Halloween Costume ideas 2015
July 2021


आयीन-ए-मुस्तफा के सिवा हल हों मुश्किलें

सब अ्नल का फरेब निगाहों का फेर है

भांडवलशाही व्यवस्थेमध्ये नाव जरी शेतकरी आणि शेतमजुरांचे घेतले जात असले तरी सत्ता ही कायम चालाक आणि धोरणी लोकांच्या हातात असते. सरकारचे समर्थक भांडवलदार आणि कट्टर कार्यकर्ते वगळता बाकी जनता कायम गरीब, अशिक्षित व रोगट कशी ठेवता येईल याकडेच राजकारण्यांचे लक्ष असते. त्यांना हे ही माहित असते की, शिक्षण, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रांमध्ये पुरेशी गुंतवणूक केली तर जनतेची कायमची गरीबी दूर होऊ शकते परंतु राजकारणी असे करत नाहीत. त्यांचेे धोरणच असे असते की, शिक्षण, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रामध्ये पुरेशी गुंतवणूक केल्या जाऊ नये. एवढेच नव्हे तर या क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे जेणेकरून सरकार समर्थक भांडवलदार आणि कार्यकर्त्यांना तारांकित शिक्षण संस्थानाचे जाळे विनता येईल व त्यात त्यांनाच लाभ होईल. अलिकडे शेतकऱ्यांविषयक केंद्र सरकारने मान्य केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांचे नव्हे तर भांडवलदारांच्या हितासाठी काढलेले आहेत हे वरील धोरणाचाच एक भाग आहे. लोकशाहीमध्ये त्याच व्यक्ती आणि व्यक्ती समुहांची प्रगती होत असते जे राजकीयदृष्ट्या जागरूक असतात. सरकारवर कुठल्या न कुठल्या पद्धतीने प्रभाव ठेवून असतात. याच कारणामुळे दर पाच वर्षांनी,’’गरीबी निर्मुलनाचे’’ आश्वासन देऊनही गरीबी निर्मुलन होत नाही. 

जनता गरीब व अशिक्षित रहावी म्हणून सरकारी रूग्णालये, शाळा आणि कृषी क्षेत्र ठरवून बकाल ठेवले जातात. म्हणून कुठलीही अस्पृश्यता न बाळगता आपोआप गरीब जनता या तारांकित शाळा आणि रूग्णालयाच्या परिघाबाहेर फेकली जाते आणि यावर कडी म्हणजे कोणाकडे याची तक्रार करता येत नाही. भारतातच नव्हे तर जगातील प्रत्येक लोकशाहीमध्ये हेच धोरण अघोषितपणे राबविले जाते. जनता अशिक्षित किंवा अर्धशिक्षित असेल आणि त्यांच्यातील बहुतेकांचे आरोग्य चांगले नसेल तर गरीबी आपोआप येते व तिच्यासोबत येणाऱ्या वाईट सवई सुद्धा ’एकावर एक फ्री’ या तत्त्वावधानाप्रमाणे आपोआपच येतात. जनतेची पोटा आणि हाताची गाठ घालता-घालता पाच वर्षे कधी निघून गेली व पुढची निवडणूक कधी आली हे जनतेलाच कळत नाही. निवडणुकांच्या तारखा घोषित होताच राजकारणाचा पारा गरीब वस्त्यांमध्ये आपोआप चढतो. कार्यकर्त्यांना अचानक महत्त्व प्राप्त होते, त्यांच्या खिशात पैसा खुळखुळायला लागतो आणि निवडणुकांना उत्सवाचे रूप प्राप्त होते. गरीब कार्यकर्त्यांना खूप महत्त्व दिले जाते. चार पैसे मिळत असल्यामुळे ते ऊर फाटेपर्यंत ढोल, ताशे बढवून साहेबांचा प्रचार करतात. निकाल लागले की साहेब नॉट रिचेबल होऊन जातात. त्यांना मंत्रिपदाचे तर कार्यकर्त्यांना रोजगार हमी योजनेचे वेध लागतात. साधारणपणे या विष्यस्सर्कल मधून बाहेर पडणे कोणालाही शक्य होत नाही. 

थोडक्यात गरीबी हटविण्यासाठी सरकारची स्थापना केली जाते मात्र सरकारच्या गरीबांच्याविरोधी धोरणामुळेच जर गरीबी येत असेल तर तक्रार कोणाकडे करावयाची? एरव्हीपेक्षा यावेळेस तर परिस्थितीही वेगळी आहे. कोविडच्या साथीचे दोन टप्पे पार पडलेले असून, येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तिसरा टप्पा सुरू होईल, अशा बातम्या अधूनमधून कानावर येत आहेत. कोविडमुळे सरकारचे उत्पन्न लक्षणीयरित्या घटले असून, सरकारच्या मनात आले तरी ते जनतेची आर्थिक मदत करू शकणार नाहीत,अशी एकंदरित परिस्थिती आहे. अश्या परिस्थितीमध्ये ’अपनी मदत आप’ या तत्वावधानानुसार आपली गरीबी आपणच दूर कशी करू शकतो, यावर गांभीर्याने विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. 

गरीबीचे मुख्य कारण

गरीबीचे मुख्य कारण भ्रष्ट-आचरण आहे. शेती वगळता इतर प्रत्येक क्षेत्राला भ्रष्टाचारी अजगराचा मजबूत विळखा पडलेला आहे. भारतासारख्या अध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या देशात एवढे भ्रष्टाचारी लोक निर्माण का झाले, याचा जर विचार केला तर लक्षात येते की, आधुनिक जगात यशाची व्याख्याच बदलून गेलेली आहे. यशस्वी तोच ज्याच्याकडे संपत्ती आहे. मग ती संपत्ती त्याने कशी कमावली, याचा कोणीच विचार करायला तयार नाही. त्यामुळे दारू आणि ड्रग्जपासून खाद्य पदार्थात भेसळ आणि औषधांमध्ये काळाबाजार करून संपत्ती कमावण्यास मोकळीक आहे. ज्ञान, त्याग, प्रेम, सदाचार, सम्मान, दया, करूणा या मुल्यांचा यशस्वी होण्यामध्ये काहीएक संबंध राहिलेला नाही. मुंबईच्या सिनेउद्योगामध्ये भरपूर पैसा आहे हे माहित असून देखील पूर्वी चांगल्या घरच्या मुली त्या उद्योगात जात नसत. आता पैशासाठी सिनेउद्योग तर सोडाच पॉर्न उद्योगातही चांगल्या घरच्या मुलींना जातांना लाज वाटत नाहीये. नव्हे राजकुंद्रासारखे उद्योगपती या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी हातभार लावताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या स्वदेशी उद्योगाला भरभराटीत आणण्यामध्ये यास्मीन रसूल बेग (40), मुहम्मद आतिफ नासीर अहेमद सैफी (32) अशी सोज्ज्वळ नावे असलेल्या मुस्लिमांचाही सहभाग असल्याची बातमी 19 जुलै 2021 च्या सर्वच वर्तमानपत्रातून झळकलेली आहे. थोडक्यात अवैध मार्गाने संपत्ती मिळविणाऱ्यांना समाजामध्ये सन्मान मिळत असल्यामुळे अनेक मुस्लिमही हा सन्मान मिळविण्याच्या स्पर्धेमध्ये सामील झालेले आहेत. 

संपत्तीचा संचय दुराचारी लोकांच्या हातात झाल्याने सदाचारी लोकांकडे राष्ट्रीय संपत्तीचा फार कमी वाटा येतो. हे गरीबीचे सर्वात मोठे कारण आहे. देशात संपत्ती संचयाची एक आंधळी स्पर्धा सुरू असून, प्रत्येकजण कुठल्याही परिस्थितीत ती स्पर्धा जिंकण्यासाठीच तिच्यात सहभागी होत आहेत. म्हणून राष्ट्रीय संपत्तीचे अभिसरण अनैतिक उद्योगामध्येच होत आहे. यासाठी सर्व समाज जबाबदार आहे. ज्याप्रमाणे रक्ताचे डाग रक्ताने स्वच्छ होत नाहीत त्याचप्रमाणे वाममार्गाचे मध्ये अडकलेल्या संपत्तीला वाममार्गाने स्वच्छ करता येत नाही. त्याला हराम आणि हलालच्या कसोटीवर कसून सद्मार्गाकडे वळवावे लागते. तेव्हाच संपत्तीचे अभिसरण समाजातील सदाचारी लोकांकडे सुरू होते. त्यासाठी ज्यांच्याकडे कुरआन नावाचा ईश्वरी ग्रंथ आहे त्यांना पुढे यावे लागेल आणि संपत्ती कमाविण्याची व ती खर्च करण्याची ईश्वरीय व्यवस्था काय आहे? हे जनतेसमोर मांडावी लागेल. थोडक्यात गरीबी निर्मुलनाची इस्लामी पद्धत काय आहे? याचा परिचय जनतेला करून द्यावा लागेल. तो परिचय करून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे हा लेख आहे. 

इस्लाममध्ये संपत्तीचे स्थान

एकेश्वरवादाचा त्याग केल्यामुळे माणसाला कोणतीच भीती राहत नाही व तो संपत्ती कमावण्यात आणि खर्च करण्यात  कुठल्याही आचार संहितेला बांधिल राहत नाही. म्हणून लोक आपल्या खऱ्या-खोट्या ऐपतीचे प्रदर्शन करण्यासाठी अमाप पैसा मिळेल त्या मार्गाने गोळा करत असतात व तो मिळेल त्या मार्गाने खर्च करत असतात. एकेश्वरवादावर विश्वास  माणसाच्या याच प्रवृत्तीला लगाम लावतो. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा व्याज आहे तर इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचा कणा जकात आहे. व्याजाधारित अर्थव्यवस्थेमध्ये संपत्ती ही खालून वर म्हणजे गरीबांकडून श्रीमंतांकडे जाते. या उलट जकात आधारित इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये संपत्ती ही वरून खाली म्हणजे श्रीमंतांकडून गरीबाकडे येते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कमाईवर कर लावला जातो त्यामुळे कमाई लपविता येऊ शकते आणि कर वाचविता येऊ शकतो. मात्र इस्लाममध्ये कर बचतीवर लावला जातो आणि बचत मात्र लपविता येत नाही. त्यामुळे जकात अदा करावीच लागते. 

इस्लाममध्ये संपत्तीचे सर्व व्यवहार शरियतच्या कोंदनात बसविलेले असल्यामुळे आर्थिक व्यवहाराचे अधिष्ठान नैतिक मुल्यांवर ठेवलेले असते. म्हणून या व्यवस्थेमध्ये सदाचार, ज्ञान, त्याग, प्रेम, सम्मान, दया, करूणा यांना फार महत्त्व असते. या सर्व कारणामुळे संपत्तीचे अभिसरण समाजामध्ये समप्रमाणात होत असते. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,’’नमाज कायम करा, जकात द्या आणि पैगंबर (सल्ल.) यांच्या आज्ञा पाळा, आशा आहे की तुमच्यावर दया केली जाईल.’’ ( संदर्भ : सूरे अन्नूर : आयत नं. 56). या आयातीमध्ये नमाजसारख्या अत्युच्च उपासनेसोबत जकातची सांगड घातलेली आहे आणि अशा अनेक आयाती कुरआनमध्ये विखुरलेल्या आहेत ज्यामुळे जकातीचे महत्त्व श्रद्धावान मुस्लिमांच्या मनावर बिंबवले गेले आहे. यामुळे जकात न अदा करण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनामध्ये येत नाही आणि दरवर्षी नियमितपणे कोट्यावधी रूपये कुठल्याही ईडी आणि सीबीआयच्या बडग्याशिवाय गरीबांच्या खिशात जातात. 

याशिवाय मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपत्तीमध्ये एकीकडे नातेवाईकांचा वाटा ठरविण्यात आलेला असला तरी दूसरीकडे वारस नसलेल्या पण गरीब असलेल्या लोकांचाही समावेश वारसांसोबत केलेला आहे. सुबहान अल्लाह (अल्लाह पवित्र आहे)! किती उच्च आणि दैदिप्यमान असा हा नैतिक विचार आहे. म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,’’आणि जेव्हा वाटणीच्या वेळी कुटुंबातील लोक आणि अनाथ व गोर-गरीब आले तर त्या संपत्तीमधून त्यांनादेखील काही द्या आणि त्यांच्याशी भल्या माणसासारखे बोला.’’(संदर्भः सुरे अन्निसा : आयत नं.8).

इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये गरीबी निर्मुलनासाठी शासनावर जेवढी जबाबदारी टाकली आहे तेवढीच व्यक्तीवरही टाकलेली आहे. शासनाने आपल्या बैतुलमाल (ट्रेझरी)मधून जनकल्याणाच्या अशा योजना हाती घ्याव्यात ज्यामुळे जनतेची गरीबी दूर होईल तसेच प्रत्येक श्रद्धावान मुस्लिमाने आपल्या बचतीमधून जकात द्यावी. त्याशिवाय, सदका (दान), उश्र (कापणीच्या वेळेस धान्याचा विशिष्ट भाग) गरीबांसाठी राखीव ठेवणे, फित्रा इत्यादी मार्गाने गरीबांना आर्थिक लाभ वर्षभर व्यक्तीगत पातळीवरून होत राहील, अशी व्यवस्था केलेली आहे. यामुळे गरीबी निर्मुलनास मदत होते. 

अलिकडे गरीबांना मोफत जेऊ घालण्यासारख्या महत्वाच्या बाबीकडे मुस्लिमांचे दुर्लक्ष होत असून यात शीख बांधवांनी बाजी मारल्याचे दिसून येते. इस्लाममध्ये गरीबांना मोफत जेवण देण्याची अनेक ठिकाणी ताकीद करण्यात आली आहे. यासंदर्भात कुरआनमध्ये गरीबांना जेवण न देणाऱ्यांच्या बाबतीत तंबी करताना म्हटले आहे की, 1.’’व गरीबांना जेवण देण्यास लोकांना उद्युक्तही करीत नव्हता’’ (संदर्भ : सुरे अलहा्नका आयत नं.34).

2. ’’आणि गरीबांना जेवू घालत नव्हते’’ (संदर्भ : अलमुदस्सीर आयत नं. 44).

3. ’’आणि गरीबाला जेवू घालण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देत नाहीत’’ (सुरे अल्फज्र आयत नं. 18).

वरील आयातींवरून एक गोष्ट तर वाचकांच्या लक्षात येईलच की, गरीबांना मोफत जेवण न घालणाऱ्या लोकांबद्दल ईश्वराने नाराजी व्यक्त केलेली आहे. या संदर्भातील अधिक तपशील या लेखात देणे शक्य नाही. म्हणून ज्यांना या संबंधी माहिती हवी असेल त्यांनी रास्त कुरआनमधील या आयातींचा अभ्यास करावा. 

याशिवाय इस्लाममध्ये अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मुस्लिमांना प्रेरित करण्यात आलेले आहे. एके ठिकाणी तर अनावश्यक खर्च करणाऱ्यांना सैतानाचा भाऊ सुद्धा म्हटलेले आहे. अनावश्यक परंपरा आणि रितीरिवाजांचे पालन करण्यामध्ये अनेक मुस्लिम लोक आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतात. विशेषतः लग्न सोहळ्यांमध्ये असा अमाप खर्च केला जातो की त्यामुळे अनेक कुटुंबेही लग्नानंतर दारिद्ररेषेखाली जातात. ब्रँडेड कपडे, सुगंध आणि मॉलमध्ये अनावश्यक खरेदी करून मुस्लिम लोक कोट्यावधी रूपये खर्च करत असतात. श्रद्धावान मुस्लिमांना अशा अनावश्यक खर्चापासून अलिप्त राहण्याची ताकीद करूनच कुरआन थांबत नाही तर आपण गरजवंत असतांना सुद्धा दुसऱ्या गरवंतांचा आपल्यापेक्षा जास्त विचार करण्याची उच्च नैतिक शिक्षा तो देतो. म्हणून म्हटलेले आहे की, 

3.‘’वायफळ खर्च करणारे सैतानचे बंधू होत, आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्न आहे’’ (बनी इस्राईल आयत नं. 27).

4. हे मानवानों! खा, प्या मात्र मर्यादाभंग करू नका. अल्लाह मर्यादा भंग करणाऱ्या लोकांना पसंत करत नाही. (संदर्भ : सुरे आराफ आयत नं. 31). 

या तिन्ही आयातीमध्ये मुस्लिमांना वायफळ खर्च टाळण्यासंबंधी सक्तीने बजावण्यात आलेले आहे. मोफत अन्नछत्र चालवणे आणि वायफळ खर्च टाळणे म्हणजे गरीबीच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या लोकांची मदत करण्यासारखे आहे. ह उदात्त शिकवण आजच्या स्वार्थी वर्तणुकीच्या अगदी उलट आहे. कुरआन येथेच थांबत नसून यापुढे म्हणतो की, ’’आणि ते स्वतः (मुस्लिम) गरजवंत असतांना दुसऱ्या गरजूंना आपल्यावर प्राधान्य देतात.’’ (संदर्भ : सुरे अलहश्र, आयत नं.9)

मदीना येथील भातृभाव योजना

एकेश्वरवादाची शिकवण म्नकाच्या मूर्तीपूजकांना मुळीच आवडत नव्हती. त्यामुळे मूठभर मुस्लिम एकीकडे आणि कुरेशचे बलवान मूर्तीपूजक दुसरीकडे असा विषम सामना जेव्हा रंगात आला तेव्हा नाईलाजाने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना आपल्या साथीदारांसोबत मदीना येथे हिजरत करावी लागली. अचानक हिजरत करावी लागल्यामुळे मुस्लिमांना अंगावरच्या कपड्यानिशी जावे लागले. त्यामुळे मदीना शहरात पोहोचल्यानंतर त्यांच्याकडे स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचीही व्यवस्था नव्हती. अशा वेळेस इस्लामी ब्रदरहुड (भातृभाव योजना)ची ऐतिहासिक घटना घडली. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्नकाहून आलेल्या एका मुहाजीरची मदीना येथील एका अन्सारी मुस्लिमांबरोबर जोडी लावून दिली आणि घोषित केले की आजपासून तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात. अशा तऱ्हेने मक्का येथील सर्व स्थलांतरीतांच्या जोड्या मदीना येथील स्थानिकांशी लावण्यात आल्या. तेव्हा जगाने पाहिले की त्यांच्यात असे बंधुत्व निर्माण झाले होते की, त्याचे दूसरे उदाहरण त्यापूर्वी किंवा त्यानंतर जगाने पाहिलेले नाही. अन्सारी मुस्लिमांनी आपल्या भावांसाठी आपल्या सर्व चल-अचल संपत्तीची उभी विभागणी करून अर्धी आपल्या स्थलांतरित भावांना दिली. येणेप्रमाणे स्थलांतरित मुस्लिमांची गरीबी दूर  झाली. म्नकाहून येणारे मुस्लिम व्यापारी होते त्यांना शेती येत नव्हती तर मदीना येथील स्थानिक मुस्लिम शेतकरी होते त्यांना व्यापार येत नव्हता. दोघांच्या जोड्या लागल्यामुळे शेतीबरोबर व्यापारही सुरू झाल्याने अन्सार आणि मुहाजीर दोघांचीही भरभराट झाली. आज जर कोविडच्या परिस्थितीमध्ये रोजगार हरवलेल्या आपल्या शेजाऱ्याची जबाबदारी प्रत्येक मुस्लिमाने स्वीकारली आणि मदीना भातृभाव योजनेप्रमाणे त्यांचे पालकत्व स्वीकारले आणि आपल्या संसाधनामधून अर्धे नाहीतरी किमान त्याच्या गरजेपुरती मदत केली तर त्याला स्वतःच्या पायावर उभे राहता येईल व बंधूभाव वाढेल तो वेगळा. तसेच वर नमूद कुरआनच्या इतर आयातींप्रमाणे आचरण केले तर कुठलीही फीत न कापता, कुठल्याही पॅकेजची घोषणा न करता, कुठलाही गाजावाजा न करता गरीबी निर्मुलनाची प्रक्रिया आपोआप सुरू होईल. यात माझ्या मनात तरी किमान शंका नाही. परंतु असे करण्यासाठी मोठ्या त्यागाची आवश्यकता आहे. मोठा त्याग करण्यासाठी मोठे मन लागते आणि मोठे मन इस्लामवर अढळ श्रद्धा असल्याशिवाय मिळत नाही. नुकतीच त्यागाची शिकवण देणारी ईदुल अज्हा झालेली आहे. 

यानिमित्ताने प्रत्येक मुस्लिमाने आपला एक गरीब शेजारी आर्थिक मदतीसाठी म्हणून दत्तक घ्यावा म्हणजे नक्कीच गरीबी दूर होईल. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ’ऐ अल्लाह ! आम्हाला आपल्या देशबांधवांची गरीबी दूर करण्यासाठी मदीना येथील भातृभाव योजनेप्रमाणे त्याग करण्याची समज आणि शक्ती दे.’’ आमीन. 


- एम.आय.शेख



देशातील विरोधी पक्ष, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून त्यांना वेळीच नामोहरम करण्यासाठी सत्ताधारी पक्ष गुप्तचर संस्था, फोन टॅपिंगचा वापर करीत. मात्र हे करणे अवघड होत असल्याने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डायरे्नट विरोधकांचे मोबाईल, कॉम्प्युटर हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे प्रकार जगभरात वाढले आहेत. त्याला भारताचे सत्ताधारीही बळी पडल्याचे समोर येत आहे. हे कृत्य लोकशाहीला ओरबाडण्यासारखे असून, ते अधिक धोकादायक आहे. त्याला वेळीच रोखणे काळाची गरज आहे. 

पेगॅसस म्हणजे काय? 

पेगॅसस हे एक सॉफ्टवेअर असून, एनएसओ ग्रुप या इस्त्राईली कंपनीने त्याला विकसित केलेले आहे. एखादा एसएमएस अथवा ईमेल पाठवून हे सॉफ्टवेअर कोणाच्याही स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करता येते. एकदा इन्स्टॉल झाले की, ज्याच्या मोबाईल/ संगणकात ते इन्स्टॉल झाले त्यात साठवलेली सगळी माहिती हे या सॉफ्टवेअरच्या मदतीने डाऊनलोड करता येते. एवढेच नव्हे हे सॉफ्टवेअर इतके भयानक आहे की, संगणक अथवा मोबाईल धारकाच्या नकळत या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोबाईल/ संगणक हाताळता येते. ते चालूबंद करता येते, कॅमेरा सुरू करता येतो, रेकॉर्डिंग करता येते. म्हणजे आपल्या हालचाली दुसरीकडील व्यक्ती पाहत आहे. याची कल्पनाच कोणाला येत नाही. ही बाब व्यक्तीस्वातंत्र्यावरील हल्ल्यासारखी आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भारतातील विविध क्षेत्रातील व्यक्तींवर लक्ष ठेवले गेले आणि त्यांची हेरगिरी केली गेली. हा मुद्दा विरोधी पक्षांनी जोरकसपणे लोकसभेमध्ये लावून धरला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांचा हा आरोप धुडकावून लावला आहे. त्यांचे म्हणणे असे की, कोणाच्या मोबाईलमध्ये पेगॅससचे काही अंश आढळून आले असतील तर त्याला सरकार जबाबदार कसे? मात्र हे उत्तर लंडन येथून प्रकाशित होणाऱ्या ’द गार्डियन’ या दैनिकाने दिले आहे. या दैनिकाने दिलेल्या तपशिलानुसार बहेरीन, कजाकस्तान, मेक्सिको, रवांडा, अजरबैजान, सऊदी अरेबिया, हंगेरी, संयुक्त अरब अमिरात आणि भारत या दहा देशांनी एनएसओकडून हे सॉफ्टवेअर खरेदी केलेले आहे. आणि एनएसओ या कंपनीचा दावा आहे की, ही कंपनी सदरचे सॉफ्टवेअर केवळ कोणत्याही देशातील सरकारांनाच विकते. त्यामागे देशविघातक कृती करणाऱ्या लोकांच्या हालचालींवर पाळत ठेवणे, ड्रग, महिला, मुलींची तस्करी, हत्यार विकणाऱ्या दलाांवर व इतर देशविघातक कृत्य करून पाहणाऱ्या लोकांवर पाळत ठेवण्यासाठी हे सॉफ्टवेअर अधिकृत सरकारांनाच विकले जाते. ही बाब खरी आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की, भारतात ज्या विरोधी पेक्षनेते, पत्रकार आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या भ्रमणध्वनीत या सॉफ्टवेअरद्वारे घुसखोरी करण्यात आली. ती नाईलाजाने सरकारनेच केली, असे मान्य केल्याशिवाय, गत्यंतर नाही आणि हीच बाब ’द वायर’ या न्यूज पोर्टलने या बाबीचा भंडाफोड करून देशाच्या निदर्शनास आणून दिली. 

आजही भारतीय सत्ताधाऱ्यांना राजकीय बंडखोरीचे मोठे भय वाटते. भाजप अडचणीत आला की राष्ट्रवाद अन् लोकशाही धोक्यात असल्याचे पालुपद आळवले जाते. पेगॅसस आत्ता चर्चेत आले. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात अशा तंत्राची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. भीमा कोरेगावप्रकरणी तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्यांच्या संगणकात अशाच तंत्राने माहिती घुसवल्याचा आरोप आहे. केंद्रातील सरकार पेगॅसस प्रकरण किती गांभीर्याने घेईल, हे सांगता येत नाही. 

संसदीय समितीची स्थापना - पेगॅससच्या वादळानंतर शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील आयटी घडामोडींच्या संसदीय स्थायी समिती बनविली असून, यामधये लोकसभेचे 21 आणि राज्यसभेचे 11 सदस्य आहेत. यापैकी 17 भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे स्वतंत्र सदस्य आहेत. समितीतील भानुप्रताप सिंह वर्मा आणि निशिथ प्रमाणिक यांना 7 जुलै रोजी मंत्रिपद मिळाले आहे. यामुळे समितीत आता दोन जागा रिक्त आहेत.

प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी केली जावी : एडिटर्स गिल्ड

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत पेगासस प्रकरणाच्या स्वतंत्रपणे चौकशीची मागणी केली. पाळत ठेवण्याचे कृत्य दाखवते की पत्रकारिता आणि राजकीय असहमतीला ‘दहशतवादा’प्रमाणे गणले जात असल्याचे गिल्डने म्हटले आहे.

- बशीर शेख



न्याय व्यवस्थेच्या बदलत्या रूपाने प्रत्येकजण आनंद व्यक्त करत आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यातली एक घटना दिल्ली दंगलीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. मुरलीधर यांनी अनुराग ठाकूर, परदेश वर्मा आणि कपिल मिश्रा यांच्या प्रक्षोभक विधानाचा एक व्हिडीओ, सॉलिसिटर जनरल तुशार मेहता यांना दाखवला. त्यांना विचारले होते की, या तिघांविरूद्ध एफआयआर कधी करणार. मेहतांनी योग्य वेळी केला जाईल असे म्हटले होते पण ती योग्य वेळ आजवर आलेली दिसत नाही. काही काळापूर्वीच त्याच दंगलीबाबत एका प्रकरणाची सुनावणी करताना दिल्लीच्या कडकडडुमा न्यायालयाने पोलिसांवर 2500 रूपयांचा दंड ठोठावला. दंगली दरम्यान नासिर नावाच्या एका व्यक्तीच्या डोक्यात बंदुकीची गोळी लागली असता त्याने पोलिसांकडे तक्रार केली. पण दिल्ली पोलिसांनी त्याची तक्रार एक अन्य एफआयआर सोबत जोडली. न्यायालयाने यावर असे ताशेरे ओढले की असे वाटते जणू पोलीसच आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. 

हेच ते न्यायालय आहे ज्यांनी गेल्या महिन्यात जेएनयुच्या विद्यार्थीनी देवांगणा, नताशा, निखाल आणि जामिआ मिल्लीयाचा एक विद्यार्थी आसिफ इ्नबाल तन्हा यांना जामीन मंजूर केले होते. प्रत्येकाबाबतचा निकाल 100 पानांचा होता. या निकालात युएपीए या कायद्याचा अयोग्य वापरावर कडक शब्दांमध्ये टिका केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याला रद्द केले नाही. उदाहरण म्हणून प्रस्तुत करण्याची मनाई केली. यावेळी देखील न्यायालयाने फक्त एफआयआर दाखल करण्याचाच आदेश दिला नाही तर आपल्या निकालात हे मान्य केले आहे की, दिल्ली पोलिसांना आपले कर्तव्य नीटपणे पार पडले नाही. मुहम्मद नासिर याने आपल्या 19 मार्च 2019 ला आपल्या शेजारील सहा व्यक्ती, नरेश त्यागी, सुभाष त्यागी, सुशील आणि उत्तम त्यागी, नरेश गौर यांच्या विरूद्ध गोळी घालण्याची तक्रार केली होती पण त्या तक्रारीवरून स्वतंत्र एफआयआर दाखल न करता ती तक्रार ईतर कुठेतरी जोडण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी त्याची तक्रार दाखल केली नसल्याने त्याने कडकडडुमा न्यायालयाकडे धाव घेतली. त्यावर न्यायालयानं दिल्ली पोलिसाला नासिरचा एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. 

29 ऑ्नटोबर 2020 तारखेला दिल्ली पोलीस न्यायालयाच्या या आदेशाविरूद्ध जिल्हा सत्र न्यायालयात गेले आणि तेथे आदेशाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तेथेही न्यायालयाने दिल्ली पोलिसांविरूद्ध कडक टिका केली. न्यायालयाने म्हटले की, पोलिसांचे हे वर्तन चकित करणारे आहे. त्यांनी कोणत्या आधारावर या खटल्यातील आरोपींना्नलीन चिट दिली. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नुसता दंडच केला नाही तर याचिकाकर्त्याला दिल्ली पोलिसांविरूद्ध न्यायालात जाण्यास सांगितले. प्रशासनाविरूद्ध जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत ते त्यांना धडा शिकवला जाऊ शकत नाही. 

मुंबई उच्च न्यायालयाने देखील आयएसआयशी संबंध असल्याचा आरोपात इ्नबाल अहमद कबीर अहमद यांच्या जामिन अर्जाच्या सुनावणी दरम्यान अशीच टिप्पणी केली होती. पाच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या एटीएसने इ्नबाल अहमद, नासिर याफई, रईसुद्दीन यांना युएपीए आणि स्फोटक पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये भा.द.वि.च्या विविध कलमाखाली खटला दाखल केला होता. त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते की, ते आयएसआयएसचे सभासद आहेत. तसेच आयएसआयएसचे अबुबकर अल बगदादी याला आपला खलीफा मान्य केले होते आणि भारतात विविध कार्यात गुंतलेले होते. त्यांच्या माता-पित्यांनी म्हटले होते की त्यांच्या विरूद्ध लावलेल्या आरोपांबाबत कोणताही पुरावा नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे दोन न्यायाधीश न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. जे.एन. जमादार यांनी इ्नबाल अहमदच्या जामीन याचिकेवर युक्तीवाद करताना ज्येष्ठ अ‍ॅडव्होकेट मिहिर देसाईंनी न्यायालयास कळवले की, पाच वर्षाचा कालावधी लोटला असताना देखील आतापर्यंतचा खटल्याची सुनावणी सुरू झालेली नाही आणि चार्जशीटमध्ये कुठेच हे नमूद केले नव्हते की, आरोपींनी बॉम्ब बनवला किंवा कोणत्याही अवैध कार्यात ते गुंतले होते. मुस्लिमांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराची चर्चा करणं त्या बाबती विचार करणं यात काही चुकीचे नाही. म्हणून पाच वर्ष जेलमध्ये डांबुन ठेवणे आणि त्यांच्याविरूद्ध खटला चालवण्याची सुरूवात करणे चुकीचे असून या कारणावरून यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा. याचे उत्तर देताना एनआयएचे वकील म्हणाले की, आरोपी भारताच्या मुस्लिमांसहीत इतर देशांमधील मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारांच्याा चर्चा करीत होते आणि ज्याचा बदला घेऊ इच्छित होते. 

- डॉ. सलीम खान



जर आपल्याला कोणी विचारले आपण कोण तर आपण काय कराल? पटकन स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव सांगून मोकळे व्हाल. हा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर विचारण्यात आला तर आपण आपल्या संपूर्ण नावासोबत आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव ही सांगाल. हाच प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारला गेला तर? मग अगोदर आपल्या राष्ट्राचं नाव, मग राज्य, जिल्हा, तालुका गाव असे सांगण्यात येईल. आहे ना बरोबर? पण एवढीच का आपली ओळख? अधिकतर लोकांचे उत्तर होय जरी असले आणि ते बरोबर जरी असले तरी आपली खरी ओळख यापेक्षा कितीतरी महान आहे पण ती समजून घेण्यासाठी आपले डोके, आपले विचार खूप प्रगल्भ असले पाहिजेत. अनप्रेज्युडाईजचा अर्थ माहित आहे का? नाही. काही हरकत नाही, मलाही माहीत नव्हते. होमियोपॅथीक डॉ्नटर होण्याआधी पण होमियोपॅथीक डॉ्नटर व्हायला महत्त्वाची अट हिच की डॉ्नटरने अनप्रेज्युडाईस असायला पाहिजे. म्हणजेच त्याचे डोके अगदी कोरे पाहिजे. यात कुठल्याही पूर्वगृहांना जागा नसावी. आपले डोके आणि विचार अगदी स्वच्छ आणि निर्मळ असावेत. 

च्छ भारत अभियाना अंतर्गत काही प्रमाणात आपले, घर परिसर स्वच्छ झाल्यासारखा दिसते पण आपल्या मनात असलेली शत्रुत्वाची, द्वेषाची, छल, कपटाची घाण काढून टाकण्यास मात्र हे अभियान यशस्वी झाल्यासारखे दिसत नाही. आपण म्हणणार त्याचा उद्देश तर फक्त डोळ्यांनी दिसणारी घाण दूर करणे हाच होता. होय! पण मनातली न दिसणाऱ्या घाणीपासून ही मुक्ती मिळवण्यासाठी ’’स्वच्छ मन’’ अभियान राबवावे लागेल की काय? आणि राबवून ही ते कितपत यशस्वी होईल सांगता येत नाही, असो. आपण निघालो होतो आपल्याच शोधात आणि आपली ओळख निश्चित करणे हे खूप महत्वाचे आहे आणि त्यासाठी माणसाने स्वच्छ डोके आणि निर्मळ मन ठेवूनच आगेकूच करायला हवी. चला मग आपण आपल्यालाच शोधूया. अगदी कोरं डोकं आणि मन ठेवून.

आपण म्हणजे तो, ती, तू, मी, स्त्री, पुरूष, लहान, थोर, काळे, गोरे इत्यादी. कोणत्याही देशात राहणारे, कोणतीही भाषा बोलणारे, कोणतेही धर्म पाळणारे, कोणतेही आचार विचार ठेवणारे, कोणतीही संस्कृती बाळगणारे, कोणत्याही पदावर विराजमान आपण म्हणजे आपणच. आनंदीत असो की रागीट, प्रसन्न प्रेमळ असो की तुसडेे, चांगले असो की वाईट आपण म्हणजे अगदी आपणच.

आपण आपल्या शोधात निघालं की आपल्याला कळेल की आपण नेमके कोण? 

काहींना वाटत असेल आपण म्हणजे फक्त आत्मा, काहींच्या मते आपण म्हणजे शरीर, तर अनेकांना वाटत असेल आपण म्हणजे आत्मा आणि शरीर.

आपण आपले डोळे बंद करा. लांब-लांब श्वास घ्या आणि फक्त 11 पर्यंत मोजा कसं वाटते? डोळे बंद केल्यास श्वासाचा आवाज येतो, एक चांगली फिलिंग येते जास्त मोजले की स्ट्रेस (नाग) ही कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला वाटते की आपण एक आत्मा आहोत. आपला शरीर गायब झाल्यासारखं वाटते. पण एक मजेशीर तथ्य मला आढळून आले की आत्मा ही अंधळी आहे ती शरीराला बघू शकत नाही, शरीर बघायला तिला ’’डोळे’’ नावाचे साधनाची गरज भासते आणि डोळे हे सर्व काही बघू शकतात, त्यांचे काम ही शरीरात असलेल्या आत्म्यामुळेच चालते पण आपल्या शरीरात वास्तव्यात असलेल्या आत्म्याला ते पाहू शकत नाहीत. म्हणजेच डोळे हे डोळे असून ही आंधळे, आहेना गंमत! पण थोड थांबा, या डोळ्यांना डोळसपणा येतो ते मरताना. प्रत्येक व्यक्ती आपल्या आत्म्याला शरीर सोडून जाताना बघूू शकतो. ते कसे? आपली आत्मा ही डोळ्यांवाटे जाते म्हणून मेल्यानंतर ही डोळे उघडेच राहतात त्यांना बंद करणारी आत्मा निघून गेलेली असते म्हणून दुसऱ्या व्यक्तींना डोळे झापावे लागतात.

आपण म्हणजे सुंदर शरीर आणि सुंदर आत्मा, स्वच्छ शरीर, स्वच्छ मन आणि स्वच्छ आत्मा. आपण म्हणजे परमेश्वराची अतिउत्तम निर्मिती होय. आपला ईश्वर, परमेश्वर एक म्हणूनच सगळे सारखे. वेगवेगळे ईश्वर असते तर निर्मितीत फरक पडला असता. एकच भाजी एकसारखेच घटक टाकून बनविलेली असली तरी ती वेगवेगळ्या व्यक्तींनी तयार केल्यामुळे चव वेगळी लागते. मग जर ईश्वर वेगळे असते तर आपण ही वेगळे असतो. आपण सगळे एक. मग आपला ईश्वर ही एक मानायला हरकत नाही. ईश्वराने तर आपली एक जात बनविली. ती म्हणजे ’मानव जात’ पण आपण मानवजातीला अनेक जातींमध्ये विभाजीत केलेले आहे. 

कोणी कावळा जर स्वतःला हंस समजत असेल तर तो हंस होणार का? त्यांचे स्वतःला हंस समजून दुसऱ्या कावळ्यांना तुच्छ समजने बरोबर आहे का? नाही ना. पण स्वतःला मानव म्हणणाऱ्या प्राण्यांच्या जातीत हे सगळे चालले आहे आणि खूप लोक याला बरोबर ही मानतात. पण एक मानव दुसऱ्या मानवापेक्षा श्रेष्ठ कसा असू शकतो? आणि जन्मतः एक मानव दुसऱ्या मानवापेक्षा तुच्छ कसा असू शकतो. माणसात श्रेष्ठता निर्माण करणारी एकच अट म्हणजे ’इशभय’ (तकवा) जो व्यक्ती ईशभय बाळगून वाईट कर्म करत नाही, वाईट गोष्टींपासून लांंब राहतो तो तर एक वाईट माणसापेक्षा निःसंदेह श्रेष्ठ असणार परंतू (ईशभय न बाळगणाऱ्या) जन्मतः कोणी कोणापासून श्रेष्ठ नाही.

आपल्याला सर्वात धोकादायक खेळ कोणता हे माहीत आहे का?

बॉक्सिंगला धोकादायक खेळ समजला गेला. पण आजच्या युगात समुद्रात सर्फिंग करणे, लहरींवर खेळणे, आईस-ब्रोकरी वगैरे खेळांना धोकादायक म्हणता येते. एवढेच नव्हे तर ब्लू व्हेल आणि फायर फेअरी गेम्स ही सोशल मीडियातली धोकादायक खेळ, बुल फायटींग म्हणजे सांडला दारू पाजवून माणसांशी झुंज लावून देणे हे ही एक धोकादायक खेळ, पण लोक पैश्यासाठी आपल्या प्राणाची चिंता करत नाही आणि खुशाल हे खेळ खेळतात. आपल्या भारतात बिनपैश्याचा एक रोमांचक खेळ खेळला जातो. ज्याचे नाव माहित आहे का? यात दरवर्षी कितीतरी लोकांचे जीव जातोय. होय तो खेळ आहे हिंदू - मुस्लिम खेळ. या खेळाची सुरूवात इंग्रजांनी केली. 

इंग्रजांच्या भारतातील पदार्पणापूर्वी भारतावर मुस्लिम शासक शासन करत होते. मुसलमान शासकांच्या हजार बाराशे वर्षाच्या कालावधीत जनता गुण्यागोविंदाने राहत होती. कोणीही राजांच्या दरबारात आपले प्रश्न घेऊन जात असे आणि त्याला पटकन न्यायही मिळत असे. फक्त हिंदू - मुुस्लिम नव्हे तर प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला त्याच्या धर्मावर चालायचे स्वातंत्र्य होते. लोक एकमेकांचेच नव्हे तर एकमेकांच्या धर्माचाही आदर करत होते. एकमेकांना मान-सन्मान देत होते. कारण इस्लाम मध्ये 1400 वर्षापूर्वीच डेमोक्रेसी (लोकतंत्र) शिकविली गेली होती. वर्णवाद, जातीयवादाला इस्लाममध्ये थारा नाही. इंग्रज भारतात आले आणि त्यांनी  फोडा आणि राज्य करा या योजनेअंतर्गत हिंदू-मुस्लिमांच्या निरागस मनात शत्रुत्वाचे बीजारोपण करण्याचा प्रयत्न केला. सुरूवातील त्यांना यश आले नाही. कारण आपले पूर्वज खूप हुशार होते. कच्च्या कानांचे नव्हते. त्यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही उलट सुशिक्षित इंग्रजांना त्यांनी हाकलून लावले. 

इंग्रज माघार घेऊन भारत सोडून गेले पण आजही ते अस्वस्थ आहे. त्यांना बघू नाही वाटत भारतात हिंदू - मुस्लिम मिळून राहिलेले. त्यांना हाकाललेल्या बेइज्जतीचा बदला ते आजही घेतात. तेच इंग्रज तीच पॉलिसी डिव्हाईड अँड रूल पण आज अमेरिकेत बसून ते हे खेळ खेळताहेत. आणि आजचली आपली पिढी कच्च्या कानाची त्यांच्यावर विश्वास करून एकमेकांना शत्रू मनायला तयार. इंग्रज हे इस्लामचे विरोधक त्यांनी भारतातल्या हिंदूंना भडकविले कि इस्लाम तलवारीच्या जोरावर पसरलेला आहे. पण हा एक निव्वळ गैरसमज आहे. असे असते तर भारतात एकही व्यक्ती दुसऱ्या धर्माची राहिली नसती. भारतातले सर्व लोक मुसलमान झाले असते. भारत एक मुस्लिम राष्ट्र झाला असता पण असे नाही. मुस्लिम शासकांचे चारित्र्य आणि इस्लामची शिकवण आणि अवलियांची करामत बघून काही लोकांनी इस्लामचा स्वीकार केला.  मुस्लिम शासनकर्त्यांच्या काळात तलवारीचा वापर केला गेला असता तर मुसलमान अल्पसंख्यांक राहिले असते का? असो. 

स्वतःला सुपरवापर म्हणणाऱ्या अमेरिकेला आजही भिती आहे की भारत सुपरपॉवर बनले तर माझे काय? थोडं डोकं लावा. आपल्या लक्षात येईल की आपल्या भारतीय लोकांचा मोठा वाटा आहे त्याला सुपरपॉवर बनविण्यात. तो आपले टॅलेंटेड, जिनिअस तरूणांना जास्त पगार, ऐश्वर्यपूर्ण जीवनाचे आमिष दाखवून आपले टॅलेंट हायजॅक करत आहे. आपल्या तरूणांना स्वतःकडे आकर्षित करत आहेत. हुशार विद्यार्थ्यांचे स्वप्न हे अमेरिका जाणे असते. ग्रीन कार्ड होल्डर बनन असते आपण कळत न कळत, आज ही त्यांच्या-(उर्वरित पान 7 वर)

 गुलामगिरीत आहोत. हिच संपदा भारतात राहिली असती तर आपला भारत महासत्ता नसता का झाला? आता खूप झाले, बस्स करा ना आता! सोडून द्या हे धोकादायक खेळ. आपण कुठवर हे हिंदू-मुस्लिमाचे कुरूप आणि लाजिरवाणे खेळ खेळत राहणार? आता तर याचे आणखीन एक भीषण आणि निर्दयी रूप ’’ मॉब लिंचींग’’च्या स्वरूपात समोर आलेले आहे. मॉब लिंचींगमध्ये मेलेल्या माणसाला मोक्ष जरी प्राप्त होत असला तरी मॉबलिंचींग करणाऱ्यांना नरकाशिवाय काय भेटणार? 

मग आपण आपले पूर्वजांसारखे शहाणे होणे गरजेचे आहे. भारतीय मुसलमान हे साधे भोळे आहेत. त्यांच्या मनात कधी ही काही वाईट येत नाही. कोरोना काळातही ते सर्वधर्मांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढे आलेले आहेत. कोरोनाच्या भितीपायी अनेक ठिकाणी बेवारस सोडण्यात आलेल्या अन्य धर्मीय  प्रेतांचे अंत्यविधी मुस्लिमांनी पार पडले. सर्वांना स्वखर्चाने ऑक्सिजन पुरवठा केला. आजही खाडीच्या देशांत सर्व धर्मांना खूप मान सम्मान दिला जातो. 

मग पूरे आता आपल्याला सायंस टे्ननॉलॉजीमध्ये पुढे जायचे आहे. आपल्या देशाला सुपरपॉवर बनवायचे आहे मग हे घाण खेळ सोडण्यातच आपले भले आहे. अन्यथा आपली प्रगती ही विरूद्ध दिशेत (आपोजिट डायरे्नशन) मध्ये होईल. म्हणजे अधोगती होईल. आपल्या देशाला उन्नतीकडे नेऊया उज्ज्वल भविष्य आपल्या पुढच्या पिढीला देऊया. 

अरे आपण कोण? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे राहिले ना. आपण खरं तर एकच ओळखधारक व काहीही असो, गाव, तालुका जिल्हा, राज्य, राष्ट्र कोणते ही असो आपण फक्त ईश्वराचे प्रतिनिधी (खलीफा) हीच आपली ओळख. प्रतिनिधीला स्वामीने दिलेल्या आदेशांचेच पालन करावे लागते मग आपण सगळ्यांनी त्याच्या आदेशाचे पालन करून त्याला ओळखून, स्वतःला ओळखून. प्रेषित सल्ल.यांनी दाखविलेल्या मार्गावर चालूया. खूप सुंदर आणि अतिशय प्रेमळ मार्ग आहे हा. ’’एकमेकांवर प्रेम करू देशाला प्रगतीकडे नेऊ’’. ईश्वराचे प्रतिनिधी व्हा, शैतानाचे नाही. 

अल्लाहकडे हीच प्रार्थना ’’आम्ही सर्व भारतवासियांच्या मनात प्रेम निर्माण कर, आम्हा सगळ्यांवर कृपा कर आणि आमच्या भारताला प्रगतीचा उच्चांक गाठू दे. (आमीन.)


- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935



रॉयटर्सचे प्रख्यात छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल संपूर्ण जग दुःखमय झाले. त्यांच्या छायाचित्रांनी दक्षिण आशियाई बातम्यांचा मानवी चेहरा टिपला आहे. छायाचित्रांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतात का? ते फसवे असू शकतात, परंतु चित्रे आपल्याला एका सत्याच्या जवळदेखील आणू शकतात जे बऱ्याचदा कटू असते. भारतीय फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांनी टिपलेल्या छायाचित्रांमध्ये बांगलादेशपासून श्रीलंकेपर्यंत दक्षिण आशियातील अलीकडच्या वर्षांतील प्रमुख संकटांचा समावेश होता. त्यांनी लोकांना आदराने वागवले, नेहमीच त्यांची प्रतिष्ठा टिकवून ठेवली जाईल याची खात्री बाळगली. पण ते त्यांच्या शेवटच्या पोस्टींवरून परत आले नाहीत. अफगाणिस्तानातील परिस्थितीची माहिती देताना ते ठार झाले, जिथे आंतरराष्ट्रीय सैन्य मागे घेतले जात आहे.

दानिश सिद्दीकी १६ जुलै रोजी अफगाण सैन्याच्या विशेष तुकडीसोबत जात असताना दक्षिण-पूर्वेकडील कंधार प्रांतात तालिबानशी झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला. एका उच्चपदस्थ अफगाण अधिकाऱ्यालाही आपला जीव गमवावा लागला. प्राणघातक हल्ल्यापूर्वी सिद्दीकींच्या हाताला छरे लागले होते, पण ते बरे होण्याच्या मार्गावर होते. त्यांच्या मृत्यूपर्यंत सिद्दीकी हे रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या भारत शाखेतील मल्टिमीडिया टीमचे प्रमुख होते.

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस पासून अफगाणिस्तानचे राष्ट्रप्रमुख अशरफ गनी आणि अमेरिकन सरकारचे प्रतिनिधी, तसेच अनेक भारतीय राजकारणी, त्यापैकी ममता बॅनर्जी (पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री), काँग्रेस पक्षाचे विरोधी राजकारणी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल (दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री) अशा जगभरातील असंख्य राजकारण्यांनी दानिश सिद्दीकींना आदरांजली वाहिली आहे. भारतात उत्तरेकडील काश्मीरपासून पश्चिमेकडील मुंबईपर्यंत, पूर्वेकडील कोलकाता ते दक्षिणेकडील त्रिवेंद्रम आणि त्याच्या मूळ गावी नवी दिल्ली पर्यंत लोकांनी शोककळा पसरली.

सिद्दीकी भारताची राजधानी नवी दिल्लीतील जामिया नगर या मुस्लिम बहुल जिल्ह्यात लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील मोहम्मद अख्तर सिद्दीकी यांनी जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठात अध्यापन केले, जिथे त्यांच्या मुलाने अर्थशास्त्राची पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर २००७ मध्ये सामूहिक संप्रेषणात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर सुरुवातीला त्यांनी टीव्ही पत्रकार म्हणून काम केलं. नंतरच त्याने फोटोजर्नालिझमकडे वळले.

सिद्दीकी यांनी २०१० मध्ये पुन्हा खालून सुरुवात केली, वृत्तसंस्था रॉयटर्समध्ये इंटर्न म्हणून. पुढच्याच वर्षी ते पश्चिम भारतात राहायला गेले. ही सुरुवातीची वर्षे होती, ज्यात त्यांनी पटकन एक नेटवर्क विकसित केले जे शहराच्या छायाचित्रकारांच्या पलीकडे पसरले होते. मुंबईत आल्यानंतर काही महिन्यांतच दानिश शहरात राहणाऱ्या जवळजवळ प्रत्येक मानवाधिकार कार्यकर्त्याला ओळखत होते. मुंबईत त्यांनी दक्षिणेकडील मोहम्मद अली रोड आणि वांद्रे जिल्ह्यातील बँडस्टँड प्रोमेनेड येथे बराच वेळ घालवला.

सिद्दीकी यांनी झोपडपट्टी आणि तेथील रहिवाशांचे शॉट्स आपल्याला मानवतेवर प्रतिबिंबित करतात. जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांबद्दलची ही सहानुभूती त्यांच्या अनेक छायाचित्रांमध्ये उघड झाली आहे. त्यांच्या टीमने २०१८ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रणासाठी पुलित्झर पुरस्कार जिंकण्याचे हे एक कारण होते, बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासितांच्या त्यांच्या प्रतिमांसह  - हे बक्षीस त्यांनी आपल्या मुलांना समर्पित केले होते. २०१९ मध्ये अखेर दानिश सिद्दीकी यांना रॉयटर्ससाठी हेड फोटोग्राफर बनवण्यात आले आणि ते पुन्हा दिल्लीला गेले.

दानिश सिद्दीकी यांनी अनेक संकटग्रस्त भागात प्रवास केला. फोटोजर्नलिस्ट म्हणून काम करताना त्यांनी नेहमी ब्रेकिंग न्यूजचा मानवी चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला. रॉयटर्स वृत्तसंस्थेसाठी फोटोजर्नलिस्टच्या असामान्य कामात नेपाळ, इराक, उत्तर कोरिया आणि हाँगकाँगमधील छायाचित्रांचा समावेश आहे. २०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतरची बोलकी छायाचित्रेही त्यांनी आपल्या कॅमेरात टिपली होती, ज्यात दक्षिण आशियात जवळजवळ ९००० लोकांचा मृत्यू झाला. २०१६ पासून इराकमधील मोसुलच्या लढाईची त्यांची छायाचित्रे, जेव्हा इराकी सैन्याने तथाकथित बंडखोरांच्या हातून शहर मुक्त केले, तेदेखील विशेष बोलकी आहेत. सिद्दीकी यांनी २०१९ मध्ये भारतीय संसदीय निवडणुकांपूर्वी कुंभमेळ्याच्या महत्त्वाच्या हिंदू उत्सवाचे दस्तऐवज तयार केले आणि म्यानमारहून बांगलादेशात (२०१७) स्थलांतर करण्यास भाग पडलेल्या रोहिंग्या मुस्लिमांचे भवितव्य देखील चित्रबद्ध केले. २०१९ मध्ये उत्तर कोरियाच्या भेटीनंतर, जिथे त्यांनी किम जोंग २ यांच्या जवळच्या नेत्यांना चित्रबद्ध केले.

भारतीय निवडणुका, वादग्रस्त नवीन भारतीय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात निदर्शने (नागरिकत्व दुरुस्ती कायदा, डिसेंबर २०१९ मध्ये मंजूर करण्यात आला), नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात भारतीय शेतकऱ्यांनी केलेला प्रदीर्घ निषेध आणि २०२० मध्ये भारताच्या पहिल्या कडक कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या घोषणेनंतर सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली तेव्हा स्थलांतरित कामगारांना होणारा खडतर आणि प्रदीर्घ प्रवास त्यांनी जगासमोर मांडला. आपल्या  मुलाला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या एका स्थलांतरित कामगाराचा सिद्दीकीचा फोटो गरीब लोकांनी त्यांच्या गावी केलेल्या लांबच्या प्रवासासाठी एक आयकॉनिक छायाचित्र बनले. त्यानंतर सिद्दीकी यांच्या फोटोंमध्ये साथीच्या रोगाच्या वेळी मदतीचा हात दाखवण्यात आला होता, पण दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्था कोसळण्याच्या टप्प्यावर आल्यामुळे त्यांनी भारतातील साथीच्या रोगाची तीव्रता दर्शविणाऱ्या धक्कादायक प्रतिमाही आपल्या कॅमेरात टिपल्या. एप्रिल २०२१ मध्ये दिल्लीतील लोकांप्रमाणे दररोज ४,००० हून अधिक मृत्यू (अधिकृत आकडेवारीनुसार) जास्त भरलेले अंत्यसंस्कार झाले, याचीही छायाचित्रे त्यांनी जगासमोर मांडली.

कोरोनाव्हायरस साथीच्या रोगामुळे भारतातील पत्रकार आणि छायाचित्रकार या दोघांमध्ये अनेक मृत्यू झाले आहेत. नेटवर्क ऑफ वुमन इन मीडिया, इंडिया (एनडब्ल्यूएमआय) त्यापैकी ५०० हून अधिक बळींची गणना करते.  दरम्यान, सिद्दीकी यांच्या मृत्यूमुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी किती धोकादायक आहे, हे दिसून येते. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्सच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानात २००१ पासून १७ परदेशी पत्रकार ठार झाले आहेत, ज्यात सिद्दीकीचे सहकारी  हॅरी बर्टन आणि अझीझुल्ला हैदरी यांचा समावेश आहे.

अफगाणिस्तानच्या पत्रकारांमध्ये मृतांची संख्या विशेषत: जास्त आहे. गेल्या वर्षभरातच किमान आठ ठार झाले आहेत. इम्रान फिरोज यांच्यासारख्या अफगाणिस्तानातील तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की माध्यमप्रतिनिधींची अक्षरशः शिकार केली जात आहे. आणि या हल्ल्यांनंतर तपास जाहीर केला जात असला, तरी ते खरोखरच जमिनीवरून कधीच उतरत नाहीत. सिद्दीकीच्या मृत्यूला जबाबदार कोण? तालिबानवर संशय आहे, पण त्यांनी या हत्येमागे हात असल्याचा इन्कार केला आहे आणि आपली खंत व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानातील एनएआय - सपोर्टिंग ओपन मीडिया या स्वयंसेवी संस्थेचे संचालक मुजीब  खल्वतगर यांच्या मते तालिबानशी सुरू असलेल्या शांतता वाटाघाटींदरम्यान देशभरातील सॉफ्ट टार्गेटवर हल्ले वाढले आहेत. ही रणनीती नवीन नाही; परंतु एकोणीस वर्षांपासून स्थानिक सरकारने हिंसाचाराच्या अशा प्रकरणांचा गांभीर्याने आढावा घेण्यासाठी आणि पाठपुरावा करण्याच्या दिशेने काहीही केले नाही. यावेळी सरकार तालिबानला गुन्हेगार म्हणून जबाबदार धरत आहे, अशा प्रकारे या घटनांचे राजकारण करत  आहे, तर या घटनांबद्दल केवळ अस्पष्ट माहिती प्रकाशित करत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काय घडले हे शोधणे अशक्य आहे. आमचा असा विश्वास आहे की अटक आणि तपास करणे खरे नाही आणि वास्तविक गुन्हेगारांची ओळख पटलेली नाही, अटक तर सोडाच. प्रसारमाध्यमांना बाहेरून पाठिंबा नसतानाही, जीवे मारण्याच्या धमक्यांना तोंड देतही आपल्या कामावर आणि देशाच्या भवितव्यावर विश्वास ठेवून समर्पित राहणारे दानिश सिद्दीकी यांच्यासारखे अनेक पत्रकार आहेत. एकूणच अफगाण समाजही सामान्यत: पत्रकारितेच्या भूमिकेचा आदर करतो.

सिद्दीकींची अफगाणिस्तानपेक्षा भारतात खरोखरच जास्त गरज होती, आम्ही त्याला ओळखणाऱ्या लोकांकडून ऐकतो. गेले वर्ष भारताच्या लोकशाहीसाठी आव्हानात्मक ठरले आहे. "मी माझे डोळे गमावले आहेत, मुला. तू सत्य दाखवलंस!" सिद्दीकींच्या मृत्यूवर व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनी काढलेले चित्र भारताचे मूर्त रूप सांगते.

दानिश सिद्दीकी या फोटोजर्नलिस्टचा मृत्यू हा अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्याबद्दल भारताचे सर्वात मोठे दु:ख आहे. रॉयटर्सने आपल्या साइटवर दानिश सिद्दीकी पृष्ठावर म्हटले आहे की, 'जेव्हा व्यवसायापासून राजकारण आणि खेळांपर्यंतच्या बातम्यांचा विचार केला जातो, तेव्हा मला ठळक बातमीच्या मानवी चेहऱ्याची नक्कल करण्यात खरोखर आनंद वाटतो.' दानिशच्या प्रत्येक छायाचित्रात नेमके हेच म्हटले होते. त्यांच्या 'ब्रेकिंग न्यूजचा मानवी चेहरा' या ध्येयामुळे समकालीन भारतीय वास्तव जगासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दानिशने काढलेली सर्व छायाचित्रे मानवी चेहऱ्यांची होती. कधी नैसर्गिक आपत्तींमध्ये, तर कधी राज्यकर्त्यांच्या उलट्या कायदेशीर व्यवस्थेत... त्याने चित्रबद्ध केलेली प्रत्येक गोष्ट भयावह होती. प्रत्येक दृश्य त्या दुःखद चेहऱ्यांच्या तीव्रतेत बुडून गेले होते.

आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या छायाचित्र पत्रकाराने साथीच्या रोगाच्या सर्वोच्च कारकिर्दीत लोक भेगांमधून कसे घसरत आहेत यावर प्रकाश टाकला. त्यानंतर त्याच्या फोटोंवरील संतापाचा अपेक्षित परिणाम झाला, ज्यामुळे अधिकाऱ्यांना जागे होण्यास आणि सामान्य माणसाला प्रवेश मिळविण्यासाठी धडपडत असलेले मूलभूत वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले. कोरोना या साथीच्या रोगापूर्वी दानिशचे सर्वांत परिभाषित छायाचित्र म्हणजे जानेवारी २०२० मध्ये दिल्लीतील नागरिकत्व विरोधी कायद्याच्या आंदोलकांकडे पिस्तूल रोखलेल्या एका व्यक्तीचे (हिंदू राष्ट्रवादीचे); दंगलविरोधी पोलिस शांतपणे त्याच्या मागे उभे होते. (या तरुणाला अलीकडेच अटक करण्यात आली होती परंतु वेगळ्या गुन्ह्यासाठी आणि जामीनही नाकारण्यात आला आहे.) "जामिया शूटर"च्या या फोटोमुळे भारतात खळबळ उडाली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान ईशान्य नवी दिल्लीत हिंसक डोके वर काढलेल्या भारतातील हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील वाढत्या आंतरधार्मिक तणावाचेही सिद्दीकी यांनी दस्तऐवज चित्रबद्ध केले. या दंगलीत ५३ लोक ठार झाले आणि मुस्लिमांनी व्यापलेली असंख्य घरे उद्ध्वस्त झाली. या स्पष्ट डोळ्यांच्या निरीक्षणांमुळेच सिद्दीकीचे अनेकांनी कौतुक केले. परंतु इतरांनी त्याच्यावर त्याच्या चित्रांनी भारताच्या प्रतिष्ठेचे नुकसान केल्याचा आरोप केला.

आम्हाला माहीत आहे की दानिश यांचा कॅमेरा कधीही खोटं बोलला नाही. आणि तरीही त्याच्या दुःखी कुटुंबाला टोमणे मारून आणि पुन्हा एकदा मुक्त पतनात समाजाचा पर्दाफाश करून परतफेड केली जात आहे. एखाद्याच्या मृत्यूची थट्टा करणाऱ्या या लोकांची व्याख्या तुम्ही कशी करणार? हे सर्व – उपभोग घेणारा राग आणि कटुता नेहमीच त्यांच्या अंतःकरणात योग्य क्षणाचा फायदा होण्याची वाट पाहत आहे का? पत्रकार किंवा फोटोजर्नलिस्टला सत्याची माहिती देण्याच्या कर्तव्याच्या नैतिकतेने मार्गदर्शन केले जाते.

वास्तविकता आणखी वाईट आणि तरीही अपरिहार्य असू शकते या जाणिवेने त्यांची छायाचित्रे पाहून कुणीही पिळवटून जात असे, स्तब्ध होत असे. तिरस्काराने या प्रतिमांपासून दूर गेलेले भारतीयदेखील मानवतावादी संकटाचा एक भाग आहेत. दानिश यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान काढलेले प्रत्येक छायाचित्र म्हणजे आमची शोकांतिका - वैयक्तिक आणि सामूहिक दोन्ही किती दृढ होती याचा खुलासा होता.

दानिश यांनी क्लिक केलेल्या प्रतिमा वारंवार चर्चेचे मुद्दे होते; ते भविष्यात संदर्भ बिंदू राहतील. त्यांच्या निरोपाच्या प्रवासात असंख्य लोकांच्या उपस्थितीने आपल्या काळातील सत्य शोधण्यासाठी त्याने खांद्यावर घेतलेली जबाबदारी अधोरेखित केली. या छायाचित्र पत्रकाराने अनेकांच्या हृदयात एक रिकामेपणा सोडला आहे. नेमके काय घडत आहे हे उघड करण्यासाठी फोटोजर्नलिस्टचे कर्तृत्व पणाला लागत असते. हे कर्तव्य दानिशने जीवनाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पार पाडले. म्हणूनच दानिशसारख्या लोकांची आज पत्रकारितेला गरज आहे ज्यांनी लोकांसोबत त्यांचा अनुभव ऐकण्यासाठी आणि तीव्र कथा बनविणारी त्यांची छायाचित्रे काढण्यासाठी बराच वेळ घालवला.

दानिश फोटोग्राफीमध्ये हवाई दृश्यांची मुबलकता आपण पाहू शकतो. ही एक प्रकारची सचोटी आहे. एक म्हणजे, एकट्या काळ्या आणि पांढऱ्या रंगात वेळ तयार करणे कठीण आहे. आपण ते जळत्या ढिगाऱ्यांमध्ये पाहू शकतो. आम्ही हे रोहिंग्या निर्वासितांमध्ये पाहतो जे समुद्र आणि जमिनीने विभागले गेले आहेत. नेपाळमधील उद्ध्वस्त इमारतींमध्ये आपण ते पाहू शकतो. दानिशला साहजिकच राजकीय संघर्षांचा मोह झाला होता. या वेळेचे वेगळ्या पद्धतीने चिन्हांकन करणे. अधिकारी काय लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत हे आम्ही दानिश कॅमेऱ्याद्वारे पाहिले. आम्हाला त्याची आठवण येईल. त्याची अनुपस्थिती कशी असेल हे मित्र आणि प्रियजन तुम्हाला सांगू शकत नाहीत. पण आपल्या काळासाठी राजकारणामुळे दानिशची कमतरता नष्ट होईल. आपल्याला राजकारण, दुःख आणि वंचितता आणखी समजावून सांगावी लागेल.

सांप्रदायिक भारतातील घृणास्पद प्रकार, अनियोजित लॉकडाऊनदरम्यान घरापर्यंत पोहोचण्यासाठी राज्याच्या सीमा ओलांडणाऱ्या भुकेल्या स्थलांतरित कामगारांच्या निर्दयी प्रतिमा आणि कोव्हिड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान संपूर्ण देशाचे आभासी मृत्यूशय्येवर बनलेले 'पक्ष्यांचे डोळे' हे धैर्याचे निव्वळ चित्रण आहे जे त्याला अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यातील संघर्ष कव्हर करण्यासाठी कंधार, अफगाणिस्तानला देखील प्रवृत्त करते. प्रिय मुले, पत्नी, मित्र आणि अनुयायी यांच्यापासून दूर जाणे इतिहास रचत आहे जे कोणत्याही मान्यतेने आणि पुलित्झरद्वारे मोजता येत नाही. थकलेल्या स्थलांतरित वडिलांच्या खांद्यावर मुलाला घरी जाण्याचा मार्ग त्याने मोकळा केला आहे. ही अमानुष व्यवस्था बदलण्याच्या स्वप्नात दानिश थोडा थकला आहे आणि आता निरंतर झोपला आहे.

एक चित्र हजार शब्दांचे असते. ज्या देशात स्वत:वर लादलेल्या जखमांनी अतिशयोक्तीपूर्ण वैयक्तिक कथन केल्याशिवाय शब्द निरर्थक असतात, त्या देशात दानिश सिद्दीकी यांनी आम्हाला आरसा वारंवार दाखवला. त्यांच्या कामात करुणा होती, ज्यांनी याचा कोणताही वेगळा अर्थ लावला त्यांनी केवळ स्वत:च्या अपयशाला दोष दिला पाहिजे. दानिश आपल्या पत्रकारितेद्वारे सामाजिक विवेक, जागृती, संघर्ष आणि निराशेच्या प्रतिमा जशा होत्या तशाच त्या मागे सोडतो. त्याचा कॅमेरा कधीही अस्वस्थतेपासून दूर राहिला नाही आणि तो आपल्याला नेहमीच आठवण करून देईल की सत्य नेहमीच रुचकर असू शकत नाही, परंतु ते निरपेक्ष आहे. आणि ते शब्द कधीकधी निरर्थक ठरतात. शस्त्रे ते कापू शकत नाहीत, किंवा ते जाळू शकत नाहीत; पाणी ते ओले करू शकत नाही किंवा ते कोरडे करू शकत नाही.

- शाहजहान मगदुम

(कार्यकारी संपादक)

भ्रमणध्वनी : ८९७६५३३४०४



आजची परिस्थिती पाहता अस वाटु लागल आहे की, निसर्ग एवढा निर्दयी का झाला आहे ? खरंतर निसर्गाच्या या क्रुरतेच्या पाठीमागे कुठे ना कुठे तरी मनुष्यच कारणीभुत राहिला आहे. मनुष्य निसर्गावर कधीच विजय मिळवु शकत नाही, मात्र निसर्गावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात जाणते-अजाणतेपणी तो निसर्गाशी वैर मात्र घेत राहिला आहे. म्हणूनच की काय या शत्रुत्वाचा परिणाम एवढा भयावह आहे की, आज मनुष्य स्वत:ला एका छोट्याश्या विषाणुपूढे एवढा लाचार, भयभीत व असाहय समजत आहे.

कोरोना महामारीचे तांडव पाहता मानवाचा सर्वश्रेष्ठ आणि सर्वशक्तीशाली होण्याचा गर्व कदाचित नष्ट झाला असेल आणि जर झाला नसेल तर त्याला भविष्यात याचे आणखिन गंभीर परिणाम भोगण्यासाठी तयार असल पाहिजे. आज मनुष्य निसर्गाशी छेडछाड केल्याबद्दल पश्चताप करत आहे, रडतो आहे मात्र ही आपत्ती संपल्यानंतर हा पश्चताप आणि अश्रु केवळ दिखावा तर ठरणार नाही ना ? जर मनुष्याच्या मनामध्ये आजही निसर्गाच्याप्रती कपट आहे, तर त्याने उज्वल भविष्याची कल्पना करणे व्यर्थ आहे. उज्वल भविष्यासाठी केवळ निसर्गप्रेमी बनण्याचा संकल्प करून काहीच साध्य होणार नाही तर त्याला मनातुन आणि कृतीतुन साध्य करणे गरजेचे आहे. माणुस या वाक्याला जेवढया लवकर आत्मसात करून घेईल तेवढं त्याच्यासाठी भल्याच आहे.

निसर्गाने मानवाला त्याच्याप्रती केली जाणारी क्रुरता सोडण्यासाठी कित्येकवेळा लहान-मोठ्या आपतींच्या रूपात चेतावणी दिली आणि मनुष्य काही काळासाठी कदाचित जागृतही झाला. मात्र मनुष्याने आपल्या विसरण्याच्या आणि चुका करण्याच्या स्वाभाविक प्रवृतीनुसार निसर्गाशी परत छेडछाड सुरू केली. निसर्गाचा द्वेष करण्याच्या परिणाम म्हणुनच त्सुनामी आणि केदारनाथ सारख्या आपत्ती आल्या, मनुष्य मात्र यातुन काहीच शिकला नाही. त्यामुळेच दुष्काळ, पूर, अतिवृष्टी, वादळ, भूकंप, महामारी सारख्या आपत्ती निसर्गाचा कोप बनुन मानवावर तुटुन पडत आहेत. इतिहासात नोंद असलेल्या नैसर्गिक आपतींबद्दल बोलायच झाल तर, १७७० मध्ये जवळपास १ कोटी लोकांचा मृत्यू बंगालच्या दुष्काळात झाला. उत्तर हिंदी महासागरात १९९९ मध्ये २५० किमी प्रतितास वेगाने आलेल्या वादळाने जवळपास १५ हजार लोकांचा जीव घेतला होता. २०१३ मध्ये केदारनाथ मध्ये निसर्गाने आपले एवढे रोद्ररूप दाखवले की, सतत झालेली अतीवृष्टी आणि भू-स्खलनामुळे ५० हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. एकतर ही आकडेवारी सरकारी आहे, प्रत्यक्षात जीवित हानी किती झाली ? हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्येक वर्षी येणारे पूर, दुष्काळ, भूकंप, महामारी सारख्या कित्येक आपत्त्या मानवाच्या दृष्टीहिन विकासाला लागलेला निसर्गाचा शाप आहे. हे खरं आहे की, ७० टक्क्यांपेक्षा अधिक आजार आणि नैसर्गिक आपत्ती या मानवी चुकांच परिणाम आहेत. 

आज मानवासाठी अभिशाप बनलेला कोरोना सुद्धा नकीच मनुष्याच्याच अशाच एका चूकीचा दुष्परिणाम आहे. केवळ आपला भारतच नाही तर जगातील प्रत्येक देश आज कोरोनाशी झुंजत आहेत. ज्या देशांना आपण जीडीपी, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता यासारख्या मानकांच्या आधारे विकसित मानतो तिथेही फारस वेगळ चित्र नाही. तिथेही मृत्यूच तांडव पहायला मिळाल जिथ  विकासाच मानक बुलेट ट्रेन आणि रिअल टाइम कनेक्टिविटी आहे. अमेरिका, यूरोप सारखा विकसित भाग असो वा आफ्रिका आणि आशिया खंडातील मागासलेले देश, कोरोनासमोर सर्वच पस्त झाले. रस्त्यांवर फिरणारे रूग्ण, दवाखाण्यातील बेडची कमी, ऑक्सिजन आणि औषधांच्या अभावाने मरणारे लोक हे चित्र आपल्या विकासाच्या मानकावर गंभीर प्रश्नचिन्ह ऊभा करणारे आहे. आपण विकासाच्या नावावर आजपर्यंत जो प्रवास केला, ख्ररच तो आपल्या अनुकुल होता? कोरोना महामारीतुन बाहेर पडल्यानंतर मानवाला हे शिकायला हवं की, कसं निसर्गाच्याप्रती त्याचा द्वेष त्याच्या आकाशाला गवसणी घालणा-या विकासाला एका झटक्यात धारातिर्थी करतो. खरंतर, कोरोना बद्दल वेगवेगळ्या प्रकारची विधाने समोर येत आहेत. अगदी सुरवातीला याला चीनच जैविक अस्त्र सांगुन तो मानवनिर्मित असल्याच म्हटलं गेल. विशेषकरून अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सरकारांनी यावर शिक्कामोर्तब केल आहे, मात्र हे खरं आहे का, हे येणारा काळच ठरवेल आणि जर का हे सत्य असेल तर हा मानवाचा निसर्गाच्या चक्रात सरळ-सरळ हस्तक्षेप असल्याने याचे परिणाम भविष्यातही घातक सिद्ध होतील.

मानवाच्या खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, त्याची बदललेली जीवनशैली आणि परिसंस्थेत त्याने केलेल्या छेडछाडीने कोरोनाला जन्म दिला आहे. चीनच्या वुहान मध्ये वटवाघुळात आढळणा-या या विषाणूने संपूर्ण जगाला उद्वस्थ केल आहे. येथील प्रयोगशाळा संशयाच्या भोव-यात असल्याने, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडन यांनी कोरोनाचा बाप शोधण्याचा आदेश आपल्या गुप्तचरांना दिला आहे. केवळ ही प्रयोगशाळाच नाही तर येथील प्राणी बाजार सुद्धा संपूर्ण जगात मानवाच्या बिभत्सतेचे दर्शक आहे. जर, हा विषाणू प्राण्यांपासुन पसरला असेल तर निसर्गाचा हा कहर नजिकच्या काळात संपण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. 

लहानपणी आपण इतिहासाच्या पुस्तकात फ्लू आणि प्लेगच्या आपत्तीमुळे लाखो लोकांचा जीव कशा प्रकारे गेला हे वाचल होत. एकीकडे अशा आपत्तींविषयी मनात भीती वाटत असताना आपण स्वत:ला आश्वस्त करत होतो की, ही त्या काळातील गोष्ट आहे जेंव्हा मनुष्य मागासलेला होता. आपण या गोड गैरसमजुतीत होतो की, विकसित वैज्ञानिक तंत्रज्ञानामुळे अशी वेळ कधीच येणार नाही. मात्र कोरोना महामारी आली आणि आपला भ्रमाचा भोपळा फुटला. आज एका छोट्याश्या विषाणू पूढे गगनभरारी घेणा-या आरोग्य क्षेत्राने गुडघे टेकले आहेत तर विकासाच्या नावावर कापलेल्या झाडांनी मानवाला ऑक्सिजनसाठी त्याची जागा दाखवली आहे. विकासाच्या नावावर उभा केलेली सीमेंटची जंगलं आज कवडीमोल झाली आहेत. आपण आपली चूक लपवण्यासाठी हा दावा करत आहोत की, आपण एका वर्षाच्या आत कोरोनाची लस बनवली, जी यापूर्वी कधीच एवढया लवकर बनली नव्हती. मात्र सोबत कोरोना विषाणू सुद्धा म्युटंट होत आहे. आता या सर्व लसी या म्युटंटवर काम करतील का, हा संशय आहे. विषाणू मानवाच्या बुद्धीमत्तेची परीक्षा घेत आहे. 

गोष्ट केवळ महामारीची नाही तर आपण अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात पारंपारिक शेतीला नष्ट केल. आता परत सेंद्रीय शेतीला महत्व देतोय. पिण्याचे पाणी प्रदुषित करून बॉटल बंद मिनरल वॉटर बाजारात आणलय. हवा प्रदुषित करून शुद्ध हवा बाजारात विकतोय. या महामारीतुन बाहेर पडल्यानंतर मनुष्य परत त्याच विकासाच्या स्पर्धेत मशगुल होणार का? असे किती तरी प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं माणसाला स्वत: शोधायची आहेत. या महामारीपासुन शिकुन आपण थोडस थांबुन या विकासाच मूल्यांकन करायला हव. विकास हा आवश्यक आहेच, मात्र कोणत्या किमतीवर, आपल्याला या तथ्याला समजल पाहिजे. जर मनुष्य निसर्गाच्या विरोधात जावून आपल्या विकासाचा मार्ग बनवु पाहत असेल तर, हा मार्ग केवळ त्याला विनाशाकडेच घेऊन जातो हे त्याने कायम लक्षात ठेवायला हवं.

- सुरेश मंत्री

अंबाजोगाई

संपर्क- ९४०३६५०७२२


प्रत्येक संस्कृती-सभ्यतेत जनसमूहात आनंद साजरा करण्याचे प्रसंग येत असतात, सण साजरे केले जातात. हे प्रसंग मानवी स्वभावाचा अविभाज्य अंग आहे. प्रत्येक माणसाला आनंद लुटण्याची इच्छा असते आणि ती साहजिकच स्वाभाविक आहे. त्याचबरोबर माणसांना संकटांनी घेरले तर तो घाबरून जातो. कारण संकट येणे माणसाला पसंत नाही. पसंत नसले तरीदेखील सुख आणि दुःख हे जीवनाचे कालचक्र आहे. अल्लाह म्हणतो की आनंदाने भारावून जाऊ नका आणि दुःख कोसळल्यास घाबरून जाऊ नका. लोक दुःखासाठी नैसर्गिक, दैवी शक्तींना जबाबदार ठरवतात, तर आनंदाच्या प्रसन्नतेच्या प्रसंगांचे स्वतःला श्रेय देतात. पवित्र कुरआनात अल्लाहने म्हटले आहे, “जगातील जीवन खेळ करमणूक देखावा एकमेकांशी दुराभिमान, संतती व संपत्तीविषयी ऐश्वर्याच्या चुरशीशिवाय काही नाही, शेतात आलेल्या पिकामुळे शेतकरी आनंदित होतो. ती वाढत जाऊन पिवळी पडते आणि नंतर तिचा भुसा होऊन जातो.” असेच या जगातील माणसाचे जगणे आहे. सुख-दुःखाचे प्रसंग येत असतात आणि निघून जातात तेव्हा माणसाने प्रसन्नतेच्या वेळी घमेंड करू नये. एकमेकांशी दुराभिमान बाळगू नये. “तुमच्या हातातून निसटून जात त्यावर निराश होऊ नये आणि जे तुम्हाला देणगीने मिळेल त्यावर फुलून जाऊ नये.” तात्पर्य हे की माणसाला जेव्हा प्रसन्नता लाभते तेव्हा त्याने त्यासाठी अल्लाहचे आभार मानावे. जास्तच काही मिळाले असल्यास त्याने अल्लाहसमोर नतमस्तक व्हावे. प्रेषित मुहम्मद (स.) असेच करत होते. त्यांचे अनुयायी सुद्धा अशाच प्रकारे प्रेषितांचे पालन करायचे. आनंद साजरा करणे म्हणजे त्या दिवशी काहीही करण्याचा अधिकार प्राप्त होतो असे नाही. कुठल्याही प्रकारे नैतिक मर्यादा ओलांडण्याची अनुमती नाही. जुगार, दारू, इत्यादी करमणुकीची मुभा नाही. सामान्य दिवसांमध्ये ज्या मर्यादा घातलेल्या असतात त्या मर्यादा कितीही मोठा आनंद प्राप्त झाला तरी त्यांना ओलांडण्याचा प्रश्नच नाही. प्रेषित मुहम्मद (स.) काळात ईदच्या दिवशी प्रचलित परंपरा पाळल्या जात होत्या. डफ-वाजवून गीत गायले जाई, खेळांच्या स्पर्धा भरविल्या जात, परंतु कसल्याही प्रकारचा अनैतिक जल्लोष साजरा केला जात नव्हता. ईदचा मानवतेसाठी ‘पयाम’ म्हणजे सणासुदीच्या जल्लोषात गोरगरीब वंचितांना विसरून जाऊ नये.

माणसाला दिलेले वैभव

अल्लाहने श्रद्धावंतांना केवळ परलोकातील देणग्यांचीच हमी दिली नाही तर त्यांना या जगातदेखील वैभवाचे आणि या धरतीवर सत्ता देण्याचे वचन दिले आहे. पण यासाठी अल्लाहने जी अट ठेवली आहे ती महत्त्वाची आहे, “जे लोक श्रद्धा बाळगतात आणि चांगले कर्म करतात त्यांना अल्लाहने वचन दिले आहे की पूर्वी जशी इतर लोकांना धरतीवर सत्ता बहाल केली होती तशीच त्यांनाही देईल.” त्यांना अराजकतेपासून वाचवील. यासाठी माणसाने अल्लाहची उपासना करावी आणि कुणालाही त्याचा भागीदार बनवू नये. अल्लाहने माणसाला या धरतीवर मालक बनवलेले नाही तर माणसाला आपला उत्तराधिकारी बनवून पाठवलेले आहे. अशात त्यास सत्ता दिल्यावर माणसाने ईश्वराच्या आदेशांनुसार राज्य कारभार चालवावा. तसे केल्यास त्यांना या जगात आणि परलोकात देखील सर्व काही मिळेल. अल्लाहचे म्हणणे आहे की “ज्यांना या जगातच सर्व काही हवे असेल, धनसंपत्ती, ऐश्वर्य, वैभव, संतती – आम्ही सर्व काही त्यांना भरभरून देऊ, पण परलोकात त्यांना कसलाच वाटा नसेल.” पण ज्या लोकांना या जगात आणि परलोकात देखील अल्लाहच्या देणग्या हव्या असतील त्यांनी अल्लाहचे आदेश पाळले तर त्यांना दोन्ही ठिकाणी सर्व काही देण्याचे अल्लाहने वचन दिलेले आहे.

इस्लाममध्ये माणसाला बादशाह, अधिपती असे काहीच मानले गेले नाही. तो धरतीवर कशाचाही मालक नसून त्याला अल्लाहचा उत्तराधिकारी आणि विश्वस्त या भूमिकेतून आपली जबाबदारी पार पाडायची आहे. खऱ्या अर्थाने केवळ अल्लाहच साऱ्या चराचराचा अधिपती आहे. “तोच (अल्लाह) साऱ्या विश्वाचा स्वामी, साऱ्या मानवांचा अधिपती, त्यांचा ईश्वर.”

याचबरोबर माणसांना दिलेल्या वैभवांचे आणि आपल्या देणग्यांचे वर्णन करताना अल्लाह म्हणतो, “आम्ही मानवाला आमचा उत्तराधिकारी नेमलेले आहे. आणि हे कारे विश्व, पृथ्वी, आकाश, समुद्र, नद्या, शेती सर्व काही त्यांच्या सेवेसाठी निर्माण केले आहे.” या अर्थाने माणूस या धरतीवर माणसांच्या सेवेसाठी पाठवला गेला आहे. त्यांना सत्ता दिलेली आहे, मग कशा प्रकारे तो आपल्या सत्तेचा कारभार चालवतो, याबाबत त्याची विचारणा केली जाईल.

- सय्यद इफ्तिखार अहमद



सरतेशेवटी अमेरिकेच्या अफगाण कमांडोच्या लष्करप्रमुखानं आपल्या पदाचा प्रतिकात्मक राजीनामा दिल्याने गेली २० वर्षे चाललेल्या अफगाण विरूद्ध अमेरिका आणि जगभरातील सैन्य या युद्धाचा रीतसर अंत झाला. अमेरिकेला पराभव पत्करावा लागला. तालिबानने आपली भूमी परत घेतली. पण जगभरचे लोक हवालदिल आहेत. आता काय होणार? म्हणजे संपूर्ण जगाने अमेरिकेला आपले रखवालदार नेमले होते की काय, असा प्रश्न पडतो. अमेरिकेला पुढे करून सारे युरोपियन देश अरब-अफगाणिस्तानची दाणादाण केली होती, करत आहेत आणि यापुढेही ते करू पाहातात. म्हणूनच त्यांना अमेरिकेने युद्ध हरल्याचे दुःख आहे, असे वाटते.

याआधी अमेरिकेने व्हिएतनामवर हल्ला केला. त्या देशावर लादलेल्या युद्धात हजारो नागरिकांची कत्तल करण्यात आली आणि शेवटी तेथेही पराभव पत्करून परत जावे लागले होते. इराककडे जैविक शस्त्रास्त्रे असल्याचा खोटा आरोप करीत त्याची नासधूस केली. १० लाख इराकींना ठार केले. यामध्ये मोठ्या संख्येने लहान मुले होती ज्यांना अजून माहीत नव्हते की ते इराकी आहेत. अब्जावधी डॉलरची इराकींची संपत्ती लुटली, इराकच्या मालकीचे अब्जावधीचे कच्चे तेल काढून विकले. ९/११ च्या घटनेशी आणि अल-कायदाशी इराकचा काहीएक संबंध नसताना खोटे आरोप केले गेले. माध्यमांद्वारे ते जगभर प्रसारित करण्यात आले.

हेच सर्व त्यांनी अफगाणिस्थानात केले. लाखाहून अधिक लोकांची हत्या केली. इराकवर निर्बंध लावून तेथील जनतेला औषधाविना मरण पत्करावे लागले. तसेच काही अफगाणिस्थानमध्ये केले गेले. त्या आधी व्हिएतनाममध्ये करण्यात आले. आजदेखील सीरियाची नासधूस चालूच आहे. त्या देशाला जगाच्या नकाशावरूनच जणू काढून टाकले आहे. सउदीअरेबियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून येमेनमधील निष्पाप लोकांची हत्या सर्रास चालू आहे. इरानवर कित्येक वर्षांपासून निर्बंध लादलेले आहेत. त्याच अमेरिकेला दरोडेखोर, लुटारू, हत्याऱ्याला जगातले युरोपियन देश आणि इतर काही राष्ट्रे अफगाणिस्थानातून जाऊ नये असे म्हणतात. अमेरिकेने हे हत्यांचे, लुटण्याचे तांडव त्यांच्या देशामध्ये माजवले असते तर अमेरिकेचे नक्की स्वरूप काय आहे हे त्यांना कळले असते.

अमेरिकेला हे सारे का करायचे आहे, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या देशात शस्त्रास्त्रांचे कारखाने रात्रंदिवस चालू आहेत. या कारखान्यांकडून लाखो लोकांना रोजगार मिळावा, जगण्याची, ऐश्वर्य-वैभवाची साधने मिळावीत आणि याच कारखान्यांकडून जगभरातील निष्पाप लोकांच्या कत्तलीसाठी शस्त्रे प्राप्त व्हावीत, हा अमेरिकेचा खरा चेहरा आहे. आधुनिक सभ्यता, संस्कृती आणि मानवाधिकारांचा मुखवटा धारण करणारे हेच राष्ट्र कोट्यवधी आफ्रिकन निग्रोंना जहाजात डांबून आणत आणि त्यांचा बाजार थाटत असत. जनावरांशी देखील जसा व्यवहार केला जात नाही तसा व्यवहार त्यांच्यावर करत होते.

कोणत्याही राष्ट्रावर जेव्हा अमेरिका हल्ला करते तेव्हा ते युद्ध जिंकणे हा त्याचा दुसऱ्या क्रमांकाचा हेतू असतो. त्याचे मुख्य उद्दिष्ट त्या देशाला इतके उद्ध्वस्त करण्याचे असते की पुढची पन्नास वर्षे त्याने वर येऊ नये, हे असते आणि तिसरे उद्दिष्ट अमेरिकी सैन्यांना सहलीवर पाठवायचे असते. ज्या बग्राम विमानतळावर अमेरिकेने छावणी उभारली होती ते एक छोट्याशा शहरासारखे नव्हे तर न्यूयॉर्क, पॅरिससारखे ऐश्वर्यसंपन्न शहर होते. मोठमोठे शॉपिंग मॉल, थिएटर, नाट्यगृह, हजारो वाहने आणि संपूर्ण शहर एअरकंडिशण्ड होते. इतक्या सोयीसुविधांयुक्त छावणीत राहाणारे सैन्य अफगाणिस्थानच्या लढवय्यांशी जिंकूच शकत नव्हते. त्यांच्याकडे कोणत्या सुविधाच सोडा अमेरिकी सैन्याच्या तोडीची शस्त्रेदेखील नव्हती. पण अमेरिकेला माघारी लावणे हे त्यांचे दृढ उद्दिष्ट होते, म्हणून ते जिंकले!

- सय्यद इफ्तिखार अहमद



(१०४) काय या लोकांना माहीत नाही की तो अल्लाहच आहे जो आपल्या भक्तांचा पश्चात्ताप स्वीकारतो, आणि त्यांच्या दानधर्माला स्वीकृती प्रदान करतो, आणि हे की अल्लाह अत्यंत क्षमाशील व दयाळू आहे?

(१०५) आणि हे पैगंबर (स.)! या लोकांना सांगा की तुम्ही कर्म करा, अल्लाह आणि त्याचा पैगंबर व श्रद्धावंत सर्व पाहतील की तुमची कार्यपद्धती आता कशी राहते,९९ मग तुम्ही त्याच्याकडे परतविले जाल जो दृश्य आणि अदृश्य सर्व गोष्टी जाणतो, आणि तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय करीत राहिला होता.१००

(१०६) काही दुसरे लोक आहेत ज्यांचा मामला अजून अल्लाहच्या हुकूमावरून स्थगित आहे. वाटल्यास त्यांना शिक्षा करील आणि वाटल्यास तो पुनरपि त्यांच्यावर मेहरबान होईल. अल्लाह सर्वकाही जाणतो आणि तो बुद्धिमान व सर्वज्ञ आहे.१०१

(१०७) काही अन्य लोक आहेत ज्यांनी एक मस्जिद बनविली या हेतूपोटी की (सत्याच्या आवाहनाला) हानी पोहोचवावी, आणि (अल्लाहची बंदगी करण्याऐवजी) कुफ्र (अवज्ञा) करावा आणि श्रद्धाळूंमध्ये फूट पाडावी, व (त्या सकृतदर्शनी प्रार्थनागृहास) त्या व्यक्तीसाठी पाळतीची जागा बनवावी जो यापूर्वी अल्लाह व त्याच्या पैगंबराविरूद्ध युद्धरत राहिला आहे. ते निश्चितच शपथा घेऊन घेऊन सांगतील की आमचा हेतू तर भलाईखेरीज दुसरा कोणत्याही गोष्टीचा नव्हता, पण अल्लाह साक्षी आहे की ते पुरते लबाड आहेत.

(१०८) तुम्ही त्या इमारतीत कदापि उभे राहू नका. जी मस्जिद प्रथम दिनापासून ईशपरायणतेवर स्थापन करण्यात आली होती तीच यासाठी अधिक योग्य आहे की तुम्ही तिच्यात (उपासनेसाठी) उभे राहावे; तिच्यात असे लोक आहेत जे पवित्र राहणे पसंत करतात, आणि अल्लाहला पवित्र्य बाळगणारेच पसंत आहेत.१०२       




९९) येथे ईमानच्या खोटे दावेदारांचा आणि गुन्हेगार ईमानधारकांचा फरक स्पष्ट करण्यात आला आहे. जो कोणी ईमानचा दावा करतो परंतु वास्तवात अल्लाह आणि त्याने दिलेल्या त्या जीवनपद्धतीवर आणि ईमानधारकांच्या जमातवर निष्ठा ठेवत नाही; त्याचे अनिष्ठावान होण्याचा पुरावा त्याच्या आचारविचारातून मिळाला तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल. अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यासाठी तो काही देत असेल तर ते रद्द केले जाईल. मेल्यानंतर मुस्लिम त्याची जनाजा नमाज अदा करणार नाही आणि ईमानधारक त्याच्यासाठी क्षमेची प्रार्थना करणार नाही, मग तो त्याचा बाप किंवा भाऊ का असेना. जी व्यक्ती ईमानधारक आहे आणि त्याच्या हातून अनिष्ठापूर्ण कार्य घडते आणि तो आपल्या अपराधांची क्षमायाचना करील तर त्याची क्षमायाचना स्वीकारली जाईल. त्याने दिलेले दान स्वीकारले जाईल आणि त्याच्यासाठी मुक्तीची प्रार्थना केली जाईल. आता येथे प्रश्न पडतो की कोणत्या व्यक्तीला अनिष्ठापूर्ण नीती स्वीकारूनसुद्धा दांभिकांऐवजी केवळ गुन्हेगार ईमानधारक समजले जाईल. यासाठी तीन कसोट्या या आयतीत सांगितल्या आहेत. 

१) तो आपल्या अपराधाला एखादे अनुचित कारण आणि हेतू सांगत बसण्याऐवजी स्पष्टपणे सरळ मान्य करतो. 

२) त्याच्या  मागील  कार्यपद्धतीवर  दृष्टिक्षेप  टाकला  जाईल  की  हा  अनिष्ठेचा  सराईत  गुन्हेगार तर नाहीना? जर त्याची विचारसरणी आणि जीवनव्यवहार पूर्वी चांगुलपणाचा  आणि भलाईचा असेल तर मानले जाईल की ही त्याची विवशता आहे जी तात्पुरत्या स्वरुपात पुढे आली आहे.

३) भविष्यातील त्याच्या जीवनव्यवहारावर लक्ष ठेवले जाईल. त्याने आपली चूक तोंडीच कबूल केली की वास्तविकपणे त्याच्या अंतरंगात पश्चात्तापाची भावना वसलेली आहे. जर तो आपल्या अपराधाच्या क्षतिपूर्तीसाठी बेचैन असेल तर मान्य केले जाईल की तो खरोखरच लज्जित झाला आहे आणि ही लज्जाच त्याच्या ईमान व निष्ठेचे प्रमाण असेल.

हदीस विद्वानांनी या आयतींचा अवतरण हेतू स्पष्ट करताना ज्या घटनेचा उल्लेख केला आहे त्याने हा विषय स्पष्ट होतो. त्यांच्या मते या आयतीं अबू लुबाबा बिन अब्दुल मुंजीर (रजि.) आणि त्यांच्या सहा साथीदारांविषयी अवतरित झाल्या. अबू लुबाबा (रजि.) त्या लोकांपैकी होते ज्यांनी बैअते अक्बाच्या वेळी हिजरतपूर्वी इस्लाम स्वीकारला होता. नंतर बदर, उहुद आणि इतर युद्धात सामील होते. परंतु तबुकच्या युद्धाप्रसंगी त्यांच्यावर `स्व' स्वार झाला होता आणि ते विना योग्य कारणाने घरी बसून राहिले. असेच निष्ठावान त्यांचे दुसरे साथीदारसुद्धा होते आणि तेसुद्धा आपल्या इच्छा आकांक्षाच्या आहारी गेले. जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) तबुक युद्धाहून परत आले आणि त्या लोकांना माहीत झाले की युद्धासाठी न जाता घरी बसून राहणाऱ्यांसाठी अल्लाह आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांचे काय मत आहे, ते सर्व अतिलज्जित झाले. चौकशी होण्याअगोदर त्यांनी स्वत:ला खांबाशी बांधून घेतले आणि सांगितले की आमच्यासाठी आता निद्रा  आणि खाणे-पीणे हराम आहे जोपर्यंत आम्हाला क्षमा केली जात नाही किंवा आम्हाला मृत्यू येत नाही. अशाप्रकारे अनेक दिवस काहीही न खाता-पिता आणि झोप न घेता त्यांनी खांबाला स्वत:ला बांधून ठेवले. शेवटी ते बेशुद्ध झाले. शेवटी जेव्हा त्यांना सांगितले गेले की अल्लाहने आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांनी तुम्हाला क्षमा केली आहे, तेव्हा त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना निवेदन केले, ``ज्या घराच्या आरामाने आम्हाला कर्तव्यापासून रोखले होते म्हणून आम्ही आमची घरे आणि सर्व संपत्ती क्षमायाचनेत समाविष्ट करून अल्लाहच्या मार्गात अर्पण करीत आहोत.'' परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``सर्व संपत्ती देण्याची आवश्यकता नाही तर फक्त एकतृतियांश संपत्ती द्यावी हे योग्य आहे.'' त्वरित ती संपत्ती त्यांनी अल्लाहच्या मार्गात दिली. या घटनेवर विचार केल्यावर कळते की अल्लाहजवळ क्षमायाचना कोणत्या प्रकारच्या विवशतेसाठी आहे. हे सर्वजण अभ्यस्त अनिष्ठावान नव्हते. यांच्या जीवनातील मागील कारकीर्द ईमान व निष्ठेचे प्रमाण होते. यांच्यापैकी कोणीच बहाणा केला नाही तर आपल्या अपराधाला स्वत: स्वीकारले. अपराध मान्य करून त्यांनी आपल्या आचरणाने सिद्ध केले की ते अतिलज्जित आहेत आणि आपल्या अपराधाच्या क्षतिपूर्तीसाठी बेचैन आहेत.

१००) म्हणजे  शेवटी  निर्णय  अल्लाहच्या  हातात  आहे. त्याच्याकडे काहीच लपून राहू शकत नाही. एखादा मनुष्य जगात आपल्या द्रोहाला लपविण्यात यशस्वी झाला तरी त्याची ईशद्रोहाच्या शिक्षेपासून सुटका नाही.

१०१) त्या लोकांचा मामला संदिग्ध होता. ते दांभिक असल्याचा निर्णय होऊ शकत नव्हता की अपराधी मुस्लिम होण्याचा. या दोन्ही प्रकाराची लक्षणे स्पष्ट झाली नव्हती. गुन्हेगार ईमानधारक होण्याचे चिन्ह अद्याप पुढे आले नाही म्हणून अल्लाहने यांच्याविषयीचा मामला स्थगित ठेवला. अल्लाहसमोर हा व्यवहार संदिग्ध होता म्हणून नव्हे तर मुस्लिमांच्यासाठी किंवा मुस्लिमांच्या गटासाठी आपले मत आणि नीतीरीती तोपर्यंत निश्चित केली जाऊ शकत नाही जोपर्यंत त्यांची स्थिती परोक्ष ज्ञानाने नव्हे तर बुद्धीविवेकाने परखली जावी.

१०२) पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मदीनेला आगमन होण्यापूर्वी खजरज कबिल्यात एक अबू आमिर नावाचा व्यक्ती होता. अज्ञानताकाळात तो िख्र्तासी संन्यासी (पादरी) होता. ग्रंथधारक विद्वानांपैकी तो एक होता. जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मदीना येथे आगमन झाले तेव्हा त्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वाच्या दाव्याला आणि इस्लामच्या आवाहनाला आपल्या बुजुर्गी, मानसन्मानासाठी मृत्यूघंटा समजले आणि त्यांचा घोर विरोधक बनला. उहुदच्या युद्धापासून हुनैनच्या युद्धापर्यंत जितके युद्ध मुस्लिम आणि अरबच्या अनेकेश्वरवादींमध्ये झाले, त्या सर्वात हा िख्र्तासी पादरी इस्लामविरुद्ध अनेकेश्वरत्वाचा   खंदा   पुरस्करता  होता. शेवटी  तो  अरब  भूमी  सोडून  रोम मध्ये  स्थायिक  झाला जेणेकरून `कैसर'ला या `धोक्या'पासून सावध करावे. हा धोका अरब भूमीत डोके वर काढू लागला होता. हा तोच काळ होता जेव्हा कैसर अरबवर चढाई करण्याची तयारी करत होता. ही बातमी मदिना येथे येऊन धडकली. यासाठी पैगंबर  मुहम्मद (स.) यांना `तबुक'च्या मोहिमेवर जावे लागले होते. अबू आमिर संन्याशाच्या सर्व कारवायामध्ये मदीनेतील दांभिकांचा एक गट सामील होता. जेव्हा तो रोमकडे जाऊ लागला होता तेव्हा त्याच्यात आणि या दांभिकामध्ये एक करार झाला होता. तो म्हणजे मदीना येथे ते आपल्यासाठी एक वेगळी मशीद बांधतील. यामुळे सर्वसामान्य मुस्लिमांऐवजी दांभिक मुस्लिमांचा एक प्रबळ गट तयार होऊन त्यावर धर्माचा पडदा पडलेला असेल. कोणीही त्यावर शंका घेणार नाहीत. त्या ठिकाणी दांभिक संघटित होतील तसेच सल्लामसलती होतील आणि अबू आमिरच्या हेरांना थांबण्यासाठी सुरक्षित जागा होईल. हा एक अपवित्र षड्यंत्र होता ज्याच्यासाठी मशीद बांधली गेली होती. याचा या आयतमध्ये उल्लेख आला आहे. 

मदीनामध्ये त्या वेळी दोन  मस्जिदी होत्या,  एक मस्जिदे कुबा जी शहराच्या किनाऱ्यावर होती आणि दुसरी मस्जिदे नबवी जी शहरात होती. या दोन मस्जिदीपेक्षा तिसरी मस्जिद बनविण्याची काहीच गरज नव्हती. परंतु अशामुळे मुस्लिम समाजात फूट पडण्याचीच आशंका होती. दांभिकांनी मस्जिद बनविण्यापूर्वी तिची आवश्यकता पैगंबर मुहम्मद (स.) यांना सांगितली. त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) समोर नव्या निर्माणासाठी गरजही दाखविली की सर्दी आणि पावसाळयात म्हातारे, आजारी व विवश लोकांना दोन्ही  मस्जिदीत पाच वेळा नमाजसाठी येणे कष्टप्रद आहे. म्हणून केवळ नमाजी लोकांच्या सोयीसाठी या नव्या मशीदीचे निर्माण आम्ही इच्छितो. अशाप्रकारे त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यापासून नवीन मस्जिदीची परवानगी घेतली आणि आपल्या षड्यंत्रासाठी एक अड्डा बनविला. त्यांची इच्छा होती की पैगंबर मुहम्मद (स.) यांना धोका देऊन या मस्जिदीचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते करावे परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांनी हे टाळले व त्यांना म्हणाले, ``या वेळी मी युद्धाच्या तयारीत मग्न आहे. एक मोठी मोहीम डोळयांसमोर आहे. या मोहिमेवरून परत आल्यावर पाहू या.'' या नंतर पैगंबर मुहम्मद (स.) तबुककडे रवाना झाले. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पाठीमागे हे लोक जत्थाबंदी करून षड्यंत्र रचू लागले. परत येताना पैगंबर मुहम्मद (स.) `जुअदान' या ठिकाणी आले. हे ठिकाण मदीना शहरालगतच होते. तेव्हा या आयती अवतरित झाल्या. त्वरित पैगंबर मुहम्मद (स.) यांनी काही साथीदारांना मदीना येथे पाठविले जेणेकरून स्वत: मदीना शहरात दाखल होण्यापूर्वी नुकसान देणाऱ्या जरार नामक मशीदीला ध्वस्त करून टाकावे.



१९७७ साली अफगाणिस्थानमध्ये एका क्रांतीद्वारे कम्युनिस्ट विचारसरणीच्या पक्षांची सत्ता स्थापित झाली. या सत्तेला सोव्हियत युनियनचा पूर्ण पाठिंबा होता. कम्युनिस्ट सत्ताधाऱ्यांनी रशियाच्या म्हणण्यानुसार धार्मिक संस्था आणि मदरसांमधील शिक्षण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांवर (तालिबान) अत्याचार सुरू केले. या अत्याचारामुळे तेथील मदरशांचे विद्यार्थी पाकिस्तानला निघून गेले. १९७९ साली खुद्द सोव्हियत युनियनने अफगाणिस्थानवर हल्ला केला आणि संपूर्ण राष्ट्रावर कब्जा केला.त्याच्या या सत्तापालटाला अफगाणींनी कडाडून विरोध केला आणि तत्कालीन दुसऱ्या क्रमांकाच्या महासत्तेविरूद्ध संघर्ष सुरू केला. अफगाणिस्थानात रशियाने येऊन त्या देशावर राज्य करावे याला अमेरिकेचा विरोध होता. अमेरिकेने स्वतः या संघर्षात भाग न घेता पाकिस्तानच्या साहाय्याने ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वात रशियाशी संघर्ष करत असलेल्या अफगाणींची मदत केली. त्यांना ‘मुजाहिदीन’ म्हणण्यात येऊ लागले. ओसामा बिन लादेन आणि त्याच्या सहकाऱ्यांची वॉशिंग्टन येथे तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची भेट खुद्द सीआयए ने घडवून आणली. १० वर्षे चाललेल्या या संघर्षात रशियाचा दारूण पराभ झाला. अफगाणी मुजाहिदीनना अमेरिकेने दारूगोळा पुरविला होता. त्यांना प्रशिक्षणदेखील दिले असेल. पण ज्या लोकांना सैनिकी प्रशिक्षण दिले गेले नव्हते, ज्यांच्याकडे लढाऊ विमाने नव्हती, रणगाडे नव्हते त्यांनी जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या महासत्तेला धूळ चारली. १९९० साली रशियन सैन्यांनी माघार घेत अफगाणिस्थानातून पळ काढला. १९९१ साली सोव्हियत संघाचे विभाजन झाले, याची कारणे राजकीय आणि आर्थिक असतानाच प्रमुख कारण अफगाणिस्थानात अवाढव्य खर्च करूनसुद्धा पराभव पत्करावा लागला, हे आहे.

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर दहशतवाद्यांनी विमानहल्ला करून उद्ध्वस्त केल्यानंतर १९०२ साली पहिल्या क्रमांकाची महासत्ता अमेरिकेने अफगाणिस्थानवर युद्ध लादले. अमेरिकेचे म्हणणे होते की वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याला बिन लादेन जबाबदार आहे. म्हणून त्यांनी सुरुवातीला तालिबानकडे बिन लादेनला ताब्यात देण्याची मागणी केली. त्या वेळी तालिबानी सरकारने अमेरिकेला याचा पुरावा सादर करण्यास सांगितले. पुरावा नसल्यास आम्ही कुणालाही ताब्यात देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितल्यावर अमेरिकेने आपल्या सैन्याला त्या देशावर हल्ला करण्यासाठी पाठवून दिले. आणि अशी या २० वर्षे चाललेल्या महायुद्धाची सुरुवात झाली.

जे विद्यार्थी सोव्हियत संघाचा अफगाणिस्थानवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानात गेले होते, तेच तालिबान म्हणून तिथून परतले होते. त्यांना अमेरिकेने सुरुवातीला आर्थिक मदत देखील पुरवली होती. कारण त्या वेळी त्यांना अफगाणिस्थानातून सोव्हियत संघाला हाकलून द्यायचे होते. पाकिस्तानातून स्वदेशी परतल्यावर ते मुजाहिदीनना जाऊन मिळाले आणि अफगाणिस्थानची सत्ता हस्तगत केली.

अमेरिकेला सुरुवातीस अफगाणिस्थानात युद्ध करायचे नव्हते. त्याला अलकायदा या संघटनेला संपवायचे होते. पण एकदा युद्धात उडी घेतल्यावर अमेरिकेला माघार घेणे शक्य झाले नाही. ज्या तालिबान आणि मुजाहिदीनना त्याने साथ दिली होती त्यांच्याशीच त्यांना लढावे लागले. अमेरिकेसारखी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे नसूनदेखील तालिबानकडून दररोज सरासरी २२ अमेरिकी सैनिक मारले जात होते. २००२ ते २०१८ पर्यंत चाललेल्या या संघर्षानंतर अमेरिकेला असे वाटू लागले होते की आपण हे युद्ध जिंकू शकणार नाही तोपर्यंत २५००० अफगाणी आणि ३००० अमेरिकी सैनिक मारले गेले.

तसे २०१३ पासूनच अमेरिकेने तालिबानशी चर्चा सुरू केली होती. दोहा (कतर) येथे तालिबानने आपले कार्यालय उघडले होते. त्यांच्याच कार्यालयात जाऊन अमेरिका तालिबानशी चर्चा करत लोती. अमेरिकेला युद्ध जिंकण्याची पर्वा नव्हती. कसे तरी त्याला अफगाणिस्थानातून माघार घ्यायची होती. त्याचबरोबर त्यांनी तिथून निघून गेल्यावर दुसरा कोणता दहशतवादी गट अफगाणिस्थानात आपले बस्तान बांधू नये याची खात्री तालिबानकडून करून घ्यायची होती. तालिबानने तसे वचन दिल्याचेही म्हटले जात आहे. तालिबानशी झालेल्या वाटाघाटीत अफगाणिस्थानचे सरकार सामीन नव्हते कारण तालिबानने त्यास नकार दिला होता.

अमेरिकेला आपल्या पराभवाचा अंदाज आल्यानेच त्याने तालिबानशी चर्चा सुरू केली होती. त्या दोघांमधील करारानुसार २०२१ पर्यंत अमेरिकन सैन्य अफगाणिस्थानातून निघून जाण्याचे ठरवले होते. पण सैन्य माघार बोलवण्याची प्रक्रिया ज्यांच्या निर्णयाने अफगाणिस्थानवर हल्ला केला गेला होता. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या काळापासूनच या चर्चेची सुरुवात झालेली होती. त्यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या काळात ३३००० अमेरिकन सैन्य परत गेले होते. नुकतेच १३ जुलैला बग्राम विमानतळावरील छावणी सोडून अधिकांश सैन्य निघून गेले आहे. बाकी थोडेफार येत्या ९/११ च्या आधी मायदेशी परतणार आहे.

अफगाणिस्थानात पराभव पत्करून एकानंतर दुसरी महासत्ता तेथून निघून जात आहे. या २० वर्षांच्या युद्धकाळात अमेरिकेने न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार २ ट्रिलियन डॉलर खर्च केले आहेत. अमरिकेला या अगोदर व्हिएतनाममधील २० वर्षांच्या युद्धानंतर पराभव पत्करून असेच माघारी जावे लागले होते. दोहा येथे अमेरिका आणि अफागणी तालिबानमध्ये वाटाघाटी सुरू होत्या तेव्हा ७५ टक्के अफगाणिस्थान तालिबानच्या ताब्यात होते. आज ९५ टक्के भूभागावर त्यांनी ताबा मिळवला आहे. अमेरिका अफगाणिस्थानातून निघून जात असताना बऱ्याच देशांना चिंता लागली आहे. यात भारतासहित पाकिस्तान आणि चीन यांचा समावेश आहे. चायना या एका वर्तमानपत्राशी बोलताना तालिबानचे प्रवक्ता सुहैल शाहीन यांनी चायनाला वचन दिले आहे की ते अफगाणिस्थान अलकायदासहित कोणत्याही दहशतवादी गटाला स्थापित होऊ देणार नाही.

- सय्यद इफ्तिखार अहमद

मो.: ९८२०१२१२०७



पूर्ण जगामध्ये इस्लामि कॅलेंडर नुसार जिल्हज्जा या बाराव्या महिन्याच्या दहा तारखेला बकरीद ईद साजरी करण्यात येते या ईदच्या दिवसाला आणि या महिन्याला इस्लाम मध्ये अन्यन साधारण महत्व आहे याच महिन्यामध्ये इस्लामच्या अनुयायांसाठी जे पात्र आहेत अर्थात जे हज यात्रेसाठी अरबस्थानातील मक्का याठिकाणी जाऊ शकतात खर्च करण्याची आर्थिक ऐपत आणि शारीरिक ऐपत धारण करतात त्यांच्यासाठी हज यात्रा आवश्यक आहे, हज यात्रा ही एक उपासना विधी आहे ती या महिन्यात आठ ते बारा या ठराविक तारखांना ठराविक पद्धतीने करावयाची असते याच हज यात्रेदरम्यान दहा ते बारा या तारखांना जगातील इस्लामचे संपूर्ण अनुयायी ज्यांना शक्य आहे ते अल्लाहच्या नावाने जनावरांची कुर्बानी करतात आणि गोर गरीबांमध्ये वितरित करतात 

जगभरातील मुस्लिम बांधव बकरीद मध्ये जनावरांची कुर्बानी का करतात हे जाणून घेण्यासाठी प्रेषित इब्राहीम अलै सलाम यांच्या जीवनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आज पासून सुमारे चार हजार वर्षापूर्वी अर्थात ईसा पूर्व 2100 वर्षापूर्वी आदरणीय इब्राहीम यांचा जन्म इराकमधील उर शहरात आजर  नावाच्या प्रमुख महांताच्या घरी झाला जे राजपुरोहित तर होतेच मूर्ती बनवून विकण्याचा त्यांचा व्यापारही होता. त्यांच्याकडे अपार संपत्ती होती परंतु हे सर्व मूर्तिपूजक होते स्वतःला चंद्रवंशी व सूर्यवंशी म्हणून घेत मूर्ति तयार करणे आणि तिच्यासमोर नतमस्तक होणे ही बाब आदरणीय इब्राहीम आलै सलाम यांना पटत नव्हती म्हणून ते आपल्या वडिलांना विविध प्रश्न विचारीत परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. प्रेषित इब्राहीम आलै सलाम यांनी लोकांना विविध प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सर्वांना काही ना काही गरजा आहेत माझा अल्लाह, ईश्वर गरजवंत नाही तो एकमेव आहे जमीन आणि आकाशामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्यांचा निर्माता, सर्वांना निर्माण करणारा ,जन्म देणारा, पालन पोषण करणारा, मृत्यु देणारा माझा तुमचा आणि विश्वाचा अल्लाह, ईश्वर आहे तो एकच आहे म्हणून त्यांनी  इतर देवी-देवतांचा इंकार केला येथूनच त्यांची पहिली परीक्षा सुरू झाली.   तेथील राजाने त्यांना जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठावली पुजाऱ्याचा मुलगा म्हणून अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु अल्लाह, ईश्वरा वरील तो एक असल्याचा दृढ विश्वास असल्यामुळे ते डगमगले नाहीत माघार घेतली नाही वडिलांनी घरातून काढून टाकले. राजाच्या आदेशाने अतिशय मोठा अग्निकुंड तयार करण्यात आला अग्निकुंडाची आग भयंकर होती तरीपण पर्वता पेक्षा अधिक दृढ हृदय बाळगणाऱे एका ईश्वरावर विश्वास ठेवणारे प्रेषित इब्राहीम विचलित झाले नाहीत त्यांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केले "ज्यांना तुम्ही ईश्वरत्वात भागीदार ठरविता त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही".

राजाच्या आदेशाने शिपायांनी प्रेषित इब्राहीम यांना धगधगत्या अग्निकुंडात फेकून दिले. आदरणीय इब्राहीम अल्लाचे प्रेषित होते अल्लाहने त्यांचे रक्षण केले. अग्नीला आदेश दिला " हे अग्नी, थंड हो शांती, सुरक्षा, सुखदायी हो इब्राहीम साठी " अल्लाह, ईश्वराच्या आदेशाने अग्नी इब्राहीम साठी थंड व शांत बनली अग्नित फेकून देणे इतके महाभयंकर होते की, त्याजागी आदरणीय प्रेषित यांना त्या लोकांमध्ये वास्तव्य करणे अशक्य होते. म्हणून अल्लाने त्यांना स्वदेश त्यागाचा आदेश दिला उर शहराला सोडून निघून जावे.  प्रेषित इब्राहीम यांनी आपली पत्नी व पुतण्या लूत अलैसलाम यांना सोबत घेऊन आपला देश सोडला त्यांनी राजपुरोहिताची गादी, धनसंपत्ती सोडून सीरिया , पॅलेस्टाईन, इजिप्त आणि अरबस्तानातील विविध देशात फिरत राहिले. अल्लाहलाच माहित या प्रवासात त्यांना किती अडचणी आल्या असतील. ते धनसंपत्ती कमविण्याच्या चिंतेत भटकत नव्हते तर लोकांना प्रत्येकाच्या गुलामगिरीतून मुक्त करून फक्त एका अल्लाचे, ईश्वराचे गुलाम बनावे हा संदेश देत होते. आज सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि आमची ही परीक्षि आहे. या भ्रमंतीमध्ये लोकांना सत्याची जाणीव करून देताना त्यांना कोठेही शांती लाभली नाही. वर्षानुवर्षे विना बिऱ्हाड भटकत राहिले. अशाच प्रकारे तारुण्य निघून जाऊन केस पांढरे झाले आणि जीवणाची दुसरी परीक्षा सुरू झाली. वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत त्यांना संतती प्राप्त झाली नव्हती. अल्लाहने त्यांना 86 व्या वर्षी संतती दिली. ते करत असलेल्या कार्यास पुढे नेण्यासाठी कोणीतरी वारस हवा म्हणून त्यांनी अल्लाकडे प्रार्थना,  संततीची याचना केली होती.पुत्र प्राप्ती नंतर अल्लाहने त्यांची दुसरी परीक्षा घेतली म्हातारपणी पुत्ररत्न प्राप्तीचा आनंद काही औरच होता. कृतज्ञता व्यक्त केली याच काळात अल्लाहचा आदेश मिळाला की काबागृहासाठी जागा निश्चित केलेली आहे तुम्ही तिकडे जा. आपल्या पत्नीला व लहान मुलाला घेऊन आज काबागृह जिथे उभा आहे तेथे पोहोचले हा परिसर निर्जन निर्जल ओसाड निर्मनुष्य होता.

या ठिकाणी दूरदूरपर्यंत वस्ती आणि पाणीही नव्हते. अल्लाहाने पुन्हा आदेश दिला पत्नी व मुलाला येथे सोडून निघूनजा. आदरणीय इब्रहिम  अल्लाहच्या आज्ञेपुढे नतमस्तक झाले विरान वाळवंटात निर्मनुष्य जागी आपल्या पत्नीला, लहान मुलाला सोडून जाताना त्यांच्या मनस्थितीची कल्पनाही केली जाऊ शकत नाही म्हातारपणी नुकतेच  पुत्रप्राप्ति झाली होती की हा आदेश प्राप्त झाला.

पुढे गेल्यावर काबागृहाकडे तोंड करून प्रार्थना केली "हे माझ्या निर्माणकर्त्या प्रभू, मी अशा निर्जन व ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागास तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे. हे पालनकर्त्या प्रभू असे मी अशासाठी केले आहे की, या लोकांनी येथे नमाज कायम करावी म्हणून तू लोकांच्या हृदयांना यांच्याकडे आकर्षित कर आणि यांना खावयास फळे दे कदाचित ते कृतज्ञ होतील " प्रेषितांची पत्नी आणि लहान मुल आदरणीय  इस्माईल त्या वाळवंटात एकटे पडले थोडं फार अन्नपाणी होती ते संपले अन्नपाणी नाही म्हणून आईला दूध एत नव्हते. मुलाची परिस्थिती वाईट होती भुकेने व्याकुळ होते कोठे पाणी मिळते काय किंवा कुणीप्रवासी दिसतील तर पाणी मागता येईल कारण मुल रडत होते म्हणून आई हजरा त्या ठिकाणी असलेल्या दोन टेकड्या सफा ,मरवा यावर चढून इकडे तिकडे पाहत होती, प्रार्थना करत होती, दोन्ही टेकड्या मध्ये त्यांनी सात फेऱ्या मारल्या टेकडीवर जात पुन्हा मुल एकटे आहे म्हणून धावून परत येत. जीव कासावीस होत होता मूल रडत होते अल्ला पाहत होता दोन्ही टेकड्यांमध्ये किमान 450 मीटर अर्थात चौदाशे 80 फूट एवढं अंतर होतं 7व्या फेरी  मध्ये 3.15 किमी अंतर त्यांनी पार केलं होतं. शेवटी सातव्या फेरीनंतर त्या ठिकाणी देवदूतांनी पाण्याचा झरा निर्माण केला.  जो जमजम च्या नावाने आजही अस्तित्वात असून जगातील सर्वात वैज्ञानिक दृष्टीने शुद्ध असून अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. दरवर्षी कोट्यवधी लिटर पाणी संपूर्ण जगातून येणारे लोक घेऊन जातात. पाण्यासाठी आईची ती पराकाष्ठा जगभरातील अनुयायासाठी हज यात्रेतील आवश्यक परंपरा म्हणून अनिवार्य केली  गेली.त्या सात फेऱ्या तशाच पूर्ण केल्याशिवाय हजपूर्ण होत नाही. दुसऱ्यापरीक्षेमध्ये ही प्रेषित इब्राहीम यशस्वी झाले. पाण्यामुळे त्या ठिकाणी वस्ती झाली होती. अधून मधून प्रेषित मुलास भेटण्यासाठी येत. अशाप्रकारे मुलगा, प्रेषित इस्माईल 14 वर्षाचे झाले. आतापर्यंत अल्लाहने प्रेषित इब्राहीम यांना ज्या ज्या परीक्षेत आजमावले त्या सर्व परीक्षेमध्ये ते खरे उतरले. 

आता तिसरी परीक्षा सुरू झाली होती. मुलास भेटावयास गेले असताना आपल्या मुलास त्यांनी जे सांगितले ते कुराणाच्या शब्दात खालील प्रमाणे आहे "तो मुलगा जेव्हा त्यांच्यासमोर धावपळ करण्याच्या वयात आला तेव्हा एके दिवशी प्रेषित इब्राहीम यांनी त्याला सांगितले हे माझ्या मुला मी स्वप्नात पाहतो की, मी तुझा बळी देत आहे आता सांग तुझा काय विचार आहे, मुलाने सांगितले हे पिताजी जी काही आज्ञा आपणास दिली जात आहे तसे करा अल्लाहाने इच्छिले तर आपणास मी  धैर्यशील आढळेल. पूर्ण विश्व पिता पुत्राचा संवाद स्तब्ध होऊन ऐकत होता. कुराणाची स्पष्टोक्ती आहे "सरते शेवटी जेव्हा या दोघांनी अल्लाच्या आज्ञापालनात मान तूकविली आणि प्रेषित इब्राहीम यांनी पुत्राला ओणवे केले." पुत्राला ओणवे करणे यासाठी 

की बळी देताना पुत्राच्या चेहऱ्याकडे पाहून प्रेषित यांचे याचे प्रेम उफाळून येऊ नये आणि त्यांचे हात डगमगायला नको. पुत्राच्या गळ्यावर सुरी फिरवणार तोच अल्लाहने आवाज दिला, आकाशवाणी झाली कुराणात आहे "आणि आम्ही पुकारले हे इब्राहीम तू स्वप्न साकार केलेस,आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो निश्चितच ही एक उघड परीक्षा होती." परीक्षा तर होतीच परंतु अल्लाहने आदरणीय इस्माईल यांना वाचविले. ह्या परीक्षेत आदरणीय प्रेषित इब्राहीम खरे उतरल्यानंतर त्यांना अल्लाहने जे बक्षीस दिले त्याचा उल्लेख कुराणाच्या शब्दात "आम्ही एक मोठे बलिदान देऊन त्या मुलाची सुटका केली आणि त्याची प्रशंसा व गुणगाण भावी पिढ्यांत सदैव ठेवले.  सलाम आहे इब्राहीम अलैसलाम वर आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. अल्लाहने एक सुदृढ मेंढा बळी देण्याचा आदेश दिला हे याच्या साठी होते की आदरणीय इब्राहीम आपल्या मुलाचा बळी देत होते परंतु अल्लाहने योग्य वेळी त्यांना रोखले ह्याचे बक्षीस अल्लाहने अशाप्रकारे दिले की या बलिदानास आदरणीय प्रेषित इब्राहीम यांची परंपरा आणि कार्य घोषित केले. बलिदानाची ही परंपरा श्रद्धावंतासाठी अंतिम दिनापर्यंत जिवंत ठेवली.प्रत्येक वर्षी याच दिवशी म्हणजे या महिन्याच्या दहा तारखेला जनावरांची कुर्बानी दिली जाते. ही कुर्बानी करताना आदरणीय इब्राहीम यांचे ते बलिदान आठवते जे त्यांनी उर शहरापासून येथपर्यंत केले होते कुर्बानीचा उद्देश ईश्वराचे आज्ञापालन आहे म्हणून जगभरातील मुस्लिम बांधव बकरीदच्या दिवशी विश्वाच्या अल्लाहच्या नावाने जनावरांची कुर्बानी देतात. गोर गरीबांमध्ये वाटतात. ही एक उपासना आहे जी अल्लाच्या आदेशानुसार इब्राहीम आले सलामच्या परंपरेनुसार प्रतीकात्मक देण्यात येते. तसे पाहिले तर हजरत इब्राहीम यांचे पूर्ण जीवन कुर्बानीची, बलिदानाची गाथा आहे. जगातील प्रत्येक वस्तू पेक्षा आपल्या म्हातारपणात प्राप्त झालेल्या मुलांच्या जीवनापेक्षा निर्माणकर्त्या अल्लाचा आदेश महत्त्वाचा आहे. आणि हेच अल्लाच्या दासाचे कर्तव्य आहे. माणसाची परीक्षा आहे आमचं सुध्दा कर्तव्य आहे पालन कर्त्याचा निर्माण कर्त्या, मालकाचा आदेश सर्वपरी म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले जीवन जगावे त्यातच आमचं आमच्या विश्वासचे कल्याण आहे.

- अ. मजीद खान

नांदेड, 

Mo. 9403004232


दिलेले वचन पूर्ण करणे हे स्वतः अल्लाहचे वैशिष्ट्य आहे. पवित्र कुरआनात अल्लाह स्वतःविषयी असे म्हणतो की, निश्चितच अल्लाह कधीही वचनभंग करत नाही. अल्लाहने केलेले हे वचन आहे आणि तो कधीच आपल्या वचनाच्या विरोधात जात नाही. अल्लाह कधीही आपला शब्द टाळत नसतो. अल्लाहपेक्षा आपल्या वचनाशी बांधिल इतर कोण असू शकतो? (पवित्र कुरआन, विविध अध्यायांतील आयती) साधारणपणे दोन माणसांनी आपसात केलेल्या करारास वचन म्हटले जाते. पण जीवनातील प्रत्येक क्षेत्रात वचनपूर्ती करावी लागत असते. मग ते सामाजिक असो की आर्थिक, संस्कृती-सभ्यतेशी निगडीत असो की राज्यव्यवस्थेशी संबंधित असो; प्रत्येक क्षेत्रात माणसाने वचनबद्धता पाळली पाहिजे. मुस्लिमांच्या बाबतीत असे म्हटले गेले आहे की जर ते आपले वचन पाळत नसतील तर त्यांची श्रद्धा परिपूर्ण होऊ शकत नाही. जे वचन पाळतात अशा श्रद्धावंतांसाठी कुरआनात म्हटले आहे की, “असे लोक त्यांच्याकडील अमानती परत करतात. वचनभंग करत नसतात. आपल्या नमाजांविषयी (उपासना) ते दक्ष असतात. तेच लोक स्वर्गाचे वारस असतील. अशाच लोकांना उच्च दर्जाच्या स्वर्गांचा वारसा लाभेल, कारण ते लोक आपल्या विधात्याच्या आयतींवर श्रद्धा ठेवतात, त्यास भागीदार जोडत नाहीत. त्यांना जे काही जमेल ते इतरांना देतात. अशाच लोकांच्या हृदयांना आपल्या विधात्याकडे परतण्याची सतत भीती असते.” (पवित्र कुरआन-२३)

लोकांना पुरेपूर माप करून देणे हे अल्लाह आणि समाजाशी केलेले वचन आहे. “माप करताना पुरेपूर द्या. वजन करताना प्रमाणित तराजूने तोलून द्या.” (कुरआन-१७)

सगळ्यात महत्त्वाचे वचन म्हणजे माणसांनी अल्लाहशी केलेले वचन होय. हे वचन माणसाने अल्लाहशी केलेले असल्याने समस्त मानवांशी, समाजाशी, जनसमूहांशी त्याचा संबंध आहे. जे लोक अल्लाहशी केलेले वचन पूर्ण करतात, आपसातला करार मोडत नाहीत, असे लोक खऱ्या अर्थाने ज्या नातेसंबंधांना अल्लाहने जोडून ठेवण्याचे आदेश दिले आहेत ते जोडून ठेवतात. (कुरआन-१६)

क्षमा करणे

जसे वचनबद्धता अल्लाहचे वैशिष्ट्य आहे तसेच क्षमा करणेदेखील अल्लाहचे मानवतेला मोठे वरदान आहे. जर असे नसते तर अल्लाहने या जगाला आणि यातील मानवजातीला कधीच नष्ट केले असते. पवित्र कुरआननात म्हटले आहे की, “तोच आपल्या मानवांचा पश्चात्ताप स्वीकारतो आणि त्यांच्यातील अवगुणांना माफ करून टाकतो.” (कुरआन) जर अल्लाहची तशी इच्छा असती तर माणसांच्या वाईटपणासाठी त्यांचा नाश केला असता. अशाच प्रकारे मानवांना म्हटले आहे की, “जर तुम्ही कुणाच्या वाईट कृत्यांना क्षमा केले तर अल्लाह तुम्हालादेखील माफ करण्याचे सामर्थ्य राखतो.” (कुरआन-३) माणसांनी एकमेकांना क्षमा केली पाहिजे. असे केल्यास अल्लाह माणसांना क्षमा करतो, कारण तो परमदयाङू आहे. अल्लाह म्हणतो, “तुमच्या विधात्याने आपल्या दयेने आणि क्षमाशीलतेने तुमच्यासाठी जो स्वर्ग निर्माण केला आहे त्या स्वर्गाकडे धाव घ्या, ज्याचा विस्तार सबंध आकाश आणि साऱ्या धरतीसमान आहे. हा स्वर्ग अशा सदाचारी लोकांसाठी तयार केला गेला आहे जे टंचाईत असोत की भरभराटीत आपली साधने लोकांच्या सेवेत बहाल करतात. आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात, लोकांना क्षमा करून टाकतात. अशाच लोकांना अल्लाह पसंत करतो.” (कुरआन)

या आयतींनुसार सदाचारी लोक म्हणजे जे कुणावर रागवत नाहीत आणि लोकांकडून झालेल्या चुकांबद्दल त्यांना क्षमा करतात. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे एक अनुयायी अबू मसऊद आपल्या गुलामास मारहाण करत होते. त्यांच्या मागून आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिले तर स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) होते आणि म्हणत होते की, “जितके नियंत्रण या गुलामावर तुमचे आहे त्यापेक्षा अधिक अल्लाहचे तुमच्यावर आहे.” अबू मसऊद म्हणतात या घटनेनंतर मी पुन्हा आयुष्यात कधी कुणावर रागवलो नाही. तसेच एका अन्य अनुयायींनी प्रेषितांना विचारले, “मी माझ्या सेवेत असणाऱ्यांच्या किती चुका माफ करू?” प्रेषित म्हणाले, “दररोज शंभर वेळा.” क्षमाशीलतेचे वर्णन पवित्र कुरआनात फार सुंदररित्या केले आहे.

“जो लोकांना अल्लाहकडे बोलावतो, नेक कर्म करतो आणि म्हणतो की मी श्रद्धावंत आहे त्यापेक्षा चांगले कुणाचे बोलणे. भले आणि वाईट समान नसतात. जे चांगले असेल त्याद्वारे वाईटावर उपाय करा. त्यामुळे ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व होते तोच तुमचा जीवलग मित्र होईल. पण जे संयमी लोक असतात त्यांनाच हे लाभते आणि ज्यांचे नशीब मोठे त्यांच्याच भाग्यात हे येते.” (कुरआन-४१)

- सय्यद इफ्तिखार अहमद


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget