Halloween Costume ideas 2015

विश्व-25

एखाद्या क्षेत्रात लोकसंख्या वाढली तर काय होते? नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अर्थात एनआयएनएच ऑफ यु.एस.च्या जॉन कॅल्हून चा या संबंधीचा प्रयोग फार प्रसिद्ध आहे.  त्या प्रयोगाचे नाव विश्व - 25 असे आहे. हा प्रयोग 1972 साली केला गेला. या प्रयोगापूर्वी मालथसचा लोकसंख्या वाढीसंबंधीचा सिद्धांत मान्यता प्राप्त होता. त्यात मालथस ने म्हटलेले  होते की, जास्त लोकसंख्येमुळे लोक दाटीवाटीने राहतात, त्यामुळे रोगराई वाढते आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात मरतात. पण त्याच सिद्धांताबरोबर कॅल्हूनचा सिद्धांतही लोकप्रिय  झाला व खरा मानला गेला. तो असा की, लोकसंख्या जास्त नसतांना सुद्धा लोक विषमतेने मरतात. उदाहरणार्थ ग्रामीण भारतात भरपूर जागा आहे. पण विषमतेमुळे शेतकरी हजारांच्या  संख्येने आत्महत्येच्या रूपाने मरत आहेत. याचाच अर्थ दाटीवाटी नसतानासुद्धा विषमतेमुळे लोक मरतात.

प्रयोग
कॅल्हूनने 9/4 फुटाचा एक चौरस हौद तयार केला. त्या हौदाच्या प्रत्येक भिंतीवर त्याने जाळ्याची बोगदे वजा बिळे बनविली. त्या बिळात भरपूर अन्नपाणी आणि स्वच्छ पाण्याची सोय  केली. त्या हौदात 3 हजार 840 उंदीर आरामत राहू शकतील अशी सर्व व्यवस्था केली. मग त्याने त्या हौदात चार नर व चार नर मादी उंदीर सोडले. सुरूवातीला सर्व काही कॅल्हूनच्या  अंदाजाप्रमाणे झाले. दर 50-55 दिवसांमध्ये उंदरांची संख्या दुप्पट होत गेली. मात्र काही दिवसांनी उंदरांची वर्तणूक बदलली. माद्या गर्भगळीत होण्याचे प्रमाण वाढले. त्या पिल्लांची  काळजी घेईनाशा झाल्या. काही उंदीर विनाकारण इतर उंदरांपासून फटकून एकटे राहू लागले. ते बिळातच राहत व ईतर उंदीर झोपल्यावर बाहेर येऊन अन्नपाणी घेत. इतर सगळा वेळ  ते स्वतःला चाटून पुसून स्वच्छ व सुंदर ठेवण्यात घालवू लागले. ते सदृढ झाले. इतर उंदरांपेक्षा त्यांचा आकार मोठा झाला. ते दुसऱ्या उंदरावर हुकूमत गाजवू लागले. त्यांचे लैंगिक  व्यवहारही बदलले. सामाजिक व्यवहार सुद्धा बदलले. या उंदरांना कॅल्हूनने ’सुंदर लोक’ अर्थात ’अलाईट्नलास’ असे संबोधले. इतर उंदरांची मात्र दाटीवाटी सुरू झाली. ते गटागटाने राहू  लागले. त्यांच्यात वाईट सवयी वाढू लागल्या. समलैंगिक संबंधही सुरू झाले. एकमेकांना जीवे मारून खाण्यापर्यंत त्यांची मजल गेली. बलात्कार वाढले. काही उंदरांनी हल्ल्यापासून  स्वतःला वाचविण्याचा प्रयत्नही सोडून दिला. अखेर 560 व्या दिवशी उंदरांची संख्या 2 हजार 200 वर पोहोचली. त्यानंतर मात्र एकेक करत अलाईड्नलास उंदरासह सर्व उंदीर मरण पावले.
म्हणजे 3 हजार 840 उंदरांना साठविण्याची क्षमता असलेल्या हौदात 2200 उंदीर म्हणजे क्षमतेच्या 57 टक्क्यांवर आली. हे सगळे हौदातील व्यवस्था कोलमडल्याने त्यातून निर्माण  झालेल्या विषमतेमुळे घडले. कारण सुंदर लोक हौदात प्रमाणाबाहेर जागा बळकावत होते. म्हणून इतर उंदरांमध्ये दाटीवाटी वाढली होती. त्यामुळे ते आपली सामाजिकता व उंदीरपणच  गमवून बसले होते. म्हणजे हौदाचे संतुलन कोलमडण्याचे मूळ दाटीवाटीत नाही तर विषमतेत होते. याला कॅल्हून ’बिहेवियरल सिंक’ म्हणजे ’वर्तन डोह’ असे नाव देतो. विषमतेमुळे  जनतेत हिंसकपणा आल्याने जनता त्या गर्तेत जाते. त्यावर वेळेवर राज्य व्यवस्थेकडून विषमता दूर करण्याचे उपाय झाले नाहीत तर सर्व जनता नष्ट होते. त्यात अलाईट्नलास  मधील सुंदर लोकही संपतात. हा नियम माणसांनाही लागू होतो.
विषमतेसंदर्भात लिहिल्या गेलेल्या’अ‍ॅन एस्से ऑन गव्हर्नमेंट’ नावाच्या एका निबंधामध्ये जेम्स नावाचा लेखक म्हणतो, ’’माणसांचा आपल्या आकांक्षापूर्तीसाठी दुसऱ्याचे हिरावून घेण्याकडे  कल असतो. ज्यांचे हिरावून घेतले जाते त्यांना जेमतेम जगता येईल, अशा स्थितीत लोटले जाते. त्यांना तीव्रतम भितीला सामोरे जावे लागते. असाधारण क्रौर्य दाखवले जाते. म्हणून  दुसऱ्यांचे हिरावून घेणे टाळणे गरजेचे आहे. ज्यांच्यामुळे विषमता वाढते ती कारणे नष्ट करणे किंवा नियंत्रणात ठेवणे हे शासनाचे पहिले कर्तव्य आहे.’’ उत्पादनाची साधणे न वाढणे  ह्यापेक्षा तीव्रतम क्रौर्य दूसरे नाही. त्यात टॅक्सचा बोजा जास्त नसावा. नसता विषमतेत भर पडते. म्हणून सरकारांनी कर योजना विचारपूर्वक आखावी.

- एम.आय. शेख.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget