Halloween Costume ideas 2015

‘विवाहाची घोषणा व्हावी आणि ती सर्वांसमोर व्हावी’

आजच्या न्यायालयात होणारे नोंदणीकृत विवाहाचा पाया इस्लामने अनेक शतकांपूर्वी घातलेला आहे. आजच्या नोंदणीकृत विवाहाप्रसंगी विधिज्ञ आणि काही साक्षीदार यांच्या  न्यायाधीशासमोर रीतसर विवाह होतो. इस्लाममध्ये विवाह तर होतोच पण त्या विवाहाची घोषणादेखील होते.

’’इस्लाम हे इच्छितो की विवाहाची घोषणा व्हावी आणि ती सर्वांसमोर व्हावी. कारण समाज या गोष्टींपासून परिचित व्हावा की अमुक पुरूष आणि स्त्री दाम्पत्यासंबंधात बांधले आहेत. ते एकमेकांचे जीवनसाथी बनून गेले आहेत आणि याच्या नैतिक आणि संवैधानिक उत्तरदायित्वांना उचलण्याचे वचन आणि प्रतिज्ञा करून घेतली आहे, जेणेकरून आवश्यकता पडल्यावर  स्वयं समाजसुद्धा त्यांच्या उत्तरदायित्वांना निभवण्यात त्यांना सहायता करू शकेल. या विषयात त्यांच्याकडून कमतरता झाली तर पकड करू शकेल. यासाठी विवाहाच्या प्रमाणासाठी  कमीतकमी दोन साक्षीदार असणे जरूरी ठरविले गेले आहे. याशिवाय हा विवाह होऊ शकत नाही.
या ठिकाणी साक्षीदाराची संकल्पना आपण जी एकोणीसाव्या शतकात (भारतात) अस्तित्वात आली. ती अगदी प्राचीन काळापासून इस्लामने स्वीकारली आहे. म्हणून इस्लामने स्त्रीला  प्रतिष्ठेच्या उंच शिखरावर ठेवले आहे. कारण आपण विटा, सिमेंट, चुना, लोखंड, लाकूड यापासून बांधलेल्या इमारतीला बाह्यरूप, आकार बहाल होतो, पण त्या इमारतीला घराचा दर्जा,  घरपण निर्माण करू देते ती एक स्त्री! मानवाची निर्मिती आई-वडील यांच्यापासून होते खरे, पण त्याचा सर्वात प्रथम संबंध आईशी येतो. नंतर त्याच्या समीप सर्व परिवार असल्याने तो  त्याच्याशी समरस होतो. या परिवारातून त्याला सामाजिकतेचा धडा मिळतो. या जगात आल्यावर मानवाला सर्वप्रथम ज्या सहाय्यतेची आवश्यकता असते, ती त्याच्या आईपासून  मिळते. त्याचबरोबर कुटुंबव्यवस्थेचे अस्तित्व फक्त घरातील स्त्रीवरच अवलंबून आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची इच्छापूर्ण करण्याची जबाबदारी घरातील स्त्रीवर असते. परिवारातील   सर्वांची मर्जी राखत-राखत ती तारेवरील कसरत करीत असते. त्यातून ती प्रत्येकाला समाधानी करण्याचा प्रयत्न करते. ती प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचा अभ्यास करून त्यांच्याशी वर्तन  करते. परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी ती हिरहिरीने सहभागी होते. ’परिवार’ हा समाजव्यवस्थेचा कणा आहे. कुटुंब लहान मोठे असू शकते. कुटुंब मजबूत असेल तर समाज  मजबूत आणि कुटुंब कमजोर तर समाज कमजोर. साहजिकच या अशक्त कुटुंबाने समाजात शिथिलता निर्माण होते आणि या कुटुंबाला दणकट बनविण्याचे काम फक्त घरातीलच स्त्रीच  करते. घरात अनेक मतभेद असतात. या मतभेदातून स्त्री मार्गही काढू शकते आणि त्या समस्या गहनही करू शकते. म्हणून स्त्री आणि कुटुंब याला इस्लाममध्ये अनन्यसाधारण महत्व  दिले आहे. कारण कुटुंब केवळ सामाजिक संस्थाच नाही तर त्याला धार्मिक आधार आहे. जी व्यक्ती कौटुंबिक पद्धतीने (इस्लाम) जीवन जगते ती जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेते.  मृत्यूपश्चात जीवनासाठी नैतिकतेने आचरण करते. यालाही स्त्रीचे फार मोठे सहकार्य असल्याशिवाय होत नाही. स्त्री-पुरूष एकत्र कुटुंबात जीवन व्यतीत करीत असताना दोघांमध्ये  मतभेद, विवाद निर्माण होतच असतात. हे मतभेद स्वतः पती - पत्नीनेच सोडविले पाहिजेत. त्यात पुरूषाने स्त्रीच्याप्रती सहानुभूती दाखवावी. तसेच मोठ्या अंतःकरणाने स्त्रीला समजून  घ्यावे. एखाद्या बाबतीत आपली पत्नी चुकत असेल तर तिला सहनशीलतेने समजावून सांगावे. निर्माण झालेल्या मतभेदांना विशिष्ट सीमा असते, त्या सीमेपार जाऊ नये. या  मतभेदावर काही मार्ग निघत नसेल तर दोघांचे पंच एकत्र बोलावून दोघांना समजावून सांगून पुन्हा आहे त्याच परिवारात मतभेदाशिवाय राहावयास त्या दोघांमध्ये समेट निर्माण करावा.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget