाजसेवा विभाग आयआरडब्ल्यू, एसआयओ विद्यार्थी संघटना  व स्थानिक जमाअतच्या सदस्यांनी मिळून या कठिण प्रसंगी नागरिकांना मदत करत आहेत. वेगवेगळ्या गावांमध्ये जावून लोकांना बोटीच्या साहाय्याने पाण्यातून काढण्यात आले.   त्यांची खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली. अनेक गावात जाऊन तिथे मेडिकल कॅम्प घेतले गेले. त्याच बरोबर त्या गावात सर्व्हे करून त्या ठिकाणी घरांची झालेली दुरवस्था, विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक साहित्याचे नुकसान याबद्दल माहिती जमा करण्याचे काम चालू आहे.
पूरग्रस्तांना जेवढ्या मोठ्या प्रमाणात मदत करता येईल तेवढी मदत जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या माध्यमातून केली जात आहे. सोबतच शासनाकडून मदत लवकरात-लवकर मिळावी  यासाठी जमाअत पाठपुरावा करणार असल्याची माहिती समाजसेवा विभागाचे प्रमुख मजहर फारूख यांनी शोधनशी बोलताना दिली. कोल्हापुरातील शहापुरी भागात पुराचे पाणी गेल्याने
अतोनात नुकसान झाले आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget