Halloween Costume ideas 2015

मानवतेची बोथट संवेदना

चोरीला गेलेला फोनमुळे थोडा अधिक हतबल झालेला मी. पण मंत्रालयातून राफेलची कागदपत्रे चोरीला जातात हे वाचून-ऐकूण मात्र जरा धिरावलो. जिथे मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेतून अती महत्त्वाची फाईल चोरीने गायब होऊ शकते तिथे माझ्या सारख्या पामराच्या फोनचं काय? पण फोनमधील डाटा, इतर कॉन्टॅ्नट मिळविता येतील. राफेलच्या फाईलची पण या पेपरलेस जगात सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी वगैरे असेलच, असा टे्ननोसॅवी विचार करून मी शांतलो. सध्या तरी टिव्हीचं भडकाऊ भूत आणि मीडियाच्या भयभीत करणाऱ्या अफवा, मॅसेजेस पासून स्वतःला दूर ठेवलंय. 
नाहीतर उथळ उन्मादल्या देशभक्तीचा गौरव पुलवामा नंतर बक्कळ आदळत होता. नको असलेली युद्ध सदृश्य स्थितीही पाकिस्तानशी अन् संशयी नजरेने हलाल मात्र मुस्लिम पोरं - पानपट्टी जवळच्या पान पिचकाऱ्यात सुद्धा टग्या तरूणाईने युद्धाला आम्ही सिद्ध आहोत, हे मीडियावरून पसरवलच होतं. बर झालं की फोन हरवला. सुटलो, तुडूंब ट्रोलनी. शहिदांच्या स्मृतीचा गौरव आणि मनापासूनचा अभिमान नक्कीच. पण डिजिटल पोस्टरवरून पक्ष प्रचाराचे फेसव्हॅल्यू नामंजूर हमेशा. सख्या मित्रांसोबत बोलतांना सुद्धा आधी विचार करून बोलावे लागणे ही अघोषित मुस्कटदाबीची लक्षणे नव्हेत? हिंदूत्व आणि भांडवलदाराच्या अजेंड्यावर नेमके आपणच टार्गेट आहोत. हे कळूनसुद्धा अजून बेफिकीरीचा आळस मात्र सुटत नाही. आठवड्या दर आठवड्याला एक नया अ‍ॅपीसोड ठरवून मनू मनाप्रमाणे सगळं व्यवस्थित घडवलं जातं. समस्यांना नडवलं जातं अगदी मुस्लिम म्हणून. मुसलमानांच्या बाजूने गळे काढणाऱ्यांना देखील मूळ प्रश्नांची जगण्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक मांडणीचे उभे असलेले पर्याय तळागाळातल्या भयभीत मुस्लिमांपर्यंत पोहोचविण्याची धडपड होताना दिसत नाही. लुटीपूटीच्या हंगामी संवेदना तात्काळ प्रतिक्रिया, तात्पुरता अभिनिवेश एवढेच काही स्पष्ट दिसते. पुरेझाले आता. हे सगळं लिहायला कागद घेतल्यावर माय सावित्रीची आठवण होतेय... फातिमांचा उल्लेख कुठेच नाही आढळत. 
विवेकाच्या बाजूने लढणाऱ्या, सनातण्यांच्या गोळ्यांनी शहीद होणाऱ्यांच्या नावांत ’सफदर हाश्मी’ वगैरे बाजूलाच राहतात. (की ठेवले जातात). माझा गोतावळा म्हणून उराउरी भेटावे किंवा कवटाळावं तरी छुप्या दुरत्वाचा जवळून वास येतो. आपली लोकप्रिय, प्रसिद्धी, आपला पैसा, पद, कोकलून मिळवलं की समाजसमूहाच्या भितीभावाशी तुटणे हे सगळ्यांचेच लक्षण झाले आहे. 
फर्ज अदा करणे, धर्म पाळणे या गोष्टी प्नया इमानी खऱ्या. त्याचबरोबर संभ्रमित केलेली अस्मिता, मुद्दामहून पुसली गेलेली प्रतिके, अंधारात दडपून ठेवलेली बलस्थाने, शिक्षणाचा अखंड जागर यांची चर्चा ऐरणीवर आली पाहिजे. ’लोहा गर्म है तो हातोडा डालो’ असं ऐकलय. घुसमट घुसळणीच्या काळात स्वतःच्या जाणिवा मारून जपणाऱ्या समाजाला जागं करण्याची  हीच वेळ आहे. नाहीतर पुन्हा तेच आठवड्याला नवीन मुद्दा, सुड घेतल्याप्रमाणे वागणारे आसपासचे बांधव, पुन्हा-पुन्हा तोच रडीचा डाव.
नजीबला हरवून कित्येक वर्ष झालीत. पुण्यासारख्या शहरातून मॉबलिंचिंगमधून, गोरक्षणाच्या भंपक कारणांवरून किंवा निव्वळ खोट्या अफवांवरून मुसलमान किंवा निव्वळ खोट्या अफवांवरून मुसलमान म्हणून मारल्या गेलेल्या जीवांना न्याय नाही मिळत. मारणाऱ्यांना जानि आणि सन्मान मिळतोय. हा मूळ हुद्दा नको का रेटायला?
सत्ताधिशांनी शेवटचं आश्रय म्हणून युद्धजन्य वीररसी, पाकिस्तानीद्वेषी जहर सर्वसामान्यांना पाजलाच आहे. मंदिर-मस्जिदीचा पत्ता वाया गेला म्हणून हा हुकमीजहरी एक्का फेकलाय. स्मृती जाग्या ठेवा. मेंदूला झोप येऊ नका देऊ. सगळ्या घटनांची साखळी जोडली की साखळी आपल्याच मानेभोवती, स्वातंत्र्याभोवती घट्ट गुंडाळली जाते हे कळेल. ’द हिंदू’ पेपर्सचे एन.राम त्यांना परवडत नाही. केवळ माझ्याहून अधिक ताकदीने लिहिण्या-वाचणाऱ्यांची जागृती चळवळ न बनता, गल्लीमोहल्ल्यातून, वाड्यावस्त्यांंतून स्वतःच्या उन्नतीचा दिया’ स्वतःच पेटवला पाहिजे. 
सजग भान, सच्चपेणाची जाणीव आणि उपरेपणाच्या दुय्यमत्वाला लाथ मारून मानवतेच्या बोथट संवेदनेला साद घालायला हवी. आपण अधिक सूज म्हणून सूज्ञपणे उद्याच्या निवडणुकांच्या बाजारात आपलं ’भारतीय जगणं’ लोकशाही संविधान मूल्य जपूया... विवेकी विचारांनेच सगळं बदलू शकतं, बदल आवश्यक... बस् इतकेच!
मै कागज की तकदीर पहचानता हूं
सिपाही को आता है तलवार पढना
किताबें रिसाले न अखबार पढना
मगर दिल को हर रात इकबार पढना

- साहिल शेख
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget