(११७) तुझा पालनकर्ता असा नाही की वस्त्यांना नाहक उद्ध्वस्त करीत राहील ज्याअर्थी त्यांचे निवासी सुधारणा करणारे असतील.११५
(११८) नि:संशय जर तुझ्या पालनकत्र्याने इच्छिले असते तर सर्व माणसांचा एक समुदाय बनविला असता, परंतु आता तर ते विभिन्न पद्धतीवरच चालत राहातील.
(११९) आणि पथभ्रष्टतेपासून केवळ तेच लोक वाचतील ज्यांच्यावर तुझ्या पालनकत्र्याची कृपा आहे. याच (आवडी व निवडीचे स्वातंत्र्य आणि परीक्षे) साठी तर त्याने त्यांना निर्माण केले होते११६ आणि तुझ्या पालनकत्र्याचे ते वचन पूर्ण झाले जे त्याने प्रतिपादिले होते की मी नरकाला जिन्न आणि माणसे या सर्वांनी भरून टाकीन.
(१२०) आणि हे पैगंबर (स.)! या पैगंबरांच्या गोष्टी ज्या आम्ही तुम्हाला ऐकवीत आहोत, या त्या गोष्टी आहेत ज्यांच्याद्वारे आम्ही तुमचे हृदय बळकट करतो. यांच्याद्वारे तुम्हाला सत्याचे ज्ञान मिळाले आणि श्रद्धावंतांना उपदेश आणि जागृती लाभली.
(१२१) उरले ते लोक जे श्रद्धा ठेवीत नाहीत तर त्यांना सांगून टाका की तुम्ही आपल्या पद्धतीने कार्य करीत राहा आणि आम्ही आपल्या पद्धतीने करीत राहू,
११५) या आयतींमध्ये (प्रकोप कोसळणाऱ्या राष्ट्रांचा वृत्तान्त) वर समीक्षा करून सांगितले जात आहे. मानवी इतिहासात जितक्या राष्टांचा विनाश झाला त्यांच्यामागे महत्त्वाचे कारण अल्लाहने त्यांना सुख- समृद्धी दिली तेव्हा त्यात मस्तवाल बनून त्यांनी पृथ्वीत बिघाड निर्माण केला. त्यांचे सामाजिक जीवन अतिबिघडले आणि त्यांच्यात असे सदाचारी शिल्लक राहिले नव्हते जे त्यांना वाईटांपासून रोखतील. काही सदाचारी होते तरी त्यांची स्थिती संख्येने कमी होती आणि त्यांचा आवाज अतिक्षीण होता की त्यांच्या परावृत्त करण्याने उपद्रव थांबला नाही. अशा कमजोर सदाचारी लोकांचे प्रयत्न तेथे विफल ठरले. याच महत्त्वाच्या कारणामुळे हे राष्ट्र अल्लाहच्या प्रकोपाने शेवटी वेढले गेले. अल्लाहला आपल्या दासांशी अजिबात शत्रुत्व नाही की त्यांना नाहक प्रकोपग्रस्त करावे. या कथनाने येथे तीन गोष्टींचा खुलासा होतो.
(१) प्रत्येक सामाजिक व्यवस्थेत अशा लोकांची उपस्थिती आवश्यक आहे जे सदाचाराकडे बोलाविणारे आणि वाईटांपासून लोकांना रोखणारे आहेत. सदाचार अल्लाहला प्रिय आहे. लोकांच्या दुष्टतेला अल्लाह सहन करीत असला तरी त्यांच्या सदाचारासाठी असे करतो जो त्या लोकांच्यामध्ये विद्यमान आहे. अल्लाह दुष्टतेला तोपर्यंतच सहन करतो जोपर्यंत लोकांमध्ये सदाचाराची संभावना शिल्लक असते. परंतु जेव्हा एखादा समाज भल्या माणसांनी खाली झाला आणि त्या समाजात केवळ भ्रष्ट लोकच असतील तर एखाददुसरे सदाचारी असतील तरी त्यांचे काही एक चालत नाही. ते कमकुवत असतात. अशा स्थितीत तो समाज किंवा राष्ट्र नैतिक भ्रष्टतेत फारच पुढे निघून जाते. तेव्हा अल्लाहचा अजाब (कोप) त्याच्या शिरावर लोंबकळत असतो.
(२) हे राष्ट्र आपल्यामध्ये अशा लोकांना सहन करण्यास तयार नसते जे सदाचारांकडे इतरांना बोलावतात आणि दुराचारांपासून प्रतिबंध करतात. अशा स्थितीत ओळखून घ्यावे की त्या राष्ट्राचे वाईट दिवस जवळ आले आहेत कारण आता ते राष्ट्र स्वत: आपल्या जीवावर उठले आहे.
(३) एका राष्ट्राचे कोपग्रस्त होणे अथवा न होणे यावर अवलंबून आहे की त्या राष्ट्रात सदाचाराच्या हाकेला प्रत्युत्तर देणारे किती प्रमाणात आहेत. जर तिथे असे सदाचारी पर्याप्त संख्येत असतील, ज्यामुळे दुष्टतेला नष्ट करून कल्याणकारी व्यवस्था स्थापित करणे सुलभ होईल, अशा स्थितीत त्या राष्ट्रावर प्रकोप होत नाही. तर त्या सदाचारींना स्थिती सुधारण्याचा वाव दिला जातो. परंतु सततचा वाव दिला जात नाही. सततच्या प्रयत्ना नंतरसुद्धा त्या ठिकाणी पर्याप्त संख्येत सदाचारी लोक नसतात. अशा स्थितीत त्या राष्ट्रात सर्वत्र दुष्टतेचेच साम्राज्य पसरते. त्या वेळी अल्लाहचा प्रकोप कोसळण्यास विलंब लागत नाही.
११६) हे त्या शंकेचे उत्तर आहे जे सामान्यता अशा वेळी भाग्याच्या नावाने प्रस्तुत केले जाते. वर पूर्वींच्या राष्ट्राच्या विनाशाचे जे कारण दाखविले आहे त्यावर असा आक्षेप घेतला जाऊ शकतो की सदाचारींची तिथे संख्या अपुरी असणे अथवा नसणे हे अल्लाहच्या इच्छेवरच अवलंबून आहे. मग अशा स्थितीत त्या राष्ट्रांवर आरोप ठेवणे कसे योग्य आहे? अल्लाहने त्या राष्ट्रांत सदाचारी लोक विपुल प्रमाणात जन्माला का घातले नाहीत? उत्तरात सांगितले गेले की अल्लाहची इच्छा मानवाविषयी ही नाही की त्याला नैसगिर्कताच साचेबंद करावे की त्यापासून तो हटलाच जाऊ नये. अल्लाहची ही इच्छा असती तर ईमान धारण करण्याचे आवाहन, पैगंबरांना पाठविले जाणे आणि ग्रंथांचे अवतरण इ. सर्वांची आवश्यकताच काय होती? सर्व माणसं त्याचे आज्ञाधारक आणि ईमानधारकच अल्लाहने जन्माला घातले असते आणि अवज्ञाकारी आणि ईशद्रोहींची संभावनाच निर्माण झाली नसती, परंतु अल्लाहची माणसाविषयी जी इच्छा आहे ती म्हणजे त्याला स्वीकारण्याची आणि निवडण्याची स्वतंत्रता दिली जावी. मनुष्याला आपल्या इच्छेनुसार वेगवेगळ्या मार्गावर चालण्याची शक्ती द्यावी. त्याच्यासमोर स्वर्ग आणि नरक दोन्ही मार्ग स्पष्ट केले जावेत. प्रत्येक माणसाला आणि समाजाला संधी दिली जावी की ज्याला जे हवे त्यावर त्याने चालावे. याचाच अर्थ होतो ज्याने त्याने आपल्या प्रयत्नांचे फळ चाखावे, म्हणून ही योजना ज्याच्यामुळे माणसाला जन्माला घातले गेले आहे त्याला निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि ईशद्रोह आणि ईमानधारक बनणे स्वातंत्र्याच्या नियमांवर आधारित आहे. मग एखादे राष्ट्र स्वत: दुष्टतेच्या मार्गावर प्रगती करू इच्छिते आणि अल्लाहने त्याला जबरदस्तीने भलाईच्या मार्गावर चालवावे, हे कसे शक्य आहे?
Post a Comment