Halloween Costume ideas 2015

राममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आधिकारच नाही

अयोध्येतील राम मंदिराचे ई- भूमिपूजन करण्यात यावे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सल्ल्यावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना उद्धव ठाकरे स्वत: पंढरपूरला पूजेसाठी गेले होते. त्यांना राम मंदिराच्या भूमिपूजनावर बोलण्याचा अधिकारच काय?, असा खोचक सवाल  रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
राम मंदिराचे ऑनलाइन भूमिपूजन करण्याचा उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याचा काहीच अधिकार नाही. कारण ते स्वत: आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते. राज्यात कोरोनाचे संकट असतानाही ते पूजेला गेले होते. अशी टीका ना. दानवे यांनी केली आहे.
ठाकरे यांनी विठ्ठलाची पूजा ऑनलाइन पद्धतीने केली असती तर त्यांना बोलण्याचा आणि सल्ला देण्याचा अधिकार होता. मात्र, स्वत: कोरोना काळात महापूजा करायची आणि दुसऱ्यांना  कोरोना आहे म्हणून ई-भूमिपूजन करण्याचा सल्ला द्यायचा हा दुटप्पीपणा आहे, असेही ते म्हणाले.
राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्याचे शॅडो मुख्यमंत्री आहेत का? असा सवाल  दानवे यांना करण्यात आला. त्यावर, शरद पवार हे मुख्यमंत्री नाहीत, पण महाविकास आघाडीचे कर्णधार आहेत, असे ते म्हणाले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget