Halloween Costume ideas 2015

बिहारमधील सत्तांतर प्रादेशिक पक्षांना संजीवनी


राजकीय अनुभव काय असतो हे नीतिशकुमार आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवरून समजतेे. भाजपाने ज्या पद्धतीने महाराष्ट्रात खेळी केली तशीच बिहारमध्येही करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात भाजपा सपशेल निकामी ठरली. राजकारणातील चाणक्य ज्यांना म्हटले जाते त्यांनी अगोदर बिहारचा दौरा करून नीतिशकुमार यांना धमकावण्याचे प्रयत्न केले. पण त्यांची डाळ शिजली नाही. त्यानंतर भाजपाचे राष्ट्राध्यक्ष यांनी बिहारचा दौरा केला आणि अशी भविष्यवाणी केली की आता देशात कोणताही प्रांतीय पक्ष उरणार नाही. सर्वत्र भाजपाचे राज्य आणि त्याचीच  सत्ता राहील. अशी भविष्यवाणी का केली हे काही लोकांना कळले नाही. अशा उलट-सुलट गोष्टी करताना ते लोक पुराव्या दाखल असे म्हणतात की, ‘मोेदी है तो मुम्कीन है‘ . पण बिहारमध्ये हा विचार फोल ठरला आणि नीतिशकुमारांनी असा डाव रचला की भाजपाचे औसान संपून गेले. त्याच बरोबर महाराष्ट्रात 40 दिवसानंतर एकनाथ शिंदे यांची मंत्री पदाची  शपथ झाल्यावर मंत्री मंडळाचा जो विस्तार झाला त्याचा आनंद सुद्धा नवनियुक्त मंत्र्यांना घेता आला नाही.

महाराष्ट्रात सत्तेत भाजपा सर्वात मोठा पक्ष असून देखील त्याला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. तसेच बिहारमध्ये सुद्धा भाजपा आमदारांची संख्या नीतिशकुमार यांच्या पक्षाच्या आमदारांपेक्षा दुप्पट असून देखील गेली दोन वर्षे त्यांनी नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करावे लागले होते. भाजपाने अगोदर जदयु पक्षाचे लाड पुरविले आणि नंतर जेव्हा त्यांच्या पाठीमागून त्यांना हटविण्याच्या कारवाया चालू केल्या तेव्हा नीतिशकुमार यांनीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आता जर भारताच्या  नकाशावर नजर टाकली तर भाजपाचा प्रभाव कमी झालेला दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपाला नामोहरम करून टाकले आहे. बिहारमध्ये नितीशकुमारांनी भाजपाशी आपली युती मोडून टाकली. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्यमंत्री मंत्री आहेत. त्यांच्या शेजारी छत्तीसगड आहे. जिथे काँग्रेसचे सरकार आहे. त्या खालोखाल ओडिशात नवीन पटनाईक यांचे सरकार आहे. दक्षिणेत आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर सत्तारूढ आहे. तेलंगणामध्ये टीआरएस पक्षाचे सरकार आहे. सर्वात खाली तामिळनाडू येथे डीएमकेची सत्ता आहे. तामिळनाडू लगतच्या केरळ राज्यात भाजपाला निवडणुकीत आपले खाते सुदधा उघडता आले नाही. देशातून विरोधी पक्षांना संपवण्याच्या बाता मारणाऱ्यांची अशी दयनीय परिस्थिती आहे. 

बिहारमध्ये आरपीसिंह जे नीतिशकुमारचे उजवे हात म्हणून समजले जायचे. त्यांना बिहार मधला एकनाथ शिंदे बनवण्याचे प्रयत्न केलस गेला. पण त्यांनी भरारी घेण्याआधीच नीतिशकुमार यांनी त्यांचे पंख कापून टाकले. गेल्या लोकसभा निवडणुकीत जदयू आणि भाजपाने मिळून निवडणूक लढवली. त्या दोघांना 16-16 जागा मिळाल्या. पण केंद्र सरकारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाला फक्त एक मंत्रीपद देऊ केले होते. नितीश कुमार यांनी यावर नाराजी व्यक्त करीत केंद्र सरकार मध्ये सामील होण्यासच नकार दिला. पण भाजपाने नितीश कुमार यांच्या विरूद्ध जाऊन आरसीपी सिंह यांना केंद्रात जाऊन मंत्री बनवले. आरसीपी सिंह यांचा केंद्रीय मंत्री मंडळात जाणे एक प्रकारे नितीश कुमार यांच्या विरूद्ध षडयंत्र होते पण त्यांनी याची दखल घेतली नाही. ते अनुकूल वेळेची वाट पाहत होते. आरपी सिंह अधिकारी होते म्हणून ते निवडणूक जिंकू शकत नव्हते म्हणून त्यांना राज्यसभेत पाठवले जात होते. त्यांच्या खासदारकीची मुदत संपत होती. नितीश कुमार यांनी त्यांना राज्यसभेत पुन्हा पाठवले नाही. त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. भाजपाला त्यांना आपल्या आश्रयात घेणे अवघड झाले होते. 

बिहारमधील मागच्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांना साथ देवून भाजपाने नितीश कुमार यांची शक्ती कमी करण्याचे प्रयत्न केले. बिहारमधून नितीश कुमारांना संपवून भाजपाला स्वतःचे मुख्यमंत्री बनवायचे होते. चिराग पासवानामुळे नितीश कुमार यांचे काही प्रमाणात नुकसान झाले पण पासवान स्वतः निवडणूक हरले. या घडामोडींचा फायदा आरजेडीला मिळाला आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून आरजेडीचा उदय झाला. काँग्रेसने चाळीस जागा लढवल्या पण केवळ सोळाच जागा त्यांना मिळाल्या आणि महाराष्ट्रा सारखे मनावर दगड ठेऊन नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवले पण नितीश कुमार यांनी त्याच वेळी हे समजून घेतले होते की भाजपा जदयुवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. नितीश कुमार लोहियावादी असून त्यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा भाजपा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करते याचे त्यांना दुःख वाटत होते. सध्या भाजपा नितीशकुमार यांच्यावर बिहारच्या जनतेशी दगा केल्याचा आरोप लावत आहे पण 1995 ला जदयु आरजेडी यांनी जे सरकार बनवले होते. एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी भाजपाने नितीश कुमार यांच्यावर एका घोटाळ्यात ब्लॅकमेल करून ते सरकार पाडले होते. त्यावेळी बिहारच्या जनतेला कोणी धोका दिला होता. इकडे महाराष्ट्रात शिंदे यांनी शिवसेनेत राहून निवडणूक लढवली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ते जिंकले देखील. अडीच वर्षे मंत्रीपदावर विराजमान होते आणि नंतर बीजेपीच्या सहाय्याने शिवसेनेला धोका देऊन मुख्यमंत्री झाले. 

भाजपाच्या चाणक्याने देशभर विविध राज्यांची सरकारे  पाडली. इतर पक्षांच्या आमदारांना साथ घेऊन अनेक राज्यात आपले सरकार बनवले. कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये निवडणूक हरल्यावर सुद्धा काँग्रेसच्या आमदारांना फोडून सरकार बनवले. त्यावेळी माध्यमांनी त्यांचे भरभरून कौतूक केले. तेच लोक आता नितीश कुमारांवर जनतेशी दगा करण्याचा आरोप लावत आहेत.

भाजपाचे प्रांतीय अध्यक्ष संजय  जैस्वालानी धमकी दिली की, अग्नीपथचा विरोध थांबवला गेला नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील. त्यावर अस्वस्थ असल्याचे कारण दाखवून चार दिवस आधी नितीशकुमार नीती आयोगाच्या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत. त्याचवेळी भाजपाने खबरदारी घ्यायला हवी होती. नितीशकुमार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत तेजस्वी यादव यांच्या आरजेडीसहित इतर पक्षांचे मिळून 164+1 अपक्ष असे 165 आमदारांच्या समर्थनाने आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेजस्वी यादव यांचा सर्वात मोठा पक्ष विधानसभेत असून त्यांनी नितीशकुमार यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यांचे हे पाऊल येत्या काळात त्यांना प्रभावी राजकारणात वर्णी लावणार हे नक्की. 


- डॉ. सलीम खान


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget