Halloween Costume ideas 2015

देशाच्या सद्यस्थितीस जबाबदार कोण?


कॉंग्रेसने 70 वर्षाच्या काळात जे काम केले नाही ते भाजपाने केवळ आपल्या सत्तेच्या 7 वर्षांमध्ये करून दाखविले. काँगे्रस पक्षाची जी दयनीय स्थिती 70 वर्षात झाली. त्याहून कित्येक पटीने जास्त भाजपाने आपल्या सुधारणा  करून दाखवली हे सर्वार्ंना मान्य करावे लागेल.

आजपासून तीन वर्षांनी म्हणजे 2024 साली होणाऱ्या  निवडणुकीत भाजपाने सत्तेनू बहेर पडावे लागेल अशी स्थिती सध्या दिसून येत आहे. तसे चहाचा कप तोंडाजवळ नेवून चहाचा घोट घेईपर्यंत काय घडू शकते हे कोणासही माहित नसते तीन वर्षांनी काय घडेल हे आताच सांगणे योग्य नसले तरी तसा अंदाज बांधायला हरकत नाही. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला यश मिळाले खरे पण त्यानंतर ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका लागल्या त्यात अनेक राज्यात भाजपाला विजय मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. राजस्थान, गुजरातमध्ये निसटता विजय, मध्ये प्रदेशात अगोदर पराजय नंतर घोडे खरेदी करून  सत्तेत परतणं, तेलंगणा येथे पराभव, आंध्रप्रदेशात स्वतःची सत्ता नाही आणि अलिकडेच झालेल्या चारपैकी तीन राज्यांच्या निवडणुकीत भाजपाचा सफाया झाला. सर्वात जास्त भाजपाला ज्याचे दुःख आहे ते पश्चिम बंगालमधील पराभवाचा इतका की काय करावे ही त्यांना सुचत नाही आणि आता पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकी अगोदरच मोदी शहांना तिथे स्थान राहिले नाही. असे सध्याचे चित्र आहे. 

योगी मोदींनाच आव्हान देऊ शकतील असे कुणी विचारही केला नव्हता. इतकेच नव्हे तर संघ मोदी शहाच्या बाजूने नाही तर योगीच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीत आहे.  इतकेच नव्हे तर भविष्यात राज्याच्या निवडणुकीत मोदींना स्टार प्रचारक करणार नाही अशी देखील भूमिका संघानं घेतली आहे. याचा अर्थ गुजरातचे ’हम दो हमारे दो’ हे युग आता संपत आले आहे. साऱ्या देशावर जसे गुजरातचे वर्चस्व होते ते संपवण्याचा डाव संघाने आखलेला आहे ही गोष्ट आता लपून राहणार नाही. 

संघाची गोष्ट देखील निराळी तो स्वतःला नेहमी सांस्कृतिक संघटना म्हणत असतो पण सांस्कृतिक क्षेत्रात संघाने आजवर काय केले हे कुणालाही माहित नाही. पण दर निवडणुकीत भाजपाचा मुखवटा समोर ठेवून निवडणुकांची रणनीति नेहमी संघ आखत असतो. तेव्हा स्वतःला राजकीय संघटना म्हणत त्याला का लाज येते हे माहित नाही. नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदी बसवण्यासाठी संघाने आपला संपूर्ण फौजफाटा आणि सर्व शक्ती एकवटली होती. त्याच संघाला आता मोदींना राज्याच्या निवडणुकीत भाग न घेण्याच्या सल्ला ते देत आहेत. इतक्या लवकर मोदींशी मोहभंगाची कारणे समजत नाहीत. मोदीच्या जागी आता योगी आपला पाठिंबा देत आहे आणि जर त्यांच्या नेतृत्वात खरेच उत्तर प्रदेशच्या निवडणुका पदरी पडल्या तर 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जर भाजपाला म्हणजेच संघाला यश मिळाले तर मोदीच्या जागी योगींना बसवण्याचे संघाने ठरवले नाही ना? तसे झाल्यास मोदीचे काय? अनेक विश्लेषकांंच्या मते मोदींना राष्ट्रपती बनवतील आणि त्यांच्याकडून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करतील. पण यासाठी जी संख्या लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांची लागणार आहे त्याची जमवा जमव कशी करणार.   

संघाकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे देशात आणिबाणी लवण्याचा. भले हिंदू राष्ट्र घोषित जरी झाले तर त्याचा हिंदूंना कोणता लाभ होणार? आजच्या घडीला देशात हिंदूचेच राज्य आहे. इतर कोणत्याही समुदायाला देशाच्या सत्तेत कसलाच वाटा नाही. आणि हिंदूंचे सरकार असतांना आज हिंदूंचीच जी दयनीय अवस्था झालेली आहे त्यात हिंदू राष्ट घोषित केल्यावर सुधार होणार आहे का? कोरोना काळात लोक ऑक्सीजनविना तडफडत मेलेे. हिंदूंना तरी ऑक्सीजन मिळाले असते आणि त्यांचे प्राण वाचले असते तर हिंदू राष्ट्रात त्यांचे भले झाले असे वाटले असते. 

आपल्या लोकांना तरी त्याचा सुरळीत पुरावा केला असता. कोरोनाने पती आजारी असल्याने पत्नी प्रत्येकाचे हात पाय पडते ऑक्सीजनसाठी. रूग्णालये त्याला ऑक्सीजन न देता काळाबाजार करतात आणि पती देखत त्याच्या पत्नीशी गैर व्यवहार करणारेही त्याच दवाखान्यातले नोकर. तो पती ऑक्सीजन न मिळाल्याने मरण पत्करतो. ह्यापेक्षा दुःखाची गोष्ट कोणती. कित्येक मध्यमवर्गीय कुटुंब उध्वस्त झाले. चार कोटी मध्यवर्गीय लोक दारिद्रय रेषेच्या खाली गेले. मोदींना पंतप्रधान होण्यासाठी ज्या उद्योगपतींनी आर्थिक मदत केली त्यांचे ऋण फेडताफेडता भारताची अर्थव्यवस्थाच ढासळली. कित्येक सार्वजनिक उद्योग विकले गेले. शेवटी शेतकऱ्यांच्या जमीनी सुद्धा त्यांच्या ताब्यात देण्यासाठी कायदा केला गेला त्यांचे कर्ज कधी फिटणार. देश कंगाल झाला आणि त्याच्या श्रीमंतीत भरमसाठ वाढ झाली. ह्याचे रहस्य काय. उद्या हिंदू राष्ट्र घोषित झाल्यावर ही परिस्थिती पूर्ववत होणार आहे काय? जर होणार असेल तर खुशाल त्यांना काय करायचे ते करावे. इतर धर्म समुदायांचे काय होईल ते त्यांच्या ते बघतील.

हिंदूंच्या सत्तेत इतरांना नगण्य स्थान राहील. केंद्रात भाजपा एखाद्या नेत्याला एखादे मंत्रीपद देईल. उद्या हिंदू राष्ट्र झाले तर ते एक पदही काढून घेतील. मोदींच्या जागी योगींना बसवल्यावर आज उत्तर प्रदेशात जे घडते आहे घडले आहे तेथे साऱ्या देशात घडल्याशिवाय राहणार नाही. पण एवढे करून देखील उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत पराभव झाला तर तेवढे राज्यदेखील भाजपाच्या हातातून निसटणार. मग कशाच्या बळावर 2024 च्या निवडणुकीत विजय मिळवून सत्तेत जातील आणि कशा प्रकारे आपला अजेंडा साकार करतील हे संघाने विचार करायला हवा. भाजपाने नव्हे. पण त्यांच्या विचारांची उंची किती ही सगळ्या जगाने पाहिली आहे. 

काँग्रेसने 70 वर्षात केली नाही ती अधोगती संघप्रणीत भाजपाने सात वर्षात करून दाखविली आणि याच्या बळावर 2024 च्या निवडणुका जिंकून हिंदू राष्ट्र करायचे स्वप्नं ते पाहत आहेत. या परिस्थितीत बदल आगामी तीन वर्षात होणार का? जर झालाच तर देशाचे नशीब पण ढासळत्या घराला सावरणं शक्य नसते तसे आपल्या देशाचे हाल झाले आहेत. जे रोजगार गेले ते परत मिळणार नाहीत. जे उद्योग धंदे उध्वस्त झाले ते पुन्हा उभे राहणार नाहीत आणि सर्वात दुःखाची बाब देशाच्या नागरिकांनी आपल्या प्रियजणांचे प्राण गमावले ते परत मिळणार नाहीत. लोक विसरणार नाहीत. पुन्हा भाजपाला सत्तेत आणण्यासाठी ते समर्थन देणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कुणी करावा हे ही सांगता येत नाही. कारण ज्यांच्यावर सुधारणा करण्याची जबाबदारी आहे त्यांच्या मानसिकतेतच लोकांचे कल्याण नाही. अशा दुर्दैवी वळणावर आज देशाला सत्ताधाऱ्यांनी आणून सोडलेले आहे. यातून मार्ग कोण काढणार? 

- सय्यद इफ्तेखाद अहेमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget