पीतांबर लोहार
पिंपरी
पिंपरी
कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे बाजारपेठा, धार्मिक स्थळे बंद आहेत. अशा स्थितीत मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान शनिवारपासून (ता. 25) सुरू झाला. या कालावधीत इफ्तार व नमाज पठण घरात थांबूनच करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान. जकात (दान), नमाज (प्रार्थना) आणि रोजा (उपवास) यांसह ईदच्या चंद्र दर्शनाला विशेष महत्त्व. दररोज पहाटे "सहेरी' आणि सायंकाळी "इफ्तार' म्हणजे नामस्मरण आणि बंधुभाव जोपासण्याची वेळ. या महिन्यात अनेकांचे उपवास असल्याने फळे, सुकामेवा व किराणासह नवीन कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असते. यंदा कोरोनाच्या सावट असल्याने बाजारपेठांवर काही प्रमाणात निर्बंध आहेत. जमावबंदी, संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत मुस्लीम बांधवांचा नित्यनेम कसा असेल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न.
मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान. जकात (दान), नमाज (प्रार्थना) आणि रोजा (उपवास) यांसह ईदच्या चंद्र दर्शनाला विशेष महत्त्व. दररोज पहाटे "सहेरी' आणि सायंकाळी "इफ्तार' म्हणजे नामस्मरण आणि बंधुभाव जोपासण्याची वेळ. या महिन्यात अनेकांचे उपवास असल्याने फळे, सुकामेवा व किराणासह नवीन कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असते. यंदा कोरोनाच्या सावट असल्याने बाजारपेठांवर काही प्रमाणात निर्बंध आहेत. जमावबंदी, संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत मुस्लीम बांधवांचा नित्यनेम कसा असेल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न.
घरातच नमाज पठण
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आहे. घराबाहेर न पडणे हेच, सर्वांच्या हिताचे आहे. केंद्रातील असो की राज्यातील सरकारनं आपल्यासाठीच निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारचं ऐकावं. विनाकारण घराबाहेर जावू नये. उपवास असल्याने फळांची गरज असते. मात्र, सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत फळे, भाजीपाला, किराणा दुकाने खुली असतात. त्या वेळी गर्दी न करता फळे, सुकामेवा, किराणा माल खरेदी करावी. नमाज घरातच पडायची. त्यासाठी मशिदीत जाण्याची गरज नाही.
- प्रा. नौशाद शेख, संचालक, क्रिएटिव्ह अकॅडमी
मशिदी बंद
लॉकडाऊन असलं तरी सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत दुकाने उघडी असतात. या वेळेत जाऊन उपवासासाठी आवश्यक असलेली फळे, सुकामेवा व अन्य साहित्य घेऊन यावे. आणि उपवास सोडण्यासाठी फळांचीच आवश्यकता असते, असे नाही. पाणी पिऊनसुद्धा उपवास सोडता येतो. त्यासाठी घराबाहेर जाण्याची आवश्यकता नाही. सर्व मशिद बंद आहेत. त्यामुळे घरामध्येच सोशल डिस्टंसिंग ठेवून नमाज पडावी. कुराण पठण करावे. अगदी शेजाऱ्यांनासुद्धा त्यासाठी बोलवू नये. एकटा व्यक्ती सुद्धा नमाज पडू शकतो.
- जिकरूल्ला चौधरी, बांधकाम व्यावसायिक, पिंपरी
गरजूंना "जकात' द्या
रमजान महिन्यात दानधर्माला मोठे महत्त्व आहे. ईदच्या दिवशी अनेक जण दान करतात. त्याला "जकात' असे म्हणतात. एकूण उत्पन्नाच्या किमान अडीच टक्के "जकात' द्यायला हवी. कोणताही जात-धर्म न बघता प्रत्येक गरजूला "जकात' दिल्यास त्यांना मदत होईल. कारण, कोरोना हा कोणा जाती अथवा धर्मावरचे संकट नसून संबंध मानवावरचे संकट आहे. ते घालविण्यासाठी सोशल डिस्टसिंग वापरून गरजूंना मदत करायला हवी. सरकारने दिलेल्या वेळेत दुकाने उघडतात, त्या वेळी आवश्यक वस्तू खरेदी कराव्यात. गर्दी करू नये. घरातच नमाज पठण करायला हवे.
- इरफान सय्यद, अध्यक्ष, महाराष्ट्र मजदूर संघ
Post a Comment