Halloween Costume ideas 2015

भारतीय राजकारण आणि गाय

गोरक्षेच्या नावावर जी काही गुंडगिरी चालू आहे, त्याचा एक परिणाम असा आहे की, देशात असे कित्येक समूह सक्रीय झाले आहेत की जे जनावरांच्या व्यापाऱ्यांना आणि त्यांचे  परिवहन करणाऱ्यांकडून खंडणी वसूल करत आहेत. खोजी पत्रकार निरंजन टकले यांनी रफिक कुरेशी नाम जनावरांच्या व्यापाऱ्याचा वेश धारण करून कित्येक लोकांशी संपर्क केला.  तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, गायींच्या एका ट्रकसाठी 15 हजार रूपये तर म्हशींच्या ट्रकसाठी 6 हजार 500 रूपये हे गुंड वसूल करत होते. टकले यांचे म्हणणे आहे की, ही खंडणी  कातडीच्या व्यापाऱ्याशी जुळालेली आहे. कारण जनावरांच्या वधानंतर त्याच्या कातडीवर मद्यस्थ करणाऱ्याचा अधिकार असतो.

भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या समविचारी पक्षांना हिंदू राष्ट्राच्या स्थापनेमध्ये गायीला अनन्य साधारण महत्व आहे. मॉबलिंचिंग याचा एकमात्र परिणाम नाही. लिंचिंगचे बळी  बहुतकरून मुस्लिम आणि दलित आहेत. जसे की चित्रपट उद्योग आणि अन्य क्षेत्रातील 49 दिग्गज लोकांच्या पत्राने स्पष्ट झालेले आहे. परंतु, गोमातेची ही कथा येथेच संपत नाही.  हिचे अनेक दूसरे पैलूसुद्धा आहेत.
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचे मंत्री श्रीकांत शर्मा यांनी घोषणा केली आहे की, मोकाट गायींच्या देखभाल करणाऱ्या लोकांना सरकार एका गायीसाठी 30 रूपये प्रती दिवस देणार आहे.  या योजनेसाठी सरकाने आपल्या अर्थसंकल्पात 110 कोटी रूपये राखून ठेवले आहेत. योगी सरकारला हे पाउल यासाठी उचलावे लागले की, मोकाट गायींच्या संख्येमध्ये जबरदस्त वाढ  झाली आहे आणि त्या शेतामध्ये घुसून पिकांची प्रचंड हानी करत आहेत. अगोदरच संकटग्रस्त कृषी व्यवस्थेसाठी हे एक नवीन संकट उभे राहिले आहे. या मोकाट गायी सडक आणि  महामार्गावर इकडून तिकडे फिरत असतात. ज्या कारणास्तव सडक दुर्घटनेमध्ये वाढ होत आहे. मागील निवडणुकीच्या घोषणापत्रामध्ये नमूद एका मुद्यावर आपण बहुतेक लक्ष दिलेले  नाही. त्या घोषणापत्रात भाजपने म्हटले होते की, राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना करेल. ज्याच्यासाठी 500 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद केली जाईल. हा आयोग विद्यापीठांमध्ये  कामधेनू पीठांची स्थापना करेल आणि गायीच्या गुणांबाबत लोकांमध्ये जनजागृती करेल. त्यासाठी आवश्यक ते अभियान चालवेल. आयोग गोशाळांच्या आसपास रहिवाशी कॉम्प्लेक्स  विकसित करेल आणि गोउत्पादनाच्या विक्रीसाठी दुकाने उघडली जातील आणि ही सर्व ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती देण्यासाठी आणि गायींच्या वैज्ञानिक पद्धतीने उपयोग करून  घेण्यासाठी केले जाईल. या मुद्याचे खरे तर स्वागत केले पाहिजे. परंतु, गायीलाच हा सन्मान का? स्पष्ट आहे गायीला निवडण्यामागे एक राजकारण आहे.
गोरक्षेच्या नावावर जी काही गुंडगिरी चालू आहे, त्याचा एक परिणाम असा आहे की, देशात असे कित्येक समूह सक्रीय झाले आहेत की जे जनावरांच्या व्यापाऱ्यांना आणि त्यांचे  परिवहन करणाऱ्यांकडून खंडणी वसूल करत आहेत. खोजी पत्रकार निरंजन टकले यांनी आपले नाव रफिक कुरेशी ठेवत व्यापाऱ्याचा वेश धारण करून कित्येक लोकांशी संपर्क केला.  तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, गायींच्या एका ट्रकसाठी 15 हजार रूपये तर म्हशींच्या ट्रकसाठी 6 हजार 500 रूपये हे गुंड वसूल करत होते. टकले यांचे म्हणणे आहे की, ही खंडणी  कातडीच्या व्यापाऱ्याशी जुळालेली आहे. कारण जनावरांच्या वधानंतर त्याच्या कातडीवर मद्यस्थ करणाऱ्याचा अधिकार असतो. गोरक्षकांचे समूह अधून-मधून हिंसाही करतात. कारण  त्यांच्या खंडणीचा व्यवसाय वाढत राहील.
एक महत्त्वाचा विषय या संदर्भात असाही आहे की, जेथे देशात गोरक्षेच्या नावावर लिंचिंगच्या घटना वाढत आहेत. त्याच ठिकाणी दुसरीकडे भारत बीफच्या निर्यातीमध्ये जगात क्रमांक  एकवर पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. सामान्यपणे असा समाज आहे की, मांस विक्रीतून लाभ फक्त मुसलमानांना होतो. परंतु, हे चूक आहे. सत्य हे आहे की, मांस व्यापारातून जे  लोक आपल्या तिजोऱ्या भरत आहेत. त्यातील अधिकांश हिंदू किंवा जैन आहेत. बीफच्या निर्यात करणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये अलकबीर, अरेबियन एक्सपोर्टस्, एमकेआर फ्रोजन फुड  आणि अलनूर यांचा समावेश आहे. यांचे नावं वाचून असे वाटते की, या कंपन्याचे मालक मुसलमान असावेत. परंतु, सत्य हे आहे की, या कंपन्याचे मालक हिंदू आणि जैन आहेत.
गाय/बीफच्या मुद्दा मुळात समाजाच्या ध्रुवीकरणाचे माध्यम आहे. असे म्हटले जाते की, भाजपच्या शासन काळात एकही मोठी जातीय दंगल झालेली नाही. हे खरे असेलही. परंतु, हे ही  खरे आहे की, याच काळात किरकोळ हिंसा आणि गायीच्या मुद्यावर लिंचिंग आदीच्या माध्यमातून अधिक मोठ्या प्रमाणात समाजाचे सांप्रदायिक ध्रुवीकरण केले जात आहे. आपल्या  सर्वांना माहित आहे की, वैदिक काळामध्ये यज्ञ करत असताना गायीचा बळी दिला जात होता. आणि बीफ सेवन सामान्य बाब होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले पुस्तक ’हू वेअर द शुद्राज’ आणि डॉ. डी.एन. झा यांनी ’मिथ ऑफ होली काऊ’ या विद्वत्तापूर्ण लेखनातून हे तथ्य अधोरेखित केले आहे. स्वामी विवेकानंदही म्हणतात, ’’वैदिक काळात गोमांसाचे  सेवन केले जात होते आणि वैदिक कर्मकांडामध्ये गायीचा बळी दिला जात होता’ अमेरिकेतील एका मोठ्या सभेला संबोधित करताना त्यांनी म्हटलं होतं की, ’’आप को ये जानकर  आश्चर्य होगा की, प्राचीन काल में माना जाता था की, जो बीफ नहीं खाता वो अच्छा हिंदू नहीं है. कुछ मौको पर उसे बैल की बली देकर उसे खाना होता था.’ (संदर्भ : द कॅम्प्लीट  वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद, खंड - 3, पृष्ठ 536, अद्वैत आश्रम, कलकत्ता 1997).
हिंदू राष्ट्रवादाच्या ज्या आवृत्तीचा आजकाल उदो उदो केला जात आहे ती आवृत्ती संघाच्या विचारधारेने प्रेरित आहे. हिंदू राष्ट्रवादाचे जनक एक दूसरी विचारधारा हिंदू महासभेच्या  रूपानेही अस्तित्वात आहे. जिच्या प्रमुख प्रवक्त्यांमध्ये वि.दा. सावरकर सुद्धा सामील आहेत. ते संघ परिवाराचे प्रेरणा पुरूष आहेत. परंतु, गायीच्या बाबतीत त्यांचे मत एकदम वेगळे  होते. त्यांच म्हणणं होतं की, गाय बैलांची माता आहे, मनुष्याची नाही. त्यांच असंही मत होत की, ‘ गाय एक उपयुक्त पशु आहे आणि तिच्यासोबत व्यवहार करताना या तथ्याला  लक्षात ठेवणे गरजेचे आहे.’, ‘‘विज्ञान निष्ठा निबंधमध्ये ते लिहितात की, गायीची रक्षा यासाठी केली जावी की, ती एक उपयुक्त पशु आहे. यासाठी नाही की ती दैवीय आहे.’’
हिंदू राष्ट्रवादाच्या संघ आणि हिंदू महासभा या दोन विचारधारांमधील संघाच्या विचारधारेने आजकाल देशाला व्यापून टाकले आहे आणि संघ याचा उपयोग गायीच्या नावावर समाजाचे विघटन करण्यासाठी करत आहे.’’ कमाल तर या गोष्टीची आहे की, एकीकडे उत्तर भारतात जिथे गायीच्या नावावर भाजपाने एवढा उत्पात माजवलेला आहे, दुसरीकडे तीच भाजपा  केरळ, गोवा आणि पुर्वोत्तर राज्यामध्ये याच गायीवर मुग गिळून गप्प राहिलेली आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येवर एकदा डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी महात्मा गांधींकडे अनुरोध केला होता की,  देशात गोहत्या प्रतिबंधक कायदा करायला सांगा. त्यावर गांधींनी जे उत्तर दिले होते ते देशासाठी मार्गदर्शक असायला हवे. गांधी म्हणाले होते, ’’भारत में गोहत्या को प्रतिबंधित करने  के लिए कानून नहीं बनाया जा सकता. मुझे इसमें कोई संदेह नहीं है के, हिंदूओं के लिए गोवध प्रतिबंधित है. मैंने भी गोसेवा करने की शपथ ली है. परंतु, मेरा धर्म अन्य सभी  भारतीयों के धर्म से कैसे अलग हो सकता है? इसका अर्थ होगा उन भारतीयों के साथ जबरदस्ती करना जो हिंदू नहीं है. ऐसा तो नहीं है के, भारतीय संघ में सिर्फ हिंदू ही रहते हैं. मुसलमान, पारसी, इसाई और अन्य धार्मिक समूह भी यहां रहते हैं. हिंदू अगर ये मानते हैं के भारत अब हिंदूओं की भूमी बन गया है तो ये गलत है. भारत उन सभी का है जो यहां  रहते हैं.’’
एकीकडे देश सरकारकडून अशा कृतींची वाट पाहतोय जिच्यामुळे लोक आणि आपला समाज विकसित होईल. दुसरीकडे सरकार गायीच्या देखरेख आणि गायीवर खोट्या संशोधनासाठी  धन आरक्षित करत आहेत. यामुळे देशाचे कधीच कल्याण होणार नाही.

 - राम पुनियानी

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget