Halloween Costume ideas 2015

ध्वनिक्षेपकासंबंधी एक स्पष्ट नीती तयार करावी

जेआयएचची मागणी : शासनाने काही पोलीस अधिकाऱ्यांची मनमानी थांबवावी


मुंबई 

धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपकांसबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन अनिवार्य आहे. मात्र काही पोलीस अधिकाऱ्यांनी मस्जिदीवरील लाऊडस्पीकरच्या आवाजाला नियंत्रित करण्याचे निर्देश देण्याऐवजी लाऊडस्पिकरच बंद करून टाकले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पहाटे अजानच्या वेळीच नाही तर दिवसाच्या चारही वेळेसच्या अजानला काही पोलीस अधिकाऱ्यांनी बंद केले आहे. त्यामुळे पोलिसांच्या या मनमानीला राज्य शासनाने वेळीच पायबंद घालीत पूर्णपणे ध्वनीक्षेपके बंद करू नयेत, असे निर्देश पोलीस प्रशासनाला द्यावेत अशी मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांना एका पत्राद्वारे जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष रिजवानुर्रहेमान खान यांनी केली आहे. 

शिवाजी नगर मुंबई चे आमदार अबू आसिम आजमी यांच्यासमवेत जमाते इस्लामी हिंदतर्फे अब्दुल मुजीब यांनी नुकतेच गृहमंत्र्यांना सोपवले. यावेळी आमदार आजमी यांनी गृहमंत्र्यांना यासंबंधीची इत्यंभूत माहिती दिली व अवाजवी पोलीस कार्यवाही थांबविण्याची विनंती केली. ज्या ठिकाणी या संदर्भात एफ.आय.आर. दाखल आहेत तेही दुःखद असल्याने निवेदनात म्हटले केले.

या प्रसंगी अ. मुजीब यांनी सांगितले की वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस वेगवेगळ्या फॉरमॅट मध्ये मस्जीद कमीटीकडून फार्म भरवून घेत आहेत. त्यात सारखेपणा नाही उलट मालकी हक्कासंबंधाने माहिती घेतली जात आहे. यावेळी एक सोपा आणि सुटसुटीत फार्मचा नमूना देखील गृहमंत्र्यांना सोपविण्यात आला आणि त्यानुसार हवे तर माहिती भरून घेण्यात यावी अशी विनंती केली गेली.

गृहमंत्र्यांनी सर्व मागण्या लक्षपूर्वक ऐकत लवकरच त्यावर ठोस उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले. गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र यांनी असेही नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या धर्मगुरूंना एकत्र बोलावून त्यांच्याशी सल्लामसलत करून ध्वनिक्षेपकाचा संबंधी एक स्पष्ट नीती तयार करावी म्हणजे यात सुसूत्रता येईल.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget