Halloween Costume ideas 2015

रमजानचे रोजे व सकारात्मक बदल


इस्लाम धर्मामध्ये रमजान व रोजा यास असाधारण महत्व प्राप्त आहे.रमजान महिन्याला महत्व फक्त कुरआन अवतरण झाल्यामुळे प्राप्त झालेला आहे. कुरआनच्या अध्याय दोन श्लोक 185 मध्ये याचा उल्लेख आहे.

"रमजान तो महिना आहे ज्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले जो पूर्ण मानव जातीसाठी सत्य मार्ग दाखविणारा आहे".

रमजान आणि कुरआनचा संबंध आपल्याला ह्या गोष्टीवरूनही कळेल की रमजान महिन्यांमध्ये रोज रात्री एक विशेष नमाज तराव्ही असते ज्यामध्ये कुरआनचे 30 पैकी किमान एक खंड तरी रोज वाचला जातो.ही एक ते दीड तासाची विशेष नमाज रमजान मध्ये फक्त कुरआनसाठी असते.

रोजा मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला वाटते तो दिवस भर भुका राहुन अन्न व पाणी त्यागणे आहे पण रोज्यामध्ये फक्त खाण्यापिण्यावर निर्बंध नसतात तर अनेक गोष्टी आहेत ज्या रोज्यामध्ये आपण करू शकत नाही. सहरी (सकाळचे जेवण) ते इफ्तार (उपवास सोडे) पर्यंत पती-पत्नीमधील शारीरिक संबंधवर ही निर्बंध असते.

रोजा ठेवून खोट बोलण्यासंबंधी प्रेषित मोहम्मद (सल्ल.) यांनी सांगितले की "ज्याने रोजा ठेवूनही खोटं बोलणे सोडले नाही तर अल्लाहला त्या श्रधावांताच्या रोज्याची काहीच आवश्यकता नाही त्याने रोजा ठेवणे न ठेवणे सारखेच आहे"

एवढेच नव्हे तर प्रेषित प्रवचन मध्ये असे सांगण्यात आलेले आहे की रमजानमध्ये जर कोणी तुम्हाला भांडण करून शिवीगाळ करत असेल तर त्याचे उत्तर देऊ नका फक्त त्याला सांगा मी रोज्याने आहे आणि मी भांडण किंवा तुझ्याशी शिवीगाळ करू शकत नाही.

आपण जर विचार केला तर रमजान हा एक प्रशिक्षण शिबिर सारखा आहे जो दरवर्षी एका महिन्यासाठी श्रद्धावंत करिता आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी व सुकर्म करण्यासाठी तसेच दुष्कर्मवर नियंत्रण करण्यासाठी ठेवला जातो.हा एक महिना प्रशिक्षण घेऊन बाकी अकरा महिने याच पद्धतीने आपण जीवन जागाव आणि ज्या गोष्टी आपण ह्या महिन्यात ईशभय ठेवून करत होतो तोच आपण इतर महिन्यात ही करावं हा रमजान महिन्याचा मूळ उद्देश आहे.

म्हणून कुरआन मध्ये रोजाचे मूळ उद्देश बदल असा उल्लेख आहे की 

"हे श्रद्धावंतानो आम्ही तुमच्यावर रमजानचे रोजे अनिवार्य केले आहे जेणेकरून तुमच्या मध्ये ईशभय निर्माण होईल." (अध्याय 2,श्लोक 183).

माणसाच्या दुष्कृत्यांचे मूळ म्हणजे त्याचे पोट म्हणजेच भूक आणि लैंगिक इच्छा.या दोन गोष्टींवर योग्य नियंत्रण ठेवून मनुष्याला रोजा द्वारे प्रशिक्षण दिले जाते.रमजान व रोज्यामुळे ईशभय कसे निर्माण होते याची एक उत्तम उदाहरण आपण समजू शकतो एखादा माणूस रोजा ठेवत असेल आणि त्याला दुपारी खुप तहान लागलेली असताना घरात एकटा असेल तरी एक थेंब पाणी आपल्या कंठा खाली जाऊ देत नाही कारण त्याला माहित आहे की मला जर कोणी पाहत नसेल तरी तो एकमेव जग निर्माता मला पाहत आहे आणि फक्त पाहत नसून तो माझ्या कर्माची नोंद घेत आहे. हाच ईशभय आपण जीवनभर पाडाव हा रमजानच्या मूळ उद्देश आहे.म्हणून रोज्या बद्दल हे प्रवचन आहे की फक्त पोटाच रोजा नव्हे तर डोळ्यांचं, जिभेनेच, हाताचा, कानाचा व पायाचा पण रोजा असते. ह्या अवयवांचा रोजा म्हणजे यांना वाईट कृती पासून दूर ठेवणे आहे.एक महिना सतत चांगल्या गोष्टी अंगीकरण केल्यामुळे व वाईट गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करण्यामुळे रमजान नंतरही अकरा महीने ईश्वरीय संदेश वर आपले जीवन जागणे श्रद्धावंत करिता सोपे जाते.

रमजानमध्ये रोजा ठेवून ही वाईट गोष्टी सोडल्या नाही तर अशा रोजाधारकांबद्दल प्रेषित मोहम्मद (सल्ल.) यांनी सांगितले की " त्यांना त्यांच्या रोजा पासून काहीच मिळत नाही."

म्हणजे त्यांना रोजा पासून न पुण्य मिळते न काही सकारात्मक बदल. प्रेषित मोहम्मद (सल्ल.) यांनी इस्लाम धर्मातील रोज्याची शिकवणी मध्ये हे स्पष्ट केले की "ज्याने पूर्ण श्रद्धा व पुनरावलोकन करून रमजानचे रोजे केले त्याचे मागील पाप नष्ट होतात."

श्रद्धेनंतर पुनरावलोकन म्हणजे आपल्या कृत्यचे अवलोकन (आढावा) करून आपली वस्तुनिष्ठ स्तुती आपल्या डोळ्यासमोर ठेवून की मी आजपर्यंत किती पाप केले व किती जणांना त्रास दिला. माझ्याकडून किती लोकांना चांगले आणि किती लोकांना वाईट मिळाले आणि जर आपण स्वतःचा आढावा घेतला नाही तर रमजान आणि रोजा हा वाया गेला समजावं.

- शेख गुलाम जावेद

रा.वसमत जि. हिंगोली, 

9822677448


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget