Halloween Costume ideas 2015

अर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(५) आता जर तुम्हाला आश्चर्य करावयाचे असेल तर आश्चर्य करण्यास योग्य लोकांचे हे कथन आहे, ‘‘जेव्हा आम्ही मरून माती होऊ तेव्हा काय आम्ही नव्याने निर्माण केले जाऊ?’’ हे ते लोक आहेत ज्यांनी आपल्या पालनकत्र्याशी द्रोह केला आहे.१२ हे ते लोक आहेत ज्यांच्या मानेत जोखड अडकलेले आहेत.१३ हे नरकवासी (जहन्नमी) आहेत आणि जहन्नममध्ये (नरकामध्ये) सदैव राहतील. 

(६) हे लोक भल्यापूर्वी वाईटाकरिता घाई करीत आहेत१४ वस्तुत: यांच्यापूर्वी (ज्या लोकांचे असे वर्तन राहिले आहे त्यांच्यावर अल्लाहच्या प्रकोपाची) धडा शिकविणारी उदाहरणे घडलेली आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की तुझा पालनकर्ता लोकांचा अत्याचार असतानादेखील त्यांच्या बाबतीत डोळेझांक करतो, आणि हेही सत्य आहे की तुझा पालनकर्ता कठोर शिक्षाही देणारा आहे.

(७) हे लोक ज्यांनी तुमचे म्हणणे ऐकण्यास इन्कार केला आहे, म्हणतात, ‘‘या व्यक्तीवर याच्या पालनकत्र्याकडून एखादी निशाणी का अवतरली नाही?’’१५ तुम्ही तर केवळ सावध करणारे आहात, आणि प्रत्येक जनसमूहासाठी एक मार्गदर्शक आहे.१६


१२) म्हणजे त्यांचे परलोकाला नाकारणे खरे तर अल्लाह आणि त्याची शक्ती व तत्त्वदर्शितेला नाकारणे आहे. ते केवळ इतकेच सांगत नाही की आम्ही मातीत मिसळल्यानंतर पुन्हा जन्माला येणे असंभव आहे परंतु त्यांच्या याच कथनात हा विचार आढळतो की (अल्लाहचा आश्रय) तो खुदा असे करण्यास विवश आहे ज्याने त्यांना निर्माण केले आहे.

१३) मानेवर जोखड असणे म्हणजे कैदी होण्याची निशाणी आहे. या लोकांच्या मानेवर जोखड असण्याचा अर्थ असा आहे की हे लोक आपल्या अज्ञानतेचे, आपल्या दुराग्रहाचे, आपल्या मनोकामनांचे आणि आपल्या पूर्वजांच्या अंधानुकरणाचे कैदी बनलेले आहेत. हे स्वतंत्रतापूर्वक विचार करू शकत नाहीत. यांना यांच्या मतभेदांनी इतके जखडून ठेवले आहे की हे परलोक जीवन मानत नाहीत. परलोक जीवन मान्य करणे तर बुद्धीसंगत आणि उचित आहे तरी ते परलोक नाकारण्यावर ठाम आहेत जे सर्वथा अनुचित आहे.

१४) मक्का येथील इस्लाम विरोधक पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणत असत, `तुम्ही खरे पैगंबर असाल तर आणि तुम्ही पाहाता की आम्ही तुम्हाला खोटे लेखत आहोत तर तो कोप आमच्यावर का कोसळत नाही ज्याची धमकी तुम्ही आम्हाला देता? तो प्रकोप होण्यास विनाकारण विलंब का होत आहे? लोक (विरोधक) कधी आव्हान देतात, `हे आमच्या पालनकर्त्या! तू आमचा हिशेब आताच करून टाक. कयामतपर्यंत लांबवू नकोस.' (सूरह साद, आयत १६) आणि कधी सांगत, ``हे अल्लाह, या गोष्टी ज्या पैगंबर मुहम्मद (स.) सांगत आहेत, ते सर्व तुझ्याकडून असतील आणि सत्य असतील तर आमच्यावर आकाशातून दगडांचा वर्षाव कर किंवा भयंकर वेदनादायी प्रकोप पाठव.''  (सूरह   अल्अन्फाल,

आयत ३२) या आयतमध्ये विरोधकांच्या याच गोष्टींचे  उत्तर  दिले  आहे  की  हे  नादान  लोक  भलाईपूर्वीच  वाईटाची  मागणी  करीत आहेत. अल्लाहकडून  यांना  सरळमार्गांवर येण्याची जी संधी दिली जात आहे त्याचा लाभ उठविण्याऐवजी ते मागणी करतात की या संधीला त्वरित समाप्त् करून त्यांच्या विद्रोहाबद्दल त्यांची पकड त्वरित व्हावी. 

१५) निशाणीने त्यांना अभिप्रेत अशी निशाणी होती जिला पाहून त्यांचा दृढ विश्वास व्हावा की  मुहम्मद (स.) अल्लाहचे पैगंबर आहेत. ते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीला तिच्या सत्यतेच्या प्रमाणांशी समजून घेण्यास तयार नव्हते. ते लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र आचरणापासून बोध घेण्यास तयार नव्हते. तसेच सहाबा (रजि.) यांच्या जीवनात जी महान नैतिक क्रांती पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीच्या प्रभावाने घडली होती, त्यापासूनसुद्धा ते बोध घेत नव्हते. विरोधक त्या तर्कसंगत प्रमाणांवरसुद्धा विचार करण्यास तयार नव्हते ज्याकडे त्यांच्या अनेकेश्वरवादी धर्माच्या आणि अज्ञानतापूर्ण अंधविश्वासाच्या चुका दाखविण्यासाठी कुरआन संकेत करत आहे. त्यांना वाटत होते की याऐवजी त्यांना एखादा चमत्कार दाखविला जावा ज्याच्या कसोटीवर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वाला पारखले जावे.

१६) हे त्यांच्या मागणीचे संक्षिप्त् उत्तर आहे. हे उत्तर सरळसरळ त्यांना देण्याऐवजी अल्लाहने आपल्या पैगंबर मुहम्मद (स.) यांना संबोधन करून दिले आहे. म्हणजे हे पैगंबर मुहम्मद (स.)!  तुम्ही या चिंतेत पडू नका की यांना संतुष्ट करण्यासाठी शेवटी कोणता चमत्कार दाखवावा. तुमचे काम प्रत्येकाला संतुष्ट करणे नाही. तुमचे काम तर केवळ गफलतीत पडलेल्या लोकांना सावध करणे आहे आणि त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबिल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामापासून त्यांना सावधान करणे आहे. ही सेवा आम्ही प्रत्येक काळात प्रत्येक लोकसमुदायात एकेक मार्गदर्शकाची नियुक्ती करून घेतली आहे, आता हीच सेवा तुमच्याकडून घेत आहोत. ज्याला वाटेल त्याने आपले डोळे उघडे ठेवावे आणि ज्याला वाटेल त्याने गफलतीत राहावे. हे संक्षिप्त् उत्तर देऊन अल्लाह त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतो. त्या विरोधकांना अल्लाह सचेत करतो की तुम्ही एखाद्या अंधेरनगरीमध्ये राहात नाही, तुमचा संबंध अशा ईश्वराशी आहे जो तुमच्यापैकी एकएक माणसाला त्यावेळेपासून ओळखतो जेव्हा तुम्ही आईच्या पोटात होता. तो तर तुमच्या प्रत्येक कृत्यावर लक्ष ठेवून आहे. त्याच्याजवळ तुमच्या भाग्याचा न्यायाधिष्ठित निर्णय तुमच्या गुणांनुसार होतो. जमीन व आकाशांत अशी दुसरी शक्ती नाही की अल्लाहच्या निर्णयावर प्रभाव टाकेल.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget