Halloween Costume ideas 2015

पाणीटंचाईला सामुहिकपणे सामोरे जावे

सध्या राज्यभरात पाणीटंचाईचे जोराचे चटके बसत आहेत. त्यातल्या त्यात मराठवाडा तर होरपळून निघत आहे. एकीककडून ऊन आणि दुसरीकडे पाण्याची टंचाई. त्यामुळे नागरिकांना  एकाच वेळी दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी कुठल्या एका व्यवस्थेला दोष देणेही चुकीचे ठरणार आहे. परिस्थिती बिकट असली तरी त्याला  सामुहिकपणे सामोरे जाणे हाच त्यावरचा उपाय आहे. त्यासाठी नागरिकांनी सकारात्मकरित्या पुढाकार घेणे गरजेचे आहे.
पाणी ही मुलभूत गरज असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी शासनाने मोठ्या उपाययोजना करायला हव्यात मात्र त्या होताना दिसत नाहीत. अशात शासन व्यवस्थेवर अवलंबून  रहाणेही परवडणारे नाही. या संकटाला सामुहिकपणे सामोरे जायचे असेल तर प्रत्येक नागरिकांने आपल्या मनात दुसऱ्यांविषयी दयेचा भाव आणणे आवश्यक आहे. कमीत कमी  पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत तरी अधिक दयाभावाची गरज आहे. गली, मोहल्ला,गाव, शहरातील नागरिकांनी आपल्या भागात एखादी समिती स्थापन करावी. त्या समितीने शासनाची  मदत घेत पाणी घरोघरी निरपेक्ष भावनेने पोहचेल याची काळजी करावी. पैशाची अडचण येत असेल तर सामुहिकरित्या लोकवर्गणी करावी अन् पाणी गावकुसाबाहेरून वाहनाने आणून  गावात वाटप करावे. जेणेकरून लहान मुलं, महिला, वृद्ध यांची पायपीट थांबेल. जे गरीब आर्थिक खर्च उचलू शकत नाहीत त्यांच्यासाठी गाव पुढाऱ्यांनी एकत्र येवून त्यांचा खर्च उचलावा.  असा प्रयत्न एकत्रितपणे केला तर निश्चितच पाणीटंचाईचे अवघड वाटणारे काम सोपे होईल. टँकरलॉबीने मराठवाड्यात लूटीचा डाव सुरू केला आहे. 200 रूपयांचे दोन हजार लिटरचे  टँकर ते आता 400 ते 500 रूपयाला देत आहेत. त्यामुळे मोठी अडचण झाली आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासन आणि श्रीमंत नागरिकांनी यात आपला आर्थिक सहभाग नोंदविणे  मानवतेच्या दृष्टीकोणातून आवश्यक आहे.

- बशीर शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget