Halloween Costume ideas 2015

न्यूझिलँडमध्ये इस्लामोफोबीयाचा आविष्कार

अंधेरी रात थकी हिम्मतें गिरां मंजील
सलामती की दुआ मांग कारवां के लिए

न्यूयॉर्क येथील ट्विन टॉवर वर 11/9/2001 रोजी घडवून आणलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकन प्रसार माध्यमांनी जगाला दोन नवीन शब्द दिले. एक, ’’इस्लामी टेररिझम व दोन इस्लामोफोबिया’’. या आठवड्यात आपण इस्लामोफोबियावर चर्चा करूया.

न्यूझिलँड

शांततेच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेला न्यूझिलैंड हा छोटासा देश दक्षिण पॅसिफिक महासागरातील एक सार्वभौम बेटांचा दोन भागात विभागलेला समूह आहे. ज्याचे  क्षेत्रफळ 268.021 चौरस किलोमीटर आहे. जनसंख्या 49 लाखापेक्षा थोडीसी अधिक आहे. त्यात 74 टक्के लोक युरोपियन वंशाचे तर 11.8 टक्के लोक एशियाई आहेत. न्यूझिलँडच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षा थोडेसे जास्त मुस्लिम आहेत.

प्रत्यक्ष घटना आणि त्यामागची मानसिकता

15 मार्चला क्राईस्टचर्च शहरातील ’अल-नूर’ आणि ’लिनवुड’ नावांच्या मशिदीमध्ये घुसून एका अप्रवासी ऑस्ट्रेलियाई नागरिकाने ज्याचे नाव ब्रेंटन टॅरेंट (वय 28) होते ने दोन  स्वयंचलित बंदूकीतून बेछूट गोळीबार करून 50 भाविकांचा बळी घेतला. घटनेपूर्वी समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या 74 पानी पत्रात त्याने स्वतः या हल्ल्यासंबंधी जी माहिती शेअर केली  त्याचे विश्लेषण करता खालील गोष्टी स्पष्ट होतात. एक तर तो स्वतःला गौरवर्णीय/ श्रेष्ठ वंशीय तर इतरांना हल्नया दर्जाचे लोक समजतो. त्याचे आदर्श पुरूष अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असल्याचे त्याने या पत्रात नमूद केलेले आहे. यावरूनच त्याच्या मानसिकतेची पुरेशी कल्पना यावी. आपल्या पत्रात त्याने मुस्लिमांवर जे आरोप केलेले आहेत त्याचा  थोडक्यात सार असा की, मुस्लिम हे आक्रमणकारी असून, युरोप आणि अमेरिका तसेच अन्य गौरवर्णीय लोकांच्या देशात घुसखोरी करून तेथील श्रेष्ठ संस्कृती नष्ट करीत आहेत.  शिवाय, अनेक मुस्लिमांनी आतंकवादाच्या माध्यमातून अनेक गौरवर्णीयांना अनाठायी जीवे मारले आहे.

प्रत्यक्ष स्थिती

ब्रेंटेन टॅरेंटने आपल्या पत्रात आंतरराष्ट्रीय मुस्लिम समुदायावर लावलेले आरोप कमी जास्त प्रमाणात तेच आहेत जे पश्चिमी मीडिया लावत आलेला आहे. या संबंधी विवेचन केल्याशिवाय, आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हणून सुरूवात, ’’फोबिया’’ या शब्दापासून करूया. फोबिया म्हणजे भिती. हा एक मानसिक आजार आहे. कोणाला अंधाराची भीती  वाटते तर कोणाला पाण्याची तर कोणाला उंचीची भिती वाटते. काही लोकांना अशीच भिती इस्लामबद्दल वाटते, असा व्यापक समज तयार करण्यात जागतिक प्रसार माध्यमांना यश  आलेले आहे, हे मात्र स्विकार करावे लागेल. जरी ही भीती अनाठायी वाटत असली तरी खरी परिस्थिती तशी नाही. होय ! अनेक लोकांना इस्लामची भीती वाटते आणि तशी ती  वाटायलाच हवी. पण कोणाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लबाड भांडवलदारांना, भ्रष्ट राजकारण्यांना, माणसा-माणसांमध्ये भेद करणाऱ्यांना, गरीबांना गुलाम समजणाऱ्यांना, मद्य  सम्राटांना, चक्रवाढ व्याज आकारून ’नाही रे’ गटातील लोकांचे शोषण करणाऱ्यांना, अश्लिल चित्रपट मालिका तयार करणाऱ्यांना, त्यांचे वितरण करणाऱ्यांना, कलेच्या नावाखाली हिडीस  संगीत व फॅशनच्या नावाखाली महिला व मुलींचे शोषण करणाऱ्यांना, वेश्याव्यवसाय करविणाऱ्यांना, दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करणाऱ्यांना, अंमली पदार्थांचा व्यापार करून स्वतःचे  उखळ पांढरे करणाऱ्यांना इस्लामची भीती वाटते, हा इतिहास आहे. अशीच भीती सातव्या शतकात इस्लामचे प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांनी, ’’इस्लाम’’ या शब्दाचा उच्चार करताच  मक्कातील धनदांडग्यांना, अनैतिक व्यापारामध्ये लिप्त असणाऱ्यांना, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वाटली होती. तीच भीती आज 21 व्या शतकातील अपप्रवृत्ती असलेल्या लोकांना वाटत आहे, हा इस्लामचा एका प्रकारचा विजयच आहे. 1991 पासून सुरू असलेले इस्लामविरूद्ध भांडवलदार देश यांच्यातील शीतयुद्ध इस्लाम हळूहळू जिंकत असल्याचे पाहून  भांडवलदारांचे पित्त खवळणारच. कशाचीही आणि कोणाचीही परवा न करता वर नमूद सर्व वाईट गोष्टींचा विरोध करणारी जगात एकमेव जीवन व्यवस्था म्हणजे इस्लाम होय.  बाकीच्या जीवन पद्धतींनी वर नमूद खल प्रवृत्तींसमोर कधीचीच शरणागती पत्करलेली आहे.
चंगळवादी भांडवलदारांची डोकेदुखी वाढण्याचे कारण म्हणजे त्यांचे स्वतःचे नागरिक इस्लामचा जाणीवपूर्वक स्वीकार करत आहेत व असे करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही केल्या याला आळा बसत नाहीये, म्हणून त्यांची माथी भडकत आहेत. ’पियू फोरम’ सारख्या प्रतिष्ठित अमेरिकन सर्वे कंपनीच्या अनेक सर्वेक्षण अहवालामधून ही बाब स्पष्ट  झालेली आहे की, युरोप आणि अमेरिकेमध्ये इस्लामसर्वाधिक वेगात वाढणारा धर्म आहे.
स्पष्ट आहे, इस्लाम केवळ काही धार्मिक रिच्युअल्स (कर्मकांड) पुरता मर्यादित असता तर कधीच वाढला नसता. इस्लाम एक स्वच्छ, सुंदर, साधी आणि नैतिक जीवन जगण्याची परीपूर्ण व्यवस्था आहे हे लक्षात येत असल्यामुळेच युरोप आणि अमेरिकेचे ते लोक जे त्यांच्या मूळ अनैतिक जीवन पद्धतीला कंटाळलेले आहेत, इस्लामच्या शीतल छायेखाली येत  आहेत. याच गोष्टीची टेरंट सारख्या खलप्रवृत्तीच्या लोकांना भीती वाटते. त्यांना वाटते हे आपल्या धर्म आणि संस्कृतीवर आक्रमण आहे. त्यांच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे इस्लामच्या  वाढत्या प्रभावाने त्यांचा धर्म आणि संस्कृती धोक्यात आलेली आहे.
ज्याप्रमाणे कुठल्याही डिबेट दरम्यान, ज्यांच्याकडे मुद्दे संपतात ते गुद्यांवर येतात, अगदी त्याचप्रमाणे इस्लामच्या नैसर्गिक विचारांचा सामना आपल्या पोकळ विचारांनी करता येत  नसल्याचे लक्षात येताच टेरंट सारखे लोक हातात बंदुका घेऊन मुस्लिमांना ठार करत सुटलेले आहेत. अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी ज्या-ज्या मुस्लिम राष्ट्रांवर हल्ले करून  त्यांना बेचिराख केलेले आहे त्याचे मूळ कारणही इस्लाम विषयी वाटणारी भीतीच आहे. बुश ज्युनियर यांनी तर 9/11 च्या हल्ल्यानंतर वेजींग वॉर अगेन्स्ट इस्लामिक टेररिझमला  ’क्रुसेड’ असे संबोधले होते. हे वाचकांच्या लक्षात असेलच. परंतु, या लोकांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही की, इस्लाम ही नैसर्गिक जीवन पद्धती आहे.
तिचा विरोध अनाठायी आहे. कारण की,
जहां में अहले इमां मानिंद-ए-खुर्शिद जीते हैं
इधर डूबे उधर निकले उधर डूबे इधर निकले

उध्वस्त पाश्चिमात्य संस्कृती

मुळात युरोप आणि अमेरिकेचा समाज खिळखिळा झालेला आहे. कुटुंब व्यवस्था उध्वस्त झालेली आहे. तरूण पीढि अमली पदार्थ आणि मुक्त लैंगिक संबंधाच्या आहारी गेलेली आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होऊन त्याचे रूपांतर स्वैराचारात झालेले आहे. म्हणून सामाजिक जीवन व्यवस्थेच्या मोडकळीस आलेल्या या जहाजामधून सावध होऊन काही लोक स्वतः व  स्वतःच्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी पूर्ण विचाराअंती इस्लामच्या सुरक्षित जहाजामध्ये प्रवेश करत आहेत. ट्रम्प असो का संघ कोणीही कितीही द्वेष केला तरी इस्लामची ही घौडदौड  थांबविणे आता कोणालाही शक्य नाही. अमेरिकन सिनेटच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अमेरिकन इतिहासात पहिल्यांदा दोन मुस्लिम महिलांना निवडून जाण्यापासून स्वतःला  पस्तीसमारखान समजणाऱ्या ट्रम्पना देखील शक्य झालेले नाही. त्यामुळे प्रत्येक सद्सद् विवेकबुद्धी असणाऱ्या व्यक्तीला पूर्वग्रह दूर सारून इस्लामचा पुन्हा एकदा नव्याने अभ्यास  करण्याची हीच योग्य वेळ आहे, यात कुठलीही शंका नाही. कोणाला किती जरी वाईट वाटले तरी इस्लामची घौडदौड काही केल्या थांबणार नाही, याची भविष्यवाणी कुरआनमध्येच  करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर खालील आयात वाचून कदाचित वाचकांना आश्चर्य वाटेल, आपल्या पवित्र ग्रंथ कुरआनमध्ये अल्लाह म्हणतो की, ’’या लोकांची इच्छा आहे की,  अल्लाहच्या प्रकाशाला आपल्या फुंकरानी विझवून टाकावे पण अल्लाह आपल्या प्रकाशाला परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मग ते अश्रद्धावंतांना कितीही असह्य होवो.’’(सुरह तौबा आयत नं.32)

भांडवलशाहीचे अपयश

1991 साली युनायटेड सोव्हियत सोशालिस्ट रिपब्लिकच्या पतनानंतर साम्यवादी जीवन व्यवस्था निकालात निघाल्याचे जगाने मान्य केलेले आहे. भांडवलशाही सुद्धा धोक्यात असल्याचा इशारा मागच्याच आठवड्यात भारताच्या आरबीआयचे गव्हर्नर व ब्रिटनच्या इम्पेरियल (रिझर्व्ह) बँकचे होऊ घातलेले गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलेला आहे. बीबीसीच्या चॅनल फोर शी बोलतांना 14 मार्च रोजी त्यांनी सांगितले की, ’’भांडवलशाही व्यवस्था गंभीर धोक्याखाली आलेली आहे.’’ एकूणच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या सर्व आघाड्यांवर युरोप  आणि अमेरिकन जीवन व्यवस्था अपयशी ठरत आहे आणि संसाधन विहीन मुस्लिम इस्लामी जीवन व्यवस्था सुदृढ होत आहे. हे सहन न झाल्यामुळे ब्रेन्टन टॅरेंट सारखे लोक  पिसाळल्यासारखे वागत आहेत. जेव्हा समाजाची उस विस्कटते, संस्कृती लयाला जात असते तेव्हा अनेक जणांचे शेवटचे आश्रयस्थान ’राष्ट्रवाद आणि वंशवाद’ असते. त्यातूनच मग  स्वतःला सावरण्याचा हे लोक प्रयत्न करत असतात. पण ते व्यवस्थित जमत नसल्यामुळे त्यातून निर्माण झालेल्या कुंठेला वाट करून देण्यासाठी मग मुस्लिम देशांवर किंवा व्यक्तींवर  हल्ले असे राष्ट्र किंवा लोक करत असतात. कल्पना करा आज या क्षणी जागतिक मुस्लिम समुदायाने असे ठरविले की, युरोप आणि अमेरिकेच्या व्याजाधारित, चंगळवादी, भांडवलशाही, भ्रष्ट आणि अनैतिक जीवन पद्धतीला विरोध करायचा नाही. उलट त्यांच्या या ’पुण्यकर्मा’मध्ये सक्रीय साथ द्यावयाची तर या क्षणापासूनच या लोकांचा इस्लाम विरोध  संपेल व हे लोक मुस्लिमांच्या गळ्यात गळे टाकून फिरतील. याबाबतीत सुद्धा कुरआनने स्पष्ट म्हटलेले आहे की,’’ त्यांची तर इच्छाच आहे की, ज्याप्रमाणे ते स्वतः अश्रद्धांवत आहेत  त्याचप्रमाणे तुम्ही अश्रद्धावंत बनावे. म्हणजे तुम्ही व ते सर्वजण एकसारखेच व्हावेत.’’ (संदर्भ : सुने निसार आयत नं. 89).

भारतीय बहुसंख्यांकांची मानसिकता

पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणांमुळे नेमकी अशीच स्थिती आपल्या देशातही उत्पन्न झालेली आहे. विशेषतः शहरी समाज तर सर्व अपप्रवृत्तींना बळी पडलेला आहे. यासंबंधी एका कट्टर हिंदूत्ववादी विचारवंताचे विचार त्यांच्याच शब्दात खाली नमूद करत आहे.
’’ परानुकरण से बढकर राष्ट्र की अन्य कोई अवमानना नहीं हो सकती, हम स्मरण रख्खें की, अंधानुकरण याने प्रगती नहीं, वो तो आत्मिक पराधिनता की ओर ले जाता है.’’ (संदर्भ :  मा.स. गोळवलकर : विचार नवनीत पान क्र. 43).

भारतीय मुस्लिमांची भूमीका

सरतेशेवटी न्युझिलैंडमध्ये घडलेल्या मस्जिंदीवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय मुस्लिमांची भूमिका काय असावी? याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. त्या संबंधी माझे मत असे की,  मुस्लिमांच्या जगण्याचा जो मूळ उद्देश्य कुरआनमध्ये सांगितलेले आहे त्यापासून किमान भारतीय मुस्लिमांनी तरी ढळू नये. तो उद्देश्य काय आहे? हे आपण अगोदर समजून घेऊ या. कुरआनमध्ये मुस्लिमांसाठी जगण्याचा जो उद्देश्य दिलेला आहे तो खालीलप्रमाणे - ’’जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी  अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचाराला प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.’’ (सुरे आलेइमरान आयत नं. 110).
या आयातींविषयी भाष्य करताना जमाअत-एइस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) म्हणतात की, ’’ एक कौम (समूह) की जिंदगी का मकसद (उद्देश्य) तमाम बनी-नौ - इन्सान (अखिल जागतिक मानव समुदाय) की खिदमत करना. ये एक ऐसी बात है जिसके तखय्युल (खयाल) से क़ौमियत (समुदायवादी) व वतनियत (राष्ट्रवादी) की फिजा में  परवरीश पानेवाले तंग दिमाग आशना (परिचित) नहीं हैं. वो ’कौमपरस्ती या वतनपरस्ती’ को तो खूब जानते हैं. और कौमपरस्ती तो गोया उनके तखय्यूल की मेराज (सर्वोच्च स्थान) है. मगर जुगराफी (भौगोलिक) व नस्ली (वांशिक) हदबंदीयों (सिमाओं) से बालातर (उपर) होकर सारे आलम-ए-इन्सान की अमली खिदमत (प्रत्यक्ष सेवा) अंजाम देना और उसीको पूरी कौम का मकसद-ए-हयात (जीवनाचा उद्देश) करार देना, उनकी रसाई (पहूंच) से बहोत दूर है. इसलिए सबसे पहले हमें इसकी तशरीह (व्याख्या) करनी चाहिए के, ये ’उखरजतुल लिन्नास’ (लोगों की भलाई)्नया चीज है? (संदर्भ : अलजिहाद फिल इस्लाम पान क्र. 86).
माझ्या मते मुस्लिम होण्याचा अर्थ असा आहे की, मुस्लिमांनी नेकीचा आदेश द्यावा व वाईटापासून रोखावे. हे काम करणे हेच आपल्या जीवनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. स्पष्ट आहे नेकीकडे बोलाविणारा खल प्रवृत्तींच्या लोकांच्या डोळ्यामध्ये काट्यासारखा खुपतो. याचसाठी मोठ मोठ्या साधूसंत आणि प्रेषितांचा लोकांनी छळ केला. हा मानवतेचा इतिहास आहे. येशूख्रिस्त (अलै.), सॉक्रेटिस पासून ते तुकाराम महाराजांपर्यंत पुण्यवान समाजाच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील असल्यानेच त्यांना त्रास देण्यात आला. नव्हे अनेकांचे जीव घेण्यात आले.  आज इस्लामचे काही पाईक हेच काम करीत आहेत, किमान वैचारिक पातळीवर तरी ते आदर्श समाजरचनेचे स्वप्न उरी बाळगून आहेत. इस्लामला समतेवर आधारित, पुण्यवान,  लज्जाशील, आदर्श समाज निर्माण करावयाचा आहे व तो होऊ नये यासाठी चंगळवादी भ्रष्ट भांडवलशाहीचे पाईक रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपल्या हातात असलेल्या माध्यमांतून  इस्लामची बदनामी करत आहेत व मुस्लिमांवर हल्ले करत आहेत. अशा ढेपाळलेल्या व्यवस्थेमधून सुद्धा वाममार्गाला कंटाळून जे लोक इस्लामच्या गटात सामिल होत आहेत ही बाब काहींना इस्लामचे त्यांच्या संस्कृतीवरील आक्रमण वाटते, जे की चुकीचे आहे. वाममार्गाकडून सद्मार्गाकडे होणारे पलायन सहन न झाल्यामुळे बे्रटेंट टेरेन्ट सारखे लोक निरपराध  मुस्लिमांवर हल्ले करीत आहेत. त्यांना घाबरण्याची मुळीच गरज नाही. कारण
की... कत्ले-ए-हुसेन अस्ल में मर्ग-ए-यजीद है
इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद.

- एम.आय.शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget