(११०) आम्ही यापूर्वी मूसा (अ.) लासुद्धा ग्रंथ दिलेला आहे त्याच्याबाबतीत देखील मतभेद केले गेले होते (ज्याप्रमाणे आज या ग्रंथाबद्दल केले जात आहेत जो तुम्हाला दिला गेला आहे.)१११ जर तुझ्या पालनकत्र्याकडून एक गोष्ट अगोदरच ठरविली गेली नसती तर त्या मतभेद करणाऱ्यांच्या दरम्यान केव्हाच निकाल लावला गेला असता.११२ ही वस्तुस्थिती आहे की हे लोक याकडून शंका व द्विधेत पडले आहेत.
(१११) आणि हीदेखील वस्तुस्थिती आहे की तुझा पालनकर्ता त्यांना त्यांच्या कृत्यांचा पुरेपूर मोबदला दिल्याशिवाय राहाणार नाही, खचितच तो यांच्या सर्व कारवायांची खबर राखणारा आहे.
(११२) तर हे पैगंबर (स.)! तुम्ही व तुमचे ते सोबती जे (द्रोह आणि बंडखोरीपासून श्रद्धा व आज्ञापालनाकडे) परत आले आहेत, ठीक ठीक सरळमार्गावर दृढ राहा जशी तुम्हाला आज्ञा दिली गेली आहे आणि बंदगीच्या मर्यादांचे उल्लंघन करू नका. जे काही तुम्ही करीत आहात ते तुमचा पालनकर्ता पाहात आहे.
(११३) या अत्याचाऱ्यांकडे यत्किंचितही झुवूâ नका अन्यथा नरकाच्या लपेटीत याल आणि तुम्हाला असा कोणी वाली किंवा पाठीराखा मिळणार नाही जो तुम्हाला अल्लाहपासून वाचवू शकेल आणि कोठूनही तुम्हाला मदत मिळणार नाही. (११४) आणि पाहा, नमाज कायम करा दिवसाच्या दोन्ही टोकांवर आणि थोडी रात्र उलटल्यावर११३ वस्तुत: पुण्याई पापांना दूर सारत असते.११४ ही एक आठवण करून देणारी गोष्ट आहे त्या लोकांसाठी जे अल्लाहची आठवण ठेवणारे आहेत.
(११५) आणि संयम राखा, अल्लाह सदाचार करणाऱ्यांचा मोबदला कधी वाया घालवीत नाही.
(११६) त्या लोकांत जे तुमच्यापूर्वी होऊन गेले आहेत, असली भली माणसे का शिल्लक राहिली नाहीत ज्यांनी लोकांना जमिनीत उपद्रव माजविण्यापासून प्रतिबंधित केले असते? असले लोक निघाले तरी फारच थोडे ज्यांना आम्ही त्या लोकांमधून वाचविले. एरव्ही अत्याचारी लोक तर त्याच मौजमजेच्या नादी लागले ज्याची सामग्री त्यांना विपुल प्रमाणात दिली गेली होती आणि ते अपराधी बनून राहिले.
१११) म्हणजे हे काही नवीन नाही की आज या कुरआनविषयी विभिन्न लोक कानगोष्टी करीत आहेत. परंतु यापूर्वी जेव्हा मूसा (अ.) यांना ग्रंथ दिला होता तेव्हा त्याविषयीसुद्धा अशीच वेगवेगळी मते मांडली गेली होती. म्हणून हे पैगंबर मुहम्मद (स.) हे पाहून तुम्ही निराश होऊ नका आणि धीर सोडू नका की इतकी साधी सोपी गोष्ट कुरआन सांगत आहे आणि तरीही लोक ऐकत नाहीत व स्वीकार करीत नाहीत.
११२) हे वाक्यसुद्धा पैगंबर मुहम्मद (स.) आणि ईमानधारक यांना संतुष्ट करण्यासाठी आणि धैर्य देण्यासाठी सांगितले गेले आहे. म्हणजे तुम्ही यासाठी बेचैन होऊ नका की जे लोक या कुरआनविषयी मतभेद करतात, त्यांचा त्वरित निर्णय व्हावा. निर्णय निश्चित वेळीच होईल, हे अल्लाहने पूर्वीच ठरविले आहे. लोक निर्णयासाठी घाई करतात. अल्लाह मात्र निर्णय घेण्यासाठी कधीही घाईगडबड करीत नाही.
११३) "दिवसाच्या दोन्ही टोकांवर" म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ आहे आणि रात्रीचा एक प्रहर संपल्यानंतर म्हणजे 'इशा' ची वेळ आहे. याने माहीत होते की हे कथन त्यावेळचे आहे जेव्हा नमाजसाठी आता पाच वेळा निश्चित झाल्या नव्हत्या. मेराजची घटना यानंतरची आहे ज्यात पाच वेळची नमाज अनिवार्य (फर्ज) करण्यात आली. (तपशीलासाठी पाहा सूरह 17, टीप 95, सूरह 20, टीप 111 आणि सूरह 30टीप 124.)
११४) म्हणजे जे दुर्गुण जगात फैलावले आहे आणि ज्या दुष्टता तुमच्याशी या सत्यसंदेशाच्या शत्रुत्वात केल्या जात आहेत, त्या सर्वांना नष्ट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जास्तीतजास्त सदाचारी बना. आपल्या या सदाचाराने दुराचाराचा पराजय करा. तुम्हाला सदाचारी बनविण्याचे उत्तम साधन नमाज आहे. नमाज तुमच्यामध्ये असे गुण निर्माण करील ज्यामुळे दुष्टतेच्या वावटळाचा तुम्ही फक्त सामनाच करणार नाही तर त्याचा नाश करून जगात सदाचाराला व्यावहारिक रूपात स्थापित करु शकाल.
Post a Comment