Halloween Costume ideas 2015

रमजान महिना आणि आत्ममूल्यांकन


रमजान महिना आला की मनात आनंद निर्माण होतो आपण रमजानच्या तयारीला रमजान अगोदरपासूनच लागलेले असतो रमजान म्हटले की एक चित्र समोर येते ते म्हणजे भक्ती  भावाचे जिकडे पहा तिकडे भक्तीने रंगलेला समाज आपल्याला दिसतो या महिन्यात लोक आवर्जून ईश्वराची उपासना करतात नमाज पठण करतात रोज ठेवतात, जकात देतात आणि पुष्कळ काही उपासना करतात.

हा महिना सर्व मानव जातीसाठी आहे परंतु काहीच लोक या महिन्याचा लाभ घेतात दिव्य कुराण अवतरणाचा सोहळा या महिन्यात साजरा होतो दिव्य कुराण हा पृथ्वीवरील अखिल मानव जाती करिता मार्गदर्शक असा ग्रंथ आहे. अल्लाहने मानवाला कल्याणाचा मार्ग दाखविण्याकरिता हा पवित्र ग्रंथ अवतरविला आहे. रमजान महिना ही अल्लाहने दिलेली एक परीक्षा आहे व्यक्तीत आपल्या इच्छा वासनांना काबूत ठेवण्याचा बळ निर्माण होतो रमजान महिन्यात दिवसा उपवास करणे हे सर्व निरोगी प्रौढ मुस्लिमांचे अनिवार्य कर्तव्य आहे धार्मिक उपवासातून त्रास निर्माण करण्याचा उद्देश नाही रोजा मुळे जीवनाला योग्य वळण लागतो संयमशीलता, जिभेवर नियंत्रण ठेवणे हे मनुष्य शिकतो.

इस्लामचे पाच स्तंभ आहेत. यामध्ये एक रोजा हा एक स्तंभ आहे. रमजानमध्ये आपण अल्लाच्या  उपासना तर मोठ्या उत्साहात पार पाडतो, परंतु रमजान गेल्यावर आपण ह्या उपासना विसरत जातो. एकेक करून आपण उपासना कमी करत जातो. रमजाननंतर आपल्याला आपले आत्ममूल्यांकन करणे गरजेचे आहे. आपण ह्या रमजान महिन्यात काय मिळवलं? रमजान महिन्याच्या आपल्याला काय फायदा झाला? किंबहुना आपल्याला यापासून काय प्राप्त झाले तर काय? आपण फक्त उपाशीपोटीच राहिलो का? रोजा ठेवण्याचे व उपासना करण्याचे आपल्याला काय फायदे झाले व आपण त्यापासून पुढच्या जीवनासाठी काय बोध घेतला? आपले जीवन आपण आता त्यानुसार कसं चालवणार? यावर आपल्याला आता विचार मंथन करावा लागेल आणि त्यानुसार आपल्याला आपले जीवन व्यतीत करावे लागेल.

हा संपूर्ण मानव जातीसाठी एक ट्रेनिंगचा महिना आहे. या सर्व प्रकारची ट्रेनिंग आपल्याला मिळते, त्यानुसार आपण आपले पुढचे ११ महिने व्यतीत करू शकतो व आपले जीवन इस्लामच्या दृष्टिकोनाप्रमाणे जगू शकतो. आपण आपल्या आत्म मूल्यांकनामध्ये हे बघावे की आपल्या मनाची स्वच्छता झाली का मनात राग, क्रोध, छल, कपट राहिला नाही ना? कारण ह्यापासून आपल्याला दूर राहावयाचे आहे. आपल्यात सत्कर्म आले का, कारण ईश्वराला सत्कर्म फार प्रिय आहे. क्षमा करण्याची शक्ती आपल्यात आली पाहिजे कारण रोजा सब्र शिकवितो. प्रत्येकाचे हक्क आपण बरोबर दिले की नाही याची जाच ही करायला हवी, कारण याची विचारणा अल्लाहकडे आहे आणि त्यामुळे ऐहीक आणि पारलौकिकरित्या माणूस यशस्वी होतो.

रमजानचा खरा उद्देश माणसात तकवा म्हणजे ईशभय निर्माण होणे हे आहे. तर हे आपल्याला निर्माण झाले की नाही याची पण पडताळणी आपल्याला करावी लागेल. आपण कुराण तर वाचले पण ते आपल्याला कळले का? आपण त्यात भाषांतराद्वारे समजण्याचा प्रयत्न केला का? कारण ईश्वराप्रमाणे आपल्याला त्याच्यावरही प्रेम करायचे आहे. तो ईश्वराने आपल्या फायद्यासाठी पाठविलेल्या ग्रंथ आहे. या महिन्यात सर्वाधिक महत्त्व जेवढे उपासनेला आहे तेवढेच दान देण्याला आहे. त्यामुळे हा महिना दानत्व प्रदान करणारा आहे. तरीही दान देण्याची सवय आपल्याला पुढेही चालू ठेवायची आहे न की रमजानपुरतीच. लोक रमजानमध्ये सत्तर पटीने जास्त पुण्य प्राप्त होते. म्हणून फक्त रमजानमध्येच दान करतात, परंतु आपल्याला ही सवय आयुष्यभर सोडायचे नाही. आपल्या प्रेषितांजवळ (सल्ल.) खायला नसायचे पण ते नेहमी दानपुण्य  करायचे. त्यांच्या पत्नीपण  त्यांच्याजवळ आले ते लवकरात लवकर दान करीत असे. आपल्याला रमजानद्वारे सर्वात प्रथम आपली आत्मशुद्धी करावयाची आहे आणि ईश्वराने दाखविलेल्याच मार्गावर आपल्याला चालावयाचे आहे. या समाजाला एक उत्कृष्ट व्यक्तित्व घडवून दाखविण्याचा प्रयत्न करायचा आहे.

- परवीन खान

पुसद


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget