Halloween Costume ideas 2015

‘दीन’ राज्यसत्तेच्या स्थितीत : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) यांनी ‘सूरह निसा’च्या ज्या आयतचा संदर्भ दिला आहे त्यापूर्वी अल्लाहने सांगितले आहे, ‘‘तुमच्यापूर्वी बनीइस्राईलना आम्ही आपली ठेव सोपविली होती, परंतु त्यांनी त्यात अफरातफर व बेईमानी केल्यामुळे अल्लाहचा कोप त्यांच्यावर कोसळला. जनसमुदायाच्या नेतृत्वाचा अधिकार त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आला आणि त्या काळात अनेकेश्वरत्वाचा अवलंब करणाऱ्यांची गुलामी त्यांच्या वाट्याला आली. आता तुम्हाला त्यांची जागा दिली जात आहे. तुम्हाला तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आणि मोठी शासनव्यवस्था देण्यात आली आहे. खबरदार! बनीइस्राईलसारखी अफरातफर आणि बेईमानी करू नका. आम्ही ज्यांना तौरात दिला होता त्यांना उपदेश केला होता की अवज्ञा करू नका, दिलेले वचन पाळा, ग्रंथाशी अप्रामाणिकपणा करू नका, परंतु त्यांनी कृतघ्नता, बेईमानी व बंडखोरीचा मार्ग अवलंबिला त्यामुळे त्यांना वाईट परिणाम भोगावे लागले, आणि आता तुम्हाला (हे मुहम्मदचा जनसमुदाय) तुम्हाला उपदेश करीत आहोत की ईशपरायणतेच्या मार्गाचा अवलंब करा, वचनभंग करू नका, कुरआनचा मार्ग सोडून आमच्या कोपाला आमंत्रण देऊ नका.’’ आणि त्यानंतर असा उपदेश देण्यात आला की ‘‘हे ईमानधारकांनो! न्याय व निवाड्याच्या या ईशव्यवस्थेचे कोणत्याही परिस्थितीत रक्षण करा.’’
    हाच विषय शब्दांच्या थोड्याफार फरकासह ‘सूरह माइदा’ मध्येदेखील पुन्हा एकदा सांगितला गेला आहे. ‘सूरह माइदा’ अंतिम आदेशात्मक सूरह आहे. यात कायदा पूर्ण करण्यात आला आहे. यानंतर कोणताही आदेशात्मक सूरह अवतरित झाला नाही. हा सूरह अरफातमध्ये अवतरित झाला. याचे वर्णन असे आहे की जणू सरतेशेवटी जनसमुदायाकडून या मैदानात वचन घेतला जात आहे की ‘‘पाहा, ईशदेणगी पूर्ण करण्यात आली आहे. एक मोठी शासनव्यवस्था तुमच्या सुपूर्द करण्यात आली आहे. आता तुमचे कर्तव्य आहे की आम्हाला दिलेल्या वचनावर दृढ राहा अन्यथा लक्षात ठेवा, बनीइस्राईलचा इतिहास तुमच्या समोर आहे. त्यांनी वचनभंग केले तेव्हा कसे अपमानित व बदनाम झाले.’’
    ही आहे धर्मव्यवस्था आणि तिचा आदर, किमंत व महत्त्वावर दु:ख वाटते की मुस्लिम जनसमुदायाने ही व्यवस्था हातची जाऊ दिली आणि वाईट या गोष्टीचे वाटते की हा जनसमुदाय गाढ झोपेत आहे–
‘‘वाए नाकामी मता-ए-कारवाँ जाता रहा, कारवाँ के दिल से एहसास-ए-जियाँ जाता रहा.’’
जमाअत बनविणे
    माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तीन मनुष्य प्रवासाला निघाले तर त्यांनी आपल्यापैकी एकाला ‘अमीर’ (नेता) बनवावे.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : इस्लामी धर्मगुरू इब्ने तैमिया (रह.) म्हणतात की प्रवासादरम्यान लोकांवर जमाअत (गट, समुदाय, संघटना) बनविणे अनिवार्य करण्यात आले आहे त्यामुळे ही गोष्ट आणखीनच आवश्यक आहे की ईमानधारकांनी एक ‘जमाअत’ बनवावी, कारण त्यांची जमाअती व्यवस्था बिघडली आहे. मुस्लिमांनांसाठी एकट्याने जीवन व्यतीत करणे निषिद्ध आहे.
    माननीय अब्दुल्लाह बिन अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जंगलात राहणारे तीन माणसांनी एकेकटे राहणे अवैध आहे. त्यांनी आपल्यापैकी एकाला आपला ‘अमीर’ (नेता) बनवावा.’’ (हदीस : मुन्तका)
    माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याप्रमाणे शेळ्या-मेंढ्यांचा शत्रू कोल्हा आहे आणि आपल्या कळपातून वेगळी होणाऱ्या शेळ्यांची तो सहजतेने शिकार करतो, त्याचप्रमाणे शैतान मानवाचा कोल्हा आहे. जर लोक जमाअत बनवून राहिले नाहीत तर तो त्यांना एकेकाला गाठून त्यांची सहजतेने शिकार करतो.’’ (हदीस : मुस्नद अहमद, मिश्कात)
स्पष्टीकरण : ‘‘हे लोकहो! एकएकटे राहू नका, तुमच्यासाठी आवश्यक आहे की जमाअत व सामान्य मुस्लिमांसह वास्तव्य करा.’’
    ‘‘जमाअतसह राहा’’ हा त्यावेळचा आदेश आहे जेव्हा मुस्लिमांची ‘अल-जमाअत’ अस्तित्वात असेल आणि अस्तित्वात नसेल तर काय? हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचे सरळ व साधे उत्तर म्हणजे जमाअत बनवा जेणेकरून ‘अल-जमाअत’ अस्तित्वात यावी.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget