कर्नाटकातील राजकीय नाटकाचा शेवटचा अंक नुकताच संपला. या नाटकाचा अन्वयार्थ एकाच वाक्यात सांगावयाचे झाल्यास काँग्रेसचे पाय जमिनीला लागले आहेत, असे सांगता येईल. कारण एकमेकांच्या विरूद्ध विखारी प्रचार करूनही काँग्रेस आणि जनता दल एकत्र आले. त्यातही काँग्रेसने पुढाकार घेतला आणि कुमार स्वामी यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. स्वतःकडे अल्पत्व घेऊन सत्ता वाचविण्यात काँग्रेसला भलेही यश आले परंतु, या खेळीचा दूरगामी परिणाम पुढील लोकसभेच्या निकालांवर झाल्याशिवाय राहणार नाही. हे परिणाम दोन प्रकारे होतील. एक तर यातून प्रादेशिक पक्षांना बळ मिळेल. कारण त्यांना कळून चुकले आहे की, ज्या प्रमाणे कमी खासदार निवडून येऊनसुद्धा कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. त्याचप्रमाणे काँग्रेसपेक्षा एकजरी खासदार जास्त निवडून आणला तर देशाचा पंतप्रधान बनविण्यासाठी काँग्रेस नक्कीच त्यांना पाठिंबा देईल. दूसरा परिणाम असा होईल की, काँग्रेस कार्यकर्त्यांचे नैतिक खच्चीकरण होईल, एव्हाना त्यांना कळून चुकले आहे की, लोकसभेत राहूल गांधी यांची पंतप्रधान बनण्याची शक्यता कमी झालेली आहे. त्यांनी सत्ता वाचविण्यासाठी जास्त आमदार असतांनासुद्धा कमी आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री केला. तर उद्या केंद्रातही आपल्यापेक्षा कमी खासदार असलेल्या एखाद्या पक्षप्रमुखाला ते पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाहीत.
काँग्रेसमुक्त भारताच्या मोहिमेला चांगलीच गति मिळाल्याने काँग्रेसला अपमानास्पदरितया कर्नाटकामध्ये जनता दलाला पुढे करावे लागले आहे. जनता दलाने दक्षिण कर्नाटकमध्ये जेथे त्यांचा त्यांचा उमेदवर निवडून येणे शक्य नव्हते त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेवून भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला होता, हे उघड गुपित होते. याची जाणीव असूनही काँग्रेसने कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री केले. यावरून काँग्रेस किती हतबल झालेली आहे आणि तिचे पाय कसे जमीनीवर आलेले आहेत, याची जाणीव झालेली आहे.
कर्नाटकात निवडणूक निकाल आल्यानंतर अचानक राज्यपाल विजूभाई वाला यांची भूमिका केंद्रस्थानी आली. हे विजूभाई वाला तेच आहेत ज्यांनी नरेंद्र मोदींसाठी आपली जागा रिकामी केली होती. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना कर्नाटकाचे राज्यपालपद मिळाले होते. त्यांनी आपल्या पक्षनिष्ठे पुढे राज्यपाल पदाला महत्व न देता निवडणुका नंतर झालेल्या काँग्रेस- जनता दल युतीचे बहूमत स्पष्ट दिसत असतांनासुद्धा येदियुरप्पा यांना सरकार स्थापण्यास पाचारण केले. एवढेच नव्हे तर त्यांचा शपथविधी करून घोडेबाजार करण्यासाठी भरपूर म्हणजे 15 दिवसाचा अवधी दिला. गोवा, मेघालयामध्ये पोळल्याने काँग्रेसने त्वरित हालचाल करून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला व कर्नाटकाची सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. यात राज्यपालांच्या निष्ठेविषयी कोणीच प्रश्न उपस्थित केलेले नाही किंवा त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्विकारून राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेला नाही. यावरून आपल्या देशाचे राजकारण किती निगरगठ्ठ लोकांच्या हातात आलेले आहे हे दिसून येते.
काँग्रेसमुक्त भारताच्या मोहिमेला चांगलीच गति मिळाल्याने काँग्रेसला अपमानास्पदरितया कर्नाटकामध्ये जनता दलाला पुढे करावे लागले आहे. जनता दलाने दक्षिण कर्नाटकमध्ये जेथे त्यांचा त्यांचा उमेदवर निवडून येणे शक्य नव्हते त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेवून भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला होता, हे उघड गुपित होते. याची जाणीव असूनही काँग्रेसने कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री केले. यावरून काँग्रेस किती हतबल झालेली आहे आणि तिचे पाय कसे जमीनीवर आलेले आहेत, याची जाणीव झालेली आहे.
कर्नाटकात निवडणूक निकाल आल्यानंतर अचानक राज्यपाल विजूभाई वाला यांची भूमिका केंद्रस्थानी आली. हे विजूभाई वाला तेच आहेत ज्यांनी नरेंद्र मोदींसाठी आपली जागा रिकामी केली होती. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना कर्नाटकाचे राज्यपालपद मिळाले होते. त्यांनी आपल्या पक्षनिष्ठे पुढे राज्यपाल पदाला महत्व न देता निवडणुका नंतर झालेल्या काँग्रेस- जनता दल युतीचे बहूमत स्पष्ट दिसत असतांनासुद्धा येदियुरप्पा यांना सरकार स्थापण्यास पाचारण केले. एवढेच नव्हे तर त्यांचा शपथविधी करून घोडेबाजार करण्यासाठी भरपूर म्हणजे 15 दिवसाचा अवधी दिला. गोवा, मेघालयामध्ये पोळल्याने काँग्रेसने त्वरित हालचाल करून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला व कर्नाटकाची सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. यात राज्यपालांच्या निष्ठेविषयी कोणीच प्रश्न उपस्थित केलेले नाही किंवा त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्विकारून राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेला नाही. यावरून आपल्या देशाचे राजकारण किती निगरगठ्ठ लोकांच्या हातात आलेले आहे हे दिसून येते.
Post a Comment