- सरफराज शेख
भारतीय समाज हा उत्सवप्रिय मनोभुमिकेत जगत आला आहे. उत्सवाच्या माध्यमातून भारतीय समाजाने जगण्यातील वेदना विसरण्याचा प्रयत्न केला आहे. उत्सवाच्या माध्यमातून एकात्मीक रचनेच्या बळकटीकरणासाठी समाजाने नेहमी प्रयत्न केले आहेत. सण हिंदू धर्मीय असो वा इस्लामी, भारतीय समाजाने त्याचे रुप सामाजिक सौहार्दाच्या अधिष्ठानावर आकाराला आणले आहे. होळी, रक्षाबंधनसारखे सण भारतीय समाजाची एकात्मीक रचना मजबूत करत आले आहेत. मध्ययुगीन काळापासून ईदच्या माध्यमातून भारतीय समाजातील काही समाजघटकांनी एकामेकांच्या जवळ येण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले आहेत. मोहम्मद तुघलकाच्या काळात ईदच्या दिवशी व त्याच्या आधी हिंदु बांधवासाठी ईद साजरी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असत. सुफींच्या खानकाह मधील लंगर असो वा इफ्तारसाठी वाटसरुंना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा असो, हिंदू-मुस्लीमांसाठी सारख्याच पध्दतीने उपलब्ध असत. मानवी मुल्यांची उद्घोेषणा या माध्यमातून केली जात असे. सुफींनी मानवकल्याणाची जाणीव रमजान महिन्यात देखील जपली होती. वस्त्रभांडार त्यांनी रमजान महिन्यात गरीबांच्या सहाय्यासाठी खुले केल्याचे अनेक संदर्भ इतिहासाच्या साधनात उपलब्ध आहेत. रमजानच्या महिन्यात जकातच्या माध्यमातून आर्थिक समन्वयातून सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मध्ययुगीन काळात हा कर शासनाच्या एका विशिष्ट विभागामार्फत वसूल केला जात असे. त्या माध्यमातून समाजोपयोगी कामे केली जात असत. औरंगजेबाने ब्रम्हपुरी मुक्कामी असताना रमजानच्या काळात विहिरी व कालव्यांचे बांधकाम करुन घेतले होते. काही बागा निर्माण केल्या होत्या. जहांगीरच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ईदचा माध्यम म्हणून वापर करण्यात आल्याचे संदर्भ ’तुज्क इ जहांगीरी’ मध्ये उपलब्ध आहेत. सेतू माधव पगडी यांनी भाषांतरीत केलेल्या काही फारसी बातमीपत्रांच्या माध्यमातून अशा अनेक नोंदी समोर आल्या आहेत. ईदच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द जपण्याची ही प्रेरणा भारतीय समाजाने घेतली. आजही अनेक मुस्लीम बांधव जकात च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतात. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्था ह्या जकातच्या माध्यमातून विधायक कार्य करत आहेत. ईदच्या माध्यमातून अनेक भारतीय समाजबांधवांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जवळ येण्यासाठी एक माध्यम उपलब्ध होते. त्यामुळे ईदचे सामाजिक महत्व आधिक आहे.
भारतीय समाज हा उत्सवप्रिय मनोभुमिकेत जगत आला आहे. उत्सवाच्या माध्यमातून भारतीय समाजाने जगण्यातील वेदना विसरण्याचा प्रयत्न केला आहे. उत्सवाच्या माध्यमातून एकात्मीक रचनेच्या बळकटीकरणासाठी समाजाने नेहमी प्रयत्न केले आहेत. सण हिंदू धर्मीय असो वा इस्लामी, भारतीय समाजाने त्याचे रुप सामाजिक सौहार्दाच्या अधिष्ठानावर आकाराला आणले आहे. होळी, रक्षाबंधनसारखे सण भारतीय समाजाची एकात्मीक रचना मजबूत करत आले आहेत. मध्ययुगीन काळापासून ईदच्या माध्यमातून भारतीय समाजातील काही समाजघटकांनी एकामेकांच्या जवळ येण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले आहेत. मोहम्मद तुघलकाच्या काळात ईदच्या दिवशी व त्याच्या आधी हिंदु बांधवासाठी ईद साजरी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असत. सुफींच्या खानकाह मधील लंगर असो वा इफ्तारसाठी वाटसरुंना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा असो, हिंदू-मुस्लीमांसाठी सारख्याच पध्दतीने उपलब्ध असत. मानवी मुल्यांची उद्घोेषणा या माध्यमातून केली जात असे. सुफींनी मानवकल्याणाची जाणीव रमजान महिन्यात देखील जपली होती. वस्त्रभांडार त्यांनी रमजान महिन्यात गरीबांच्या सहाय्यासाठी खुले केल्याचे अनेक संदर्भ इतिहासाच्या साधनात उपलब्ध आहेत. रमजानच्या महिन्यात जकातच्या माध्यमातून आर्थिक समन्वयातून सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मध्ययुगीन काळात हा कर शासनाच्या एका विशिष्ट विभागामार्फत वसूल केला जात असे. त्या माध्यमातून समाजोपयोगी कामे केली जात असत. औरंगजेबाने ब्रम्हपुरी मुक्कामी असताना रमजानच्या काळात विहिरी व कालव्यांचे बांधकाम करुन घेतले होते. काही बागा निर्माण केल्या होत्या. जहांगीरच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ईदचा माध्यम म्हणून वापर करण्यात आल्याचे संदर्भ ’तुज्क इ जहांगीरी’ मध्ये उपलब्ध आहेत. सेतू माधव पगडी यांनी भाषांतरीत केलेल्या काही फारसी बातमीपत्रांच्या माध्यमातून अशा अनेक नोंदी समोर आल्या आहेत. ईदच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द जपण्याची ही प्रेरणा भारतीय समाजाने घेतली. आजही अनेक मुस्लीम बांधव जकात च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतात. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्था ह्या जकातच्या माध्यमातून विधायक कार्य करत आहेत. ईदच्या माध्यमातून अनेक भारतीय समाजबांधवांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जवळ येण्यासाठी एक माध्यम उपलब्ध होते. त्यामुळे ईदचे सामाजिक महत्व आधिक आहे.
Post a Comment