मोदी लाट गुजरातपुरतीच : दिल्लीत आप, हिमाचलमध्ये काँग्रेस
राहुल गांधी विषयी वारंवार सांगितले जाते की, त्यांना निवडणुकीत काहीच रस घेतला नाही तेव्हा भारत जोडो यात्रेचे खरे लक्ष्य काय आहे? लोकांनी स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करावा. राहुल गांधींनी भारत जोडण्याचा संकल्प बांधलेला आहे. काँग्रेस जोडोचा नाही.
असे सर्रासपणे बोलले जाते की, एमआयएम आणि आप हे पक्ष भाजपाची बी टीम आहेत. पण कोणताही नवा पक्ष उदयास येतो तेव्हा त्याच्याकडे कोणत्या न कोणत्या पक्षाचे लोक आकर्षित होणारच आणि त्या पक्षाला मते देणारच. तेव्हा किती नव्या पक्षांना लोक बी.सी.डी. टीम म्हणणार?
गुजरातमधील निवडणुुकीत भाजपा जिंकणार यात कुणाला शंका नव्हती, असण्याचे कारण नव्हते. तरी देखील बऱ्याच विश्लेषकांची इच्छा होती की भाजपानं गुजरातमधील निवडणूक जिंकू नये. ज्या राज्याने देशाला पंतप्रधान आणि गृहमंत्री दिले आहेत त्यानांच त्यांच्या गृहराज्यात निवडणुकीत भाजपाला पराभूत करावा हा विचारच चुकीचा होता. पण इच्छा असते आणि सत्यता असते. तसेच भाजपाला याची थोडी देखील शंका नव्हती की हिमाचल प्रदेश त्यांच्या हातून जाईल. पण हिमाचलमध्ये भाजपाच्या इच्छेप्रमाणे घडले नाही. भाजपाला गुजरातमधील निवडणूक जिंकण्याचा जितका आनंद झाला तेवढेच दुःख हिमाचलप्रदेशच्या पराभवाचे त्यांना झाले असेल. अशातच दिल्लीतील मनपा निवडणुकीतही भाजपाने सपाटून मार खाल्ला. त्यामुळे दोन गमावलं; एक जिंकलं, अशी स्थिती भाजपाची झाली. येणाऱ्या काळात मात्र अशीच परिस्थिती राहीली तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या हातून सत्ता निसटलेली दिसली तर आश्चर्य नको.
गुजरातमध्ये आम आदमी पार्टी (आप) मुळे भाजपाला अधिक मते मिळाली आणि म्हणून त्याला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्याच बरोबर ओवेसी यांच्या एमआयएममुळे सुद्धा भाजपाची मदत झाली. असे सर्रासपणे बोलले जाते की, हे दोन्ही पक्ष भाजपाची बी टीम आहेत. पण कोणताही नवा पक्ष उदयास येतो तेव्हा त्याच्याकडे कोणत्या न कोणत्या पक्षाचे लोक आकर्षित होणारच आणि त्या पक्षाला मते देणारच. तेव्हा किती नव्या पक्षांना लोक बी.सी.डी. टीम म्हणणार? प्रत्येकाला पक्ष स्थापन करण्याचा आणि निवडणुका लढण्याचा अधिकार आहे. खरे तर जुन्या पक्ष, संघटनांनी नव्या राजकीय पक्षांना बदनाम करण्याचे कारण नाही. काँग्रेस पक्षाला तर असा अधिकारच नाही.
भाजपा सत्तेत आल्यापासून एकही निवडणूक अशी नाही जी काँग्रेसनं गांभीर्याने लढविली असेल. स्वतःच निवडणूक रिंगणापासून दूर जात असताना त्यांना नव्या पक्षांवर आक्षेप घेण्याचे काय कारण. हिमाचल प्रदेश असो की इतर ठिकाणी काँग्रेसचे मतदार आजही टिकून आहेत. लोकांना असे वाटते की काँग्रेसने पुन्हा सत्तेत यावं पण स्वतः काँग्रेसला सत्तेत येण्याची इच्छा आहे की, नाही हा प्रश्न आहे. काँग्रेसकडे संगठण नावाची व्यवस्था नाही. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत आहेत त्यांना सध्याच्या निवडणुकांमध्ये काहीच रस नव्हता. यात्रा सोडून एक दिवसासाठी गुजरातला गेले खरे पण पुन्हा तिकडे फिरकले नाहीत म्हणजे सध्या त्यांना निवडणुकांमध्ये भाग घ्यायचा नाही.
यात्रेनंतर कोणता निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा येत्या लोकसभा निवडणुकीत काय परिणाम होईल हे काँग्रेस कार्यकर्त्यांनाच माहित नाही. लोकांची अशीही एक धारणा होती की भाजपा अजिंक्य पक्ष आहे. पंतप्रधानांचा करिश्मा आणि संगठण याला तोड नाही. पण सध्या झालेल्या हिमाचल दिल्ली महानगरपालिका आणि सात ठिकाणी झालेल्या बाय इले्नशन मध्ये हे तथ्य समोर आले की भाजपाला पराभूत करता येते. लोकांना बदल हवा आहे आणि यासाठी जर कोणत्याही राजकीय पक्षाने एक पर्याय लोकांसमोर ठेवला तर त्या पक्षाला निवडून आणतील. हिमाचलमध्ये भाजपाचे संगठण, रास्व संघाचे कार्यकर्ते आणि पंतप्रधानांचा करिश्मा भाजपाला काही कामी आला नाही. तिथल्या लोकांना बदल हवा होता ते त्यांनी करून दाखविला. प्रियंका गांधीमुळे काँग्रेस पक्ष जिंकला हे ही चुकीचे आहे. हिमाचल निवडणुकीत त्यांनी फक्त पाच सभा घेतल्या होत्या. यापेक्षा जास्त मेहनत त्यांना उत्तर प्रदेश निवडणुकीत केली होती. तिथे त्यांना यश मिळाले नव्हते. वस्तुस्थिती अशी की प्रथमतः हिमाचल प्रदेशच्या लोकांना बदल करायचा होता. तशी तीथली परंपरासुद्धा आहे. आलटून पालटून ते भाजपा आणि काँग्रेस पक्षाला सत्तेत आणत असतात. दुसरी एक गोष्ट अशी म्हटली जाते हिमाचलच्या संदर्भात की तिथे कमीत कमी तीन नेते मुख्यमंत्री पदाचे इच्छुक होते आणि त्या तिघांनी आपापलं समर्थन वाढण्यासाठी जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न केला. याचा फायदा काँग्रेस पक्षाला झाला त्याला बहुमत मिळाले. ज्याची त्यांना आशा नव्हती. भाजपामध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली. पंतप्रधानांनी देखील ती थांबवण्याचे प्रयत्न केले पण पक्षाला सावरू शकले नाही.
राहुल गांधी विषयी वारंवार सांगितले जाते की, त्यांना निवडणुकीत काहीच रस घेतला नाही तेव्हा भारत जोडो यात्रेचे खरे लक्ष्य काय आहे? लोकांनी स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करावा. राहुल गांधींनी भारत जोडण्याचा संकल्प बांधलेला आहे. काँग्रेस जोडोचा नाही.
राहुल गांधी समोर एक नवा भारत नव्या तरूण पिढीचे नेतृत्व साकार करायचे आहे. काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांचा आदेशांवर ते चालायला तयार नाहीत. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना सत्ता हवी आहे ते अविरत 50-50 वर्षे सत्तेत राहिले आहेत. त्यांना स्वतः काही करायचे नाही जे काही करायचे आहे त्यांच्या आशा आकांक्षाच्या पूर्ततेला ते गांधी परिवाराने करावे त्यांना फक्त सत्ता हवी आहे. सत्तेसाठी परिश्रम करायला ते तयार नाहीत. ही गोष्ट राहुल गांधी यांच्या लक्षात आल्याने ते एका नवीन तरूण पिढीला सोबत घेऊन भारत भ्रमण करायला निघाले. जेणेकरून जनतेची वास्तविक परिस्थिती त्यांचे प्रश्न त्यांच्या अडी अडचणीशी त्यांना थेट संवाद साधता यावा. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत देखील राहुल गांधी आणि त्यांचे तरूण सहकारी सक्रीय भाग घेणार की घेणार नाहीत याची सुद्धा खात्री नाही. त्याचे लक्ष्य 2029 निवडणुकीचे असणार की काय हे ही सांगता येणार नाही. राहूल गांधी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमीका घेणार की महात्मा गांधींची, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सद्यपरिस्थितीत आणि त्यांची वेशभूषा आणि राजकीय मिजास पाहता ते बहुतेक महात्मा गांधींची भूमिका घेणार असे वाटते. सध्या ते राजकीय तपस्या ते करत असल्याचे स्पष्ट दिसून येते.
गुजरातमधील निवडणुका तसे भाजपा जिंकरणारच होती. परंतु, त्यांना शंभर टक्के खात्री नव्हती की काय हा ही एक प्रश्न आहे. गुजरातमधील राजकारण हा केवळ हिंदू-मुस्लिम द्वेषाशी फारकत घेऊ शकत नाही म्हणून शेवटी गृहमंत्र्यांनी 2002 च्या दंगलींची आठवण करूनच दिली. याचा अर्थ गुजरातच्या जनतेच्या मानसिकतेवर सांप्रदायिक द्वेष बिंबवल्या शिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत की काय असा सवाल उपस्थित होतो. रोजगार, रस्ते, वीज, पाणी, गरीबी ह्या समस्या त्यांच्यासाठी निरर्थकच असणार काय? हा ही एक प्रश्न आहे.
- सय्यद इफ्तेखार अहमद
9820121207
Post a Comment