Halloween Costume ideas 2015

पाप की पुण्य?


कोरोनाचा उद्रेक होणार म्हणून गेल्या वर्षी मार्चच्या २० तारखेला पंतप्रधानांनी देशभर लॉकडाऊन जाहीर केला. लोकांना घरापासून किमान ५-५० किमी दूर असताना देखील त्यांना आपल्या घरी पोचण्याचीही संधी मिळाली नाही. १३७ कोटी लोकसंख्येच्या या देशात किमान दहा-पाच कोटी नागरिक देशभर इतरत्र विखुरलेले असतील. परदेशात गेलेले असतात, त्यांची संख्या वेगळीच. त्या सर्वांना आपल्या घरी पोचण्याची संधी दिली गेली नाही. केवळ दोन तासांचा कालावधी लॉकडाऊन जाहीर होण्यापासून त्याची अंमलबजावणी होण्यात होता. अशात आपली घरंदारं, मुलाबाळांना सोडून किती लोक कुठे कुठे अडकून पडले होते. मुंबईत देशाच्या इतर राज्यांतून लाखो प्रवासी मजूर रोजगारासाठी येऊन राहातात. त्यांचे कायमचे घर किंवा ठिकाणा नसतो. राहायला कुठे जागा मिळाली तर इतर कोणत्याच सुविधा त्यांना मिळत नाहीत. अशा परिस्थितीत आपले पोट आणि आपल्या गावी सोडून आलेल्या आपले आईवडील, मुलंबाळं आणि पत्नी व इतर नातलगांच्या दोन वेळ पोट भरण्याची व्यवस्था करायला ते मुंबईत दाखल झालेले असतात. इतक्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगण्याऱ्या लाखो प्रवासी मजुरांना लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. त्यांचासुद्धा पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला. यातच कोरोनाच्या संसर्गाची भीती. कसे ते लोक राहू शकत होते मुंबईत. सरकारने परिवहनाची सगळी व्यवस्था बंद केली. रेल्वे नाही, बसेस नाहीत, स्वतःची वाहनं जरी असतील काही लोकांकडे तर तीसुदधा प्रवासासाठी वापरण्याची बंदी. एक कामगिरी मात्र सरकारने जरूर केलेली होती. परदेशात जी उच्चभ्रू मंडळी अडकून पडलेली होती, लाखाच्या आसपास त्यांच्या सोयीसाठी विशेष विमाने चालू होती. एकदा ही मंडळी मायतेशी परतली की सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. बाकीच्या कोट्यबधी प्रवासी मजुरांशी, गोरगरिबांशी सरकारचे देणे घेणे नसल्याने त्यांना वाऱ्यावर सोडून दिले.

अशात एक माणूस समोर येतो – सोनू सूद त्याचे नाव! त्याच्या माणुसकीने जन्म घेतला आणि मग तो या अ़डकून पडलेल्या गोरगरिबांना आपापल्या गावी पाठवून देण्याची सोय करू लागला. त्या अगोदर लाखो लोक हजारो किमीचा प्रवास पायीच करत आपल्या घराकडे निघाले. जवळ पैसे नाहीत. खायला काही नाही. अशात इतर स्वयंसेवी संस्थादेखील बाहेर पडल्या. जागोजागी रस्त्यात अशा लोकांच्या जेवणाची सोय करू लागल्या. पाण्याच्या बाटल्या, अन्नाची पाकिटे पाटू लागले. काही लोक रेल्वेमार्गाच्या कडेला उभं राहून प्रवाशांना अन्नाची पाकिटे, पाणी वाटत होते. देशात कोट्यवधी लोकांचे असे हाल होत असताना शासन-दरबारचा कुठे थांगपत्ता नव्हता. सोनू सूदने जणू शासनाचीच भूमिका घेतली. त्या एकट्या माणसानं लाखो प्रवासी मजुरांना बसेसची सोय करून ज्यांना त्यांना त्यांच्या गावी पाठवून दिले. शासनाला जमले नाही ते त्याने एकट्याने करून दाखवले. गोरगरीबांसहित अशा काही लोकांनाही त्याने चार्टर्ड विमानाने देशात आणले जे तिथे अडकून पडले होते. आणीबाणीच्या काळात लोकांच्या सेवेसाठी जर कोण कार्य करत असेल, आपली जबाबदारी नसताना शासनाची भूमिका घेत असेल तर त्याने या कार्यासाठी कुठून पैसे आणले, किती आणले, कुठे खर्च केले, किती शिल्लक आहेत, पैशांची अपरातफर केली का? असे प्रश्न सहसा कुणी विचारत नसतो. कारण जो माणूस अडकलेल्यांना मदतीचा हात देत आहे, आपल्या कमाईचे पैसे खर्च करीत असेल, जाहिरातींद्वारे आणि इतर मार्गांनी. म्हणजे त्याच्या उद्दिष्टाशी सहमत असलेय्या मंडळींकडून मिळालेल्या देणग्यांमधून खर्च करत असेल तर त्याने असा कोणता गुन्हा केला? त्याने जर लाखो लोकांचे पोट भरले, त्यांना त्यांच्या घरी पोहचवले तर त्याचा कोणता गुन्हा यात? ज्या महान कार्यासाठी, माणुसकीच्या अशा काळी सेवेसाठी ज्या वेळेस सरकारनेही काही केले नव्हते अशा वेळी जर त्याने लोकांची सोय केली असेल तर त्यासाठी त्याला पारितोषिक द्यायला हवे होते. त्याचा सन्मान करायला हवा होता. म्हणजे इतरही श्रीमंत लोकांना या महान कार्याची प्रेरणा मिळावी.

पण आपल्या देशाच्या सत्ताधाऱ्यांचे काय विचार आहेत, कोणती विचारधारा आहे याचा उलगडा होत नाही. असे वाटते की लोकांनी जगू नये. म्हणजे त्यांना जगू देऊ नये. एकामागून एक समस्येमझ्ये गुरफटून त्यांना ठेवावे आणि या यातनांमधूनच त्यांनी या जगाचा निरोप घ्यावा. असे जर वाटत असेल तर कोण काय करू शकतो.

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget