Halloween Costume ideas 2015

तो येणारच!


त्याचे नाव घेतले की अंगावर शहारे येतात. बहुतांश लोक त्याचे नाव घेणेही पसंत करत नाहीत. किंबहुना अधिकतर लोक भयभीत होतात यातही महिलांची आघाडी आहे. 

त्यूला जरी माणूस पसंत करत नसेल तरी माणसाला मृत्यू येणारच. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. यापासून माणसाला सुटका नाही. हे माहित असतानाही आपण गाफील असतो. मृत्यूनंतर काय? हा प्रश्न सहसा आपल्याला पडत नाही का? आपल्यापैकी बहुतेक लोक आपल्या, जीवनाची अगदी मायक्रोप्लानिंग करतात. पण जगणं संपल्यानंतर काय? याला काहीच महत्त्व देत नाही, याची प्लानिंग करायची असते हे ही पुष्कळ लोकांना माहित नसते. कोणी मरण पावलं की आपल्याला थोडसं दुःख होतं, जवळची व्यक्ती असली की जास्त दुःख होते. हे दुःख सहसा तीन दिवस ताजे राहते. पुन्हा आपण हळूहळू त्या व्यक्तीला विसरून जातो. एक वर्ष गेले की असं वाटतं ती व्यक्ती कित्येक वर्षांपासून आपल्यापासून लांब गेली आहे. 

कोरोनाच्या आधी आपल्याला कोठे जायचे झाल्यास आपण किती योजना करत होतो आठवते ना? कोणी जायचे? कधी जायचे? कसं जायचे, किती दिवस राहायचे? सोबत काय घेवून जायचे? शिदोरीला काय करायचे? परत येताना काय आणायचे? अश्या अनेक प्रश्न आपल्याला पडत होते. मृत्यूही दुसऱ्या जीवनाचा एक प्रवास आहे. अशीच योजना आपल्याला मृत्यूची करायची आहे, कारण कधी जावं लागेल? कसं जावं लागेल? आपली किती मानसीक व अध्यात्मीक तयारी करायची आहे हे आपल्याला काहीच माहित नाही.

मृत्यू म्हणजे कम्पलसरी ए्नप्लोजन. बळजबरीने आपल्याला या जीवनापासून त्या जीवनात घेवून जाणे, खुशीने अथवा नाखुशीने जायचे मात्र आहेच. मृत्यू हा जीवनाचा अंत  नसून एक नव्या जीवनाची सुरूवात होय. मृत्यू असा प्रतिस्पर्धी आहे ज्याच्याशी संघर्ष करताना शेवटी पराजयच आपल्या नशीबी येतो. मृत्यूशी काही वेळा आपल्याला जिंकल्यासारखे वाटत जरी असले तरी एक न एक दिवस आपण हारणारच.

मृत्यू असे द्वार आहे ज्याच्यातून प्रत्येकाला जायचेच आहे. मलीकलमौत कधीच आपली परवानगी घेवून येत नाहीत की कोणाच्या अडचणीची काळजी करत नाहीत. न सांगता कधीही मृत्यू येवू शकतो म्हणून अत्यंत हुशार आहे ती व्यक्ती जी आपल्या प्रत्येक दिवसाला शेवटचा दिवस समजून चांगले आचरण करते. 

खरोखर जीवंत कोण? 

जी व्यक्ती दुसऱ्यांच्या मृत्यूमध्ये आपला मृत्यू बघते म्हणजेच जी व्यक्ती दुसऱ्यांच्या मृत्यूपासून शिकते तीच खरोखर जीवंत होय. मरणारे मेले पण आपल काय? 

आपल्यालाही एक दिवस मरण येईल आणि जग सोडून जावे लागणार म्हणून हे निश्चित केले पाहिजे की आपल्या मृत्यूनंतर लोक आपली आठवण काय म्हणून करतील त्या प्रमाणे आपण आपले जीवन व्यतीत करावे. उदाहरण जर आपल्याला वाटत असेल की मेल्यानंतर मला सत्यवादी म्हणून ओळखले जावे तर ’’खोटं ’’ हे शब्द आपल्या जीवनाच्या शब्दकोषातून काढून टाकले पाहिजे. जर तुम्ही लोकहितचिंतक म्हणून ओळख बनवू इच्छितात तर लोककल्याणाच्या कामाला जीवनाचा उद्देश बनवायला हवे. पण हे सगळे करताना लोकांसाठी नाही तर अल्लाहला खुश करण्याची नियत ठेवली पाहिजे. अन्यथा लोकतर खुश होतील पण अल्लाहच्या दरबारी ते स्वीकार होणार नाही. 

मनुष्य आपली सगळी शक्ती खर्च करून जास्तीत जास्त पैसे कमाविण्यासाठी प्रयत्न करत असतो. का तर सुख उपभोगण्यासाठी? पण खरोखर तो खुश असतो का? त्याला सुख मिळते का? क्षणिक सुख मिळाले तरी डिप्रेशनमध्ये जाणे, मानसीक ताण जे सावरता न आल्याने आत्महत्या करून घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. 

माणूस आपल्या लेकरांच्या तेजस्वी भविष्यासाठी स्वतः झीजत असतो. तेवढ्यातच मृत्यू येतो आणि त्याला अशा भविष्याकडे नेतो ज्याची त्याने काहीच तयारी केलेली नसते. माणूस जास्तीत जास्त जीवन जगण्याची इच्छा बाळगतो परंतु, मृत्यू त्याचे स्वागत करण्यासाठी नेहमी सज्ज असतो. 

कोणाची पदवी, कोणची लोकप्रियता, कोणाचे ऐश्वर्य, कोणाची सत्ता, काही म्हणजेच काहीच त्याला मृत्यू पासून वाचवू शकत नाही. जीवंत लोकांसाठी मृत्यू हे एक रिमायंडर आहे. 

आपण वाढदिवस साजरा का करतो? 

आपल्याला वाटते आपण मोठे झालो पण खऱ्या अर्थाने काय होते? एक एक वर्षे आपण जुनं होतो, मृत्यूच्या एक वर्ष जवळ जात असतो. आपण साजरा करत असलेल्या वाढदिवस पार्टीमध्ये मृत्यूही येवून जणू आपल्याला सांगत असतो की, तू तुझ्या नातेवाईक, मित्र मैत्रीण पासून एक वर्ष लांब गेला आणि माझ्या एक वर्ष जवळ आला आहेस. पण ही बाब आपल्या लक्षात येत नाही तर आपण मोठे झाल्याच्या भ्रमात मृत्यूचे सिलेब्रेशन करत असतो.

खरंतर आपण विचार केला पाहिजे की माझे वय एवढे झाले आणि मी काय चांगले काम केले आहे? दुसऱ्यांसाठी ? स्वतःसाठी तर जनावरे जगतात, माणसाला ईश्रवाने जनहितासाठी निर्माण केले आहे. बसून विचार करा कधी कुण्या गरीब परिवाराची मदत आपण केली आहे का? आपल्या नातेवाईकांपैकी कोणी गरजवंत तर नाही? कोणी दुःखी तर नाही? त्यांची विचारपूस करण्याचा विचार आपण केला आहे का? रंजले, गांजलेल्यांसाठी आपले नियोजन काय आहे? कधी समाजात रूजलेल्या रूढी, परंपरा पासून माणसाला मुक्त करण्याचा विचार आपण केला का? जेवढा खर्च आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी करतो तेवढा कुण्या गरजवंताला देऊन पहा मनास समाधान वाटेल नक्कीच.

आपण लहान असताना शाळेत मातीचा प्रकार शिकलेले असतो आठवते ना? पण मोठे झाल्यावर ते सगळे विसरून माणसाला दोन प्रकार दिसतात. 1. उभी माती 2. आडवी माती. आणि माणसाचा पैसा, वेळ हे सर्व आडव्या मातीला उभारण्यात खर्च होत असते म्हणजेच माणूस घर बांधणीवर त्याच्या डेकोरेशनवर खूप लक्ष देत आहे पण कधी विचार केला का एवढा खर्च करून बांधलेले आलीशान घर, बंगले, महाल सोडून माणूस का बरं जातो (माफ करा त्याला बाहेर काढले जाते)

श्वास संपला की सारे संपले असे आपल्याला वाटत असले तरी हे जग फक्त एक ट्रेलर आहे. अस्सल चित्रपट तर मेल्यानंतरच सुरू होणार. हे जीवन एक परीक्षागृह आहे. आपल्याला एक ठरावीक वेळ दिलेला आहे. (माहित नाही किती) ती संपताच आपल्याला जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, म्हणून ईश्वराने दिलेल्या प्रश्नपत्रिका आपल्याला अगदी अचूक सोडविणे गरजेचे आहे जेणेकरून जेव्हा निकाल समोर येईल तेव्हा आपण यशस्वी व्हावे.

मृत्यू अगोदर माणसाला खूप कामे दिसतात, करायची असतात, पण मृत्यूला याच्याशी काही देणे घेणे नाही, ईश्वराचा आदेश आला आणि यमदूत हजर! आपण म्हणतो एखादी व्यक्ती अपघाताने मेली हे आपल्यासाठी व त्याच्यासाठी अपघात होवू शकते पण हे पूर्णनियोजित असते. आपण जेव्हा आईच्या पोटात असतो. तीन महिन्यानंतर सगळे लिहिले जाते आपण कोठे जन्मनार, काय होणार, कोठे मरणार एवढे की (उर्वरित आतील पान 7 वर)

जेथे मरणार त्या ठिकाणची मातीही आपल्या शरीरात टाकली जाते (आहे ना अद््भूत). मेडिकल सायन्स अजून हे सिद्ध करू शकले नाही हे वेगळेपण एक दिवस जरूर सिद्ध करेन. जसं डीएनएला शोधलं ज्याच्यात आपल्या पूर्ण अस्तित्वाची माहिती असते. माणूस म्हणून ही माणसाची आत्मा नेहमीच राहणार आहे. तिला मरण नाही म्हणून आपल्याला गैरसमज होतो किंवा आपल्याला मृत्यूची आठवण सहसा येत नाही कारण आपल्या डीएनएमध्ये ती कोडिंग नाही. आपण मेल्यानंतर ही मरत नाही फक्त या जगातून त्या जगात प्रवेश करतो. प्रत्येक माणूस चालत आहे, त्याचे चालणे हे मृत्यूवर संपते. मग येथून तो उडायला लागतो, स्वर्ग किंवा नर्काकडे. आपल्याला माहित आहे की मेल्यानंतर पटकन आपल्याला स्वर्गात किंवा नर्कात टाकले जात नाही तर बरजख (एक आड पडदा) आहे. या दुनियेत आणि त्या दुनियेमध्ये. चांगल्या आत्म्यांना इल्लियीन मध्ये आकाशांच्या वर तर वाईट आत्म्यांना सिज्जिन जमीनीखाली ठेवण्यात येते. प्रलयाचा दिवस येईपर्यंत. न्यायनिवाडा होईपर्यंत. 

मृत्यूनंतर काय होते?

1. माणसाचे नाव सर्वप्रथम हरवते, लोक त्याला डेडबॉडी शव (मय्यत) म्हणून ओळखायला लागतात. ज्या नावाला गाजवण्यासाठी त्याने पूर्ण जीवन समर्पित केलेले असते. नमाजे जनाजा अदा करण्यासाठी ’जनाजा आणा’ म्हणतात. माणसाचे नाव घेऊन नाहीत म्हणत. साहेबांना कबरमध्ये घालताना ’मय्यत’ म्हटले जाते. 

2. त्याचा माल वारसदार वाटून घेतात.

3. लेकरं जगविण्यासाठी तो रात्रंदिवस एक करतो. त्याला फक्त कब्रस्तान किंवा स्मशानघाटापर्यंतच साथ देतात. परंतु त्याने केलेली पुण्याई मेल्यानंतरही साथ देते आणि त्याचा मोबदला त्याला मिळणार म्हणून चांगले कर्म करावे हेच आपला खरे इन्व्हेस्टमेंट (निवेश) आहे.

ज्यांना आपण जीवापाड प्रेम करतो ते आपल्याला सोडून का जातात? कोठे जातात? हे असे नियम का आहे? आपण याला मोडू शकतो का? आपली भेट आपल्याला सोडून गेलेल्या आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी वगैरे यांचयशी पुन्हा होऊ शकते. एक मोठी स्पेस निर्माण होते आयुष्यात प्रियजन गेल्यावर भेटावेसे वाटते पण कधी? 

वरील प्रश्नांचे उत्तर :

हे अल्लाहने केलेले नियम आहेत. प्रत्येक सजीवाला मृत्यू येणार म्हणजे येणारच. म्हणूणच आपले प्रियजन आपल्याला सोडून जातात. आपल्याला जन्म आणि मृत्यू देणारा अल्लाहच आहे. त्याच्या आदेशाविना कोणी बाळ जन्मू शकत नाही की कोणी मरू शकत नाही. बळजबरीने जसे टाईम ओव्हर झाल्याने उत्तरपत्रिका आपल्यापासून हिसकावून घेतली जाते तशीच मृत्यू येवून आपली आत्मा हिसकावणार. 

हा अल्लाहचा नियम आपण मोडूच शकत नाही. आपली भेट आपल्या पालकांशी व नातेवाईकांशी नक्की होणार आहे म्हणून उदास होऊ नका. मृत्यू ही झोपेची थोरली बहीण आहे. जसं दररोज आपण झोपेतून उठतो तसेच मेल्यानंतर ही कित्येक वर्षे ओलांडले असतील. अल्लाह प्रलयाच्या दिवशी सगळ्यांना परत उठविणार म्हणून मृत्यू हे जीवनाचा अंत आहे असं समजण्याची घोडचूक करू नका. जसं 6,7,8 तास झोपून उठल्यानंतर ही आपल्याला वाटते की काही मिनीटच आपण झोपले तसंच माणसाला प्रलयाच्या दिवशी वाटेल या जगात अर्धा किंवा एकच दिवस राहिले. 

आपल वय काय आहे? अगदी बरोबर सांगा आणि विचार करा की यांच्या आदी आपण कोठे होतो? या जगात आपण आपल्या इच्छेने आलो का? का आपण आपल्या इच्छेने आपले राष्ट्र, जिल्हा, शहर, गांव, घर, आई-वडिल, भाऊ-बहीण, पती-पत्नी, मातृभाषा, रंग, उंची वगैरे निवडले आहे का? मग हे सगळे आपल्यासाठी निवडणारा कोण? निश्चितच एक मात्र अल्लाह. आपले इतके चांगले सुंदर अस्तित्व ही अल्लाहची देणगी आहे. आभार मानावे आणि तोच आपल्याला मृत्यूही देणार. मृत्यूला चव ही असते? माहित आहे का? ’’प्रत्येक जीवाला मृत्यूचा आस्वाद घ्यावा लागणार आहे. मग तुम्ही सर्व आमच्याकडेच परतवून आणले जाणार आहात.’’ (सुरे अल अनकबूत)

म्हणून चिंता करण्यासाठी हा मुद्दा मुळीच होऊ शकत नाही की या जगात आपला जीव कसा वाचवावा. परंतु, चिंतेची बाब तर ही आहे की या जगात ईमान कसे शाबूत ठेवावे आणि ईशभक्तीची निकड कशी पूर्ण करावी. अल्लाहकडे हीच प्रार्थना आहे की आपल्या सर्वांचा अंत चांगला होवो आणि मृत्यूचा आस्वाद आपल्याला चांगला लागो. (आमीन.)

- डॉ. सीमीन शहापूरे

8788327935


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget