Halloween Costume ideas 2015

भारतातील धर्मनिरपेक्षतेचे भवितव्य


भारतीय राष्ट्रीयत्वाच्या या स्पर्धात्मक दृष्टिकोनांमध्ये निर्माण झालेला तणाव अलिकडच्या काही वर्षांत चव्हाट्यावर आला आहे, विशेषत: २०१४ मध्ये भाजपला ऐतिहासिक निवडणूक विजय मिळाल्यापासून. जातीयवादी अस्मितांना प्रोत्साहन देणाऱ्या राजकीय उद्योजकांनी-विशेषत: हिंदू राष्ट्रवादी विचारवंतांनी धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेभोवती बराच गोंधळ निर्माण केला आहे. राष्ट्रवादी शक्ती बाजूला ठेवून, भारतीय धर्मनिरपेक्षतेत सर्व काही अलबेल नाही. हिंदुत्ववादी शक्तींनी भारताच्या धर्मनिरपेक्ष परंपरेवर हल्ला चढवण्यापूर्वीच काँग्रेस पक्षाने विविध मतदान गटांच्या पाठिंब्यासाठी आणि सामाजिक अस्मितेच्या (व्होट बँक प्रथेच्या) विभाजनकारी मुद्द्यांना चिथावणी देऊन धर्मनिरपेक्षतेला कमी लेखण्यास सुरुवात केली होती. देशाच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेला हिंदू राष्ट्रवादी जवळजवळ पूर्णपणे अनुपस्थित होते, परंतु हिंदू परंपरावादी - ज्यांनी प्रबळ काँग्रेस पक्षाची उजवी शाखा स्थापन केली होती - त्यांचे प्रतिनिधित्व चांगले होते. त्यांच्यावर कितीही दबाव आला तरी घटना सभेच्या मसुदा समितीचे प्रमुख बी. आर. आंबेडकर यांनी 'संमिश्र संस्कृती'च्या एका प्रकाराच्या बाजूने यशस्वीपणे युक्तिवाद केला, ज्याला भारतात 'धर्मनिरपेक्षता' असे म्हटले जाते. १९५० ते १९७० च्या दशकात भारताचे धर्मनिरपेक्ष मॉडेल बऱ्यापैकी काम करत असल्याचे दिसून आले. देशातील निवडून आलेल्या विधानसभांमध्ये मुस्लिमांसह धार्मिक अल्पसंख्याकांचे चांगले प्रतिनिधित्व राहिले. १९८० च्या दशकापासून भारतीय धर्मनिरपेक्षतेवर अधिक ताण आला. काँग्रेस पक्षाने संधीसाधूपणे एकामागोमाग एक धार्मिक समुदायांकडे अधिक स्पष्टपणे कुरघोडी करण्यास सुरुवात केली आणि परिणामी भारतीय धर्मनिरपेक्षतेचे खूप नुकसान झाले. इंदिरा आणि राजीव गांधी यांनी हिंदू राष्ट्रवादाला अधिक व्यापक राजकीय महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी दारे खुली केली. त्याचवेळी हिंदू राष्ट्रवादी राजकीय उद्योजकांनी बहुसंख्य समाजाला व्होट बँकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला. १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची (भाजप) निर्मिती होईल, असा अंदाज व्यक्त करून बाळासाहेब देवरस (त्या वेळचे रा.स्व.संघाचे प्रमुख) यांनी १९७९ मध्ये जाहीर केले होते, "हिंदूंनी आता स्वत:ला इतके जागृत केले पाहिजे की, निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही राजकारण्यांना हिंदूंच्या भावनांचा आदर करावा लागेल आणि त्यानुसार आपली धोरणे बदलावी लागतील. एकदा का हिंदू एकत्र आले की सरकार त्यांचीही काळजी घ्यायला सुरुवात करेल." २०१४ मध्ये पहिल्यांदा भारतीय संसदेच्या खालच्या सभागृहात म्हणजेच लोकसभेत भाजपला पूर्ण बहुमत मिळालं. एका दशकात प्रथमच राष्ट्रीय पातळीवर राजकीय सत्तेची चव चाखल्यानंतर हिंदू पहारेकऱ्यांच्या गटांनी अल्पसंख्याकांना (मुस्लिम आणि ख्रिश्चनांना) सरकारी यंत्रणेच्या आशीर्वादाने शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. लव्ह जिहाद, घरवापसी, गोरक्षण असे अनेक मुद्दे उपस्थित करून त्यांचा छळ सुरू झाला. वाढत्या हिंदू राष्ट्रवादामुळे काँग्रेस पक्ष आणि धर्मनिरपेक्षता अधिक सामान्यपणे पिछाडीवर पडली आहे. गेल्या दोन वर्षांत काँग्रेस पक्षाने 'सॉफ्ट हिंदुत्व' अंगिकारून भाजपशी निगडित असलेल्या धार्मिकतेचे अनुकरण केले आहे. नुकतेच भाजपच्या वरिष्ठ नेत्याने आपला पक्ष मुस्लिमांना उमेदवारी का देत नाही याचे उत्तर तो पक्षाचा ‘राजकीय शिष्टाचार’ असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे तिकीट वाटपाच्या बाबतीत पक्षाच्या रणनीतीमुळे काँग्रेस पक्षाची हिंदूहिताची प्रवृत्ती बळावली आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात काँग्रेस पक्ष निवडणुकीत मोजकेच मुस्लिम उमेदवार उतरवताना दिसत आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभा निवडणुकीसाठी केवळ सत्तावीस मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली होती, जी त्यांच्या एकूण उमेदवारांपैकी ५.६ टक्के होती. २०१७-१८ मध्ये कॉंग्रेस पक्षाने दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान आणि तामिळनाडू सारख्या महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या जागांसाठी फारच कमी मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या राजवटीतही काँग्रेस पक्षाने अनेक मुस्लिमांना उमेदवारी दिली नाही. प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी धर्मनिरपेक्ष चर्चा आणि धर्मनिरपेक्ष प्रथांमध्ये दोलायमानता केली आहे. काही प्रादेशिक पक्ष अपवाद वगळता अजूनही अल्पसंख्याकांच्या हक्कांचे जोरदारपणे रक्षण करत आहेत आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मोठ्या संख्येने मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देत आहेत. भारतातील धर्मनिरपेक्षतेचा नाजूक समतोल तेव्हाच राखता येईल, जेव्हा कायद्याचे राज्य टिकून राहील आणि प्रत्येक नागरिकाला समाज कोणताही असो, इतरांशी बरोबरीचे वाटेल. ते खरे ठरण्यासाठी धार्मिक पूर्वग्रह किंवा प्रेरणेचा डाग न बाळगता सावध न्यायव्यवस्था आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालय ही या बाबतीतली सर्वांत महत्त्वाची भारतीय संस्था असली, तरी तिचे काही वेळा परस्परविरोधी निर्णय आणि काही खालच्या न्यायव्यवस्थेच्या अधिका-यांनी स्वीकारलेली जातीय तेढ यामुळे धर्मनिरपेक्षतेचा ऱ्हास होण्यास हातभार लागला आहे. सर्वोच्च न्यायालय हे भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे शेवटचे विश्वासार्ह संरक्षक आहे आणि बाबरी मशीद, पुण्यातील मोहसीन शेख हत्या यासारख्या प्रकरणांच्या बाबतीत त्याची मनोवृत्ती अधिक बारकाईने तपासली जाईल.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.:८९७६५३३४०४


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget