Halloween Costume ideas 2015

मुल्याधिष्ठित व्यक्तीमत्व

अशफाक अहेमद यांना मी लहानपणापासून ओळखत होतो. ते अतिशय मुल्याधिष्ठित व्यक्तीमत्व होते. इस्लामी मुल्यांमध्ये त्यांची गाढ श्रद्धा होती व ही मुल्य विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून रूजविण्याकडे त्यांचा कल होता. म्हणून त्यांनी स्वत: महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच लहान मुलांसाठी ’नूरी महेफिल’ नावाची चळवळ सुरू केली होती. त्यात ते दर आठवड्याला जवळपासच्या बालकांना एकत्रित करून जीवनाचा उद्देश काय असावा? नैतिकतेचे जीवनामध्ये स्थान काय?, इस्लामी नितीमत्ता जीवन जगण्यासाठी किती महत्वपूर्ण आहे? चांगली वर्तणूक कशी असावी? या बाबतीत ते अतिशय तळमळीने मुलांना मार्गदर्शन करीत असत. त्यासाठी ते कुरआन आणि हदीसमधून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांच्या बालमनावर चांगला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत असत. आपल्या महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी मौलाना आझाद कॉलेजमध्ये सर्वप्रथम एसआयओची स्थापना केली होती. एसआयओच्या माध्यमातून त्यांनी अनेक सहपाठ्यांना आणि महाविद्यालयातील इतर शाखेतील विद्यार्थ्यांना जोडण्याचे मोलाचे कार्य केले. एवढेच नव्हे तर औरंगाबादच्या आझाद कॉलेजमध्ये आजूबाजूच्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या छोट्यामोठ्या गरजा पुरविण्याकडेही त्यांचे कटाक्षाने लक्ष असे. कोणाला पुस्तकं हवीत, कोणाला वह्या हव्यात, कोणाला पेन हवा, कोणाला राहण्यासाठी अडचण असेल, कोणाला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल, या सगळ्या बाबींकडे ते अतिशय कनवाळूपणे लक्ष देत. शिवाय, ते राहत असलेल्या मोहल्ल्यात आणि आजूबाजूच्या मोहल्ल्यातसुद्धा फिरून लोकांना नमाजसाठी बोलावत व इस्लामी शिक्षणाकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न असे.
    जेव्हा त्यांनी एम.ए.एमएड केले. तेव्हा त्यांनी मौलाना जाकीर हुसेन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून नियुक्ती मिळाली तेथे त्यांनी 5 वर्षे कार्य केले. दरम्यान, शिक्षक आणि प्राध्यापकांना त्यांनी त्यांच्या जीवनाचा उद्देश्य काय असावा? त्यांच्या व्यवसायाचा उद्देश्य काय असावा? व विद्यार्थ्यांप्रती त्यांची जबाबदारी काय असावी? त्यांची स्वत:ची वर्तणूक कशी असावी? यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याशी त्यांचा वैयक्तिक संपर्क होता. प्रत्येकाशी ते बोलायचे, त्यांच्या काही समस्या आहेत का त्या समजून घ्यायचेे. प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारणा करणे व प्रत्येकाची शक्य तेवढी मदत करणे हा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा महत्वाचा गुण होता. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावर अभ्यासाचे महत्व बिंबविण्यामध्ये त्यांचा हतकंडा होता.

- प्रा.वाजीद अली खान
(अध्यक्ष, जेआएच औरंगाबाद साउथ)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget