Halloween Costume ideas 2015

तहानलेल्यांना पाणी पाजा, स्वर्गात जाल : पैगंबरवाणी (हदीस)


हजरत अबू जर गफ्फारी (र.) म्हणतात, मला प्रेषित मुहम्मद (स.) यांनी काही गोष्टींची शिकवण दिली.

१) ज्या लोकांना श्रीमंती आणि प्रतिष्ठा लाभली आहे, मी त्यांच्याकडे न पाहता अशा लोकांकडे पाहावे ज्यांना माझ्यापेक्षा कमी लाभले आहे.

२) मला शिकवण दिली की मि निराधारांशी प्रेमाचा व्यवहार करावा आणि त्यांच्या सान्निध्यात जावे.

३) मला ताकीद दिली आहे की जरी माझे नातलग माझ्याशी नाराज असले आणि माझे अधिकार देत नसतील तरीही मी त्यांच्याशी संबंध स्थापित करावेत आणि त्यांचे हक्काधिकार त्यांना द्यावेत.

(तरगीब व तरहीब, संदर्भ- तबरानी)

ह. अबू हुरैरा (र.) म्हणतात की एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले,

"माझ्या या गोष्टी कोण घेईल, त्यावर आचरण करील आणि आचरण करणाऱ्यांना सुद्धा सांगेल?"

मी म्हणलो, 'हे प्रेषिता, मी त्यासाठी तयार आहे.' तेव्हा त्यांनी माझा हात धरला आणि खालील गोष्टी सांगितल्या.

(१) अल्लाहय्या अवज्ञेपासून स्वतःला वाचवा, तुम्ही सर्वांत जास्त उपासक व्हाल.

(२) अल्लाहने जितकी उपजीविका तुमच्यासाठी निश्चित केलेली आहे त्यावर समाधान व्यक्त करा आणि राजी व्हा, तुम्ही सर्वांत जास्त श्रीमंत व्हाल.

(३) आपल्या शेजाऱ्यांशी चांगले व्यवहार करा, तुम्ही अधिक श्रद्धावंत व्हाल.

(४) तुम्ही स्वतःसाठी जे पसंत करता तेच इतरावसाठीही पसंत केले तर तुम्ही मुस्लिम व्हाल.

(५) जास्त हसू नका, कारण जास्त हसण्यामुळे हृदयावर परिणाम होतो.

(संदर्भ- मिश्कात)

एके दिवशी एक खेडूत मुस्लिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, 'हे अल्लाहचे प्रेषित, मिला अशा काही गोष्टी सांगा ज्यांच्यावर आचरण करुन मी स्वर्गात जाईन.'

प्रेषित (स.) म्हणाले, "तुम्ही फार थोडक्यात विचारलं, परंतु फार चांगलं विचारलं आले. जर स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर एखाद्या माणसाला मुक्त करा आणि काहींना गुलामीतून मुक्त करा."

तो खेडूत म्हणाला, 'ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत.'

प्रेषित (स.) म्हणाले, "ह्या दोन्ही गोष्टींचा अर्थ एकच नाही. एखाद्या माणसाला किंवा महिलेला मुक्त करण्याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःचे पैसे खर्च करुन त्या व्यक्तीला मुक्त करणे आणि गुलामाला मुक्त करण्याचा अर्थ असा की अनेक माणसांनी मळून एखाद्या गुलामाला मुक्त करणे. दुसरे काम असे की तुम्ही आपली उंटीण दूध पिण्यासाठी दुसऱ्या कुणाला तरी देऊन टाका. तिसरी गोष्ट ही की ज्या नातेवाईकांनी तुमच्याशी संबंध तोडले असलीत त्यांच्य़ाशी तुम्ही संबंध जोडा. जर ही सगळी स्वर्गात जाण्याची कामे करणे शक्य नसेल तर भुकेलेल्यांना जेवण द्या, तहानलेल्यांना पाणी पाजा, लोकांना भल्या गोष्टी सांगत जा आणि वाईट गोष्टींपासून रोखा. जर हेदेखील करणे तुम्लाहा जमत नसेल तर आपल्या जिभेचे रक्षण करा. केवळ भल्या गोष्टीच जिभेने उच्चारा."

(तरगीब व तरहीब, संदर्भ- अहमद)

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget