Halloween Costume ideas 2015

मताची अनमोलता कळू दे

आता उन्हाळ्यात पडणार घोषणांचा पाऊस, दाहीदिशांनी आदळत राहणारा नाटकीपणाचा गोंधळ, गोंधळलेल्या नागरिकांच्या मताला फुटणार आमिषाच्या हजार वाटा. पण या वाटांवर  नजिब न्यायापासून परवा कोसळलेल्या मुंबईपुलाच्या जीवांचा आकांती हिशोब विचारायला हवा. त्याचे भान नागरिकांनी जपायलाच हवे. बांध्यावरच्या आत्महत्या आणि फोडांतून रक्त  फुटेपर्यंत सडक्या पायांच्या मोर्च्याची स्मृती ठेवायलाच हवी ताजी. तजेला देणाऱ्या मुर्खजाहिरातींच्या नारील्या डोसांतून बाजूला करून ’आण्णाचं काय झालं’ म्हणून छळायलाच हवं...  लोकांना पाल समजून त्यांना झटकून टाकणारी व्यवस्था बदलायला हवी. कंत्राटी चौकीदारांचा हा भारीव ठळकपणा अचानक उठून दिसतोय. तरी गायब झालेल्या सगळ्याच महत्त्वाच्या  फायलींचे मागमूस लागत नाही.
अतिप्रभावाने क्षुल्लक, चेष्टेचा विषय बनलेल्या मीडियाने काबीज केलेला मेंदू, आता भानावर येतोय. हिप्नॉटीस्टचे परदेशी दौरे कमी झालेत. देशाच्या कोपऱ्यांतून अस्मितेचे झेंडे विरोधात  फडकताहेत. जातीनिहाय माशांची यादी गळाला लागली आहे. पण प्रश्न जैसे थे वैसेच. सामान्य मुस्लिम म्हणून प्रश्नांचा न संपणारा गुंता करून वाढलाय समोर. 55 हजाराहून अधिक तरूण विनाकारण सडताहेत जेलमध्ये, याबद्दल कुणीच कुठे हालचाल करताना दिसत नाही. खऱ्या गुन्हेगाराने अपराध्याची कबूली देऊन सुद्धा सुटत नाहीत. मुस्लिम नावाचे बेगुनाह कैदी. आरक्षण-रक्षणाच्या आंदोलनाचे केवळ राजकीय फलीत झोळीत पडावे म्हणून स्वतःतच झगडाहेत काही चळवळी चेहरे. दुःखाचा मागोवा घेत मुस्लिम भवितव्याची मांडणी करणारं साहित्य येत नाही आतून, आले तरी प्लॅटफॉर्मवरून ढकललं जातय बाजूला दूर. नव्या प्रतिकांची खऱ्याने मांडणी करताना सध्याच्या तरूणाईशी जोडता येत नाही प्रतिमांना. बहुजनीपदर  धरून चाचपडत रहावं तरी जातीपेक्षा ’धर्म’ म्हणून बुद्धिभेद होतोय. हुशार, विद्वानांच्या फौजेत सामिलकी पत्करून सुद्धा माझ्या दुःखव्यथेला साधी ओलीओळ मिळत नाही.
एकीकडे नव्याने येणारे धार्मिक जाणतेपण आणि बदलाच्या टोकावरली घुसमट याचा मेळ घालताना नाकीनऊ येताहेत. सामाजिक बहिष्कृततेचा छुपा मार मुस्लिम म्हणून गप्प सहन  करावाचा लागतोय. दोन पावलं पुढे असणाऱ्या प्रादेशिक मुस्लिमांच्या समवेत देवाणघेवाणीचा वैचारिक संवाद ही अत्यल्प ठरतोय. राजकीय अनिश्चित गटांच्या दावणीला अस्तित्वाचा फुगा लटकलेला दिसावा यासाठीची धडपड केविलवाणी दिसत आहे. शिक्षणाच्या एकूण गोंधळात, केवळ धार्मिक शिक्षणाचा जोर लावलाय. सहृदयी विचारवंताच्या मेळ्यात सांस्कृतिक जडणघडणीत आपण शेवटी उरतोय. कुठल्याही पदराला पकडून कितीही उभ राहण्याचा प्रयत्न इम्बॅलन्स करतोय. मानवप्रवृत्ती म्हणून असणाऱ्या जगण्याच्या संघर्षातली अत्यवस्था  तितकीच तडफडीची आणि मुस्लिम म्हणूनची इमानी धडपड ही मोलाची. यातल्या हल्नयाने येणाऱ्या मानवतेला कुणी तितकासा प्रतिसाद देत नाहीए. अगदी परवा न्यूझिलँडच्या आतंकी  हल्ल्यातील सगळ्याच बातम्यांवर कितीसे आपले किमान व्यक्त होत राहिले? नाहीच!!!
माणसाच्या जाण्याने चांगलच बोलावं, म्हणून ढिगभर पोस्ट भरतात. लेखकाच्या लेखनाप्रत प्रेम उफाळून येत. शहिदांवर मातम करत बोलून-लिहून गाजतात लोक. आचारसंहितेच्या कारणास्तव स्वतःलाच पुन्हा कोषात बंद करून घेताहेत सगळे...
माझं जगणं गोंधळाचं झालंय, यावर विचारल पाहिजे, बोललं पाहिजे, स्वतःच्या पायावरती ठाम उभे राहताना आधुनिक काळाशी सख्य सांगताना माझ्या भवितव्याची स्पष्ट मांडणी  व्यक्ती म्हणून झाली पाहिजे. अंधार गडद असला तरी, पहाट होईलच. पहाटेसाठीच्या केवळ बाष्फळगप्पा न करता कृतीशील विवेकीविचारांचा सुगंध दरवळू दे. मत कळू दे, मताची  अनमोलता कळू दे.. सध्या जागेपणी उजेडवाटा निवडाव्यात.
’’अपना गम सबको बताना, है तमाशा करना.
हाले-दिल उसको सुनाएंगे वो जब पूछेगा.’’

- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर)
9923030668
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget