Halloween Costume ideas 2015

पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदर्श जीवनचरित्र (उत्तरार्ध)

-एम. हुसैन गुरुजी
ताइफचा प्रवास
पैगंबर मुहम्मद (स.) त्यांच्या एका साथीदारास घेऊन ताइफच्या प्रवासाला रवाना झाले. ताइफची वस्ती मक्केपासून ऐंशी मैलांवर स्थितहोती. तेथील सरदारांपुढे पैगंबरांनी इस्लामचे आवाहन सादर केले. परतु ताइफवासियांनी पैगंबरांचे आवाहन स्वीकारले नाही. उलट त्यांच्यासोबत खूप वाईट वर्तन केले. त्यांनी काही दुराचारींना त्यांना त्रास देण्याकरिता लावून दिले. त्यांनी दगडांचा इतका वर्षाव केला की पैगंबर रक्तबंबाळ झाले. त्याच्या बुटांमध्ये रक्त गोठले. ही अत्यंत दु:खदायक आणि कठीण घटना होती.
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे सगळे प्रयत्न मानवांच्या मार्गदर्शन व पथप्रदर्शन आणि त्यांना मरणोत्तर जीवनात नरकाग्नीपासून सुरक्षित राखण्यासाठी होते. लोक मात्र या गोष्टींपासून अनभिज्ञ होते. शेवटी पैगंबर मक्केस परतले.
हिजरतची घटना
मक्केत सतत तेरा वर्षे अत्याचार सहन केल्यानंतर अल्लाहकडून एक आदेश झाला की आता मक्केहून हिजरत (स्थलांतर) करून मदीनेस प्रस्थान करावे. कारण मक्केत जीवन जगणे त्यांना अजिर्ण झाले होते. त्यांनी आपल्या सोबत्यांनादेखील मदीनेस जाण्याची आज्ञा केली. ते स्वत:सुद्धा इ. सन ६२४ मध्ये मक्का सोडून मदीनेकडे रवाना झाले. या प्रवासाला ‘हिजरत’ म्हणतात. मक्केतून हिजरतच्या रात्री मदीना रवानगीच्या प्रसंगी मक्कावासियांच्या मौल्यवान ठेवी त्यांच्याजवळ ठेवण्यात आल्या होत्या. त्यांनी त्या सुरक्षितपणे सर्व संबंधितांना परतीची व्यवस्था केली. हिजरतच्या घटनेचा तपशील खूपच ईमानवर्धक आहे परंतु येथे संक्षिप्त वर्णनास पर्याप्त समजले जात आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) मदीनेत
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मदीनेत शुभागमन झाले. येथे त्यांच्या अनुयायांची एक चांगली अशी विशेष संख्या अगोदरपासून उपस्थित होती. त्यांनी त्यांचीसाथ देण्याचे अभिवचन दिले. मदीनेत यहुदी धर्मीयांचीसुद्धा वसाहत होती. येथे पोहचून पैगंबरांनी इस्लामच्या संदेशास सार्वजनिक स्वरूप देण्याचा क्रम सुरू ठेवला. मदीनेत एक सवलत मिळाली की इस्लामी शिकवणीच्या प्रकाशात एक इस्लामी सोसायटी आणि क्रमश: एक इस्लामी व्यवस्था प्रस्थापित करण्याचा मार्ग उघडला गेला. परंतु मक्केच्या विरोधकांनी त्यांना शांततापूर्वक कार्य करण्याची संधी मिळू दिली नाही. त्यांनी योजना तयार करून सैन्याची उभारणी केली आणि मदीनेवर आक्रमण करण्याचा दृढ निर्धार केला.
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शांतताप्रिय आणि मनावांशी प्रेमाचे नाते एक महत्त्वपूर्ण पुराव्याची साक्ष पटविणारी ही घटना होय. मक्केत भयंकर दुष्काळ पडला होता. परंतु ते मदीनेत असल्यामुळे तिथे रक्कम गोळा करून पाचशे सुवर्ण नाणी अर्थात दीनार कुरैश सरदार अबू सुफियान यांच्याकडे पाठविले. जरी ते आणि मक्कावासी त्यांचे मोठे शत्रू होते.
मदीनेत यहुद्यांनी त्यांच्याशी समझोता केला. ही संधी शांती व धार्मिक स्वातंत्र्याची साक्ष होती. मदीनेत इस्लामी व्यवस्थेच्या प्रमुखाच्या मानाने त्यांनी दुसरा धर्म असलेल्या यहुद्यांचे मूलभूत अधिकार, त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य, त्यांच्या प्रार्थनास्थळांच्या आदराचा समझोता केला. यास ‘मिसाक मदीना’ अर्थात ‘मदीनेचा वचननामा’ म्हणतात. तरीही यहुदी नेहमी या कराराची अवज्ञा करीत राहिले. याव्यतिरिक्त त्यांनी वेळोवेळी कटकारस्थानांच्या माध्यमातून मुहम्मद (स.) व त्यांच्या सोबत्यांविरूद्ध युद्धक योजना बनविल्या.
मदीना वास्तव्याच्या काळात पैगंबर मुहम्मद (स.) यांना मक्का व भोवतालच्या जनजाती आणि यहुद्यांशी लहान मोठी युद्धे करावी लागली. त्यांची संख्या ८२ आहे. यात २७ युद्धांत मुहम्मद (स.) स्वत: सहभागी झाले होते. या युद्धांत दोन्ही बाजूंकडील ठार होणाऱ्यांची संख्या १०१८ आणि अटक होणाऱ्याची संख्या ६५६५ आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी युद्धाचा उद्देश व पद्धतींना आपल्या नैतिक शिकवणींद्वारे मानवी व रचनात्मक स्वरूप व दिशा दिली. समस्त मानवी इतिहासात याचे एखादे उदाहरण आम्हास आढळत नाही. पैगंबरांनी आपल्या सोबत्यांना युद्धाच्या बाबतीत दिलेल्यासूचना व मार्गदशनावर सर्वांनी मानवतावादी दृष्टिोकनातून अवश्य विचार करावा.
प्रतिज्ञाभंग करू नये. शत्रूचे नाक, कान व अन्य अवयव कापू नये. स्त्रिया, निर्बल व अल्पवयस्क, वृद्ध व गुलामांना ठार मारू नये. शेतीवाडीचा सर्वनाश करू नये. फळे असलेले वृक्ष कापू नये आणि पशुंची हत्या करू नये. प्रतिनिधी, राजदूत यांची हत्या करू नये. प्रार्थनागृहांना उद्ध्वस्त करू नये. जे शस्त्रे टाकतील त्यांना ठार करू नये. रात्रीत एखाद्या शत्रूच्या जवळ गेला तर सकाळ होण्यापूर्वी छापा मारू नये.
या युद्धांत मक्का विजय सोडून उर्वरित युद्धांत त्यांनी स्वत:हून प्रथम वार कधी केला नाही. किंबहुना आपल्या व मदीनेच्या रहिवाशांच्या बचावासाठी युद्ध केले गेले. एका प्रसंगी झालेल्या हुदैबियाच्या तहाची घटना सर्वश्रुत व अत्यंत प्रसिद्ध आहे. ते या समझोत्यात अशा शर्ती मान्य करण्यास तयार झाले, ज्यात उघडपणे मुस्लिमांचा अशक्तपणा प्कट होतहोता. या आधारावर त्यांच्या अनुयायी सोबत्यांना हा तह नापसंत वाटत होता. याची एक अट अशी होती की उभयपक्षी परस्परांत दहा वर्षांपर्यंत युद्ध करणार नाहीत. ही महत्त्वपूर्ण अट त्यांच्या शांतताप्रियतेचा सबळ पुरावा होय. मदीनेत सततच्या प्रयत्नांच्या परिणास्वरूप मोठ्या संख्येने लोकांनी इस्लाम स्वीकार केला. येथपर्यंत की पैगंबर दहा हजारांचे सैन्य घेऊन मक्केस रवाना झाले.
मक्का विजय
जगाच्या इतिहासातील ही अद्भूत व अद्वितीय घटना आहे की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मानवांचे रक्त सांडल्याविना मक्केवर विजय संपादन केला. त्यांनी यासाठी उत्कृष्ट वूâटनीतीचा अवलंब केला. काही मनुष्यप्राणी अवश्य मृत्यूमुखी पडले. परंतु व्यवस्थीतपणे कोणत्याही प्रकारच्या संघर्षाची स्थिती उद्भवली नाही आणि ते मक्केत विजेता म्हणून प्रविष्ट झाले. या वेळी त्यांच्या जिभेवर अल्लाहची प्रशंसा व माहात्म्य सुरू होते. उंटावर स्वार पैगंबरांचे डोके विनम्रतेने झुकलेले होते. या प्रसंगी त्यांच्याकडून खाली दिलेल्या उद्घोषणा करण्यात आल्या.
जी व्यक्ती काबागृहात प्रवेश करील त्यास शरण आहे. जो मनुष्य आपल्या घरात दरवाजा बंद करील त्याला शरण आहे. जो कोणी शस्त्रे टाकील त्यास शरण आहे. पळणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग केला जाऊ नये आणि जखमी व वैâद्यास ठार मारू नये.
विचार करा की मक्केवर कसे आक्रमण झाले! मक्का अशा तऱ्हेने जिंकला गेला की यात अजिबात रक्तपात झाला नाही. विश्वकरुणासूर्य मुहम्मद (स.) यांचे हे खूप मोठे उदाहरण होय. मक्का विजयाच्या प्रसंगी मोठमोठे सरदार पराभूत मनोवृत्तीने उपस्थित होते.ज्यांनी त्याच्यावर आणि त्याच्या सोबत्यांवर अनन्वीत व अमर्याद अत्याचार व जुलूम केले होते, निरपराध लोकांना ठार मारण्यात आले होते. निवासस्थाने व मालमत्तेवर ताबा ताबा मिळविण्यात आला होता. प्रचंड लूटमार केली होती. हे सगळे युद्धक अपराधी होते. जर त्यांना ठार करण्याचा त्यांनी आदेश दिला असता तरी कोणत्याही कायद्यान्वये ते चुकीचे ठरले नसते. सरदारांना त्याच्या समोर सादर केले गेले. ते सगळे माना खाली घालून उभे होते. या वेळी पैगंबरांनी हे ऐतिहासिक विधान फरमाविले,
‘‘जा, आज तुम्ही सर्व स्वतंत्र आहात. आज तुमच्यावर कोणतीही पकड नाही!’’
मानवतेच्या इतिहासात असे एखादे उदाहरण उपलब्ध आहे काय?
मृत्यू
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे दु:खद निधन इ. सन ६३४ मध्ये वयाच्या ६३ व्या वर्षी झाले. त्यांनी कोणतेही सामान आपल्या वारसात सोडले नाही. मृत्यूसमयी त्यांच्या वाचेतून हे शब्द निघाले : नमाज, नमाज, सेविका आणि गुलाम!
आम्ही कितीतरी धार्मिक नेत्यांना पाहत असत की ते कोट्यवधींच्या मिळकतीचे मालक होत असतात. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वारसामध्ये कोणतीही उल्लेखनीय वस्तू नव्हती.
(उत्तरार्ध)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget