महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अनंत अडचणीवर मात करीत मार्गक्रमण करीत आहे. सातत्याने संततधार राहिल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे. सोयाबीन पीक तर धोक्यात आले आहे. पिकाला पाऊस लागल्याने पीके पिवळी पडली असून, सोयाबीनमध्ये दाने भरले नाहीत. जिथे भरले आहेत ते वजनदार नाहीत. अशात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन ऐवजी अन्य पिके घेतली आहेत त्यालाही पावसाचा फटका बसला आहे. अशात रानडुकरांचे कळप पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत असल्याने ते ही हातची जात आहेत. मराठवाड्यात याचा अधिक सुळसुळाट आहे.
भुईमुगाची शेतीतर रानडुकरांमुळे पूर्णतः धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची भुईमुगाकडे पाठ आहे. याकडे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. रानडुकरांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी होत आहेत. मात्र वनप्रशासनाकडून याची कसलीही दखल घेतली जात नाही. शासनाने नुकसानीसाठी तुटपुंजी मदत जाहीर केली आहे मात्र तीही खात्यावर पडली नाही. याचा शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. अशात शेतीकडे वाढणारा कल दिवसेंदिवस कमी होत आहे. शासनाने भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
Post a Comment