बॉलीवुडच्या भाई-भतीजा वादावर मुखरपणे बोलणार्या अभिनेत्यांपैकी अभिनेत्री कंगना रानावत एक प्रमुख नाव आहे. याच आठवड्यात तीने ’मुंबईत आपल्याला पाकव्याप्त कश्मीर सारखी परिस्थिती वाटत आहे’ असे वक्तव्य केले. पुढे तीने असेही म्हटलेले आहे की, तिला मुंबई पोलिसांची भीती वाटते. वास्तविक पाहता तिचे हे वक्तव्य राष्ट्रविरोधी या श्रेणीत मोडणारे असतांनासुद्धा भाजपच्या पाठीराख्यांनी तिची पाठराखण केलेली आहे. वाचकांना आठवत असेल अभिनेता आमीर खान याने एका बक्षीस समारंभामध्ये म्हटले होते की, त्याची पत्नी किरण राव हिला देशातील जातीय परिस्थितीची भीती वाटत असून, मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने दुसर्या देशात जावून रहावेसे वाटते. यावर केवढा गहजब झाला होता. हिंदुत्ववाद्यांनी आमीरखानला राष्ट्रद्रोही ठरवून टाकले होते. अलिकडे छद्म राष्ट्रवाद मोठ्या प्रमाणात वाढला असून, एकाच प्रकारच्या वक्तव्याचे सोयीने दोन अर्थ काढले जात आहेत. एकच वाक्य कोण बोलतंय यावर त्याचा अर्थ अवलंबून आहे. कंगनाच्या या वक्तव्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला असून, कंगनानेही मी मुंबईत येतेय कोणाच्या बापामध्ये दम असेल त्यांनी अडवून दाखवावे, असे प्रती वक्तव्य केले आहे.
मुळात कंगनाच्या अशा वक्तव्यावरून राष्ट्रवादाची भावना या लोकांनी किती खालच्या स्तरावर नेऊन ठेवली आहे, याचे :ख वाटते. कोरोनाचे रूग्ण 37 लाखाच्या पुढे गेले असून, चीन दारासमोर येऊन उभा आहे. अशावेळी देशात एकोप्याची गरज असताना असे मतभेद चांगले नाहीत. तूर्त एवढेच.
मुळात कंगनाच्या अशा वक्तव्यावरून राष्ट्रवादाची भावना या लोकांनी किती खालच्या स्तरावर नेऊन ठेवली आहे, याचे :ख वाटते. कोरोनाचे रूग्ण 37 लाखाच्या पुढे गेले असून, चीन दारासमोर येऊन उभा आहे. अशावेळी देशात एकोप्याची गरज असताना असे मतभेद चांगले नाहीत. तूर्त एवढेच.
Post a Comment