Halloween Costume ideas 2015

इस्लाममध्ये मानवी जीवाचे महत्त्व

-एम. एम. शेख

अल्लाहतआला, जो सर्वशक्तिमान आहे, जीवसृष्टीचा निर्माता आणि पालनकर्ता आहे. अल्लाहतआलाने या सृष्टीमध्ये अनेक जीवांची निर्मिती केली. जमिनीवर, आकाशात आणि समुद्रामध्ये- पशू, पक्षी, जलचर जीव इत्यादी. परंतु या संपूर्ण जीवांमध्ये मानवी जीवनाला सर्वश्रेष्ठत्व अल्लाहने प्रदान केले. मानवी जीवन एकदाच आहे. पुन्हा पुन्हा जीवन मिळत नाही, हे कुरआनने प्रभावासह स्पष्ट केले आहे. अशा अमूल्य मानवी जीवनासंबंधी कुरआनने अत्यंत स्पष्टपणे मार्गदर्शन केले आहे.
अल्लाहचे प्रेषित ह. मूसा (अ.) यांच्या जनसमूहाला संबोधन करून त्यांना आदेश देण्यात आला आहे.
‘‘ज्याने एखाद्याचा नाहक खून केला (त्या मृत व्यक्तीने एखाद्याचा खून किंवा पृथ्वीतलावर उपद्रव (फितना) माजविण्याचे कृत्य केले नव्हते तर त्याने (खून करणाऱ्याने) जणू समस्त मानवजातीला ठार मारले. आणि जर एखाद्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही समस्त मानवजातीला जीवन प्रदान केले.’’(दिव्य कुरआन, सूरह माइदा, आयत क्र. ३२)
मानववंश टिवूâन राहण्यासाठी एक दुसऱ्याच्या प्राणाचा आदर प्रत्येकाच्या मनात असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने एक दुसऱ्याच्या जीवनरक्षणाची भावना बाळगणे अत्यावश्यक आहे. जो कोणी अकारण एखाद्याची हत्या करतो तेव्हा तो फक्त एकावरच अत्याचार करीत नाही, तो खुनी दुसऱ्याची नाहक हत्या करून सिद्ध करतो की जीवनाच्या आदरसन्मानाने त्याचे हृदय रिक्त आहे. त्याला मानवी सहानुभूती नाही. म्हणूनच तो संपूर्ण मानवतेचा शत्रू आहे. नाहक हत्या करून तो समस्त मानवजातीविरूद्ध पाऊल उचलतो. खरे महत्त्व प्राणाची कदर आहे. मनुष्य हत्या करतो तेव्हा त्याच्या मनात मनुष्यप्राणाविषयी आदर शिल्लक राहत नाही. अशा अवस्थेतील मनुष्य संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक ठरतो. अशा व्यक्तीमध्ये असलेला दुर्गुण इतर मानवांत येत असेल तर संपूर्ण मानवजात नष्ट होऊन जाईल. याविरूद्ध जो मनुष्य एखाद्या मानवाचा जीव वाचवितो, इतरांच्या जीवाचे रक्षण करतो, तो खरे तर समस्त मानवजातीचा आदर करणारा आहे. कारण त्यात जे वैशिष्ट्य सापडते त्यावरच मानवता टिकून आहे.
मानवामध्ये खुनशी वृत्ती का आणि कशी उद्भवते? याचे स्पष्टीकरण कुरआनने स्पष्टपणे उघड केले आहे. आद्य मानव ह. आदम (अ.) हे प्रथम प्रेषित होते. त्यांना दोन पुत्र होते. ‘तौरात’ ईशग्रंथात त्यांची नावे काईन (काबील) आणि हाबील आहेत. मानवजातीच्या आरंभकाळातील एका महत्त्वपूर्ण घटनेचा उल्लेख तौरात (बायबल) मध्ये आहे. परंतु त्यातील बोधप्रद भाग नाहीसा करण्यात आला आहे. दिव्य कुरआनने या घटनेचे काहीही उणेअधिक न करता वर्णन केले आहे, त्याच्या उद्दिष्टासह स्पष्ट केले आहे.
‘‘आणि जरा यांना आदम (अ.) च्या दोन मुलांची गोष्टदेखील पूर्णपणे ऐकवा. जेव्हा त्या दोघांनी (आदमपुत्रांनी) कुर्बानी दिली तेव्हा त्यांच्यापैकी एकाची कुर्बानी स्वीकारली गेली. दुसऱ्याची स्वीकारली गेली नाही. त्याने सांगितले, ‘‘मी तुला ठार मारीन.’’ त्याने उत्तर दिले, ‘‘अल्लाह तर पापभीरू लोकांच्याच भेटी स्वीकारतो. जरी तू मला ठार मारण्यासाठी हात उचलशील तरी मी तुला ठार मारण्यासाठी हात उचलणार नाही.’’ मी समस्त विश्वांचा स्वामी, पालनकर्ता अल्लाहच्या प्रकोपाला भितो.’’ (कुरआन, सूरह माइदा, आयत २७)
काबीलच्या मनात मत्सर निर्माण झाला की हाबीलची कुर्बानी कशी स्वीकृत झाली व त्याची स्वत:ची कुर्बानी का स्वीकृत झाली नाही. या मत्सरापायीच त्याने आपल्या निरपराध भावाला ठार मारले. यावरून निष्पन्न होते की मत्सर असा भयंकर रोग आहे, जो माणसाला हत्येसारख्या घोर अपराधाकरिताही उद्युक्त करतो.
पृथ्वीवर हे पहिले मानवी रक्त होते जे जमिनीवर सांडले गेले होते. त्याच्या रक्तपाताच्या पापात, आदम (अ.) चा पहिला पुत्र सहभागी होतो, कारण तो पहिला मनुष्य आहे ज्याने हत्येची पद्धत प्रचलित केली. (हदीस : मुस्लिम किताबुल कसास)
कुरआनमध्ये या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करण्याचा मूळ उद्देश यहुदी लोकांच्या कटकारस्थानांवर सूक्ष्म दृष्टीने निंदा करणे आहे, जे त्यांनी इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) व त्यांच्या प्रतिष्ठित सहाबा (सहकारी) यांना ठार मारण्यासाठी केले होते. (कुरआन, अध्याय ५, आयत ११)
आज जगात सर्वत्र द्वेष, मत्सर याचा मोठा पगडा रिवाज आहे. त्यामुळे क्षुल्लकशा कारणामुळे माणूस माणसाला ठार मारण्यासाठी उद्युक्त होत आहे. अशा लोकांची अत्यंत कठोर शब्दांत निर्भत्र्सना करीत कुरआन आदेश देतो की,
जे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांच्याशी युद्ध करतात आणि पृथ्वीवर उपद्रव माजविण्याकरिता हिंसाचार माजवतात, त्यांची शिक्षा ही आहे की ते ठार मारले जातील, अथवा सुळावर चढविले जातील अथवा परस्पर विरूद्ध दिशेने त्यांचे हातपाय कापले जातील अथवा त्यांना देशांतर करावयास लावले जाईल. हा अपमान व नामुष्की तर त्यांच्यासाठी दुनियेत आहे आणि मरणोत्तर जीवनामध्ये त्यांच्यासाठी याहून मोठी शिक्षा आहे.’’ (कुरआन, सूरह ५, आयत ३३)
शेवटी सर्वशक्तिमान अल्लाहकडे मी दुआ करतो की, समस्त मानवांना सुबुद्धी दे. एकमेकांच्या जीवनाचा आदर, रक्षण करण्याची सद्गती दे.
अल्लाहच्या आदेशानुसार (दिव्य कुरआन) आणि अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कृतिशील जीवनानुसार (सुन्नत) प्रत्येकाला जीवन जगण्याचे मार्गदर्शन प्राप्त होवो. द्वेष, मत्सर, हिंसाचारापासून मुक्तr मिळो. (आमीन)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget