Halloween Costume ideas 2015

एमपीजेचे राशन वंचितांसाठी राज्यव्यापी आंदोलन

उदगीर :
उदगीर तालुक्यात अन्न सुरक्षा आयोगाअंतर्गत अनेक लाभधारकांना शिधा (राशन) मिळत नाहीत तसेच मंजूर कोट्यातूनही राशन कमी मिळण्याच्या तक्रारीत वाढ झाली आह़े पीडित  लाभधारक तहसील कार्यालयात वारंवार जाऊनदेखील त्यांना कोणी दाद घेत नाहीत, त्यांच्या तक्रारींचे निवारण होत नसल्याने मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीच्या वतीने उदगीर येथे  ‘अन्नाचा अधिकारजगण्याचा अधिकार’ या शिर्षकाखाली आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आल़े.
आंदोलन उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाल़े आंदोलनात विविध राजकीय, सामाजिक संघटना, पक्षांचा समावेश होत़ा यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राजकुमार अतनुरे  म्हणाले, राशन हा गरीबांचा हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहि़जे महागाईने जगणे दुभर केले आह़े त्यात राशन मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आह़े प्रशासनाने हा प्रश्न  ऐरणीवर आणून लाभधारकांना राशन उपलब्ध करून द्याव़े राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील म्हणाले, राशनकार्ड काढण्यासाठीच्या अटीही सुलभ कराव्या़त उपजिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष  देऊन उदगीर तालुक्यातील राशनधारकांचे प्रश्न मार्गी लावावे़त कुठलाही गरीब यापासून वंचित राहू नये, याची काळजी घ्याव़ी आज जवळपास ५०० नागरिकांनी तक्रार अर्ज दिले आहे़त  त्याचा तात्काळ निपटारा करावा, अशी मागणीही त्यांनी केल़ी यावेळी शेख समीर हाश्मी, अजीज अहमद सरवर म्हणाले, एमपजीजे गरीब लोकांना हक्क देण्यासाठी वारंवार आंदोलन  करीत आह़े आंदोलनस्थळी खाजोद्दीन शेख, बिस्मील्लाबी शेख, भालचंद्र, नागशे, सुंदरबाई कांबळे, मतीन शेख आदींस ६०० नागरिकांनी नवीन फार्म भरल़े
यावेळी मौलाना रहेमान, मौलाना फारूख, मौलाना जियाओद्दीन, मौलाना अजीज पटेल, फारूकी रफियोद्दीन, फारूक चाऊस, ड़ॉअजगर, शमशोद्दीन जरगर शेख, हिसामोद्दीन सर, कदम  सर, नागसेन भदंत, जकी पटेल, एमपीजे जिल्हाध्यक्ष वसी हाश्मी, शेख मुंतजीब आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होत़ी उपजिल्हाधिकारी यांनी मागण्यांचे निवेदन घेतल़े  यावेळी त्यांना सांगितले की, तालुक्यात राशन धारक कुटुंबातील सर्व सदस्यांचे थंब फक्त १० टक्केच पूर्ण झाले आहे़त अजून हजारो कुटुंब यापासून वंचित आहे़त २९ जानेवारी त्याचा  अंतिम दिनांक होत़ा याची दखल घेत त्यांनी एक महिना अवधी वाढवित असल्याचे जाहीर केल़े. निवेदनात म्हटले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आयोग अधिनियमांतर्गत गरीब लोकांसाठी  अन्न सुरक्षा एक अधिकार आह़े मात्र या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाह़ी कायद्यांतर्गत अन्न सुरक्षा सुविधेपासून एकही गरीब आणि दुर्बल व्यक्ती वंचित राहता कामा  नय़े ए़नप़ीए़स अंतर्गत १ कोटीहून अधिक प्राप्त लाभधारक प़ीड़ीए़स प्रणालीतील तांत्रिक त्रुटीमुळे शिधा (राशन) वाटप दुकांनातून शिधा प्राप्त करण्यास असमर्थ आहे़त जोपर्यंत शेवटच्या  व्यक्तीच्या प़ीड़ीए़समध्ये यशस्वीरित्या नोंदणी केली जात नाही तोपर्यंत एकाही पात्र लाभार्थ्याला खाद्य सुरक्षेपासून वंचित केले जाऊ नय़े कुटुंबप्रमुखाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ५९ हजार  रूपयांवरून १ लाख रूपये करण्यात याव़े तसेच राज्यभरता अन्न सुरक्षा योजनेत ऑक्टोबर २०१४ पासून राशन पासून वंचित करण्यात आलेल्या एप़ीए़ल केसी कार्डधारकांचा  पुन्हा समावेश करण्यात याव़ा.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget