लोकशाही समाजव्यवस्था स्वीकारली की, त्यामध्ये निवडणूक ही प्रक्रिया अपरिहार्य आहे, लोकशाहीच्या रक्षणासाठी त्या आवश्यक ही आहेत, भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला ज्यांची वयाची १८ वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना मतदानाचा पवित्र हक्क बहाल केला आहे.मग तो गरीब असो, अगर श्रीमंत असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, नोकरदार
असो अथवा व्यावसायिक असो, सुशिक्षित असो नाहीतर अशिक्षित असो.दर ५ वर्षाने त्याला मतपेटीतून आपणांस हवा तो आणि तसा राज्यकर्ता निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
मात्र अलीकडे या देशातील निवडणुका म्हणजे एक चिंतेचा व चिंतनाचा विषय झाला आहे.सामान्य पण सुसंस्कृत नागरिकांना या निवडणुका म्हणजे संकट वाटते आहे तर काहींना पैसे मिळवण्यासाठी संधी वाटते आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून ते देशातील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर साम-दाम-दंड-भेद याचा वापर होऊ लागला आहे, त्यामुळे, या देशातील सामान्य माणूस भयग्रस्त झाला आहे. निवडणुका जवळ आल्या की, त्यातील काही अनिष्ट प्रकारामुळे सज्जन व सुज्ञ नागरिक निवडणुकांपासून दूर राहणे पसंत करतात. राजकारणातील अनीती, दबंगगिरी व भ्रष्टाचार इतका वाढला आहे की त्यामुळे सामान्य माणसाला जगणे दिवसेंदिवस कठीणच होत चालले आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही.अर्थात संपूर्ण देशभरातून विविध माध्यमांतून ते आपल्या समोर येत आहे.
आपण ज्या विश्वासाने निवडून देतो ते बहुतांशी लोकप्रतिनिधी जनतेशी प्रतारणा करतात. ते निवडून येताच प्रामाणिक रहात नाहीत.ते मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार करतात. प्रशासनाला हाताशी धरून, गुंडांना अभय देऊन लुच्चांना व बगलबच्चांना पाठीशी घालून ते भ्रष्टाचारातून मिळवलेल्या प्रचंड संपत्तीचे मालक बनतात.भूतकाळात तसेच वर्तमान काळातील अनेक आर्थिक घोटाळे याची साक्ष देतात. गेल्या ६७ वर्षातील वास्तव पाहीले असता संपूर्ण देशभरातून, बहुतांशी राज्यात दर ५ वर्षांनी ज्या निवडणुका होतात त्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच आणि तसाच अनुभव जनतेला येत आहे.स्वच्छ पाणी, मुबलक वीज, चांगले रस्ते, निरामय आरोग्य, आदर्श शिक्षण, यासारख्या मुलभूत सुविधा संपुर्णपणे उपलब्ध करुन देण्यात आजही अपयश आले आहे,कचरा उठाव,ड्रेनेजव्यवस्था, नद्या नाले,तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी अंदाज पत्रकात तरतूद करण्यात आलेली दिसते, पण हा पैसा योग्य त्याठिकाणी खर्च न होता लोकप्रतिनिधी आपल्या घशात घालतात,हे विदारक सत्य अनेकदा जनतेच्या डोळ्यासमोर आले आहे.पण या सत्ताधिशांसमोर कुणी ब्र सुद्धा काढत नाही.
ते चोखतात आता, हाडे
नव्या पिढीची ।
अद्यापही दिलेला
नाही,डकार त्यांनी ।।
या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. कारण आपण अशा खोट्या व भ्रष्ट उमेदवारांना निवडून देतो. या दैनंदिन जीवनातील वेदनांना व व्यथांना आपण मतदारच प्रथम जबाबदार आहोत.हे वास्तव नाकारता येणार नाही
या वेदनांना व व्यथांना संपविण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधीना देशभरातून मतदानाचा अधिकार वापरून हकलून लावले पाहिजे .प्रामाणिक व चारित्र्यवान उमेदवारांना उभे करून निवडून आणले पाहिजे.अन्यथा आपले व आपल्या देशाचे आपणच नुकसान करणार आहोत, हे लक्षात ठेवा. खडतर प्रयासाने व परिश्रमाने मिळविलेले स्वातंत्र्य आणि भारतीय लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संधी साधू,स्वार्थी व मतलबी, नैतिक अध:पतन झालेल्या व ‘पाकीट’ संस्कृतीलाच महत्व देणा-या उमेदवारांना व त्यांच्या बगलबच्चांना मतपेटीतून हक्क बजावून हाकलून लावले पाहिजे. सेवाभावी, प्रामाणिक, नि:स्वार्थी व अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी असणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा व पाठबळ दिले पाहिजे. प्रचंड खर्चिक निवडणुका हे देशापुढील संकट समजून निवडणुकीतील पावित्र्य जपले पाहिजे. चांगल्या व सज्जन लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपणच आपल्या जगातील आदर्श अशा लोकशाही समाजवाद मानणाऱ्या या देशाचे संरक्षण केले पाहिजे.खरं तर आपणच आपले पावित्र्य व नितीमुल्ये जपली पाहिजेत व हा देश वाचविला पाहिजे.
– सुनीलकुमार सरनाईक
(मो.: ७०२८१५१३५२)
असो अथवा व्यावसायिक असो, सुशिक्षित असो नाहीतर अशिक्षित असो.दर ५ वर्षाने त्याला मतपेटीतून आपणांस हवा तो आणि तसा राज्यकर्ता निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
मात्र अलीकडे या देशातील निवडणुका म्हणजे एक चिंतेचा व चिंतनाचा विषय झाला आहे.सामान्य पण सुसंस्कृत नागरिकांना या निवडणुका म्हणजे संकट वाटते आहे तर काहींना पैसे मिळवण्यासाठी संधी वाटते आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून ते देशातील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर साम-दाम-दंड-भेद याचा वापर होऊ लागला आहे, त्यामुळे, या देशातील सामान्य माणूस भयग्रस्त झाला आहे. निवडणुका जवळ आल्या की, त्यातील काही अनिष्ट प्रकारामुळे सज्जन व सुज्ञ नागरिक निवडणुकांपासून दूर राहणे पसंत करतात. राजकारणातील अनीती, दबंगगिरी व भ्रष्टाचार इतका वाढला आहे की त्यामुळे सामान्य माणसाला जगणे दिवसेंदिवस कठीणच होत चालले आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही.अर्थात संपूर्ण देशभरातून विविध माध्यमांतून ते आपल्या समोर येत आहे.
आपण ज्या विश्वासाने निवडून देतो ते बहुतांशी लोकप्रतिनिधी जनतेशी प्रतारणा करतात. ते निवडून येताच प्रामाणिक रहात नाहीत.ते मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार करतात. प्रशासनाला हाताशी धरून, गुंडांना अभय देऊन लुच्चांना व बगलबच्चांना पाठीशी घालून ते भ्रष्टाचारातून मिळवलेल्या प्रचंड संपत्तीचे मालक बनतात.भूतकाळात तसेच वर्तमान काळातील अनेक आर्थिक घोटाळे याची साक्ष देतात. गेल्या ६७ वर्षातील वास्तव पाहीले असता संपूर्ण देशभरातून, बहुतांशी राज्यात दर ५ वर्षांनी ज्या निवडणुका होतात त्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच आणि तसाच अनुभव जनतेला येत आहे.स्वच्छ पाणी, मुबलक वीज, चांगले रस्ते, निरामय आरोग्य, आदर्श शिक्षण, यासारख्या मुलभूत सुविधा संपुर्णपणे उपलब्ध करुन देण्यात आजही अपयश आले आहे,कचरा उठाव,ड्रेनेजव्यवस्था, नद्या नाले,तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी अंदाज पत्रकात तरतूद करण्यात आलेली दिसते, पण हा पैसा योग्य त्याठिकाणी खर्च न होता लोकप्रतिनिधी आपल्या घशात घालतात,हे विदारक सत्य अनेकदा जनतेच्या डोळ्यासमोर आले आहे.पण या सत्ताधिशांसमोर कुणी ब्र सुद्धा काढत नाही.
ते चोखतात आता, हाडे
नव्या पिढीची ।
अद्यापही दिलेला
नाही,डकार त्यांनी ।।
या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. कारण आपण अशा खोट्या व भ्रष्ट उमेदवारांना निवडून देतो. या दैनंदिन जीवनातील वेदनांना व व्यथांना आपण मतदारच प्रथम जबाबदार आहोत.हे वास्तव नाकारता येणार नाही
या वेदनांना व व्यथांना संपविण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधीना देशभरातून मतदानाचा अधिकार वापरून हकलून लावले पाहिजे .प्रामाणिक व चारित्र्यवान उमेदवारांना उभे करून निवडून आणले पाहिजे.अन्यथा आपले व आपल्या देशाचे आपणच नुकसान करणार आहोत, हे लक्षात ठेवा. खडतर प्रयासाने व परिश्रमाने मिळविलेले स्वातंत्र्य आणि भारतीय लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संधी साधू,स्वार्थी व मतलबी, नैतिक अध:पतन झालेल्या व ‘पाकीट’ संस्कृतीलाच महत्व देणा-या उमेदवारांना व त्यांच्या बगलबच्चांना मतपेटीतून हक्क बजावून हाकलून लावले पाहिजे. सेवाभावी, प्रामाणिक, नि:स्वार्थी व अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी असणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा व पाठबळ दिले पाहिजे. प्रचंड खर्चिक निवडणुका हे देशापुढील संकट समजून निवडणुकीतील पावित्र्य जपले पाहिजे. चांगल्या व सज्जन लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपणच आपल्या जगातील आदर्श अशा लोकशाही समाजवाद मानणाऱ्या या देशाचे संरक्षण केले पाहिजे.खरं तर आपणच आपले पावित्र्य व नितीमुल्ये जपली पाहिजेत व हा देश वाचविला पाहिजे.
– सुनीलकुमार सरनाईक
(मो.: ७०२८१५१३५२)
Post a Comment