प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, जर तुम्ही अल्लाहवर तशाच प्रकारे भरोसा (विश्वास) कराल जसा त्याचा हक्क आहे, तर तो तुम्हालादेखील त्याच प्रमाणे उपजीविका देईल जसा तो पक्ष्यांच्या उपजीविकेची तरतूद करतो. ते, पक्षी सकाळी रिकाम्या पोटी निघतात आणि संध्याकाळी तृप्त होऊन आपल्या घरट्यांत परततात. (ह. उमर बिन खत्ताब (र.), तिर्मिजी)
अल्लाह पवित्र कुरआनात म्हणतो की, जो कुणी अल्लाहला भिऊन कार्य करत राहतो अल्लाह त्याला कष्टातून बाहेर निघण्याची सोय करतो. जो अल्लाहवर भिस्त ठेवतो त्याच्यासाठी तो (अल्लाह) सक्षम आहे. (पवित्र कुरआन, अत् तलाक-३)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ही कुरआनची आयत (श्लोक) ह. मआज यांना ऐकवून म्हटले होते की, जर सर्व लोकांनी ह्या आयतीवर आचरण केले असते तर ही सर्वांसाठी पुरेशी होती. म्हणजे त्यामी जर पूर्णपणे अल्लाहवर विश्वास ठेवला असता आणि त्ची भीती बाळगली असती तर त्यांच्या ऐहिक आणि पारलौकिक सबंध गरजा पूर्ण झाल्या असत्या.
प्रेषित म्हणतात, सर्व प्रकारे सक्षम होऊ इच्छित असेल त्याने अल्लाहवर विश्वास ठेवावा.
पवित्र कुरआनात अल्लाह उपदेश देतो की, हे श्रद्ध लोकहो, सामना करण्यासाठी नेहमी तत्पर राहा. (प. कुरआन, सूरह अन् निसा-७१)
जितके होईल तितके बळ प्राप्त करा. सामना करण्यासाठी नेहमी सुसज्ज घोडे तयार ठेवा. (प. कुरआना, अन फाल-६०)
ज्या गोष्टींचा अल्लाहने आदेश दिला आहे त्या आदेशाचे पालन केल्याने आणि त्याकडे दुर्लक्ष करण्याने माणूस स्वर्ग किंवा नरकात जाऊ शकतो.
दुसऱ्या प्रकारचे आचरण माणसांच्या ऐहिक गरजांशी संबंधित आहे. जसे भूक लागल्यास जेवणे, तहान लागल्यास पाणी पिणे, उष्णता, थंडी अनुभवणे, थंडीच्या दिवसांत उष्णतेची सोय करणे. यासाठी अल्लाहने जी संसाधने माणसांना दिली आहेत त्यांचा उपयोग करावा. जर कुणाकडे ही संसाधने उपलब्ध असतील आणि त्यांचा तो उपयोग करत नसेल तर अल्लाह अशा माणसाला शिक्षा देत असतो. कधी माणसाकडून झालेल्या गुन्ह्यामुळे त्याची उपजीविका हिरावून घेतली जाते.
प्रेषित म्हणतात, जोपर्यंत माणूस त्याच्या नशिबात असलेले अन्न प्राप्त करत नाही तोपर्यंत त्याला मृत्यू येत नाही. म्हणून अल्लाहची भीती बाळगत राहा. जे वैध आहे ते घ्या आणि जे निषिद्ध आहे ते टाळा.
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment