Halloween Costume ideas 2015

एकात्मता-सहिष्णूतेची परीक्षा

संवेदना मरणासन्न करणार्‍या या डिजीटली देशप्रेमाच्या अवस्थेत सामान्य माणसाला अत्यवस्थ करण्याचा उजवाडाव यशस्वी होतोय. अगदी अस्मितांच्या जोरावर आरक्षणाचे अनेक मोर्चे करून सुद्धा झुलती आशा, मुस्लिम, आरक्षणाच्या हक्काच्या लढाईचा तोंडदेखलेपणाचे छोट्या कॉलमची स्तुती आणि पटकन सवर्ण आरक्षणाचा मंजूर झालेला कायदा.
    थोरामोठ्यांच्या मानवतमंत्राची महत्ता जपत जगणार्‍या महाराष्ट्राला हंगामी त्यागमूर्तींची लागण झाल्यासारखी व्यक्ती महात्म्य वर्णन करणार्‍या सिनेमा-सिरीअल्सना अक्षरशः ऊत आलाय. जिभेला हाड आणि विचारांचा कणा नसलेल्या मुर्खादी नेत्या-चमच्यांची राजकीय वर्दळ द्वेषाचा धुरळा जनतेच्या डोक्यात फेकत कालच्या प्रश्‍नाला आज बगल देऊन नविन मुद्दा निर्माण करण्यात सत्ता पटाईत आहे. प्रश्‍नांच्या पाठशिवीचा खेळ खेळण्यात भोळी सूज्ञ जनता मग्न आहे.
    प्रियंका गांधीच्या राजकीय प्रवेशनाट्यावरून ओकली गेलेली नीच गरळ हीन मानसिकतेची अस्सलता उघड करीत होती. ते झाकावं, बाजूला व्हावं म्हणून महाराष्ट्रातल्या युतीच्या चढाओढीची फोडणी झकास दिली गेली. संघधर्मीय कार्यकर्त्यांच्या शस्त्रसाठेची चर्चा तापली असताना त्यांनी आनंदी तेल परतवलं. वंचितांच्या मेळाव्यात मीडिया मधून टाकून, ’हाउज द जोश’चा नारा उराऊरी बडविला. कुंभमेळ्याच्या मेळाव्यातल्या खर्‍या रिपोर्ताजना गाडून धार्मिकतेचा रंगांधळेपणा पसरवला.
    राफेलची चर्चाच फेल ठरवित, ट्वीटरच्या सहेतूक मांडणीचा फोटो सेव्हड् केला. अनुपम - बाबा - साध्वी वगैरे बाजूला सारत स्वतःच कॅरेक्टरायझेशन उदात केल सिनेमातून. गर्दीचा पूर ओसरला तरी पोपटमिडीयाला आस्वादक समिक्षक पुरविले. महान पुरूषांच्या पुतळ्या-स्मारकाची चर्चा दाबून स्मार्ट सिटीचे मृगजळ दाखविले. बजेट समजण्यापूर्वीच सरळ छापेमारीच्या सत्राची सुरूवात झाली. राज्या-राज्यातून देशपातळीवर बंगाली हायव्होल्टेज ड्रामा रंगला. त्यावर काही बोलू, लिहू पाहू तेव्हा उपोषण महंतांची बातमी धडकली.
    या बातम्या ऐकाव्यात पाहाव्यात तर केबल चॅनल्सचा धंदा प्रायव्हेट केला. पुन्हा उद्योगी भांडवलदारांचे आर्थिक उन्नतीकरणाचा उदात्त हेतू सफल झाला. या सगळ्या खेळात महाराष्ट्राची, देशाची जनता भावनिक समतोल साधण्याचा प्रयत्न करत राहते. रोजच्या जगण्याच रूटीन, गरजेच्या गोष्टी, आरोग्य शिक्षण, सुविधा, जातीधर्माशिवाय केवळ देशवासी म्हणून चे काही हक्क अधिकार याचे काहीच देणेघेणे व्यवस्थेला नाही. मध्यमवर्गाला नवश्रीमंतीचे डोहाळे लावून स्वप्नरंजनाचे काजळ डोळ्यात घालण्याचे अ‍ॅडव्हस्टायनिंग कार्य सरकार पूर्ण करतंय. साहित्य-सांस्कृतिक चर्चापीठांतून वरच्या थरांतील पुरस्कार-मानधनाच्या घोषणेत धावपळ उडत आहे. ’पद्म’सारख्या प्रतिष्ठित, पुरस्कारांना परत करणार्‍या संवेदनशीलांना देशद्रोहीचा शिक्का उठसूट मारला जातोय.
    पुरोगामी, धर्मांध, उजवे, डावे, सेक्यूलर म्हणत-म्हणत वंचितांचा मुस्लिम सामान्यांचा प्रवास चिंतनीय. योग्य नेता, अभ्यासू राज, क्षेत्रीय जाणीवांची सुयोग्य मांडणी, पूर्वग्रहदुषित सांस्कृतिक समावेशकता यांचा अभाव सातत्याने माथ्यावर मारला जातोय. सर्वतोपरी उपरेपणाची जाणीवांच्या भिंती उभारून, भीतीच्या दबावाने आपणच देशप्रेमी कसे या दिखाऊपणाच्या भोळसर गडबडीत सामान्य क्षेत्रीय मुस्लिमाला केवळ मतदार म्हणून वापरण्याचा सुगीचा काळ जवळ आलाय.
    बाभळीला बहर आणि फुलातून जहर प्रसवत असेल तर आता पाठशिवीच्या खेळात सजगपणे कसर न ठेवता उतरायलाच हवे. सगळच फाट्यावर मारून, कुणासाठीही स्वार्थाची मोजपट्टी न बनता, स्वतःहून अधिक समाजकारणाची लढाई ठाशिवपणे गडद करायलाच हवी. एकात्मता-सहिष्णूतेच्या परीक्षा पास होण्यासाठी आपण नाही, हेच जाणून अधिक एकतेचा-मानवतेच्या इक्बाली संकेताचा आदरपूर्वक वापर करण्यासाठीचा विचार व्हायलाच हवा. हे सरळ कागदावर उतरवताना आण्णांच्या उपोषणाची सांगता होण्याची ब्रेकींग न्यूज मोबाईलवर आदळली.
    आता चौकातल्या गप्पांपासून टीव्ही एफबीपर्यंत आदरणीय आण्णामहात्म्य वाढतं ठेवलं जाईल. पण उद्या नव्याने प्रश्‍नांचा पाठ घोळावला जाईल, आपण घोळात राहू. सावध ऐका पुढच्या हाका...
अब भी कुछ नहीं बिगडा प्यारे,
पता करो लोहारों का
धार गिराना काम नहीं है,
लोहे पर सोनारों का!!

- साहिल शेख
8668691105
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget