Halloween Costume ideas 2015

उदारवाद्यांवरील भांडवलधार्जिण्यांच्या खोट्या आरोपांचे खंडण

blame
अक्षरनामा या संकेतस्थळावर कादियानी धर्मातील अहेमदिया पंथाचे बशारत अहमद यांच्या एका पुस्तकातील संपादित परिच्छेद ‘मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात’ जमातवाद’ फैलावला आहे. फक्त भारतीय उपखंडातच नव्हे, तर जगभर फैलावला आहे.’ या लांबलचक शिर्षकाने नुकताच वाचण्यात आला. त्यात त्यांनी स्वत: फार उदारवादी असल्याचा देखावा करत काही खर्‍याखुर्‍या उदारवादी धार्मिक चळवळींवर खोटे आरोप केले आहेत, त्याचेच हे खंडण -
सध्या कोरोना आणि तबलीगी जमाअतला घेऊन काही लोकांनी बराच अपप्रचार चालवलेला असतांना त्यात अनेक जन मागचा पुढचा सगळा सूड उगविण्यासाठी वाहत्या गंंगेत हात धुऊन घेत आहेत. तबलीगींसोबतच इतर उदारवादी मुस्लिम संघटनांनाही विनाकारण यात ओढले जात आहे. त्यासाठी ते ’जमात’ या शब्दाचा हेतुपुरस्पर गैरवापर करत आहेत. खरं म्हणजे ’जमात’ व ’जमाअत’ यात फरक आहे. (तबलीगी जमाअत किंवा जमाअत ए इस्लामी हिंद या ’जमाअत’ आहेत, जमात नव्हे.) ’जमात’ म्हणजे ’टोळी’ आणि ’जमाअत’ म्हणजे विशिष्ट सहेतूक चळवळ चालविणारी संघटना. परंतु काही पुरोगामी मंडळींना विश्‍वासात घेऊन त्यांचा बुद्धीभेद करण्याकरिता पुरोगाम्यांनीच प्रस्थापितांविरूद्ध तयार केलेला ’जमातवाद’ हा शब्द लेखकांनी या लेखात फार चालाखीने वापरलेला आहे. मात्र लेखक खुद्द ’जमात-ए-अहेमदिया’ चे प्रचारक असून त्यांनीच लेखाच्या शेवटी या टोळीचा उल्लेख केला आहे. खरं म्हणजे ते स्वत:च ’जमातवाद’ फैलावत असल्याचं स्पष्ट होतंय. अन् या तथाकथित जमातवादाच्या फैलावासाठी ते ब्रिटिशांना कारणीभूत ठरवितात. सुरूवातीला लेखक लिहितात की, ”जमातवादाचा उदय भारतात किंबहुना सर्व दक्षिण आशियायी देशांत पाश्‍चात्य देशांनी लादलेल्या वसाहतवादातून आणि धर्म व भाषेवर आधारित राष्ट्रवादाच्या कल्पित सिद्धांतांतून झालेला आहे. पण ज्या ब्रिटिश पाश्‍चात्यांना लेखक जमातवाद फैलावण्यासाठी जबाबदार धरत आहेत, त्याच ब्रिटिशधार्जिण्या व्यक्ती व विचारधारेला पुढे नेणार्‍या टोळीचे स्वत: या लेखाचे लेखकच प्रचारक आहेत. हा सगळा प्रकार समजून घेण्यासाठी लेखकांची ’कादियानी/अहेमदी’ विचारधारा नेमकी काय आहे, ते समजल्याशिवाय लेखाची पार्श्‍वभूमी लक्षात येणार नाही. कादियानी किंवा अहेमदींचा हा संक्षिप्त परिचय -
    भांडवलवादाला साम्राज्यवादाशी जोडून जगभरात एक धोरण म्हणून स्वीकारणार्‍या इंग्रजांनी आपलं इप्सित साध्य करण्यासाठी सुधारणावादी, पुरोगामी, आधुनिकतावादी आणि उदारवादाचा मुखवटा चढविलेला होता. ब्रिटिश राज्यकर्ते हे इथल्या मागासलेल्या समाजाला शिक्षणाचा अधिकार देऊन आपल्या देशातील जातीव्यवस्थेला खिंडार पाडतील असा आशावाद काही बहुजन समाजसुधारकांना सुरूवातीला वाटू लागला होता. परंतु फक्त आपले नौकर किंवा कारकून तयार करणार्‍या मेकालेच्या शिक्षण व्यवस्थेकडून फारसं काही साध्य झालं नाही. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत इंग्रजांनी जाती व्यवस्था समूळ नष्ट न केल्याची खंत शेवटी व्यक्त केलीच होती. रेल्वे, टेलीफोन वगैरे वरकरणी वाटणार्‍या विकासप्रवण योजना या फक्त ‘कंपनी’साठी एक ’इन्फ्रास्ट्रक्चर’च्या पलिकडे काहीही नव्हत्या, हेही कटू सत्त्यच!
    ब्रिटिशांनी इतकी वर्षे राज्य केले ते आपल्यातूनच तयार केलेल्या काही हस्तकांमार्फत. त्याशिवाय त्यांना ते करता येणे शक्य नव्हते. भारत देश सोडल्यानंतरही इथे मानसिकदृष्ट्या आपलेच व्हाइसरॉय जागोजागी बसवून ते गेले आहेत, जेणेकरून भविष्यातही इथे भांडवलधार्जिणेच धोरण राबविले जावेत म्हणून. हे हस्तक आजही समाजात वावरत आहेत, जे देशासाठी फार मोठा धोका आहे. म्हणून त्यांची ओळख पटवणे फार महत्त्वाचे आहे.
    हे हस्तक फक्त राजकीय क्षेत्रातच नव्हे तर जवळपास सर्वच क्षेत्रात लपलेले आहेत. विस्तारभयास्तव या लेखात फक्त धार्मिक क्षेत्रात आणि त्यातल्या त्यात फक्त मुस्लिम समाजात लपलेल्या अशा मुस्लिमेतर ब्रिटीश-समर्थकांचा उपापोह करण्यात आला आहे. मुस्लिम नाव धारण करून, मुस्लिमांसारखीच टोपी, दाढीचा वापर करून हे ब्रिटीशांचे पपेट आज फारच तुरळक प्रमाणात असले तरीही प्रशासन व इतर व्यवस्थेच्या तळाशी यांचा वावर हा दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही. थोडंसं दुर्लक्षही देशासाठी घातक ठरू शकते.
    या ब्रिटीश समर्थकांचं नाव आहे - अहेमदीया किंवा कादियानी ! देशाचे शत्रू असलेल्या इंग्रजांचा समर्थक विचारसरणीचा संस्थापक मिर्जा गुलाम अहमद कादियानी होता. त्याचा जन्म इ.स. 1839 किंवा 1840 मध्ये पंजाबच्या कादियान गावात झाला. याने सन 1901 मध्ये स्वत: इस्लामचा प्रेषित असून त्याच्याकडे अल्लाहकडून श्‍लोक अवतरीत होत असल्याचा दावा केला होता (संदर्भ: मिर्जा गुलाम अहमद कादियानीचे पत्र, हकीकतुल सुबूत, पान नं.270 ते 271, उद्धृत: कादियानीयतची वास्तविकता, लेखक: मुहम्मद अब्दुल रऊफ) आणि ’कादियानी’ म्हणून नवीन धर्माची स्थापना केली होती. मोगालांचा वंशज असलेल्या या मिर्झाचे निधन इ.स. 1908 मध्ये झाले आणि त्याला लाहोरमध्ये दफन करण्यात आले होते. त्याच्यानंतर त्याचे खलिफा (उत्तराधिकारी) म्हणून या धर्माची धुरा हातात घेतली ती आजतायगत पाकिस्तानात सुरू आहे. भारतात राहून इथल्या अहेमदी कादियानींची निष्ठा या तथाकथित खलिफा असलेल्या एका पाकिस्तानीशी असणे, ही देखील देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिने विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
     या धर्माचे लोकं आपण मुस्लिम असल्याचं सांगत असले तरीही कुरआन व हदिसनुसार हे मुस्लिम नाहीत. कारण एका खोट्या तोतया पैगंबराला मानणारे मुस्लिम असूच शकत नाही. आता मिर्जा हा तोतया पैगंबर कसा? तर याचे उत्तर तीन टप्प्यात देता येते -
1) मिर्जा गुलाम कादियानी हा ब्रिटिश सरकारचा समर्थक होता. 2) ब्रिटिश सरकार हे अत्याचारी होते. 3) अत्याचारिंचा समर्थक हा एक प्रेषित असूच शकत नाही.
आता उपरोक्त तीनही विधानांसाठी एकानंतर एक आपण संदर्भ तपासून पाहू -
1) मिर्जा गुलाम कादियानी हा खरंच ब्रिटिश सरकारचा समर्थक होता की नाही?
तर याचे उत्तर ’होय’ असे आहे. याचा पुरावा म्हणून 1857 च्या उठावात जे मुस्लिम स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिशांविरूद्ध जिहाद करत होते, त्या स्वातंत्र्ययुद्धाबद्दल म्हणजेच त्या जिहादबद्दल मिर्जा काय लिहितो बघा -I have been writing in favor of the British Government from the past seventeen years. During all these seventeen years, in all the books which I wrote and publishes, I have been advocating to the people to be loyal to the British Government and have tried to persuade them to be sympathetic and obedient to government officers. I have given convincing lectures against Jihad and, as a matter of policy, I wrote many books in Arabic and Persian and published them in Arabia, Egypt, Syria, Iraq, and Afghanistan abrogating Jihad and spent thousands of rupees in this propaganda.’ (Al-Barriah, Sept. 2, 1867, No. 3)भाषांतर -
    ”मी मागील सतरा वर्षांपासून ब्रिटिश सरकारच्या समर्थनार्थ लिहित आलो आहे. मी जीतकी काही पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली, त्यात मी लोकांना ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केले आहे आणि सरकारी अधिकार्‍यांच्या बाबतीत सहानुभुतीपूर्ण व आज्ञाधारक म्हणून राहण्याचा आग्रह धरला. मी (जो इंग्रजांविरूद्ध सुरू होता त्या) जिहाद विरूद्ध अनेक भाषणे केली आणि एक धोरण म्हणून, जिहाद संपविण्याकरिता मी अरबी, फारसीत अनेक पुस्तकं लिहिलीत आणि ती अरबस्थान, इजिप्त, सीरीया, इराक व अफगानीस्तान येथे प्रकाशित केली आणि या प्रचारकार्यात मी हजारो रूपये खर्च केले.”
- संदर्भ: अल-बरीराह, सप्टें.2, 1867, नं.3, उद्धृत संकेतस्थळ लिंक -http://www.irshad.org/exposed/ service.php2) ब्रिटिश अत्याचारी होते की नाही?
    याचे प्रतिउत्तर अहेमदीया लोकं असे देतात की, इंग्रजांनी जे काही अत्याचार केले ते मिर्जा मेल्यानंतर म्हणजे 1908 नंतर केले. परंतु ब्रिटिशांनी 1908 च्या पूर्वीही जगभरात अतिशय भयानक अत्याचार केल्याची नोंद इतिहासात नमूद केलेली आहे. उदाहरणार्थ 1899 ते 1902 दरम्यान आफ्रिकेतील बोअर्स कँपमध्ये महिला व चिमुकल्या मुलांसहीत 1 लाख 7 हजार लोकांना तुटपुंजे राशन पाणी देऊन इतक्या वाईट पद्धतीने अटक करून ठेवण्यात आले होते की, 27 हजार 927 लोकं मृत्युमुखी पडले होते. (संदर्भ:https://www.independent.co.uk/news/uk/home-news/worst-atrocities-british-empire-amritsar-boer-war-concentration-camp-mau-mau-a7612176.html?fbclid=IwAR1z_9axwIeAo-
4C_V43Ydv0FCuBH6onh-7_lI0d_cBMKj1E-PO5zArbVNU ))
अशा अनेक घटनांचा मिर्जाने कधी विरोध करून त्याविरूद्ध आंदोलन केल्याचा उल्लेख    इतिहासात कुठेही सापडत नाही. अशा देशद्रोह्याच्या अनुयायींची देशाबद्दल निष्ठा कशी राहील, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. हे एक फार मोठे आणि महत्त्वाचे कारण आहे की, भारतीय मुस्लिम समाजच नव्हे तर जगभराचा विवेकी समाज या लोकांचा विरोध करतो. अशी व्यक्ती प्रेषितच काय तर तो मुसलमानही नसतो, नव्हे एक सच्चा माणुसदेखील असु शकत नाही.
3) मिर्ज़ा प्रेषित होता का?
    भारतात प्रत्येकाला धर्म स्थापण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा घटनादत्त अधिकार असला तरीही कलम 420 अंतर्गत कुणाची फसवणूक करण्याचा अधिकार नाहीये. कुणी ओबीसी नसून जर ओबीसी असण्याचा दावा करत असले किंवा अल्पसंख्यक नसून अल्पसंख्यांक असल्याचा दावा करून त्यांना मिळणार्‍या सवलती लाटण्याचा प्रयत करत असेल तर तो फार मोठा गुन्हा ठरतो. प्रेषित मुहम्मद सलअम् यांच्यानंतर कुणीही प्रेषित येणार नसल्याचं स्पष्ट कुरआनात म्हटलं आहे -
”(लोकहो!) मुहम्मद (सलअम् ) तुमच्या पुरूषांपैकी कोणाचे पिता नाहीत, परंतु ते अल्लाहचे रसूल (संदेष्टा) आणि अंतिम प्रेषित आहेत, आणि अल्लाह प्रत्येक वस्तूचे ज्ञान राखणारा आहे.”     - कुरआन (33:40)
    प्रेषित मुहम्मद सलअम् यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ’ला नबी य अबदी’ म्हणजे माझ्यानंतर कुणीही प्रेषित नाही. याचे अनेक संदर्भ हदिस (प्रेषित वचन) ग्रंथात मिळतात. म्हणून कादियानी किंवा अहेमदीया हा मुस्लिमांचा एक सांप्रदाय नसून तो स्वतंत्र असा धर्म आहे. पाकिस्तानात त्यांनी स्वत:ला अल्पसंख्यक म्हणजेच तेथील बहुसंख्यक मुस्लिमांपेक्षा वेगळा धर्म असल्याचे मान्य केलेले आहे. तिथे त्यांना अल्पसंख्यकांच्या सर्व सुविधा बहाल करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे त्यांनी स्वत:ची वास्तविकता उघड करून राहण्यात काहीही वावगं नाही. परंतु तोतयागीरी करणे हे फक्त मुस्लिम समाजासाठीच नव्हे तर देशासाठीही घातक ठरू शकते. म्हणून आमचा विरोध फक्त तोतयागीरीला आहे. बाकी कुणी काय मानावं, काय मानू नये, कोणता धर्म स्थापन करावा, कोणता सांप्रदाय स्थापन करावा याचे स्वातंत्र्य भारतीय संविधान देतो, आम्ही त्या संवैधानिक स्वातंत्र्याचा आदर करतो. आपल्या देशाचं वैशिष्ट्य असं की, इथल्या मुस्लिम समाजातील जवळपास सर्वच सांप्रदायात अनेक मतभेद असले तरीही मात्र कमालीचं सहिष्णुता आणि काही बाबतीत बर्‍याच प्रमाणात एकवाक्यता आढळते. सर्व मुस्लिम सांप्रदायांचं प्रतिनिधीत्व असलेली शिखर संघटना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हे त्याचं जीवंत उदाहरण आहे, ज्याचे अध्यक्ष हे सुनी तर उपाध्यक्ष शिया आहेत. इतकी एकता असूनही अहेमदीया कादीयानी हे मुस्लिम नाहीत, यावर देशातल्याच नव्हे तर जगभरातल्या मुस्लिमांची एकवाक्यता आहे. म्हणून सांप्रदायिक सहिष्णुतेच्या नावाखाली काही लोकं या ब्रिटीशसमर्थकांना जवळ करण्याचा जो केविलवाणा प्रयत करतात, तो किती फसवा आहे, ते स्पष्ट होते.
    प्रेषित मुहम्मद सल्लम यांची शिकवण ही फक्त धर्म किंवा मज़हब (पुजाविधी) नसून तो धम्म (परिपूर्ण जीवन संहिता, जीवन व्यवस्था) आहे. त्यात फक्त अध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, नैतिक, सामरिक तसेच राजकीय क्षेत्राविषयीही पुरेपूर मार्गदर्शन केलेले आहे. फक्त मार्गदर्शनच नव्हे तर त्या शिकवणीद्वारे प्रबोधन कार्य करून इमान, समता, न्याय व बंधुत्त्वावर आधारित जगभरात एक आदर्श व्यवस्था शांतीच्या मार्गाने कायम करण्याचे आदेशही मानवी कल्याणाच्या दृष्टीने दिलेले आहे. सामाजिक परिवर्तनातून व्यवस्था परिवर्तन घडवून आणणे हाच उद्देश लक्षात घेऊन जगभरात अनेक क्रांतिकारी चळवळी उभ्या राहिल्या, त्यातीलच एक जमाअत ए इस्लामी हिंद ही चळवळ आहे. परंतु या उदात्त हेतूला या चळवळीचे संस्थापक संत अबुल आला मौदुदींची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा संबोधून लेखक अतिशय खोटारडा आरोप करतात. संत मौदुदी हे देशाच्या फाळणीविरूद्ध असल्याचं स्वत:च लेखक सांगतात अन् पुन्हा त्यांच्यावर पाकिस्तानात ’पळून गेले’ या भाषेत मखलाशी जोडतात. मुळात संत मौदूदी हे हैद्राबाद दक्खन येथे राहत होते आणि कवी इक्बाल यांच्या विशेष विनंतीवरून पठाणकोट येथे 1938 साली एका इस्लामी विद्यापीठाच्या डीन पदी विराजमान होण्यासाठी सहकुटूंब गेले होते. फाळणीच्या वातावरणात देशभरात दंगली उसळल्या असतांना पठाणकोट येथेही दंगलीचे लोन उसळले होते. विद्यापीठ परिसराला दंगेखोरांनी घेरले होेते. त्यावेळी त्या ठिकाणी राहत असलेले संत मौदुदी व त्यांचे सहकारी तेथून कसेबसे कुटुंबासहीत बाजुच्या सुरक्षित गावात निघून गेले होते. आणि ते गाव फाळणीनंतर पाकिस्तानच्या हद्दीत गेले. या परिस्थितीमुळे त्यांना तिथेच रहावं लागलं. परंतु त्यांचं मन हे नेहमीच अखंड भारतासाठीच नव्हे तर अखंड जगतासाठी तळमळत होते. त्यांच्या समस्त मानवी व्यवस्थेला, लेखक पॅन इस्लाम वगैरे पाश्‍चात्त्य शब्द वापरून जमाअतची तुलना फॅसिस्ट संघटनांशी करतात. वास्तविकपणे एकजातीय, एक वंशीय देशाची भाषा करणार्‍या कोणत्याही संघाची तुलना अखिल मानवी समाजाच्या ऐक्यासाठी झटणार्‍या जमाअतशी होऊच शकत नाही.
    यामागचे कारण इतिहासात दडलेले आहे. प्रेषितांच्या पूर्णत्वालाच आव्हान देणार्‍या आणि भांडवलदार ब्रिटीशधार्जिण्या असलेल्या कादियानी उपद्रवाचा खरा चेहरा चव्हाट्यावर आणण्याकरिता तसेच समाज व देशाला त्यांच्या गुप्त कारवायांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मूळचे आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबदमधील मराठी माणुस असलेले संत अबुल आला मौदुदींनी ’खत्म ए नबुवत (प्रेषित्त्वाची समाप्ती)’ हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचा प्रतिवाद आतापर्यंत हे लोकं करू शकलेले नसल्याने संत मौदुदींचं फक्त नाव काढलं तर हे लोकं चिडत असतात. त्याच पुस्तकामुळे या उपद्रवाला भारतीय उपमहाद्विपमध्ये तग धरता आलेला नाहीये. या लोकांच्या उपद्रवी कारवायांमुळे त्या काळात पाकिस्तानात दंगली उसळल्या आणि मोठा रक्तपात झाला होता. पण हे त्या पुस्तकामुळंच घडल्याचा आरोप करून दंगलींचं खापर विनाकारण संत मोदुदींवर फोडण्यात आले. यासाठी तत्ताकालीन कादियानीधार्जिण्या पाकिस्तानी सरकारनं संत मौदुदींना फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु या महान क्रांतिकारकाची जगभरातल्या विविकी देशांनी दखल घेऊन बेईमान पाकिस्तान सरकारवर दबाव आणला आणि फाशिची शिक्षा रद्दबातल ठरवली गेली. ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली होती, मात्र ती पूर्ण होण्याअगोदरच संत मौदुदींची निर्दोष सुटका करण्यात आली.
    संत मौदुदींचे विचार अन् त्यांनी नंतर घेतलेल्या काही निर्णयांचा विरोधाभास लेखकांनी दाखविण्याचा प्रयत्न सदर लेखात केला आहे. परंतु तो विरोधाभास नसून परिस्थितीनुरूप घेतलेले योग्य निर्णय होते. ते निर्णय समजून घेण्यासाठी लोकशाही (डेमोक्रसी) आणि नेतानिवड (इलेक्ट्रोसी) यातला फरक समजून घेण्याची गरज आहे. स्वैर मानवी इच्छा आकांक्षाना सार्वभौमत्त्व बहाल करून फक्त बहुमताच्या नावाखाली निसर्गकर्तानिर्मित नीतीमुल्यांवर प्राथमिकता देणार्‍या लोकाशाहीला संत मौदुदींनी विरोधच केला आहे, परंतु स्वत:च्या मनाने आपला नेता निवडण्याची पद्धत ही तर प्रेषित मुहम्मद सल्लम यांचे उत्तराधिकारी असलेल्या आदर्श खलिफांपासून चालत आलेली आहे. म्हणूनच अत्याचारी अयुब खानाला सत्ताच्यूत करण्यासाठी संत मौदुदींनी त्याच्याविरूद्ध असलेल्या सक्षम पक्षाला पाठिंबा दिला होता. आजही जमाअत फॅसिस्टांना पराभूत करणार्‍या दुसर्‍या सक्षम पक्षाला नेहमी पाठिंबा देत असते.
    अशा क्रांतिकारक संत मौदुदींनी समाज प्रबोधनासाठी जवळपास 200 पुस्तकं लिहिली असून त्यापैकी अनेक पुस्तकं मराठीतही उपलब्ध आहेत. त्यांनी स्थापन केलेली जमाअत ए इस्लामी फाळणीनंतर भारतात जमाअत-ए-इस्लामी हिंद म्हणून 1948 मध्ये पुनरस्थापित झाली. माणसाला माणुस जोडण्याकरिता इस्लामविषयीच्या गैरसमजुती दूर करून मुस्लिम व मुस्लिमेतरांचं ऐक्य घडवून आणणे, मुस्लिम समाजातील अनिष्ट चालीरिती दूर करण्यासाठी त्यांचं प्रबोधन करण्याच्या उद्देशाने लोकशिक्षणाची चळवळ राबवणे, समाज सेवा करणे आणि लोकांना व्यवस्था परिवर्तनासाठी संघटित करणे असा जमाअतचा चार कलमी कार्यक्रम आहे. त्यासाठी वैयक्तिक भेटीगाठी, छोटे छोटे साप्ताहिक कुरआन प्रवचन, कॉर्नर मिटींग्स, चर्चासत्रे, कधी कधी मोठमोठी अधिवेषणे, जाहिर सभा, साहित्याचं मोठ्या प्रमाणावर वितरण, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये लेखण व निर्मिती (प्रॉडक्शन) तसेच महिलांमध्ये जनजागृती, विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करण्यासाठी ईद मिलन, इफ्तार पार्टी व प्रेषित परिचय सम्मेलनं, मस्जिद परिचय संमेलने इत्यादी माध्यमातून जमाअत कार्य करत असते. महाराष्ट्रात इस्लाम व मुस्लिमांविषयी तीनशेपेक्षा जास्त विषयांवर आधारित जमाअतने आय.एम.पी.टी. प्रकाशनातर्फे मराठी भाषेत प्रकाशित केली आहेत.
    तबलीग़ी जमाअतशी काही मुद्यांवर स्वत: आमचेही मतभेद आहेत. परंतु त्यांच्या समाज प्रबोधनामुळे समाजात फूट पडली व देशाच्या मिश्र संस्कृतीला तडा गेल्याचा जो आरोप लेखक करतात, तो धादांत खोटा आणि वस्तुस्थितीला धरून नाही. हाच आरोप दस्तूरखुद्द प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यावरही मक्केतले पुरोहितवादी लावत होते, कारण प्रेषित त्यांच्या पुरोहितगीरी, वर्णवाद आणि अंधश्रद्धेविरूद्ध लोकांचं प्रबोधन करायचे. ऐक्य हे चागंल्या गोष्टींसाठी चांगल्या लोकांत हवं, चोरी करण्यासाठी चोर व पोलीसांच ऐक्य हे समाजासाठी घातक असतं. तसंच चांगल्या गोष्टींचा प्रचार झाल्यावर वाईट लोकांशी वैर विकत घेणे हे ओघानं येतंच. तेंव्हा तुम्ही वाईट लोकांशी असलेलं सख्य मोडताय, असा त्याचा अर्थ होत नाही. वाईट लोकांना खरंच समाजात ऐक्य हवं असेल तर त्यांनीही अंधश्रद्धा वगैरे वाईट चाली, रीती सोडायला हव्या. परंतु प्रबोधन करत असतांनाही तबलीगी लोकांनी तुमचे कौटंबिक किंवा सामाजिक नातं तोडून टाका, अशी शिकवण कधीही दिलेली नाहीये. त्यामुळे मतभेद व पूर्ववैमनस्यातून सकारात्मक व विधायक कार्य करणार्‍या चळवळींवरही विनाकारण चिखलफेक कुणीही करायला नको. सर्व जाती, धर्म व सांप्रदायांनी प्रेम व सहिष्णुतेने एकत्रित राहावे, याही मताचे आम्ही आहोत. पण आधीच देशाची परिस्थिती अतिशय नाजुक असतांना, कोरोनासहीत अफवांचाही विषाणू पसरलेला असतांना बुद्धीभेद करणारे असे लेख लिहून दोन समाजात तेढ निर्माण करून समाजाचं वातावरण गढूळ करणार्‍या लेखकांवर सरकारनेच कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. यापुढेही अशाप्रकारचे लेखन वाचल्यानंतर वाचकांनी कृपया दुसरी बाजुही नीट तपासून पाहत जावी, ही विनंती.

- नौशाद उस्मान
9029429489

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget