Halloween Costume ideas 2015

आपण लोकशाही राष्ट्रात राहतो याचा अभिमान असावा

Democracy

विधानसभेबाबत आपण फक्त आमदार निवडून देतो ज्या पक्षाच्या आमदार जास्त तो पक्ष विजयी होतो. त्यातील एकाची मुख्यमंत्री म्हणून निवड होते. कधी-कधी  तर दोन किंवा अधिक पक्ष एकत्र येऊन सरकार बनवतात तर कधी दोन पेक्षा अधिक पक्षांचे राजकारण हे आम्हाला कळत नाही. राजकारण्यांचा अंतिम उद्देश सरकार स्थापन करणे हाच असतो. मंत्रिमंडळात मंत्रिपद कसे मिळेल यासाठी ते शत्रूलाही मित्र मानतात. निवडणुकीनंतर त्यांचे वैर संपते परंतु आम्ही मूर्ख कट्टर कार्यकर्ते म्हणून लोकांशी, आपल्याच  बांधवांशी राजकीय वाद विवाद करतो. आम्ही निवडणुकांत विवेकी नसतो हे मान्य करावे लागते. मागील दोन पिढ्यांपासून जे मतदारसंघाची दूर्दशा करतात विकासाऐवजी धर्मांधतेचे डोस देतात त्यांनाच आम्ही पुन्हा-पुन्हा निवडून देतो कारण काय असेल? मतदारसंघातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समस्या सुटतात का? तरीपण निवडून देतो आम्हाला आमचे नेतृत्व दर पाच वर्षाला बदलण्याचे स्वातंत्र्य असते कदाचित लोकांना याचा विसर पडतो. जर तुमचा नेता काम करीत नसेल तर तो बदलण्याचा अधिकार निवडणुकीत मतदारानां मिळालेला आहे पण या अमुल्य मताचा वापर आम्ही करतो का? समाजाचे नेतृत्व करणारे नेते निवडताना आम्ही त्यांची योग्यता पाहत नाही.
    युवकानी जागृत झाले पाहिजे व विचार केला पाहिजे, पुरोगामीही युवकांची दिशाभुल करतात. अनेकांचे लिखान जमातवादाकडे झुकत चालले आहे. आज महाराष्टात जमातवादी लिखान पुरोगामी लेखनीतून मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या पुरोगाम्यांच्या विचारांची ही चिकित्सा होणे गरजेचे आहे. धर्मनिरपेक्ष देशात विचारांची सूट असते. पुरोगाम्यात समाजवादी, मार्क्सवादी, गांधीवादी, अंबेडकरवादी इत्यादि विचारधारा आहे व यांच्यात खुप वैचारिक मतभेद आहेत. ज्यातून हल्ली वाद निर्माण होत राहतात. या मतभेदातून प्रतिगामी विचारधारा भक्कम होत आहे.
    युवकांनी विवेकवादी व मानवतावादी असायला हवे . प्रतिगामी विचारधारेने पुरोगाम्यात फुट पाडण्याचा सफल प्रयत्न केला आहे. आज फुटाफुटीचे राजकारण होत आहे, ज्या प्रकारे प्रत्येकजण आपला महापुरुष निवडून त्याचीच जंयती साजरी करतात व एकसंघ राहण्याऐवजी जातीत विखरतात. त्याच प्रमाणे प्रत्येक विचारधारेने आपले स्वतंत्र व्यासपीठ निर्माण केले आहे .
    भारतीय राजकारणांची दूसरी बाजू अशी ही आहे. आज ही भारतात काही प्रमाणात का असेना कायद्याचे रक्षणकर्ते आहेत. आज ही काही प्रमाणात प्रामाणिक व कर्तृत्वान नेते आहेत.  ज्यांचे चरित्र निष्कलंक असून ज्यांच्यात स्वार्थी भावना नाही. समाजात त्याना मान ही मिळते, हे राजकारणी जरी असले तरी ते समाजकारणी असतात व ते नेहमी समाजाचाच विचार करतात. असे थोडेच मोजके लोक आहेत जे चांगले आहेत. नेतृत्व समाजाला लाभते म्हणून आज आमचा लोकशाही व निवडणुका यावर विश्‍वास आहे. हे राजकारणी समाजाकडे विकासाच्या दृष्टीने बघतात. शैक्षणिक, आर्थिक, आणि सामाजिकस्थिती सुधारून लोकांचे राहणीमान कसे उंचावता येईल याचा विचार करतात. असे राजनेते कमी आहेत पण  अनेक  समाजसेवक राजकारणात येण्यास उत्सुक असतात. त्यांना आपले नेतृत्व करण्याची संधी द्या .समाजसेवी लोकांना निवडणुकीत उभे करा .त्यांना निवडून आणा ते तुमच्या स्थिती बदल करू शकतील.
    आजच्या माझ्या या युवा पिढीला सांगु इच्छितो की, आज युवा पिढी धर्मांध नेत्यांच्या विचारांच्या आहारी गेली तरी अनेक युवक हे समाज प्रबोधन करतात. लोकांना जागृत करून त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देतात., असे युवक कमी असले तरी त्यांचे काम हे उल्लेखनीय आहे.
    आपण लोकशाही राष्ट्रात राहतो याचा अभिमान असावा. हुकूमशाही पेक्षा लोकशाही कधीही श्रेष्ठ आहे. पैशाच्या व गुंडगिरीच्या आधारे लोक निवडून येतात परंतु निस्वार्थी समाजसेवा करणारे ही आहेत व नविन नेतृत्व करण्यासाठी लोक पुढे येत आहेत.
     वरील सर्व लिखाणातून मी देशात धर्मांधता वाढत आहे हे  सांगीतले. परंतु धर्माची निंदा केली नाही. सर्वधर्म मला सारखे आहेत. परंतु जेव्हा चिकित्सा करतो तेव्हा पक्षपात करीत नाही. व्यक्तिगत जीवनात  धर्माला मी महत्त्व देत नाही, परंतु लोकांनी ही देेऊ नये असा आग्रह नाही . भारताला समाजसुधारकांची एक दीर्घ परंपरा लाभली. ज्यात त्यांनी धर्मातील रूढी- परंपरा वर टीका केली व सुधारणा केली, परंतु त्या काळी लोकांनी त्याचा थोडा का होईना स्वीकार केला परंतु आज धर्माची चिकित्सा करणे शक्य नाही त्यातील एक म्हणजे लोकांची मानसिकता  की धर्म कसेही असो यावर बोलूच नये.
    मुळ वाद हा नाही की लोक धार्मिक आहेत. सांगायचे हेच की लोकांच्या श्रद्धेचा, भावनांचा , राजकारण्यांनी फायदा उचलवू नये. आज भारताचे जे काही राजकारण होते ते धर्माच्या आधारे होत आहे. विशिष्ट धर्मातील एक व्यक्ती किंवा एक व्यक्ती समूहाने सामाज विघातक कृत्य किंवा देशद्रोही कृत्य केले, तर सबंध समाजाला वेठीस धरणे धरले जाते. परंतु तो व्यक्ति किंवा समूह हा संपूर्ण धर्म व त्या धर्मातील संपूर्ण व्यक्ती नाहीत हे लक्षात घेतल्या घेतल्या जात नाही,  त्यामुळे राजकारणी या मुद्द्यांच्या आधारे आपले स्वार्थ साध्य करीत असतात.
    गाव शहरापासुन पासून पाचशे ते हजार किलोमीटर दूर एक शहरात जातीय संघर्ष निर्माण झाला तर याचे पडसाद व परिणाम या गावापर्यंत येतात. वर्षानुवर्ष एकत्र  राहिलेल्या लोकांत दुरावा निर्माण होतो. कारण त्या गावातील लोक जाती-धर्माच्या व्यक्तीचे समर्थन करतात ते पण वास्तविकता माहिती नसताना. मुळात गरजच काय असते?
    भारत हा एकमेव असा देश आहे की जेथे विविधता तर पहावयास खूप मिळेल पण एकता ही आहे. प्रत्येक व्यक्तिला स्वधर्माचा अभिमान आहे धार्मिकआचरण स्वातंत्र्य सर्वांन च असतात. त्यामुळे कोणीही स्वधर्म अभिमान व इतर धर्मीयांकडे संशयित नजरेने पाहू नये. असो भारतात धार्मिक विविधता तर आहे त्याच बरोबर सांस्कृतिक विविधता आहे मैल-मैल अंतरावर भाषा व संस्कृती बदलते. त्याचबरोबर भारतात जातीय विविधता आहे , भारतीय समाज अनेक जातीत विखरललेला आहे.  धर्म, जात ,भाषा, संस्कृती इत्यादींचा लोकांना अभिमान असतो व असायलाच हवा गेल्या हजारो वर्षा पासुन  यातील अनेक मूल्यांनी समाजाला एकसंघ केले आहे.
     जगात कोणताही असा धर्म नाही जो नैतिकता सांगत नाही.  मुळ धर्मांची निर्मिती ही नैतिक मूल्यांची व सद्गुणांची शिकवण देण्यासाठीच झाली. धर्माच्या नावाखाली लोक हिंसेच्या मार्गाचा अवलंब करी असतील तर त्याच लोकांच्या श्रद्धेचा , आस्थेचा उपयोग मूठभर लोक आपल्या स्वार्थासाठी करीत असतील तर हे योग्य नाही.
    भारतीय लोकांत धर्म जात खोलवर रूजल्या गेली आहेत.  हिंदू- मुस्लिम  किंवा इतर कोणत्याही धर्माचे अनुयायी असो त्यांच्या मनात हे  रुजवले गेले की, आपला धर्म आपली श्रद्धास्थाने आपली उपासनागृहे संकटात आहेत. वास्तविकपणे सामान्य लोकांना दोन वेळच्या अन्नाची गरज असते परंतु जेव्हा हे विचार त्यांना सांगितले जातात त्यांच्या श्रद्धेला धक्का बसतो व ते त्या विचारधारेच्या समर्थनात पुढे येतात.
    कट्टरवादी ,धर्मांध व जातीयवादी लोक प्रत्येक धर्मात प्रत्येक जातीत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे अशा धार्मिक गोष्टींकडे लक्ष देऊ नये. विवेक बुद्धी आता तरी लोकांनी वापरून यांच्या राजकारणांची व विचारांची चिकित्सा करावी.
    आज शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. हजारो खाजगी शाळा उघडल्या जात  आहेत. त्याच बरोबर सरकारी शाळेचा दर्जा खालावला आहे असा समज समाजात निर्माण झाला असून हे पुर्णता: सत्य नाही.
    जरी काही प्रमाणात दर्जा खालावला असला तरी सरकारी शाळेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंग्रजी,सेमी यातुन श्रीमंत व मध्यमवर्गीय मुले शिकत आहेत परंतु गरीब मुलाना पर्याय नाही. या व्यवस्थेत गरीबांची मुले तर दर्जेदार शिक्षण घेण्यापासुन वंचित आहेत.
 सरकार ने शिक्षण सक्तीचे व मोफत केले तरी अनेक गरीब कामगार वर्ग व अल्पभुधारक यांची मुले जरी शाळेत जात असले तरी त्यांच्या गुणवत्तेचे प्रमाण खुप कमी  आहे. बाल मजुरी कायदा असुन ही लहान मुले काम करतात.ही समाजातील विषमता राजकारण्यांना व पुरोगाम्याना दिसत नाही का?
    या कोरोना संकटामध्ये कामगार हजारों किलोमीटर पायी चालले, लोक मेले लोकांची उपासमार झाली, तरी या व्यवस्थेतील लोकांच्या काळजाला पाजर फुटले नाही. मार्क्सवादी विचारधारेच्या लोकांनी तर विषमता व वर्ग संघर्ष यावर बोलावे परंतु पाहिजे त्या प्रमाणे मार्क्सवादीही या व्यवस्थेला प्रश्‍न करतांना दिसत नाही. त्यांच्यात धाडसी मोजकेच लोक आहेत.
    आज लोकांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे प्रत्येक धर्म जातीतील लोक एकमेकांच्या कडे संशयित नजरेने पहात आहेत .अशा प्रकारे संशयित नजरेने  पाहतात तेव्हा आमच्या सारख्याना चिंता व खूप :ख होते. म्हणून लेख लिहीत रहावे लागते थोडे का होइना लोक विचार करतील. पूर्वी काही प्रमाणात का असेना धर्मांधता व जातीयता होती लोक होते, परंतु आता खूपच भयानक परिस्थिती निर्माण झाली. यास धर्मांध राजकारण काही प्रमाणात कारणीभुत आहे पण यासाठी जास्त जबाबदार आमची मानसिकता आहे.     
    धर्मांध लोकांनी येथील सामान्य लोकांची मने दुषित केली. पुर्वी  खेड्या गावात तर पूर्वी लोक गणपती उत्सवात आनंदाने सामील व्हायचे एकत्र दिपावली साजरी करायचे. ईद असो वा इतर  मुस्लिम सन हिंदू बांधव आनंदाने एकत्र यायचे. भारतीय सण हे एकात्मतेचे प्रतीक होते जे आज वादाचे मुद्दे झालेत.
    मी  दर वर्षी  राखी बांधून घेतो. हे आमच्या अभिमानाच्या जागा नष्ट करून पाहणार्‍या लोकांची मानसिकता लवकरात लवकर लोकांच्या लक्षात यावीत नाही तर   खूप वेळ निघून जाईल. तेव्हा ह्या आमच्या  अभिमानाच्या जागा नष्ट करू पाहणारे लोक सर्रास समाजात दिसून येतात परंतु आम्हीच का  बदलून गेलो यांच्यामुळे? का एकमेकांकडे संशयित नजरेने पाहतो? मैत्री स्नेह व एकमेकांच्या सुख-:खात सहभागी झालेले विसरून गेलोत व जात आहेत. पूर्वी शिक्षणाचे प्रमाण कमी होते स्वातंत्र्यापूर्वी तर हे प्रमाण खूपच कमी होते  पुर्वी अडाणी लोक होते  परंतु ते कधी इतक्या प्रमाणात धर्मांध व जातीय राजकारणाला बळी पडलेले दिसत नाही. आज आम्ही पदव्युत्तर शिक्षण घेऊनही व समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढूनही वैचारिकदृष्ट्या निरक्षरच आहोत, या शिक्षण प्रणालीतुन आम्ही विवेकवाद शिकलोच नाही असे जाणवते. मानवतावादी मूल्यं आजच्या युवा पिढीला माहीत नाहीत काय ? फायदा काय त्या शिक्षणाचा ज्यातून राष्ट्राच्या विकासाला हातभार लागत नाही उलट धर्मांध राजकारणाला बळी पडून आम्ही मानवता विसरून गेलो.

- नजीर महेबूब शेख  
9561991736


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget