Halloween Costume ideas 2015

भारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक्यता

एनडीटीव्हीचे प्रसिद्ध आणि मॅगसेसे पुरस्कारप्राप्त पत्रकार रविश कुमार यांनी मुस्लिमांना स्वत:चे मीडिया हाऊस किंवा मीडियामधील मुस्लिमविरोधी सोशल प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी स्वत:चे मीडिया हाऊस किंवा न्यूज चॅनेल तयार करण्याचे आवाहन केल्याचा मेसेज व्हायरल झाला. मुस्लिमांच्या मालकीच्या न्यूज चॅनेल्सच्या गरजेबद्दल मुस्लिमांमध्ये बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे, मात्र असा कोणताही ऑडिओ जारी केल्याचा त्यांनी नकार दिला आहे.
प्रसारमाध्यमे विशेषतः बहुतेक न्यूज चॅनल्स मुस्लिमांविरुद्ध विष ओकत आहेत यात शंका नाही, पण हे 'पूर्ण सत्य' गृहीत धरणे भोळेपणाचे ठरेल. आज प्रसारमाध्यमांनी आपली विश्वासार्हता आणि बातम्यांबाबतचे पावित्र्य गमावले आहे, ते सत्ताधारी पक्षाचे साधन आणि प्रवक्ते बनले आहेत. सरकारशी असहमती, गुन्हेगारी, राक्षसीपणा आणि अगदी वृत्तवाहिनीवरील थेट प्रसारण कार्यक्रमातील गैरवर्तनाच्या मर्यादेपलीकडे तथ्ये आणि प्रतिकूल बातम्या दडपण्यातही ते दोषी आहेत. लडाखमध्ये चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर जनतेने सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला तेव्हा एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा अँकर ‘सीमेवर घुसखोरी रोखणे ही सैन्याची जबाबदारी आहे’ असे म्हणत विरोधी पक्षाला आणि भारतीय लष्कराला प्रश्न विचारतो. गरीब शेतकऱ्यांच्या आत्महत्येचेही वृत्तांकन चुकीचे केले जाते. डेटा पत्रकार रुक्मिणी एस. यांनी नमूद केल्याप्रमाणे शेतकरी आत्महत्येच्या नवीन संख्येबद्दल कटाचा सिद्धान्तही तयार करण्यात आला आहे. ऑक्सफॅम इंडिया आणि न्यूजलॉन्ड्री यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला, "आमच्या कथा कोण सांगते : भारतीय न्यूजरूममधील वंचित जातीगटाचे प्रतिनिधी", न्यूजरूममधील दलितांचे अल्प प्रतिनिधित्व आणि उच्च जातीचे वर्चस्व शोधून काढले.

प्रसारमाध्यमे लोकविरोधी बनली आहेत का? 
अशा प्रकारे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली भारतीय प्रसारमाध्यमे पारंपरिक पद्धतीने लोकांचे वैरी बनली आहेत.
प्रसारमाध्यमांचे वर्तन एका रात्रीत बदलले नाही, तर एका प्रक्रियेचे पालन केले. वाचक, प्रेक्षक आणि दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर भारतीयांना ग्राहक म्हणून संबोधले जाते आणि त्यांना तशी वागणूक दिली जाते. नेहरूवियन्स समाजवादी वर्तनापासून कट्टर भांडवलशाहीकडे वळली आहेत आणि आता सत्तेत असलेला राजकीय पक्ष आपल्या कॉर्पोरेट मित्रांबरोबर न्यूज चॅनल्स आणि त्यांच्या निळ्या डोळ्यांच्या अँकरच्या माध्यमातून देशातील अजेंडा आणि कथा मांडत आहे.
काही दृढ अंतःकरण, तल्लख मन आणि कटिबद्ध पत्रकार हस्तक्षेप करून लोकविरोधी दृष्टिकोन थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते खऱ्या बातम्यांपासून फेक न्यूज वेगळ्या करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत, सार्वजनिक हितासाठी बातम्या आणि विष्लेषण लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत, केवळ राजकारण्यांचेच नव्हे तर त्यांच्या सहकारी पत्रकारांचेही भ्रष्टाचार आणि दुहेरी मापदंड उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारतात प्रसारित होणाऱ्या न्यूज चॅनलला अपलिंकिंग आणि डाऊनलिंकिंगसाठी, कंपनीच्या संचालकांसाठी गृह मंत्रालयाकडून परवानग्या, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून कंपनीची स्थापना इत्यादींसाठी सरकारी तपासणी आणि मंजुरी आवश्यक आहे... आस्थापना खर्च, ऑपरेटिंग कॉस्ट आणि सरकारी मंजुरीनंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे टीव्ही चॅनल्सचे वितरण जे प्रेक्षकांसाठी त्याची दृश्यमानता ठरवते आणि "टीआरपी" निर्माण करते तसेच जाहिरातदारांसाठी नियमावली तयार करते.
सरकारी पाठिंब्याशिवाय न्यूज चॅनल्स टिकू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे की कोणतेही वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल स्वत:हून किंवा जाहिरातीच्या उत्पन्नावर जिवंत राहू शकत नाही. न्यूज चॅनलपेक्षा जास्त टीआरपी असलेल्या जनरल एन्टरटेन्मेंट चॅनल-जीईसीसारख्या वेगळ्या शैलीत, ज्यामध्ये बहुतेक आयबॉल, स्पोर्ट्स आणि फिल्म चॅनल्सचा ग्रुप सुरू करणे हे आजच्या व्यावसायिक धोरणांपैकी एक आहे. कंपन्या या स्पर्धात्मक बाजारपेठेतील जाहिरातदारांना वेगळ्या शैलीतील चॅनल्ससह वाढीव दृश्यमानता प्रदान करतात. आणखी एक धोरण म्हणजे वितरण खर्च वाचविण्यासाठी झीच्या डिश टीव्ही सारख्या डीटीएच नेटवर्कचे मालक असणे. एवढेच तर केंद्र आणि राज्यांतील सरकारे त्यांच्या सामाजिक आणि कल्याणकारी योजना आणि सबसिडी किंवा त्यांचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी जमीन वाटपाच्या जाहिरातीच्या स्वरूपात पाठिंबा देतात. अशा प्रकारे, प्रचंड आणि वारंवार लागणाऱ्या ऑपरेटिंग कॉस्टसाठी सरकारी पाठिंब्याशिवाय किंवा इतर उत्पन्न मॉडेल्सशिवाय कोणतीही वृत्तसंस्था स्वतःहून जिवंत राहू शकत नाही.

दै. माध्यमम आणि ‘मीडिया वन’ टीव्ही चॅनलचा लोकसमर्थक दृष्टिकोन
काही प्रमुख संघटना आणि मुस्लिम कार्यकर्तेही प्रयत्न करत आहेत, पण काही अपवाद वगळता बहुतेक जण अपयशी न होण्यासाठी धडपडत आहेत. १८ आवृत्त्या (भारतात ९ आणि आखाती प्रदेशात ९) असलेले मल्याळम दैनिक माध्यमम आणि केरळमधील ‘मीडिया वन’ टीव्ही चॅनलचा दृष्टिकोन आणि व्यावसायिक व्यवहार्यतेच्या दृष्टीने मुस्लिमांच्या यशस्वी मीडिया उपक्रमांच्या यादीत आघाडीवर राहू शकतात. त्यांचे वृत्तांकन केवळ मुस्लिम बातम्यांपुरते मर्यादित नाही, तर त्यांचे यश हे त्यांच्या लोकसमर्थक दृष्टिकोन आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारांच्या मुख्य प्रवाहातील बातम्यांमुळे चर्चेत आले आहे.
वेब पोर्टल
डिजिटल क्रांतीने जगाला उलगडून टाकल्यामुळे जगाला सीमा उरल्या नाहीत आणि आता आपण जागतिक नागरिक आहोत. या जागतिकीकरणामुळे सर्वसामान्य लोक सक्षम बनले आहेत आणि त्यांना आपले मत व्यक्त करण्याचे व्यासपीठ लाभले आहे. हे एका उदाहरणाद्वारे समजू शकते की भारतीय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडू शकत नाही, पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने किंवा विरोधात अमेरिकन लोकांवर नक्कीच प्रभाव पाडू शकतो. डिजिटायझेशनमुळे वेब पोर्टल आणि वेब चॅनल्सच्या माध्यमातून थेट किंवा लक्ष्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी निर्माण झाली आहे. या क्षेत्रात अजूनही सरकारी आणि कायदेशीर हस्तक्षेप अल्प आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. आस्थापनेचा खर्चही मर्यादित आहे आणि प्रेक्षकसंख्या उच्च व्यावसायिक वितरण कंपन्यांवर अवलंबून नाही.
डिजिटल जगात आशय राजा आहे. ध्रुव राठीला यूट्यूबवर लाखो सबस्क्रायब आणि फॉलोअर्स मिळू शकतात, साकेत गोखले ट्विटरवर भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करू शकतात, न्यूयॉर्क टाइम्समधील राणा अय्युबचा लेख आणि गल्फ न्यूजमधील स्वाती चतुर्वेदी यांचा लेख भारतात वाचता येईल, रोहिणी सिंह आपला लेख ‘द वायर’ न्यूज पोर्टलवर आपले विष्लेषण मांडू शकतात तर अरफा खानम ‘द वायर’वर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा घडवू शकतात. बरखा दत्त भारतभर प्रवास करून आपल्या ‘मोजो स्टोरी’मध्ये कोरोना साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनदरम्यान गरीब आणि स्थलांतरित मजुरांची दयनीय अवस्था मांडू शकतात. ऑपरेटिंग कॉस्टसाठी प्रामुख्याने चांगले पत्रकार, डिजिटल मार्केटिंग टीम आणि काही तांत्रिक जाणकार यांची नियुक्ती करावी लागते.




या क्षेत्रातील स्वातंत्र्य आणि मुक्तता समजून घेऊन काही व्यक्ती, कार्यकर्ते, पत्रकार आणि संघटनांनी प्रामुख्याने मुस्लिमांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या किंवा मुस्लिमांनी स्थापन केलेल्या न्यूज पोर्टलसाठी प्रयत्न केले आहेत. TwoCircles.net, MuslimMirror.com, Beyondheadlines.in, IndiaTomorrow.net, Ummid.com, Maeeshat.in आणि आता ClarionIndia.net ही काही प्रमुख न्यूज पोर्टल्स आहेत. त्यांनी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त सेवा केली आहे आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांवर प्रभाव पाडणाऱ्या अनेक बातम्या आणल्या असल्या तरी दुःखाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक पोर्टलचा वेदनादायक संघर्ष आणि भांडवल, देणग्या आणि क्राउडफंडिंगशी संबंधित एक दुःखद कहाणी आहे. भारतातील कोणत्याही 'मुस्लिम ओन्ली मीडिया' उपक्रमासाठी हा संशोधन आणि माहितीपटांचा विषय आहे. त्यांचे बहुतेक संपादक आणि मालक मला वैयक्तिकरित्या ओळखतात कारण मी फ्रीलान्स असोसिएट्सपैकी एक होतो आणि आहे. या प्रत्येक पोर्टलची संघर्षकथा व्यक्त करण्यासाठी प्रत्येकी एक स्वतंत्र आणि सविस्तर लेख लिहिला जाऊ शकतो. 
न्याय आणि शांतता स्थापित करण्यासाठी अधिकाधिक लोकसमर्थक न्यूज पोर्टल्स आणि चॅनल्स स्थापण्याची आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांच्या सांप्रदायिक आणि  फूट पाडणाऱ्या आख्यायिकांचा प्रतिकार करण्याची मागणी आजच्या परिस्थितीत करण्यात येत आहे.
या ठिकाणी २०२० साली अमेरिकेतील फ्लोरिडा येथे BlackNewsChannel.com मुस्लिमकेंद्रित न्यूज पोर्टलसाठीही जागा आहे. आपल्याविषयी, BlackNewsChannel.com आपले ध्येय स्पष्ट करताना म्हणते की, ‘’आपल्या आफ्रिकन-अमेरिकन प्रेक्षकांना माहितीपूर्ण, शैक्षणिक, मनोरंजक, प्रेरणादायी आणि सक्षम करणारे बुद्धिमत्तापूर्ण प्रोग्रॅमिंग उपलब्ध करणे हे आपले ध्येय आहे.’’
वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही भारतात एकाच वेळी राहत आहोत, जिथे भारताचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल देखील ‘तिरंगा टीव्ही’ न्यूज चॅनेल चालवू शकले नाहीत. प्रणॉय रॉय यांच्या बरोबरीचे न्यूज चॅनल इंडस्ट्रीतले ज्येष्ठ व्यक्ती राघव बहेल यांना आपला ‘टीव्ही १८ ग्रुप’  विकावा लागला आणि ते अजूनही न्यूज चॅनलचा परवाना मिळवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांनी वेब वर्ल्डकडे वळून the Quint  नामक वेब पोर्टल सुरू केले आहे.
एकीकडे बरखा दत्त, करण थापर, पुण्यप्रसून वाजपेयी, अभिसार शर्मा सरकारला प्रश्न विचारणारी न्यूज चॅनलमधील अग्रगण्य नावे बाजूला सारली जात असताना, डिजिटल जगताच्या अभिव्यक्तीला आळा घालणारे कोणतेही नियम अस्तित्वात येईपर्यंत वेब पोर्टल हाच एकमेव व्यवहार्य पर्याय उरला आहे.

- रेहान अन्सारी
(रेहान अन्सारी हे मुंबईस्थित फ्रीलान्स पत्रकार आहेत)
Rehan Ansari is a Mumbai-based journalist and has worked with Sahara Samay, CNBC and twocircles.net and Ex Secretary of Shodhan Trust

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget