Halloween Costume ideas 2015

मानवी अस्तित्व टिकविण्यास जीवनदायी निसर्गाचे रक्षण अत्यंत गरजेचे


पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक (ईपीआई) २०२२ नुसार, भारत १८० देशांमध्ये १८० व्या क्रमांकावर आहे. ईपीआई प्रमाणे, शासकीय कायदे, भ्रष्टाचार नियंत्रण आणि सरकारी कामगिरीच्या बाबतीतही भारत खराब आहे, यासंदर्भात भारताने टीका केली आहे. स्विस फर्म आईक्यूएयर ने प्रसिद्ध केलेल्या जागतिक वायु गुणवत्ता अहवाल २०२१ नुसार, ६३ भारतीय शहरे पृथ्वीवरील १०० सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांमध्ये आहेत. वायू प्रदूषणामुळे भारतीयांचे सरासरी आयुर्मान ६.३  वर्षे कमी होते. स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२० च्या अहवालानुसार, २०१९ मध्ये जन्माच्या एका महिन्याच्या आत भारतात वायू प्रदूषणामुळे ११६,००० पेक्षा जास्त बाळांचा जीव दगावला. भारतातील जवळजवळ संपूर्ण लोकसंख्या जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या गुणवत्तेच्या दर्जापेक्षा कमी असलेल्या हवेत श्वास घेते.


पर्यावरणीय आरोग्य हे सभोवतालच्या पर्यावरणाचे मानवी शरीरावर होणारे परिणाम दर्शवितो. पर्यावरणीय आरोग्याचा समतोल बिघडवणाऱ्या समस्यांमध्ये पर्यावरणीय स्रोत आणि घातक घटक ओळखून त्यांचे मूल्यांकन करून घातक भौतिक, रासायनिक आणि जैविक घटक, प्रदूषण, हवामान बदल, रोग निर्माण करणारे जंतू, आरोग्य सुविधांचा अभाव, निकृष्ट पायाभूत सुविधा यात सामील आहेत. स्वच्छ हवा आणि पाणी, संतुलित हवामान, आवश्यक स्वच्छता, मर्यादित यांत्रिक संसाधने आणि रसायनांचा मर्यादित वापर, ओझोन संरक्षण, सुरक्षित कामाची ठिकाणे आणि निवासस्थान, निरोगी कृषी पद्धती, संरक्षित निसर्ग हे सर्व पृथ्वीवरील प्रत्येक मानवाचा चांगल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. जगभरातील मानवी आरोग्यावर सतत वाढत असलेल्या पर्यावरणीय प्रभावांबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी “जागतिक पर्यावरण आरोग्य दिन” साजरा करण्यात जातो. या विशेष दिवसानिमित्त यावर्षीची थीम "शाश्वत विकास लक्ष्यांच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरणीय आरोग्य प्रणाली मजबूत करणे" आहे. "पर्यावरण आरोग्य" लोकांचे संरक्षण आणि समुदायांना निरोगी वातावरण प्रदान करण्याच्या उद्देशाने हवा, पाणी, माती आणि अन्न यांचे रासायनिक आणि इतर पर्यावरणीय संपर्क कमी करण्यासाठी धोरणे आणि कार्यक्रम प्रगत करण्यासाठी कार्य करते.

जगातील  एकूण मृत्यूंच्या ४ पैकी १ पर्यावरणीय जोखीम घटक, जसे की हवा, पाणी आणि माती प्रदूषण, रासायनिक धोका, हवामान बदल आणि अतिनील किरणे, १०० हून अधिक रोग आणि जखमांना कारणीभूत ठरतात, जे अकाली मृत्यूचे कारण आहे. स्ट्रोकमुळे दरवर्षी २.५ दशलक्ष मृत्यू, इस्केमिक हृदयरोगामुळे दरवर्षी २.३ दशलक्ष मृत्यू, अनावधानाने झालेल्या दुखापती (जसे की रस्ते वाहतूक मृत्यू) - दरवर्षी १.७ दशलक्ष मृत्यू, कर्करोगामुळे दरवर्षी १.७ दशलक्ष मृत्यू, तीव्र श्वसन रोगांमुळे दरवर्षी १.४ दशलक्ष मृत्यू, अतिसाराच्या आजारांमुळे दरवर्षी ८४६,००० मृत्यू, श्वसन संक्रमणामुळे दरवर्षी ५६७,००० मृत्यू, मलेरियामुळे दरवर्षी २५९,००० मृत्यू, दरवर्षी २७०,००० नवजातांचा मृत्यू होतो. २०३० ते २०५० दरम्यान, कुपोषण, मलेरिया, अतिसार, हवामान बदलामुळे आणि उष्णतेमुळे दरवर्षी अतिरिक्त २५०,००० मृत्यू होण्याची शक्यता आहे.

पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक (ईपीआई) २०२२ नुसार, भारत १८० देशांमध्ये १८० व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम आणि म्यानमारनंतर भारताचा क्रमांक १८.९ च्या माफक गुणांसह आला आहे. ईपीआई प्रमाणे, शासकीय कायदे, भ्रष्टाचार नियंत्रण आणि सरकारी कामगिरीच्या बाबतीतही भारत खराब आहे, यासंदर्भात भारताने टीका केली आहे. स्विस फर्म आईक्यूएयर ने प्रसिद्ध केलेल्या जागतिक वायु गुणवत्ता अहवाल २०२१ नुसार, ६३ भारतीय शहरे पृथ्वीवरील १०० सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांमध्ये आहेत. वायू प्रदूषणामुळे भारतीयांचे सरासरी आयुर्मान ६.३ वर्षे कमी होते. स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२० च्या अहवालानुसार, २०१९ मध्ये जन्माच्या एका महिन्याच्या आत भारतात वायू प्रदूषणामुळे ११६,००० पेक्षा जास्त बाळांचा जीव दगावला. भारतातील जवळजवळ संपूर्ण लोकसंख्या जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या गुणवत्तेच्या दर्जापेक्षा कमी असलेल्या हवेत श्वास घेते.

भारताच्या पर्यावरण अहवाल २०२१ नुसार, भारत १८० पैकी ११७ व्या क्रमांकावर आहे. भारतात होणाऱ्या मृत्यूंपैकी १२.५ टक्के मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात. अहवालानुसार, देशातील भूजल पातळी धोक्यात आहे, ८६ टक्के जलस्रोत गंभीरपणे प्रदूषित झाले आहेत . देशात २६१३ झोपडपट्टी असणारे शहर आहेत. २०१६-१७ दरम्यान भारताने घातक कचरा निर्माण करणाऱ्या उद्योगांच्या संख्येत ५६% वाढ नोंदवली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, देशातील प्रमुख औद्योगिक क्लस्टर्सपैकी ३५ ने एकूणच पर्यावरणाचा ऱ्हास दर्शविला आहे, ३३ ने हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे निदर्शनास आणले, ४५ मध्ये जास्त प्रदूषित पाणी होते आणि १७ मध्ये मातीचे प्रदूषण आणखीनच वाढले. कोविड-१९ ने जगातील गरीबांना आणखी गरीब केले आहे. कोविड-१९ महामारीमुळे, जागतिक स्तरावर ५०० दशलक्षाहून अधिक मुलांना शाळा सोडावी लागली आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक मुले भारतातील होती.

पर्यावरणीय आरोग्य सुधारणा प्रत्येकाची जबाबदारी

आजचे खरे सत्य हे आहे की साधारणपणे १ टक्के लोक समाज, पर्यावरण, धोरण, शासकीय सुव्यवस्था, मानवता जगविण्यासाठी जागरुकतेने काम करतात, पण ९९ टक्के लोक चांगल्या कामांबद्दल बोलतात पण त्या गोष्टी अंमलात आणू इच्छित नाही. ज्याचा जिथे स्वार्थ किंवा फायदा आला, तिथं ते नियम मोडतात, याचा फटका संपूर्ण समाजाला सहन करावा लागत आहे. स्वार्थी लोक स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचेही नुकसान करण्यास मागेपुढे पाहत नाहीत, म्हणून अगोदर सर्व लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण वाचवायला प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे गरजेचे आहे. चिपको आंदोलन, सायलेंट व्हॅली बचाव आंदोलन, जंगल बचाओ आंदोलन, अप्पिको आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, टिहरी धरण संघर्ष अशा अनेक चळवळी पर्यावरणाच्या रक्षणासाठी देशात केल्या गेल्या आहेत. आजही अनेकजण रक्षाबंधनाला झाडांना राखी बांधून त्यांच्या रक्षणाची शपथ घेतात. निसर्गाचे सौंदर्य जतन करण्यासाठी, थारू जमाती समुदाय स्वेच्छेने 60 तासांचा कडक लॉकडाऊन लावून एक अद्वितीय सण साजरा करतो. आज आपल्या समाजाला अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पुनर्वापराच्या सवयी लागू करणे हा लँडफिल कचरा कमी करणे सोबतच नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे, प्रदूषण कमी करणे, ऊर्जेचा वापर कमी करणे हे सर्व ग्लोबल वॉर्मिंगची गती कमी करण्यात सहायक होऊ शकते. आपल्या समाजातील स्वच्छतेसाठी स्वयंसेवकाची भूमिका पाळा. जागरूक रहा, इतरांना आपल्या नैसर्गिक संसाधनांचे महत्त्व आणि मूल्य समजविण्यास मदत करा. पाणी अनमोल आहे, त्याचे महत्त्व समजून घ्या, पाण्याचे काटकसरीने वापर करा. खरेदी करताना टिकाऊ वस्तू निवडा, प्लॅस्टिकला नाही म्हणून शहाणपणा दाखवा. आंतरराष्ट्रीय मानकांद्वारे प्रमाणित साधने वापरा, यांत्रिक संसाधनांचा वापर कमी करा. वृक्ष लागवडीला चालना द्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग राबवा. शक्यतो दररोज चालावें, सायकल चालवावे, सार्वजनिक वाहतूक वाहने वापरा. नेहमी जागरूक राहून शासकीय नियमांचे पालन करावे. विशेष प्रसंगी, लोकांना त्यांची आवडती झाडें भेट म्हणून द्यावी.

आपल्या समाजात वस्तूंच्या गरजेपेक्षा त्याला स्टेटस सिम्बॉल म्हणून जास्त महत्त्व दिले जाते. आजच्या आधुनिक काळात जास्ततर माणसांचे आयुष्य देखावा करण्यामध्येच संपते. स्वत:ची नासाडी करून अशी लोक समाजाची आणि पर्यावरणाची मोठी हानी करतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देखावा थांबविणे गरजेचे आहे. जीवन खूप सोपे आणि सुंदर आहे, आपल्या मुख्य गरजा निसर्गाद्वारे सहजरित्या पूर्ण केल्या जातात, पण आपले असमाधानी मन इच्छा आकांक्षा वाढवत असतात, त्यामुळे समस्या सतत वाढत जातात. नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिशोषण, यांत्रिक उपकरणांचा अतिवापर, सर्वत्र घातक रसायनांचा वापर, जंगल आणि वन्यजीवांचे वाढते नुकसान, वाढता प्राणघातक कचरा यामुळे पर्यावरण चक्र विस्कळीत होत आहे. निसर्गाचे संरक्षण म्हणजे आपल्या जीवाचे रक्षण. ही पृथ्वी आपले घर आहे, निसर्ग आपल्याला जीवन देतो आणि जर आपण त्या निसर्गाचीच सतत हानी करत असू तर आपल्यापेक्षा स्वार्थी सैतान कोणीही नाही.

- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget