Halloween Costume ideas 2015

भाजपचे नेते गांधी परिवारामागे

उर्दू टाईम्सच्या 30 जानेवारीच्या अंकात प्रकाशित एका वार्तांकनामध्ये म्हटलेले आहे की, भाजपचा प्रत्येक नेता काँग्रेसच्या मागे हाथ धुवून लागलेला आहे. राहूल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींनाही टिकेचे लक्ष करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका नेत्याने म्हटले आहे की, प्रियंका दिसायला सुंदर आहेत, परंतू सुंदर चेहर्‍याकडे पाहून लोक मतं देत नाहीत. स्त्री सौंदर्याबद्दल केलेले हे आक्षेपार्ह विधान हवेत विरते न विरते तोच भाजपा अध्यक्ष अमित शहांनी म्हटले की, गांधी परिवाराला टू जी नंतर थ्री जी, यांनी मोठमोठे घोटाळे केले. आता काँग्रेस थ्री जी मध्ये परावर्तीत झालेला आहे. त्यांचा निशाना प्रियंका गांधीवर होता. त्यांनी मोबाईल सवेमध्ये उपयोगात आणलेल्या जी या शब्दाशी केली व पुढे स्पष्ट केले की, टू जी आणि थ्री जीला जनता विसरली असून, आता फोर जी चा जमाना आलेला आहे, असे म्हणून आपली पातळी दाखवून दिली.
    31 फेब्रुवारी रोजी इन्क्लाब या वर्तमानपत्रात कर्नाटकमधील घोडेबाजारावर टिप्पणी करण्यात आलेली असून, त्यात म्हटलेले आहे की, कर्नाटकाचे पूर्व मुख्यमंत्री आणि सध्या काँग्रेस आणि जनता दल एस चे समन्वयक सिद्धरामय्या यांनी रविवारी म्हटले आहे की, मागच्या निवडणुकीनंतर कर्नाटकामध्ये शासन स्थापित करण्यात आलेल्या अपयशाला भाजपा पचवू शकत नाहीये. म्हणून कर्नाटक सरकारला अस्थिर करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. अनेक विधानसभा सदस्यांना अनेक कोटींचे आमिष दाखवून त्यांची खरेदी करण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केलेला आहे. सिद्धरामय्या यांनी असाही आरोप केला आहे की, आमचे आमदार फोडण्यासाठी भाजपाने प्रती आमदार 25 ते 30 कोटी एवढी प्रचंड रक्कम देण्याची लालूच दाखविलेली आहे. मात्र या प्रयत्नांना आमच्या आमदारांनी दाद दिलेली नाही. बीजेपी भविष्यातही यशस्वी ठरणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
    1 फेब्रुवारीच्या उर्दू टाईम्समध्ये मन्सूर एजाज यांनी एक लेख लिहिलेला असून, त्यात त्यांनी म्हटलेले आहे की, राहूल गांधी असोत की प्रियंका गांधी, मायावती असोत का प्रियंका गांधी यांनी लवकरात लवकर आपसातील तारतम्य वाढवून कोणत्याही परिस्थितीत उत्तर प्रदेशामध्ये भाजपा जिंकणार नाही, याची व्यवस्था करावी. असे झाले तरच राज्यात घटनात्मक वर्चस्व अबाधित राहील आणि भारताची गंगाजमनी संस्कृती जीवंत राहील.
    तसेच फारूख अन्सारी यांचा लेख प्रसिद्ध झाला असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून मुस्मि हा शब्द वगळण्याची जर मागणी होत असेल तर बनारस हिंदू विद्यापीठातील हिंदू हा शब्द सुद्धा गाळण्यात यावा. त्यांनी आपल्यात पुढे म्हटलेले आहे की, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ हे सांप्रदायिक लोकांच्या नजरेमध्ये कायम सलत राहिलेले आहे. अनेकवेळा या विद्यापीठाचे नाव बदलण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत आणि आताही सुरू आहेत. भाजपाच्या खासदार सतिश गौतम यांचे म्हणणे आहे की, मुस्लिम शब्द कठोर असून, हिंदू शब्द मऊ वाटतो. म्हणून अलिगढ विद्यापीठाच्या नावातून मुस्लिम हा शब्द गाळण्यात यावा, असा त्यांनी अजब तर्क दिला.


- फेरोजा तस्बीह
9764210789
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget