Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(९२) कोणत्याही ईमानधारकाचे हे काम नव्हे की त्याने दुसऱ्या श्रद्धावंताला ठार करावे या शिवाय की त्याच्याकडून चूक घडावी.१२० आणि जी व्यक्ती एखाद्या श्रद्धावंताला चुकून ठार  करील तर त्याचे प्रायश्चित हे आहे की तिने एका श्रद्धावंताला गुलामीतून मुक्त करावे.१२१ आणि ठार झालेल्या व्यक्तीच्या वारसांना खुनाबद्दल भरपाई द्यावी.१२२ परंतु त्याला अपवाद  तो की जो खुनाची किंमत माफ करील, परंतु जर ठार झालेला तो मुस्लिम एखाद्या अशा जनसमुदायापैकी असेल ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व आहे तर त्याचे प्रायश्चित्त एक श्रद्धावंत गुलाम मुक्त करणे होय, आणि जर तो एखाद्या अशा मुस्लिमेतर जनसमुदायापैकी असेल ज्याच्याशी तुमचा करार आहे तर त्याच्या वारसांना खुनाबद्दल भरपाई द्यावी आणि एका  श्रद्धावंत गुलामाला मुक्त करावे लागेल.१२३ परंतु ज्याला गुलाम आढळले नाही त्याने लागोपाठ दोन महिन्याचे उपवास (रोजे) करावेत.१२४ ही या गुन्ह्यासाठी अल्लाहसमोर तौबा  (पश्चात्ताप) करण्याची रीत आहे,१२५ आणि अल्लाह ज्ञानी व बुद्धिमान आहे. (९३) उरली गोष्ट त्या व्यक्तीची की जो एखाद्या श्रद्धावंताला जाणूनबुजून ठार करील तर त्याचा मोबदला  नरक आहे ज्यात तो सदैव राहील. त्याच्यावर अल्लाहचा प्रकोप आणि त्याचा धिक्कार आहे आणि अल्लाहने त्याच्यासाठी कठोर शिक्षा तयार ठेवली आहे.
(९४) हे श्रद्धावंतांनो, जेव्हा तुम्ही अल्लाहच्या मार्गात लढण्यासाठी (जिहाद) निघाल तेव्हा मित्र व शत्रू यांच्यामधील फरक जाणून घ्या.




१२०) येथे त्या दांभिक मुस्लिमांचा उल्लेख नाही ज्यांना ठार मारण्याचे आदेश वर दिले आहेत. परंतु त्या मुस्लिमाचा उल्लेख आहे जे या दारुल इस्लामचे रहिवाशी आहेत किंवा दारूल हर्ब किंवा दारूल कुफ्रचे रहिवाशी आहेत परंतु इस्लामविरोधी कारवायात त्यांनी भाग घेतल्याचे पुरावे नाहीत. त्या वेळी अनेक लोक असे होते की इस्लाम स्वीकार केल्यानंतर आपल्या  वास्तविक विवशतेच्या कारणांमुळे इस्लामविरोधकांसोबत राहत होते. युद्धात एखाद्या शत्रूटोळीतील मुस्लिम कधी मारले जायचे. म्हणून अल्लाहने येथे चुकीने एखाद्या मुस्लिमाकडून  दुसरा मुस्लिम मारला गेल्यास त्या स्थितीसाठीचा आदेश दिला आहे.
१२१) ठार केलेला ईमानधारक होता म्हणून त्याच्या ठार केल्याचा कफ्फारा (प्रायश्चित) एक मुस्लिम गुलामाला स्वतंत्र करण्याचे आहे.
१२२) पैगंबर मुहम्मद (स.) यांनी रक्त सांडण्याचे हत्यादंड शंभर उंट किंवा दोनशे गाया किंवा दोन हजार शेळया निश्चित केल्या आहेत. जर दुसऱ्या स्वरुपात मनुष्य हत्यादंड देऊ  इच्छितो तर त्याची किंमत यांच्या बाजार भावाने ठरविली जाईल. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात रोख हत्या दंड देणाऱ्यासाठी आठशे दिनार आणि आठ हजार दिरहम निश्चित  होते. जेव्हा माननीय उमर (रजि.) यांच्या खिलाफतकाळात उंटांची किंमत वाढली होती म्हणून सोन्याच्या शिक्क्यांत एक हजार दीनार किंवा चांदीच्या नाण्यांत १२ हजार दिरहम हत्यादंड  दिला जात होता. परंतु हे स्पष्ट आहे की हत्यादंडाची ही रक्कम निश्चित केली ती इरादा करून केलेल्या हत्येसाठी नाही तर अनायासे झालेल्या हत्येसाठी आहे.ंना ठार मारणे आवश्यक  आहे, त्यांनी जर एखाद्या इस्लामविरोधी राज्यात आश्रय घेतला ज्याच्याशी इस्लामी राज्याचा करार झालेला आहे; तर त्यांच्या क्षेत्रात त्या दांभिक मुस्लिमांचा पाठलाग करता येणार नाही. तसेच हेही योग्य नाही की इस्लामी राज्याचा एखादा मुस्लिम निष्पक्ष राज्यात गेल्यानंतर एखाद्या दांभिक मुस्लिमास पाहून त्याला ठार मारील. येथे सन्मान दांभिक मुस्लिमाच्या  रक्ताचा नाही तर कराराचा आहे.
१२३) हा आदेशाचा सार आहे. जर हत्या केलेला मनुष्य दारूल इस्लाम (इस्लामी प्रांत) निवासी असेल तर त्याच्या हत्याऱ्याने हत्यादंड दिला पाहिजे आणि अल्लाहशी आपल्या अपराधांची  क्षमायाचना करण्यासाठी एक गुलामसुद्धा स्वतंत्र केला पाहिजे. जर तो दारूल हर्बचा रहिवाशी आहे तर हत्याऱ्याला फक्त एक गुलाम स्वतंत्र केला पाहिजे. त्याचा हत्यादंड काहीच नाही.  जर तो अशा `दारूल कुफ्र'चा निवासी असेल आणि ज्याच्याशी इस्लामी शासनाचा करार झाला असेल तर हत्याऱ्याला (खुन्याला) एक गुलाम स्वतंत्र केला पाहिजे परंतु हत्यादंडाची मात्रा करारानुसारच असणे आवश्यक आहे.
१२४) म्हणजे रोजे सतत ठेवले पाहिजे मध्ये सुटले नाही पाहिजे. जर कोणी शरीयतनुसार योग्य कारणाविना एक रोजा जरी मध्ये सोडत असेल तर नव्याने पुन्हा रोजा ठेवणे आवश्यक आहे.
१२५) म्हणजे हा दंड नाही तर क्षमायाचना आणि प्रायश्चित आहे. आत्मग्लानि आणि पश्चात्ताप आणि स्वत:ला सुधारण्याचा काही अंश नसतो परंतु सामान्यत: अत्यंत मजबुरीच्या  स्थितीत द्यावा लागतो. बेजारी आणि कडवटता आपल्या मागे सोडतो. याविरुद्ध अल्लाह इच्छितो, की ज्या दासाद्वारा अपराध घडला तो उपासना, भली कामे आणि दुसऱ्यांचे हक्क   देऊन त्याचा प्रभाव आपल्या आत्म्यावरून पुसून टाकतो आणि आत्मग्लानि आणि पश्चातापाने पुन्हा अल्लाहकडे परततो जेणेकरून त्याचा हा अपराध माफ व्हावा आणि भविष्यात अशा  प्रकारचे अपराध पुन्हा करण्यापासून तो परावृत्त व्हावा. `कफ्फारा'चा शाब्दिक अर्थ आहे `लपविण्याची गोष्ट'. एखाद्या सदाचाराला अपराधाचा कफ्फारा म्हणणे म्हणजे हा सदाचार त्या   अपराधाला आच्छादित करतो, ज्याप्रकारे एखाद्या भींतीवर डाग लागला असेल तर भींतीला रंग दिल्याने तो डाग नाहीसा होतो.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget